मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शिवाजी महाराजांचे बसरबरचे पहिले नौकानयन - भाग १

शशिकांत ओक · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार

शिवाजी महाराजांचे बसरबरचे पहिले नौकानयन - भाग १

१अ नमस्कार मित्रांनो दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोहिमांवर आधारित सादर केलेले लेखन मिपावरील वाचकांनी वाचले आहे. त्यावरील सूचना, मार्गदर्शनातून नंतरच्या काळात ईपुस्तके बनवायला प्रेरणा मिळाली. भारतीय नौसेनेचे स्वप्न दृष्टा म्हणून शिवाजी महाराजांचा गौरव होतो. आपण अनुभवातून अनेक गोष्टी शिकतो. शिवाजी महाराजांना आपले नाविकदल कसे असावे जल दुर्गांचे महत्व काय किनाऱ्यावर राहून, म्हावरे पकडून उपजीविका करणाऱ्या सामान्य जनतेचे खडतर जीवन कसे असते अशा लोकांना मासेमारी करताना, मिठागरातील लवण उद्योग निर्धोकपणे करता यावा. भात शेती, अंबा, रातांबा, फणस, पोफळी, नारळ, ताड, वनौषधी, देशावर पाठवून कोकणात शांततामय जीवन जगता यावे. कोकणी माणसांच्या भाव विश्वात सागराला देवता मानायची संकल्पना असते. त्यांच्या वार्षिक सणाला, देवी यात्रांना जायला यायला सोई करणे वगैरे ही राज्यकर्ता म्हणून जबाबदारीची जाणीव बिंबली. विदेशी दर्यावर्दी लांबून येऊन अरबी सागरावर आपला हक्क सांगतात. मोठ्या जमिनी बळकावतात. आपला धर्म प्रचार करायला चर्च, मशीद बांधतात. गरिबीने पोळलेले सिद्दी व अन्य देशीय गुलाम म्हणून विकले जातात. चाचेगिरी करून बोटी लुटायचे साहस करतात. या वर उपाय योजना करायला हवी. बोटी बांधायला गोद्या, माल धक्के, माल वाहायला शिकवून तयार केलेली जनावरे पैदास केंद्रे, यासाठी अरबी लोकांकडून शिकायची सोय करायला हवी याचे भान त्यांना आले. यासर्वाचा आढावा त्यांना बसरूरच्या नौकानयनातील अनुभवातून आला असावा अशी संकल्पना घेऊन मांडणी केली आहे. २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ ११ १२ १३ १४ १५ १६ पुढील भागात भीमगडावरील वास्तव्यातील विचारनधन मुगल व मराठा सैन्याची तैनाती वेंगुर्ला, कुडाळची लढाई, खवासखानाची पळापळ, मुधोळकर बाजी घोरपड्यांचा बंदोबस्त

वाचने 3710 वाचनखूण प्रतिक्रिया 15

शशिकांत ओक Tue, 10/29/2024 - 11:53
  • गोकर्ण बंदरातील शांत सागर आणि महाबळेश्वर मंदिरातील पवित्र वातावरणात आपल्या नौदलाच्या संकल्पना आकारू लागल्या.
  • पोर्तुगीज, डच, इंग्रज, अरब, सिद्दी, विजापुरकर यांच्या, वाहतूक बोटी,चाच्यापासून चोरट्यांचा सुळसुळाट, मासेमारी, मीठ बनवायचे व्यवसाय विना व्यत्यय चालू राहायला तटांची सुरक्षा वगैरे गरजा समजून आल्या.
  • जमिनीवरील राजकारणातून उसंत मिळाल्याने उत्तरेला भिवंडी-कल्याण, ते दक्षिणेत बसरूर, कारवार, गोमांतक किनारा हे आपल्या राज्याचे, सर्वात महत्वाचे क्षेत्र, म्हणून कोकणपट्टीच असू शकते. हे मनात ठसले.
  • भावी काळात घाटावरील किल्ले,जमिनीचा महसूल गमावला गेला तर सह्यपर्वताचे कडेकपारी, दाट जंगल आणि कोकण किनाऱ्यावरील मालवाहतूक, व्यापार आपल्याला वाचवू शकतात.
  • तटसुरक्षित करायला जलदुर्ग, सुसज्ज नाविक दल याशिवाय पर्याय नाही. भावी काळात याच भागात राजधानी बनली पाहिजे. असे मत प्रकर्षाने दृढ व्हायला लागले.
वरील विचारांवर वाचकांची प्रतिक्रिया अपेक्षित आहे...

दुर्गविहारी Sat, 11/02/2024 - 00:19
शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील हि एकमेव सागरी मोहीम, कदाचित या मोहीमेत त्रास झाल्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यानंनतर सागरी मोहीम केल्याचे आढळत नाही. या मोहीमेची योजना अतिशय बारकाईने केली असणार. एकतर महाराष्ट्र , कर्नाटकाच्या सागर किनारपट्टोवर इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच ( मालवण येथे फ्रेंच वखार होती ) आणि वेंगुर्ल्याचे डच अशा चारही सागरी सत्ता आणि पर्यायने शत्रु होते, समुद्रावरुन प्रवास करताना त्यांना कार्ताझ द्यावा लागे. इथे त्यांनी शिवाजी महाराजांकडून कोणताही कार्ताज घेतलेला दिसत नाही. इथे शिवाजी महाराजांची या युरोपियान सत्तांनी घेतलेली दहशत लक्षात येते. मात्र या मोहीमेसाठी आवश्यक नियोजन खुप बारकाईने केलेले असणार. एकतर जेव्हा गुराबे रात्री किनार्यावर मुक्काम करतील तेव्हा कोठे मुक्काम करायचा तिथली सुरक्षा नेमकी कशी आखली असणार हे महत्वाचे आहे. तसेच जरी महाराजांचे सागरी दल समुद्रातून प्रवास करत असले तरी पायदळ आणि घोडदळ भुमार्गे महाराजांच्या नौदलाला समांतर जमीनमार्गे प्रवास करत असणार. त्यांचे एकमेकांशी सहसंपर्क कसा साधला असणार हे कुतुहल वाढवणारे आहे. कारण दोन्ही मार्गे प्रवास करताना वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागणार. तरीही दोन्ही दले एकाच वेळी मुक्कामाला पोहचणे गरजेचे आहे. यावर अधीक चर्चा झाली किंवा काही माहीती पुढे आली तर या मोहीमेवर अधीक प्रकाश पडेल.

विजुभाऊ Sat, 01/11/2025 - 10:04
महाराजांच्या कडे कोणकोणत्या प्रकारची गलबते होतीयाचे साद्यंत वर्णन ब मो पुरंदर्यानी केले आहे. तसेच ते कान्होजी आम्ग्रे या पुस्तकातदेखील आढळते. इतकी दूरदृष्टी असणारा राजा अजून काही वर्षे असायला हवा होता. संभाजी महाराज जर फंदफितुरीमुळे पकडले गेले नसते तर त्यानी औरंगजेबाला पुरते नेस्तनाबूत केले असते आणि हिरव्या विषवल्लीचा त्याच वेळेस नायनाट झाला असता.

In reply to by विजुभाऊ

शशिकांत ओक Sun, 01/12/2025 - 17:27
नमस्कार विजुभाऊ, आपण म्हणता ते बरोबर आहे. या नौकावहनाच्या वेळी महाराज कोणत्या प्रकारच्या गलबतातून प्रवास करत होते? किती जहाजे त्यांच्या बरोबर जात होती? त्यातून किती मावळे बरोबर असावेत? शिवाय काही घोडदळ जमिनीवरून आधीच कारवार, बसरूरला येऊन थांबले असावे? ही मोहीम नौदलाचे सामर्थ्य दाखवून बसरूर बाजार पेठेत डच, पोर्तुगीजांचा प्रभाव कमी करण्यासाठी प्रयत्न होता असे वाटते.