आर्ट ऑफ डाइंग - मृत्यूवर प्रेम करण्याची कला हा सोत्रींचा दिवाळी अंकातला लेख वाचून; जनमानसात अप्रिय असणार्या पण वास्तविकात अत्यंत मोहक अशा या विषयावर लिहिण्याचा मोह आवरला नाही. ही घ्या दिवाळी निमित्त सर्वांना एक अनमोल भेट !
१. मृत्यू ही काही फार भारी घटना नाही. पूर्वीच्या सिद्ध लोकांनी या गोष्टीचा उगीच मोठा लफडा करुन ठेवला आहे. संजीवन समाधी, (सोत्रींच्या लेखात वर्णन केलेली) जन्मभर करायची साधना, पुष्पक विमान, झालंच तर यम अँड रेडा वगैरे कल्पनांनी लोकांच्या मनात मृत्यूविषयी दहशत निर्माण करुन ठेवली आहे. वास्तविकात सिद्धाचा मृत्यू आणि सामान्याचा मृत्यू यात काहीएक फरक नाही कारण दोन्ही बाबतीत मृत्यू ही समान दैहिक घटना आहे.
इतर उत्सर्गांसारखाच मृत्यू हा संपूर्ण शरीराचा होणारा उत्सर्ग आहे इतकी साधी गोष्ट लक्षात आली की मग मरण्याची मौज काही और आहे. संभोगाची परमोच्चता उत्सर्गात आहे आणि ती केवळ इंद्रियाच्या दायर्यात होणारी घटना आहे. त्यामुळे (अजून मेलो नसलो तरी) संपूर्ण शरीराचाच उत्सर्ग होणं ही काय कमाल घटना असेल याची कल्पना कुणीही करु शकेल.
२. मुद्दा फक्त असा आहे की मृत्यूपूर्वी आपण देहापेक्षा वेगळे आहोत हा अनुभव यायला हवा. अज्ञानी लोकांनी याबाबतीत पण अध्यात्मात अनंत लफडी करुन ठेवली आहेत.
मुळात आपण देहापासून वेगळे आहोत ही वस्तुस्थिती आहे. थोडक्यात, देहापासून वेगळं होण्यासाठी साधना करायची करायची गरज नाही, विदेहत्व ही स्थिती ऑलरेडी आहेच. आपण देह झालेलो नाही आणि कदापि होऊ शकत नाही; आपल्याला फक्त देहाची जाणीव आहे. म्हणजे आपल्याला देह नाही तर 'देह आहे' ही जाणीव आहे. देहाला आपण आपला मानतो म्हणून आपण देहात आहोत, किंबहुना आपण देहच आहोत असा आपला गैरसमज झाला आहे. त्यामुळे देहाचा मृत्यू म्हणजे आपण संपलो असं वाटतं आणि ही मृत्यूची दहशत आहे.
दूर एक तारा आहे, आपल्याला तो दिसतोय, तो आहे याची जाणीव आहे, समजा तो निखळला तर आपल्याला आपण संपलो असं वाटत नाही, कारण त्या तार्याकडे आपण देहातून पाहतोय आणि तो देहापेक्षा वेगळा आहे याची आपल्याला कल्पना आहे. तद्वत, आपल्याला देहातून देहाची जाणीव होत असली तरी तारा आणि देह या एकसारख्याच जाणीवा आहेत, फरक फक्त अंतराचा आहे ! थोडक्यात, जशी तार्याची जाणीव होतेय अगदी तशीच (संपूर्ण) देहाची जाणीव झाली की तारा निखळला काय की देह उन्मळला काय दोन्ही एकच !
३. यासाठी एक अत्यंत सोपी साधना आहे. कोणत्याही निवांत वेळी, शांतपणे पाठ टेकून, बेड किंवा तुमच्या दिवाणावर बसा. एक कुशन मांडीवर ठेवा (त्यामुळे तुमचे खांदे स्क्वेअर राहतील) आणि त्यावर दोन्ही हात रेस्ट करा. फोटोतल्या सारख्या दोन्ही हाताच्या तर्जन्या अंगठ्याला जुळवून, त्या दोन्ही मुद्रा एकमेकात गुंफा. दोन्ही हाताची तिन्ही बोटं सहजपणे सरळ ठेवा; तर्जनी आणि अंगठ्याचे एकमेकात गुंफलेले गोल एकमेकांना स्पर्श करणार नाहीत याचं भान ठेवा.
आता शांतपणे समोर पाहा : तत्क्षणी तुमचे सगळे विचार थांबतील ! लोकांना ही निर्विचार स्थिती यायला तीस-पस्तीस वर्ष कायकाय साधना करावी लागते !
आता शांतपणे डोळे मिटा. तुमच्या लक्षात येईल की देह बसला आहे आणि आपल्याला संपूर्ण देहाची जाणीव होते आहे. यू आर ऑलमोस्ट डन !
४. आता ही साधना तुम्ही कधीही आणि कितीही वेळ करु शकता. जोपर्यंत तर्जनी आणि अंगठ्याचे गोल एकमेकांना टेकत नाहीत तोपर्यंत मनात कोणताही विचार उमटू शकत नाही. पहाटेच्या निवांत वेळी, कधी रात्री झोपण्यापूर्वी ही साधना करुन त्या निर्विचार अवस्थेची मजा घ्या. दरवेळी तुम्हाला संपूर्ण शरीराची जाणीव होईल, म्हणजे देह बसलाय आणि आपल्याला कळतंय हा अनुभव येईल.
तुम्ही या साधनेत रमायला लागलात आणि मन दीर्घकाल निर्विचार अवस्थेत राहायला लागलं की एक दिवस तुम्हाला एक भन्नाट अनुभव येईल : देह म्हणजे फक्त स्केलेटन आणि फ्लेश आहे, आत कुणीही नाही ! मेंदूत चाललेल्या मनाच्या अविरत बडबडी मुळे आणि दृश्य प्रक्षेपणामुळे आपल्याला आपण आत आहोत असा भास होत होता. वास्तविकात आत कुणीही नाही !
हा उलगडा एकदम अफलातून आहे; कारण आत मरायला कुणीही नाही ! आणि हा अनुभव आणखी सघन झाला की तुम्हाला कळेल, कुणाच्याही आत कुणीही नाही ! यालाच बुद्ध शून्यता म्हणतो. `शून्यवाद' असं काही नाही. ते बुद्धाचं आर्ग्युमंट नाही, तर शून्यता ही वास्तविकता आहे.
ही सार्वभौम शून्यता कळली की तुम्हाला मृत्यू म्हणजे संपूर्ण देहाचा उत्सर्ग आहे हे लक्षात येईल. आणि मग एका मृत्यूत हजार संभोगांची उत्कटता आहे असं का म्हटलंय ते कळेल !
_________________________________________
हा लेखाचा विषय नाही पण साधनेतून डायवर्शन होऊ नाही म्हणून लिहितो. बुद्धाला हा उलगडा आयुष्यभर साधना करुन सरते शेवटी आलेल्या हताशेत अचानकपणे झाला. त्यामुळे त्याला वास्तविकता कळली पण त्याप्रत पोहोचण्याचा मार्ग कळला नाही. त्यानं विपश्यना ही साधना शोधली आणि प्रचलित केली. याचा दुहेरी तोटा झाला; एकतर विपश्यनेतून शून्याचा उलगडा असंभव आहे कारण त्यात अनेक पायर्या आहेत आणि गेल्या अडीच हजार वर्षात कुणीही त्या साधनेनं सिद्ध झाला नाही. किमान मी जितक्या उघडपणे आणि सहजतेनं शून्यता मांडली आहे तितकी बुद्धाचा (किंवा विपश्यनेचा) कुणीही साधक मांडू शकला नाही. दुसरा तोटा असा झाला की शून्यता हा शून्यवाद (आर्ग्युमंट ) समजला गेला आणि तो निरिश्वर वादाशी जोडला जाऊन नैराश्यवाद मानला गेला. मग त्याविरोधात पूर्णवाद मांडला गेला. अशाप्रकारे अनूभवशून्य आणि आकलनहीन लोकांना विवादाशिवाय काहीही जमत नसल्यानं, एका सुरेख वस्तुस्थिचा अनुभव घेण्याऐवजी, गेली हजारो वर्ष तो केवळ वैचारिक मैथुनाचा विषय झाला.
इथले सदस्य विवादापूर्वी अनुभव घेतील अशी अपेक्षा करतो कारण अनुभवानंतर विवादाची गरज उरत नाही.
काही भाग संपादित
- मिपा व्यवस्थापन
आता शांतपणे समोर पाहा : तत्क्षणी तुमचे सगळे विचार थांबतील ! लोकांना ही निर्विचार स्थिती यायला तीस-पस्तीस वर्ष कायकाय साधना करावी लागते !
आता शांतपणे डोळे मिटा. तुमच्या लक्षात येईल की देह बसला आहे आणि आपल्याला संपूर्ण देहाची जाणीव होते आहे. यू आर ऑलमोस्ट डन !
४. आता ही साधना तुम्ही कधीही आणि कितीही वेळ करु शकता. जोपर्यंत तर्जनी आणि अंगठ्याचे गोल एकमेकांना टेकत नाहीत तोपर्यंत मनात कोणताही विचार उमटू शकत नाही. पहाटेच्या निवांत वेळी, कधी रात्री झोपण्यापूर्वी ही साधना करुन त्या निर्विचार अवस्थेची मजा घ्या. दरवेळी तुम्हाला संपूर्ण शरीराची जाणीव होईल, म्हणजे देह बसलाय आणि आपल्याला कळतंय हा अनुभव येईल.
तुम्ही या साधनेत रमायला लागलात आणि मन दीर्घकाल निर्विचार अवस्थेत राहायला लागलं की एक दिवस तुम्हाला एक भन्नाट अनुभव येईल : देह म्हणजे फक्त स्केलेटन आणि फ्लेश आहे, आत कुणीही नाही ! मेंदूत चाललेल्या मनाच्या अविरत बडबडी मुळे आणि दृश्य प्रक्षेपणामुळे आपल्याला आपण आत आहोत असा भास होत होता. वास्तविकात आत कुणीही नाही !
हा उलगडा एकदम अफलातून आहे; कारण आत मरायला कुणीही नाही ! आणि हा अनुभव आणखी सघन झाला की तुम्हाला कळेल, कुणाच्याही आत कुणीही नाही ! यालाच बुद्ध शून्यता म्हणतो. `शून्यवाद' असं काही नाही. ते बुद्धाचं आर्ग्युमंट नाही, तर शून्यता ही वास्तविकता आहे.
ही सार्वभौम शून्यता कळली की तुम्हाला मृत्यू म्हणजे संपूर्ण देहाचा उत्सर्ग आहे हे लक्षात येईल. आणि मग एका मृत्यूत हजार संभोगांची उत्कटता आहे असं का म्हटलंय ते कळेल !
_________________________________________
हा लेखाचा विषय नाही पण साधनेतून डायवर्शन होऊ नाही म्हणून लिहितो. बुद्धाला हा उलगडा आयुष्यभर साधना करुन सरते शेवटी आलेल्या हताशेत अचानकपणे झाला. त्यामुळे त्याला वास्तविकता कळली पण त्याप्रत पोहोचण्याचा मार्ग कळला नाही. त्यानं विपश्यना ही साधना शोधली आणि प्रचलित केली. याचा दुहेरी तोटा झाला; एकतर विपश्यनेतून शून्याचा उलगडा असंभव आहे कारण त्यात अनेक पायर्या आहेत आणि गेल्या अडीच हजार वर्षात कुणीही त्या साधनेनं सिद्ध झाला नाही. किमान मी जितक्या उघडपणे आणि सहजतेनं शून्यता मांडली आहे तितकी बुद्धाचा (किंवा विपश्यनेचा) कुणीही साधक मांडू शकला नाही. दुसरा तोटा असा झाला की शून्यता हा शून्यवाद (आर्ग्युमंट ) समजला गेला आणि तो निरिश्वर वादाशी जोडला जाऊन नैराश्यवाद मानला गेला. मग त्याविरोधात पूर्णवाद मांडला गेला. अशाप्रकारे अनूभवशून्य आणि आकलनहीन लोकांना विवादाशिवाय काहीही जमत नसल्यानं, एका सुरेख वस्तुस्थिचा अनुभव घेण्याऐवजी, गेली हजारो वर्ष तो केवळ वैचारिक मैथुनाचा विषय झाला.
इथले सदस्य विवादापूर्वी अनुभव घेतील अशी अपेक्षा करतो कारण अनुभवानंतर विवादाची गरज उरत नाही.
काही भाग संपादित
- मिपा व्यवस्थापन
वाचने
73995
प्रतिक्रिया
255
मिसळपाव
प्रतिक्रिया
गम्मत आहे खरी....
सिद्ध महाराजाना डीवचू नये !!
इथे सिद्ध महाराजांची दारं
Interesting experience
@ nanaba : सो नाईस ऑफ यू !
In reply to Interesting experience by nanaba
नमस्कार !!
In reply to Interesting experience by nanaba
नेमक्या शब्दात आणि नेटके
In reply to नमस्कार !! by अर्धवटराव
@अर्धवटराव - योग्य प्रतिसाद
In reply to नमस्कार !! by अर्धवटराव
तिला इथे काय लिहिलय ते अर्थातच सांगितलेलं नाही म्हणजे
In reply to @अर्धवटराव - योग्य प्रतिसाद by nanaba
मग ठीक आहे :)
In reply to तिला इथे काय लिहिलय ते अर्थातच सांगितलेलं नाही म्हणजे by nanaba
हे एक राहिलच..
In reply to तिला इथे काय लिहिलय ते अर्थातच सांगितलेलं नाही म्हणजे by nanaba
@ nanaba : स्वतःशी कनेक्ट होण्यात धोका तो काय ?
In reply to @अर्धवटराव - योग्य प्रतिसाद by nanaba
आपल्या निमित्तानं, ज्या सदस्याचे प्रतिसाद आपण अनुसरण्याचं
In reply to @ nanaba : स्वतःशी कनेक्ट होण्यात धोका तो काय ? by संजय क्षीरसागर
:)
In reply to आपल्या निमित्तानं, ज्या सदस्याचे प्रतिसाद आपण अनुसरण्याचं by संजय क्षीरसागर
@ nanaba : कुणाही व्यक्तीची अवस्था पुलंच्या बेंबट्यासारखी
In reply to :) by nanaba
"असे बुद्ध म्हणतो "अशी पुस्ती जोडून कल्पना दिली (कारण `पुलंनी म्हटलंय' असं सांगितल्याशिवाय लोक काही ऐकायलाच तयार होत नाहीत, तीच परिस्थिती आध्यात्माची आहे). तर सांगायचे तात्पर्य असे की ' देहात कुणीही नाही याची प्रचिती येईल' या आमच्या विधानाने त्यांच्या चाणाक्ष बुद्धीने हे हेरले की 'आमच्या साधनेनी त्यांची मृत्यूची भीती शून्य होईल' कारण मरायला देहात कुणीच नाही; उतार वयात यापरता दिलासा तो काय ? ते एक तर आहेच पण खरा दिलासा आम्हाला मिळाला हे इथे नम्रपणे नमूद करतो कारण आमच्या मातोश्रींनी आम्हाला दाखवून दिले की साधनेत कोणताही धोका नाही. शिवाय त्यांच्या चालण्यातही सध्या उत्साह जाणवतो, आमच्या अल्प मतीला असे वाटते की देहात कुणीही नाही या आमच्या विधानाने (साधनेमुळे यथावकाश तो त्यांचाही अनुभव होईल) त्या आनंदात असाव्यात. तरीही आनंदाचे कारण विचारुन त्याचा विरस करु नये हे एक आम्हाला बालपणी समजले होते, अर्थात तारुण्यात मात्र जगातल्या सर्व अध्यात्माचा सर्वांगिण अभ्यास केल्यावर आमच्या असे लक्षात आले की आनंद हा आपला स्वभावच आहे त्यामुळे निष्कारण आनंदात राहणे हे उचितच आहे.महाराज
In reply to @ nanaba : कुणाही व्यक्तीची अवस्था पुलंच्या बेंबट्यासारखी by संजय क्षीरसागर
भारी !
In reply to @ nanaba : कुणाही व्यक्तीची अवस्था पुलंच्या बेंबट्यासारखी by संजय क्षीरसागर
याचं करण म्हणजे...
In reply to :) by nanaba
जब्बर्दस्त प्रतिसाद.
In reply to याचं करण म्हणजे... by अर्धवटराव
वाह... जियो !!!
In reply to याचं करण म्हणजे... by अर्धवटराव
गवि, तुम्ही संक्षीना नीट
In reply to वाह... जियो !!! by सतिश गावडे
माझा हाच मुद्दा होता
In reply to गवि, तुम्ही संक्षीना नीट by आनन्दा
नामदेव - चमनदेव फरक !!
In reply to माझा हाच मुद्दा होता by सतिश गावडे
हो चुकून गविना लिहिला.
In reply to माझा हाच मुद्दा होता by सतिश गावडे
संक्षीना हाताला काहीतरी
In reply to गवि, तुम्ही संक्षीना नीट by आनन्दा
काऊ,
In reply to संक्षीना हाताला काहीतरी by कानडाऊ योगेशु
संक्षीना हाताला काहीतरी
In reply to गवि, तुम्ही संक्षीना नीट by आनन्दा
धन्यवाद सर. बाकी तुमच्याशी
In reply to संक्षीना हाताला काहीतरी by शाम भागवत
या निमित्तानं सर्वांना उपयोगी होईल असा प्रतिसाद देतो
हसून हसून पूरे वाट
In reply to या निमित्तानं सर्वांना उपयोगी होईल असा प्रतिसाद देतो by संजय क्षीरसागर
अष्टावक्रानं स्थितीचं वर्णन यथार्थ केलंय पण ती कशी येते याची त्याला कल्पना नव्हती. आज ते रहस्य तुम्हाला उघड झालं आहे.मी भाग दोन वर तुम्हाला विनोदी लेखक म्हटलं आहे आणि लेखाना विनोदी लेख ते उगाच नाही. लेखनाची उबळ आली की तुम्ही इथे येऊन काही तरी लिहीता आणि वर हे ही रेमटून देता की तुम्हाला जे कळलंय ते याआधी कुठल्याच ज्ञानी पुरुषाला कळले नव्हते. आणि आता ते इथे एका लेखात प्रतिसादात खरडल्याने समस्त मानव जातीचा उद्धार होणार आहे. असेच विनोदी लेखन अजून येऊ द्या. छान टाईमपास होतोय वाचताना.@ त्याचू वैलपान : आपला आध्यात्मिक अभ्यास फारच दांडगा दिसतो
In reply to हसून हसून पूरे वाट by संगणकनंद
अनावधानस्य सर्वत्र !
In reply to या निमित्तानं सर्वांना उपयोगी होईल असा प्रतिसाद देतो by संजय क्षीरसागर
एक शंका.
In reply to अनावधानस्य सर्वत्र ! by प्रसाद गोडबोले
सर्वत्रानवधानस्य हा दाखला
In reply to एक शंका. by शा वि कु
माझ्या मते
In reply to सर्वत्रानवधानस्य हा दाखला by आनन्दा
संजय क्षीरसागर यांना प्रतिसाद
कशाला हवं फिजिक्स आणि संशोधन
In reply to संजय क्षीरसागर यांना प्रतिसाद by गामा पैलवान
थोडा गंडलाय,
In reply to कशाला हवं फिजिक्स आणि संशोधन by आनन्दा
@ गामा पैलवान : तुम्ही नम्रपणे काहीही लिहिता आहात !
In reply to संजय क्षीरसागर यांना प्रतिसाद by गामा पैलवान
हे सायंटिफिक टेस्टिंग नव्हे
@ गामा पैलवान : इथे हायपोथिसिसचा प्रश्नच नाही !
In reply to हे सायंटिफिक टेस्टिंग नव्हे by गामा पैलवान
@ गामा पैलवान
नेहमीप्रमाणे
संजय क्षीरसागर यांना प्रतिसाद
@ गामा पैलवान : आपला २६ मुद्यांचा विक्रमी प्रतिसाद वाचला
In reply to संजय क्षीरसागर यांना प्रतिसाद by गामा पैलवान
बापरे! बरीच चर्चा झालीय.
ज्यांना आम्ही प्रतिसाद देऊ इच्छित नाही आणि
संक्षि तुम्ही
In reply to ज्यांना आम्ही प्रतिसाद देऊ इच्छित नाही आणि by संजय क्षीरसागर
@ शा वि कु : आपल्या या प्रतिसादाने आज आमची मतीच गुंग झाली आहे
In reply to संक्षि तुम्ही by शा वि कु
माझा (निनावी) उल्लेख केला
In reply to @ शा वि कु : आपल्या या प्रतिसादाने आज आमची मतीच गुंग झाली आहे by संजय क्षीरसागर
कपोलकल्पित घटना आहेत असे इथले
In reply to @ शा वि कु : आपल्या या प्रतिसादाने आज आमची मतीच गुंग झाली आहे by संजय क्षीरसागर
@ शा वि कु : असे नाही !
In reply to कपोलकल्पित घटना आहेत असे इथले by शा वि कु
आमच्या अल्पमतीने
In reply to ज्यांना आम्ही प्रतिसाद देऊ इच्छित नाही आणि by संजय क्षीरसागर
आमच्या अल्पमतीने आमचे मानसशास्त्राचे स्वल्प आकलन असे नम्रपणे नमूद करतो
बाप रे संक्षी कडून असे अनपेक्षित शब्द जालावर उमटले? मुंगीने मेरुपर्वत गिळला की समुद्र कोरडा झाला?आमच्या अल्पमतीने
In reply to आमच्या अल्पमतीने by सुबोध खरे
आमच्या अल्पमतीने
आमचे मानसशास्त्राचे स्वल्प आकलन
असे नम्रपणे नमूद करतो
बाप रे संक्षी कडून असे अनपेक्षित शब्द जालावर उमटले? मुंगीने मेरुपर्वत गिळला की समुद्र कोरडा झाला?फक्त शब्द बदललेत, भाव नाही...
In reply to आमच्या अल्पमतीने by सुबोध खरे
लेखकाचं सुदैवच म्हणायचं...
@ त्याचू वैलपान : आपल्या लेखमालेवर येणार्या
In reply to लेखकाचं सुदैवच म्हणायचं... by संगणकनंद
पुढचा भाग केव्हा येणार?
In reply to @ त्याचू वैलपान : आपल्या लेखमालेवर येणार्या by संजय क्षीरसागर
@ त्याचू वैलपान : अष्टावक्राच्या 'अनावधानस्य सर्वत्र' यावर आपण
In reply to पुढचा भाग केव्हा येणार? by संगणकनंद
लेखमाला रंगतदार होऊ द्या..
In reply to @ त्याचू वैलपान : अष्टावक्राच्या 'अनावधानस्य सर्वत्र' यावर आपण by संजय क्षीरसागर
@ त्याचू वैलपान : आपल्या यापूर्वीच्या प्रतिसादाने
In reply to लेखमाला रंगतदार होऊ द्या.. by संगणकनंद
मडके कच्चे आहे!
In reply to @ त्याचू वैलपान : आपल्या यापूर्वीच्या प्रतिसादाने by संजय क्षीरसागर
@ त्याचू वैलपान : पुन्हा एकदा अद्वितीय प्रतिसाद !
In reply to मडके कच्चे आहे! by संगणकनंद
अध्यात्म ही अनुभवायची गोष्ट आहे, प्रदर्शन मांडण्याची नव्हे.
In reply to @ त्याचू वैलपान : पुन्हा एकदा अद्वितीय प्रतिसाद ! by संजय क्षीरसागर
@ त्याचू वैलपान : अरे व्वा ! तरीही अनाहूतपणे
In reply to अध्यात्म ही अनुभवायची गोष्ट आहे, प्रदर्शन मांडण्याची नव्हे. by संगणकनंद
काहीही हं क्ष्री...
In reply to @ त्याचू वैलपान : अरे व्वा ! तरीही अनाहूतपणे by संजय क्षीरसागर
@ त्याचू वैलपान : तोच तर मुद्दा आहे !
In reply to काहीही हं क्ष्री... by संगणकनंद
@ त्याचू वैलपान :
In reply to काहीही हं क्ष्री... by संगणकनंद
ज्ञानाने लोकांना दिपवून टाकण्याची भाषा अज्ञानीच करु शकतो
In reply to @ त्याचू वैलपान : by संजय क्षीरसागर
मिपा संपादक
In reply to ज्ञानाने लोकांना दिपवून टाकण्याची भाषा अज्ञानीच करु शकतो by संगणकनंद
तुम्हारे गुरुवर्य करे तो चमत्कार, बाकी करे तो अत्याचार...
In reply to मिपा संपादक by उन्मेष दिक्षीत
त्याचू
In reply to तुम्हारे गुरुवर्य करे तो चमत्कार, बाकी करे तो अत्याचार... by संगणकनंद
जसा गुरु तसा चेला
In reply to त्याचू by उन्मेष दिक्षीत
त्याचू
In reply to जसा गुरु तसा चेला by संगणकनंद
पून्हा मुद्दा टाळलात. तेव्हढं
In reply to त्याचू by उन्मेष दिक्षीत
गोंधळ घातला की आयडी ब्लॉक होतो
In reply to त्याचू by उन्मेष दिक्षीत
@ त्याचू वैलपान : मूळ मुद्दा लक्षात घ्या !
In reply to ज्ञानाने लोकांना दिपवून टाकण्याची भाषा अज्ञानीच करु शकतो by संगणकनंद
बाता अध्यात्माच्या मारता...
In reply to @ त्याचू वैलपान : मूळ मुद्दा लक्षात घ्या ! by संजय क्षीरसागर
@ त्याचू वैलपान : तुमचा मूळ मुद्दा हुकतोयं !
In reply to बाता अध्यात्माच्या मारता... by संगणकनंद
हे मात्र आता सांगाच कारण
In reply to @ त्याचू वैलपान : तुमचा मूळ मुद्दा हुकतोयं ! by संजय क्षीरसागर
@ त्याचू वैलपान : आपल्या अफाट ज्ञानाने आम्ही अचंबित झालो आहोत !
In reply to हे मात्र आता सांगाच कारण by संगणकनंद
मग नाचा आता :)
In reply to @ त्याचू वैलपान : आपल्या अफाट ज्ञानाने आम्ही अचंबित झालो आहोत ! by संजय क्षीरसागर
@ त्याचू वैलपान : स्वतःच्या अज्ञानाचा पिसारा फुलवून
In reply to मग नाचा आता :) by संगणकनंद
संपादित
In reply to @ त्याचू वैलपान : स्वतःच्या अज्ञानाचा पिसारा फुलवून by संजय क्षीरसागर
क्षमस्व...
In reply to संपादित by संगणकनंद
विदेहत्व आणि एफर्ट-लेसनेस
@ उन्मेष दिक्षीत : येस !
In reply to विदेहत्व आणि एफर्ट-लेसनेस by उन्मेष दिक्षीत
यासाठी एक अत्यंत सोपी साधना
In reply to @ उन्मेष दिक्षीत : येस ! by संजय क्षीरसागर
असं काहीही होत नाही.
इतके दिवस या साधनेचा मी विविध मार्गानी प्रयोग केल्यावर मला असे लक्षात येते आहे. जे होतं ते फक्त तुमचा मन विचलित झाल्यामुळे मनात चालू असलेले विचार हे सबकॉन्शस होतात (जाणिवेच्या पातळीपर्यंत पोचत नाहीत.) तुम्ही त्याकडे पाहणे सोडले कि विचार परत जाणिवेच्या पातळीवर येतातच. यामुळेच या साधनेचा सुरुवातीला ज्यांना फायदा होतो असे जाणवते त्यांना हा फायदा काही दिवसांनी अजिबात होत नाही असे लक्षात येईल. मनात विचार न येणे आणि मन विचलित झाल्याने विचाराची जाणीव न होणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे. आणि हि गोष्ट लक्षात न घेता संक्षी यांनी एवढा मोठा जडजंबाल शब्दांचा डोलारा रचुन ठेवला आहे. बाकी त्यांच्या इतके हुशार साधक या दुनियेत कोणीही नाही. बाकी सगळे संत महंत ओशो वगैरे भंपक आहेतअसे त्यांचे मत आहे.
आपल्याला देह नाही, तर फक्त
In reply to यासाठी एक अत्यंत सोपी साधना by सुबोध खरे
@ सुबोध खरे : आपल्याला अध्यात्मिक अभ्यास वाढवावा लागेल
In reply to आपल्याला देह नाही, तर फक्त by सुबोध खरे