नव्याने बरसणार्या पावसात
नव्याने बरसणार्या पावसात
जुन्या आठवणी आठवतात
सहवासातले प्रत्येक क्षण
मन पून्हा साठवून ठेवतात
यल्लप्पा सटवाजी कोकणे
१६ जून २०१५
नव्याने बरसणार्या पावसात
जुन्या आठवणी आठवतात
सहवासातले प्रत्येक क्षण
मन पून्हा साठवून ठेवतात
यल्लप्पा सटवाजी कोकणे
१६ जून २०१५
थांबव लपंडाव तुझा रे पावसा!
घे आता तु मनसोक्त बरसुनी.
आतुर झाली धरती सजण्यास,
जा हीरवा शालू तिला पांघरूनी.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
११ जून २०१५
छबी नजरेसमोर तुझी येते
पावसाच्या सरी कोसळताना
जाणवतो तुझा सहवास
पावसाच्या सरी झेलताना
यल्लप्पा सटवाजी कोकणे
११ जुन २०१५
प्रेम करुन करुन दमावं
असं आमच्या आयुष्यात कधी घडलंच नाही,
आणि तसं काही घडण्यासाठी कधी कोणी आमच्या प्रेमात पडलंच नाही.
प्रेमात होकार मिळवणार्याची गावात मोठी वट आहे,
समोरुन जर नकाराचा 'रेड' सिग्नल आला तर लगेचच गावच्या 'मजनु' चा डाग आहे
सैफ च्या म्हातारपणात तरी असं काय रहस्य दडलंय,
त्याला जर करीना पटतेय तर आमचच घोड कुठ अडलंय.
आता तर म्हणे पोरगी कशी पटवावी याचेसुध्दा क्लासेस आहेत,
तरी सुध्दा नकार मिळणार्याच्या ओठी तर मद्याचेच चिकटलेले ग्लास आहेत.
आता तर मीही म्हणतो नाही मिळाली प्रेयसी तर नसू दे,
लग्नानंतर येईलच की बायको,
जीवनातल्या या चढ उतारात
शोधतो फक्त जगण्याचा बहाणा
नाते संबंध जपत असताना
भावनेचा वेग किती जीव घेणा
- यल्लप्पा सटवाजी कोकणे
०७ जून २०१५
-----------------------
धागा संपादित केला आहे
तहानलेल्या वसुंधरेची,
तहान भागणार किती?
झाडे तोड झाल्यामुळे,
वरूणराजा बरसणार किती?
यल्लप्पा सटवाजी कोकणे
०५ जून २०१५
लेख लिहायच्या सगळ्यात आधी मुविंचे कट्ट्याच्या आयड्याच्या कल्पनेबद्दल आभार मानतो. कट्ट्याच्या निमित्ताने का होईना मिपामंडळी आपल्या व्यस्त वेळापत्रकामधुन वेळ काढुन आली. हा संपुर्ण वृत्तांत नाही. कारण मी कट्ट्याची सुरुवातीची पंधरा मिनिट आणि शेवटचे दोन-तीन महत्त्वाचे तास नव्हतो. त्यामुळे संपुर्ण वृत्तांताची जबाबदारी नाखु'न'काका आणि वल्ली धरलेणीकर ह्यांच्यावर सोपावण्यात येत आहे.
उन्हाळ्यात सर्वांच्या अंगांची लाही लाही होऊ लागते, त्यात विरहाने व्याकूळ विरहणीची दशा काय झाली, कल्पनाच करणे अशक्य. १०० डिग्री सेंटीग्रेड तापलेल्या या विरहणीच्या शरीराचा काय बरा उपयोग होऊ शकतो, अशी खट्याळ कल्पना मनात आली.
विरहणीच्या डोक्स्यावारी
मी पाण्याची धार धरली
वाफेचा उसळत्या डोंबावरी
चालविला जनरेटर भारी
अशी म्या वीज वाचविली.
ज्ञानियाचा पाठीवर
भाजली होती पोळी
विरहणीच्या पाठीवर
मी *पिज्जा बेक केला.
अशी म्या वीज वाचवली.
(* युग बदलले आता पोळीच्या जागी पिज्जा)
खर्या आयडीने बोलता येईना
मनातले गरळ ओकता येईना...
डुआयडीने आता सगळे....
"स्कोअर सेटल" करू.....!!
उपद्र्व हा अनंत काळचा...
मिपाबरोबर कायम रहायचा...
घरात चारच माणसे आणि...
दारात चारशे चपला सारू.....
नव्या आयडीच्या बाटलीत भरली
शिळ्या विचारांची जुनीच दारु....
त्यांना वाटतं आतातरी भपकारा येणार नाही...
मिपाकरांच्या नाकाचं किती कौतुक करू !!
आडून आडून सगळे करिती हल्ला...
भुरट्यांचा ठाऊक असे मोहल्ला....
एकटा दुकटा कोणी लागता हाती....
चला त्याला आडवे करू !!
येता जाता शरसंधान.....
बर्याचं दिवसांपासुन व्हॉट्स अॅप गृप वरती किमान ३००० वेळा कट्टा करायच्या गोष्टी चाललेल्या होत्या. गेले २-३ आठवडे हो-ना-हो-ना करता करता शेवटी काल मोदक, मी, कपिलमुनी आणि अनाहितांचा लाडोबा असे चार जणांचा कट्टा ठरला. त्याचा एक वृत्तांत लिहायचा एक माफक प्रयत्न. कट्ट्याचं आयोजनं करतानाचं माझ्याकडुन एक मोठी चुक झाली ती म्हणजे वल्लींना फोन करायचा राहुन गेला :( (वल्ली मनापासुन सॉरी!! ). अन्या दातार कोल्हापुरला गेल्यानी आणि गुर्जीं फुलराणीच्या शोधात मार्केट यार्डामधे असल्यानी येउ शकले नाहीत. ;)