Skip to main content

शीघ्र कविच्या तीन कविता

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी सोमवार, 16/03/2009 या दिवशी प्रकाशित केले.
एक तांत्रिक कारणामुळे कविता स्वतः कवीने वगळली आहे. दोन आवंढ्यासारखी गिळता येत नाही भळभळणारी कविता मुक्यामुक्यानं जगावं अशी नाही एकही जागा जालावर येतो जरासे सुखाचे क्षण मिळावेत म्हणून, तर इथेही दोस्ताच्या कथेत लहानग्या लेकराला त्याची माय कपाटात कोंडून ठेवते. अन बोटे कुरतडतात त्याची ,उंदीर माझ्या स्वतःच्याच वेगळ्या चिंता असतांना, उगाच चिंता करतो..याची,त्याची.. अन, संस्कृतीच्या नावाने बोंबलतही बसतो. खरं तर या अशाच वेदनांवर एखादा प्रोजेक्ट केला असता, पण आजकाल टीचभर कविताही दमवू लागल्यात साल्या. तीन रस्ते सारेच रस्ते गूलाम निलाम झालेले, श्वानपुच्छ . एक-दोन-तीन-चार म्हणताच जयजयकार करणारे, एखादाच रस्ता असतो गुहेत जाळ शोधण्यासाठी निघालेला, बुद्धालाही युद्ध भूमीपर्यंत आणून सोडणारा.
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 4970
प्रतिक्रिया 26

प्रतिक्रिया

दिलीपशेट!!! आजपासुन तुमची प्रा.डॉ. ची झुल आमच्यासाठी संपली.... आजपासुन तुम्हाला आम्ही दिलीपशेटच म्हणणार... सोमवारची सकाळ सार्थकी लागली... सुंदर... अतिशय छान.
एखादाच रस्ता असतो गुहेत जाळ शोधण्यासाठी निघालेला, बुद्धालाही युद्ध भूमीपर्यंत आणून सोडणारा
मस्त !!!! --अवलिया

लै राग येतो. पण आजकाल टीचभर कविताही दमवू लागल्यात साल्या. बुद्धालाही युद्ध भूमीपर्यंत आणून सोडणारा. विवा लै लै भारी!

In reply to by सहज

लै भारी हेच म्हणतो !!!

In reply to by सहज

विवा लै लै भारी! सहमत आहे. आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

क आणि ड आणि क!!!

आवडल्या, सर. दुसरी आणि तिसरी विशेष आवडली. पहिली तूर्तासमधल्या 'कवी' या कवितेच्या पहिल्या कडव्याचे मिपाकरण म्हणता येईल ना? तसा स्पष्ट उल्लेख हवा, हे माझं वैयक्तिक मत. उगाच कुणाला बोट ठेवण्याची संधी देता कामा नये.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी


In reply to by नंदन

सहमत. उल्लेख आवश्यक होता. मूळ कविता दासू वैद्य यांची आहे. -झेल्या थांबला असाल तर चालायला लागा, चालत असाल तर पळायला लागा, पळत असाल तर थांबा.

In reply to by नंदन

>>पहिली तूर्तासमधल्या 'कवी' या कवितेच्या पहिल्या कडव्याचे मिपाकरण म्हणता येईल ना? हो, आता 'तुर्तास' शोधल्यावर लक्षात आले, वरील पहिल्या कडव्यांचे 'मिपाकरण' झाले असे समजावी इतकी ती सारखी उतरली आहे. मात्र दासुंची संपूर्ण कविता वेगळ्या आशयाची आहे आणि दुर्दैवाने तशाच कल्पनेच्या नादात (मिपावरील निवासी /अनिवासींच्या चक्रात)तसेच शब्द उतरल्यामुळे सदरील कवितेवरुन आली आहे, उचलली आहे, असे वाटण्यापेक्षा...सदरील कविता वगळत आहे. नंदन आभारी !!! -दिलीप बिरुटे

मस्त कविता प्रा डॉ !!

आवडल्या ! सुंदरच आहेत. ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

प्राडॉ..... कब्बी कब्बीच आते, मगर जब्बी आते.... क्या शान मे आते मियां... मस्तच आहेत कविता. २ आणि ३, विशेषतः ३ तर फारच आवडली. बिपिन कार्यकर्ते

सारेच रस्ते गूलाम निलाम झालेले, श्वानपुच्छ . एक-दोन-तीन-चार म्हणताच जयजयकार करणारे, एखादाच रस्ता असतो गुहेत जाळ शोधण्यासाठी निघालेला, बुद्धालाही युद्ध भूमीपर्यंत आणून सोडणारा. ही कविता मास्टरपीस आहे. कवि बिरुटे चांगलाच दमदार आहे.

एखादाच रस्ता असतो गुहेत जाळ शोधण्यासाठी निघालेला, बुद्धालाही युद्ध भूमीपर्यंत आणून सोडणारा. - हे खर आहे.

काळं बेट, लाल बत्ती - ह्या नाटकाच्या शेवटाची. गुप्त खजिन्याच्या हव्यासापोटी इतर माणसांची हत्या करणार्‍या माणसाला शेवटी खजिना सापडतो आणि तो म्हणजे - "बुध्दाच्या शांततेच्या संदेशाचे भूर्जपत्र "

एखादाच रस्ता असतो गुहेत जाळ शोधण्यासाठी निघालेला, बुद्धालाही युद्ध भूमीपर्यंत आणून सोडणारा. सॉलिट्ट्ट्ट्ट मदनबाण..... "If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.

लै भारी. मदन बाण म्हणतो ते कडवे तर शॉलेट्ट

एखादाच रस्ता असतो गुहेत जाळ शोधण्यासाठी निघालेला, बुद्धालाही युद्ध भूमीपर्यंत आणून सोडणारा हे कडवे छानच आहे..... कविता २ सुद्धा छान आहे....

अरे क्या बात है राजासाब....... !! एकदम जबरी आहे काव्य.....!! बोले ते एकदम कडक :)

सुंदर लेखन !अभिनंदन

वा .. कविता छान आहेत. बुद्धाची विशेष ! पहिल्या कवितेत कल्पना छान आहे. पण अनिवासी घरटी वगैरेने वेगळे वळण लागले असे वाटले. ते तसे पटले सुद्धा नाही. (किंवा मला समजले नाही) अजून कविता वाचायला आवडतील. -- लिखाळ.

३ री विशेष आवडली. (बामियानचा बुद्ध आठवला) २ री त्या खालोखाल. पहिली समजली नाही! प्राडॉ लगे रहो! अजून येऊदेत. :) चतुरंग

आवडली. दुसरीही त्याच्यापाठी. (पहिली सशक्त असून आवडली नाही. वर काही जणांनी सांगितल्यामुळे "ते परप्रकाशामुळे असावे" असे वाटते - पण मूळ कविता मी वाचलेली नाही.)

तिसरी कविता एक्दम मस्त! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}