ये जो देस है तेरा.. स्वदेस है तेरा!
In reply to हम्म खरे by llपुण्याचे पेशवेll
In reply to भाग्यश्री.... by बिपिन कार्यकर्ते
In reply to भाग्यश्री.... by बिपिन कार्यकर्ते
In reply to भाग्यश्री.... by बिपिन कार्यकर्ते
In reply to तलवारी तयार ठेवा by हवालदार
In reply to छान लिहीलंय by नीलकांत
In reply to अगदी by प्रमेय
कोणी भारतातले भारतीय, भारतात नसलेल्या भारतीयांवर सरळ जिभेचे आसूड ओढतात ना तेव्हा खरंच कळत नाहीअशा लोकांशी वाद घालणं निव्वळ निरर्थक! आपलं देशप्रेम-आपुलकी या लोकांनी असं म्हणल्याने नाहीशी होणार आहे का? :)
In reply to पसंद अपनी अपनी by बेसनलाडू
In reply to चांगला लेख by विकास
In reply to चांगला लेख by विकास
In reply to >>अनिवासी by शाहरुख
In reply to अगं by रेवती
In reply to ठ्ठ्यॉ!!!! by प्राजु
In reply to ठ्ठ्यॉ!!!! by अडाणि
In reply to एका दगडात... by विकास
In reply to रिकामं मन, सैतानाच घर by नंदा
पण पुढे भारतातले संदर्भ निवत जातील, मुळ उखडत जातील. आता हेच घर, जितक्या लवकर हे समजताल, जवळ कराल, तेवढा मार्ग सुकर होइल. शुभेच्छा!सहमत आहे. आमच्याही शुभेच्छा.. छान छान, पॉश पॉश, स्वच्छ स्वच्छ अश्या अमेरीकेत बसून लिहिलेला लेख आवडला! :) आपला, (निवासी भारतीय) तात्या.
हिन्दु धर्मामध्ये देशान्तर हे पाप कधीपासून मानले जाऊ लागले, याचा सन्दर्भ कुणी देऊ शकेल कामाहित नाही पण देशापेक्षा महाराष्ट्रात असे मानण्याचे प्रमाण आतापर्यंत होते.उत्तरेत/तामिळ्/आंध्र्मध्ये स्थलांतर करण्याचे प्रमाण पुर्वीपासुन आहे. कॅलिफोर्नियात शीख लोक १९०५ मध्ये प्रथम आले होते. आफ्रिकन देशांत गुजराती/मारवाडी तर १०० वर्षापेक्षा जास्त काळ आहेत. खुद्द महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेत जवळ्पास २० वर्षे होते.मॉरिशस्,सेशेल्स,फिजी सारख्या देशांत भारतिय अनेक वर्षापासुन आहेत.
अनिवासी भारतीय प्रकारात जर अमेरिकास्थित भारतीय हा प्रकार नसता, तर मग निवासी-अनिवासी भारतीय हा वाद कितपत झाला असता?हा वादाचे मुळ बहुदा अमेरिकेचे प्रमाणाबाहेर केले जाणारे उदात्तीकरण असावे.हल्लीच हिलरी क्लिंटन भारत भेटीवर आल्या होत्या. मिडिया,सरकार ह्याना त्याना 'कुठे ठेवू कुठे नको' असे झाले होते.९ वर्षापुर्वी बिल क्लिंटन भारतात आले असता सही घेण्यासाठी भारतिय खासदारांची झुंबड उडाली होती.मनमोहन सिंग अमेरिका भेटी वर येतात त्यावेळी बहुदा ती बातमी nytimes च्या पाचव्या पानावर असते!.ईंडिया कॉकस वगळता त्यांच्या भेटीला अमेरिकेत विशेष महत्व नसते.अमेरिकेच्या द्रुष्टिकोनातुन भारताचे स्थान नगण्य असले तरी भारतिय उच्च मध्यम वर्ग अजुनही(अमेरिकेत सध्या नोकर्या कमी असल्या तरीही) ड्रीम लँड म्हणून अमेरिकेकडेच बघतो. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न
In reply to उदात्तीकरण by चिरोटा
उत्तरेत/तामिळ्/आंध्र्मध्ये स्थलांतर करण्याचे प्रमाण पुर्वीपासुन आहे.एक उदाहरण. थोडक्यात संकुचित बुद्धीला काळ नाही.
मनमोहन सिंग अमेरिका भेटी वर येतात त्यावेळी बहुदा ती बातमी nytimes च्या पाचव्या पानावर असते!अगदी टीपीकल अन-ईन्फॉर्मड प्रतिपादन! या अशा वाक्यानीच अडाणी भारतीय जनते मध्ये चुकीचे समज पसरतात. मी रोज वॉल स्ट्रीट जर्नल वाचतो व त्यात मी अनेकदा भारतातील अनेक बातम्या पहील्या पानावर वाचल्या आहेत. (मला उलट, ही बातमी पहिला पानावर! असेही अनेकदा वाटले आहे, शोधुन दुवे देईन हवे असल्यास.)
अमेरिकेच्या द्रुष्टिकोनातुन भारताचे स्थान नगण्य असले तरी भारतिय उच्च मध्यम वर्ग अजुनही(अमेरिकेत सध्या नोकर्या कमी असल्या तरीही) ड्रीम लँड म्हणून अमेरिकेकडेच बघतो.अत्यंत खुळा गैरसमज! मग काय त्या क्लींटन बाई तुमच्या मिडीयाची पॉप्युलॅरीटी मिळवायला आल्या होत्या का भारतात? की पुढच्या निवडकुणित भारतीय मतं मिळवायला?
उच्च मध्यम वर्ग अजुनही(अमेरिकेत सध्या नोकर्या कमी असल्या तरीही) ड्रीम लँड म्हणून अमेरिकेकडेच बघतो.हे का याचा निट विचार करा. अर्थात हे वरील वाक्य ही पुर्ण सत्य नाहीच आहे.
हा वादाचे मुळ बहुदा अमेरिकेचे प्रमाणाबाहेर केले जाणारे उदात्तीकरण असावेया बाबतीत विकासरावांच्या प्रतिसादाशी सहमत आहे.
In reply to बर्याच by Nile
थोडक्यात संकुचित बुद्धीला काळ नाहीसहमत. माझ्या म्हणण्याचा उद्देश हा की उत्तरेत(गुजरात्/राजस्थान्/पंजाब) स्थलांतरीत लोकांचे प्रमाण ईतर राज्यांपेक्षा जास्त आहे.
मग काय त्या क्लींटन बाई तुमच्या मिडीयाची पॉप्युलॅरीटी मिळवायला आल्या होत्या का भारतातनाही. भविष्यात भारत दोन राज्यांमध्ये अणु प्रकल्प चालु करणार आहे.ह्याचे कोट्यावधी डॉलर्स चे कंत्राट काही अमेरिकन कंपन्याना पाहिजे आहे. जी बोलणी झाली त्यात हा मुद्दा प्रामुख्याने होता. (संदर्भ- nytimes.com). हा झाला व्यवहाराचा भाग. अमेरिकेच्या उच्च राजकिय वर्तुळात भारताचे स्थान नगण्य आहे. म्हणजे ब्रिटन्,फ्रांस,जर्मनी सारखे त्याला स्थान नाही(ह्यात काही गैर आहे असे मला वाटत नाही.प्रत्येक देश्(भारतही) आपला फायदा बघतो).
हे का याचा निट विचार कराअमेरिकेला जावून स्थायिक होणे ह्यात काही गैर आहे असे मला तरी वाटत नाही. क्ष्^न + य्^न = झ्^न
In reply to प्रतिसाद by चिरोटा
हा झाला व्यवहाराचा भाग.म्हणजे भारत त्यांच्या साठी व्यवहार करण्याइतका महत्त्वाचा आहे तर! :)
अमेरिकेच्या उच्च राजकिय वर्तुळात भारताचे स्थान नगण्य आहे. म्हणजे ब्रिटन्,फ्रांस,जर्मनी सारखे त्याला स्थान नाहीसमजा, ब्रिटन जर्मनी सारखे स्थान नाही, म्हणजे नगण्य का? मला तुमचा मुद्दा कळला होता पण तुम्ही 'जितके भारताला महत्त्व (त्यांच्यामते) द्यायचे आहे तितकेच देतात, पण जितके द्यायला हवे (भारत, भारतीय लोक वगैरे) तितके देत नाहीत' असे म्हणालात तर योग्य होईल असे वाटते. हा एक वेगळ्या धाग्याचा विषय होउ शकेल म्हणुन यावर जास्त बोलत नाही.
अमेरिकेला जावून स्थायिक होणे ह्यात काही गैर आहे असे मला तरी वाटत नाही.तुम्हाला गैर वाटते की नाही यावर मी तो प्रतिसाद नव्हता दिला, तर तुमच्या विधानातील मला वाटलेल्या चुका दुरुस्त करण्याकरीता.
In reply to बर्याच by Nile
In reply to उदात्तीकरण by चिरोटा
In reply to बराचसा सहमत by विकास
In reply to भावपूर्ण मनोगत. by रामदास
मराठी माणसांना स्थलांतर करून पोट भरण्याची सवय उशीरा लागलीसहमत.स्वातंत्र्यानंतर सर्वात जास्त औद्योगिकीकरण महाराश्ट्रात झाले हे त्याचे मुख्य कारण.त्यामुळे संधी मुबलक प्रमाणात होत्या.१९९० पर्यंत देशाबाहेर स्थालांतर मर्यादित स्वरुपातच होई.नंतर उदारीकरणानंतर संधी इतर देशात्/राज्यांमध्येही वाढल्या. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न
In reply to भावपूर्ण मनोगत. by रामदास
In reply to प्रकटन चांगलं आहे by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
पण बरीच लोकं २-३ वर्ष परदेशी राहिली की इथली उणी-दुणी काढायला सुरुवात करता. भारतात हे नाही, ते नाही, भ्रष्टाचार आहे, घाण आहे वगरे बडबड सुरू होते. इथे रहाणार्यांना अक्कल शिकवायला सुरुवात करतात. अरे हे बदलण्यासाठी तुम्ही काही केलं का? (उलट इथे रहातात तेव्हा ह्या सगळ्याला हातभारच लावतात) तुम्ही देशाला एक चान्स तरी दिलात का? शिक्षण संपल्यावर शेपूट घालून गेलात ना पळून परदेशात पैशासाठी? मग देशाच्या प्रगतीला काडीचाही हातभार न लावता नुसतं नावं ठेवणे कितपत बरोबर आहे? माझ्या मते हा शूद्ध कृतग्नपणा आणि हलकटपणा आहे.ज्या लोकांना भारताने चान्स दिला नाही त्यांचं काय? तरीही इथे येऊन दारिद्र्यात मेलेल्यांचं काय? उदाहरणही देते, डॉ. खानखोजे. या कृषकाला इंग्रजांनी वॉरंट काढलं नाही म्हणून स्वतंत्र भारतात व्हीजा मिळवायला किती त्रास झाला याची कल्पना आहे का? असे कितीतरी खानखोजे संधी मिळत नाही, भ्रष्टाचार आहे, त्याला एकटा माणूस काहीही करू शकत नाही याचा अनुभव घेऊन वैतागून देश सोडतात त्यांनाही तुम्ही असेच बोल लावणार का? माझाच व्यक्तीगत अनुभव सांगते. स्थळ साहेबाचा देश, विद्यार्थ्यांसाठी असलेलं विद्यापीठाचं घर: एक तक्रार येते, गाद्या फार खराब आहेत, पाठदुखी होते. दोन आठवड्यांत नवीन गाद्या आल्या आणि शिवाय हळहळ व्यक्त झाली, तुम्ही आधी का सांगितलंत नाहीत. स्थळ असंच एक विद्यार्थी, पोस्ट-डॉक्ससाठी असलेलं होस्टेल, देश आपलाच: एक तक्रार, आम्हाला जेवण बनवायचं आहे, कँटीनच्या जेवणाचा त्रास होतो, गॅसचं कनेक्शन कसं घ्यावं आम्ही? तुम्हाला काय करायचं आहे जेवण-बिवण बनवणं? गोंधळच घालाल जास्त! आणि तुम्ही कँटीनमधे नाही जेवलात तर कँटीन कसं चालणार? मग व्हिजीटर्सना काय आणि कसं जेवायला घालणार आम्ही? ते काही नाही, तुम्ही इथेच जेवायचं. सगळ्यात शेवटी सार सांगण्याची पद्धत असते म्हणूनः 'सब घोडे बारा टके' यामुळे अनेकांवर अतोनात अन्याय होतो याची जाणीव असावी. अदिती
In reply to चला वादावादी खेळू या! ;-) by ३_१४ विक्षिप्त अदिती
'सब घोडे बारा टके' यामुळे अनेकांवर अतोनात अन्याय होतो याची जाणीव असावीयाबद्दल अदितीला लाख अनुमोदनं! बाकी जास्त लिहीत नाही.. तुम्ही आरोप करा, आम्हीही करतो याने काही चर्चा होत नाही.. त्यामुळे एव्हढच बास.. :) http://www.bhagyashree.co.cc/
In reply to चला वादावादी खेळू या! ;-) by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to प्रकटन चांगलं आहे by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
पण बरीच लोकं २-३ वर्ष परदेशी राहिली की इथली उणी-दुणी काढायला सुरुवात करता. भारतात हे नाही, ते नाही, भ्रष्टाचार आहे, घाण आहे वगरे बडबड सुरू होते. इथे रहाणार्यांना अक्कल शिकवायला सुरुवात करतात. अरे हे बदलण्यासाठी तुम्ही काही केलं का? (उलट इथे रहातात तेव्हा ह्या सगळ्याला हातभारच लावतात) तुम्ही देशाला एक चान्स तरी दिलात का? शिक्षण संपल्यावर शेपूट घालून गेलात ना पळून परदेशात पैशासाठी? मग देशाच्या प्रगतीला काडीचाही हातभार न लावता नुसतं नावं ठेवणे कितपत बरोबर आहे? माझ्या मते हा शूद्ध कृतग्नपणा आणि हलकटपणा आहे.अच्छा म्हणजे ते लोक उणी-दुणी काढतात म्हणुन राग आहे होय! चुका शोधणे, त्या दाखविणे हा चुका दुरुस्त करणे ह्यातील पहीला टप्पा असतो. (त्या दाखविण्याची एखाद्याची (वा काही लोकांची) पद्धत जर चुकत असेल तर अक्ख्या अनिवासी भारतियांना शिव्या घालणं म्हणजे काय?) मी तरी भारत(त्यातही माझं गाव, मी रहात असलेलं, पुर्वी राह्यलो होतो असं शहर) सोडुन (आणि राहता देश) इतर देशाला कश्याला शिव्या घालु? माझ्या देशात जे चुक आहे त्याबद्द्ल मला खेदच वाटतो. जे बरोबर आहे त्याबद्द्ल आनंद आणि अभिमानच वाटतो. बर परदेशी येणारे सगळेच काय उच्च दर्जाचे विद्वानच असतात का? काही लोकांनी बेजबाबदार व्यक्तव्य केली तर त्यात काय नविन? भारतात भारताबाबत वाट्टेल ते बडबडणारी कमी आहेत की काय कि तुम्हाला याचा राग यावा? की भारतात असल्यावर अशी बेजबाबदार, तुमच्या भाषेत अक्कल शिकवणारी भाषा बोलायला नैतीक परवानगी मिळते?
In reply to पण बरीच by Nile
In reply to . by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
In reply to एकदम चपखल by मराठी_माणूस
In reply to +१ चूका by llपुण्याचे पेशवेll
In reply to ओके.. मला by भाग्यश्री
In reply to मस्त by नंदन
In reply to सही झालाय by मेघना भुस्कुटे
हम्म खरे