Skip to main content

(किराणा घराण्याचा अति संक्षिप्त इतिहास...)

लेखक सुनील यांनी सोमवार, 26/10/2009 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
किराण्या घराण्याची सुरुवात देहूकर बुवांनी साधारणतः सतराव्या शतकात पुणे प्रांती केली. परंतु हे घराणे फार काळ टिकाव धरू शकले नाही. त्यांच्या विरोधी घराण्यांनी बुवांच्या हिशोबाच्या चोपड्या इंद्रायणी नदीत बुडवल्या. त्यातील काही चोपड्या नंतर बाहेर काढण्यात आल्या असल्या तरी हे घराणे नामशेषच होत गेले. बुवांपश्चात त्यांच्या घराण्याची खासियत शेजारील गुर्जर प्रांतातील शा घराण्याने उचलली. त्यानंतर जवळपास तीन शतके ह्या शा घराण्याने आपला दबदबा ह्या प्रांती कायम राखला. अगदी परवा परवा पर्यंत त्यांचा प्रभाव खेडोपाडच्या लोकांवर होता. आजही ह्या शा घराण्याचे नाव असले, तरी ह्या घराण्याची पताकामात्र हळूहळू गोयल, अंबानी, टाटा आदि मंडळींच्या हाती जात असल्याचे स्प्ष्ट दिसत आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1489
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

इतिहास आवडला! :) आपला, (कच्छी बनीया आणि शेयर दलाल) तात्या पटेल.

छान आढावा. सांप्रत समयी बुवांच्या मरुस्थलातून आलेल्या काही अनुयायांनी किराणा परंपरेचे पुण्यनगरीत आणि आजुबाजूच्या परीसरात मोठ्या निष्ठेने पुनरुज्जीवन केले आहे; अर्थात स्वतःच्या शैलीत.(बुवांची शैलीच निराळी. त्याची सर या अनुयायांना येणारच नाही). असो. अभ्यासकाला विनंती - या अनुयायांविषयी पण थोडे लिहावे. (अगावु) धन्यवाद महेश हतोळकर