✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • लेख
  • भटकंती
  • कविता
  • नवीन लेखन
  • पाककृती
  • भटकंती
  • विशेषांक

शिवाजी महाराजांचे बसरबरचे पहिले नौकानयन - भाग १

श
शशिकांत ओक यांनी
Sun, 10/27/2024 - 19:49  ·  लेख
लेख

शिवाजी महाराजांचे बसरबरचे पहिले नौकानयन - भाग १

१अ नमस्कार मित्रांनो दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोहिमांवर आधारित सादर केलेले लेखन मिपावरील वाचकांनी वाचले आहे. त्यावरील सूचना, मार्गदर्शनातून नंतरच्या काळात ईपुस्तके बनवायला प्रेरणा मिळाली. भारतीय नौसेनेचे स्वप्न दृष्टा म्हणून शिवाजी महाराजांचा गौरव होतो. आपण अनुभवातून अनेक गोष्टी शिकतो. शिवाजी महाराजांना आपले नाविकदल कसे असावे जल दुर्गांचे महत्व काय किनाऱ्यावर राहून, म्हावरे पकडून उपजीविका करणाऱ्या सामान्य जनतेचे खडतर जीवन कसे असते अशा लोकांना मासेमारी करताना, मिठागरातील लवण उद्योग निर्धोकपणे करता यावा. भात शेती, अंबा, रातांबा, फणस, पोफळी, नारळ, ताड, वनौषधी, देशावर पाठवून कोकणात शांततामय जीवन जगता यावे. कोकणी माणसांच्या भाव विश्वात सागराला देवता मानायची संकल्पना असते. त्यांच्या वार्षिक सणाला, देवी यात्रांना जायला यायला सोई करणे वगैरे ही राज्यकर्ता म्हणून जबाबदारीची जाणीव बिंबली. विदेशी दर्यावर्दी लांबून येऊन अरबी सागरावर आपला हक्क सांगतात. मोठ्या जमिनी बळकावतात. आपला धर्म प्रचार करायला चर्च, मशीद बांधतात. गरिबीने पोळलेले सिद्दी व अन्य देशीय गुलाम म्हणून विकले जातात. चाचेगिरी करून बोटी लुटायचे साहस करतात. या वर उपाय योजना करायला हवी. बोटी बांधायला गोद्या, माल धक्के, माल वाहायला शिकवून तयार केलेली जनावरे पैदास केंद्रे, यासाठी अरबी लोकांकडून शिकायची सोय करायला हवी याचे भान त्यांना आले. यासर्वाचा आढावा त्यांना बसरूरच्या नौकानयनातील अनुभवातून आला असावा अशी संकल्पना घेऊन मांडणी केली आहे. २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ ११ १२ १३ १४ १५ १६ पुढील भागात भीमगडावरील वास्तव्यातील विचारनधन मुगल व मराठा सैन्याची तैनाती वेंगुर्ला, कुडाळची लढाई, खवासखानाची पळापळ, मुधोळकर बाजी घोरपड्यांचा बंदोबस्त
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
इतिहास
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
3670 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

सुंदर.

कंजूस
Sun, 10/27/2024 - 20:29 नवीन
सुंदर. आकर्षक मांडणी आणि सादरीकरण आवडले.
  • Log in or register to post comments

मेहनती व व्यासंगी लेख

नठ्यारा
Sun, 10/27/2024 - 20:35 नवीन
ओकसाहेब, लेख वाचतांना तुमचे परिश्रम व व्यासंग ठायीठायी जाणवतो. दंडवत घ्यावा! आपला नम्र, -नाठाळ नठ्या
  • Log in or register to post comments

नेहमीप्रमाणेच शोधपुर्ण

कर्नलतपस्वी
Sun, 10/27/2024 - 21:06 नवीन
लेख आवडला. लेख माले साठी शुभेच्छा. पु.ले.शु.
  • Log in or register to post comments

पुलेशु

शशिकांत ओक
Mon, 10/28/2024 - 07:44 नवीन
धन्यवाद सर तपस्वी सर. पुढील लेखन लवकरच सादर करेन. काही स्लाईड्स मधील मजकुरावर आपले भाष्य अपेक्षित आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

सुन्दर

अनिरुद्ध प
Mon, 10/28/2024 - 10:17 नवीन
खूप छान आवडले, पू भा प्र, अनिरुद्ध
  • Log in or register to post comments

 संकल्पना आकारू लागल्या...  याच भागात राजधानी बनली पाहिजे...

शशिकांत ओक
Tue, 10/29/2024 - 11:53 नवीन
  • गोकर्ण बंदरातील शांत सागर आणि महाबळेश्वर मंदिरातील पवित्र वातावरणात आपल्या नौदलाच्या संकल्पना आकारू लागल्या.
  • पोर्तुगीज, डच, इंग्रज, अरब, सिद्दी, विजापुरकर यांच्या, वाहतूक बोटी,चाच्यापासून चोरट्यांचा सुळसुळाट, मासेमारी, मीठ बनवायचे व्यवसाय विना व्यत्यय चालू राहायला तटांची सुरक्षा वगैरे गरजा समजून आल्या.
  • जमिनीवरील राजकारणातून उसंत मिळाल्याने उत्तरेला भिवंडी-कल्याण, ते दक्षिणेत बसरूर, कारवार, गोमांतक किनारा हे आपल्या राज्याचे, सर्वात महत्वाचे क्षेत्र, म्हणून कोकणपट्टीच असू शकते. हे मनात ठसले.
  • भावी काळात घाटावरील किल्ले,जमिनीचा महसूल गमावला गेला तर सह्यपर्वताचे कडेकपारी, दाट जंगल आणि कोकण किनाऱ्यावरील मालवाहतूक, व्यापार आपल्याला वाचवू शकतात.
  • तटसुरक्षित करायला जलदुर्ग, सुसज्ज नाविक दल याशिवाय पर्याय नाही. भावी काळात याच भागात राजधानी बनली पाहिजे. असे मत प्रकर्षाने दृढ व्हायला लागले.
वरील विचारांवर वाचकांची प्रतिक्रिया अपेक्षित आहे...
  • Log in or register to post comments

बोटिवर शिजवलेले भात आणी सागूची नवी चव

धर्मराजमुटके
Tue, 10/29/2024 - 19:18 नवीन
"बोटिवर शिजवलेले भात आणी सागूची नवी चव" यातला "सागू" म्हणजे नक्की काय ?
  • Log in or register to post comments

सागू, सागूळ

शशिकांत ओक
Tue, 10/29/2024 - 22:23 नवीन
फणसाच्या अठळ्यांची भाजी
  • Log in or register to post comments

मस्तच.

शाम भागवत
Fri, 11/01/2024 - 10:08 नवीन
मस्तच. व्यासंग व मांडणी यांसाठी 🙏
  • Log in or register to post comments

अतिशय उत्तम मांडणी !

दुर्गविहारी
Sat, 11/02/2024 - 00:19 नवीन
शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील हि एकमेव सागरी मोहीम, कदाचित या मोहीमेत त्रास झाल्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यानंनतर सागरी मोहीम केल्याचे आढळत नाही. या मोहीमेची योजना अतिशय बारकाईने केली असणार. एकतर महाराष्ट्र , कर्नाटकाच्या सागर किनारपट्टोवर इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच ( मालवण येथे फ्रेंच वखार होती ) आणि वेंगुर्ल्याचे डच अशा चारही सागरी सत्ता आणि पर्यायने शत्रु होते, समुद्रावरुन प्रवास करताना त्यांना कार्ताझ द्यावा लागे. इथे त्यांनी शिवाजी महाराजांकडून कोणताही कार्ताज घेतलेला दिसत नाही. इथे शिवाजी महाराजांची या युरोपियान सत्तांनी घेतलेली दहशत लक्षात येते. मात्र या मोहीमेसाठी आवश्यक नियोजन खुप बारकाईने केलेले असणार. एकतर जेव्हा गुराबे रात्री किनार्यावर मुक्काम करतील तेव्हा कोठे मुक्काम करायचा तिथली सुरक्षा नेमकी कशी आखली असणार हे महत्वाचे आहे. तसेच जरी महाराजांचे सागरी दल समुद्रातून प्रवास करत असले तरी पायदळ आणि घोडदळ भुमार्गे महाराजांच्या नौदलाला समांतर जमीनमार्गे प्रवास करत असणार. त्यांचे एकमेकांशी सहसंपर्क कसा साधला असणार हे कुतुहल वाढवणारे आहे. कारण दोन्ही मार्गे प्रवास करताना वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागणार. तरीही दोन्ही दले एकाच वेळी मुक्कामाला पोहचणे गरजेचे आहे. यावर अधीक चर्चा झाली किंवा काही माहीती पुढे आली तर या मोहीमेवर अधीक प्रकाश पडेल.
  • Log in or register to post comments

हा इतिहास फारसा माहीत नाहीये,

प्रचेतस
Sat, 11/02/2024 - 05:53 नवीन
हा इतिहास फारसा माहीत नाहीये, आपण जे लिहिताय ते स्तुत्य आहे.
  • Log in or register to post comments

+१

ज्ञानोबाचे पैजार
Sun, 11/10/2024 - 19:36 नवीन
लेख आवडला, नेहमीप्रमाणे केलेले अभ्यासपपूर्ण लेखन पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

उत्तम मांडणी जमलेली आहे.

llपुण्याचे पेशवेll
Sun, 11/24/2024 - 11:52 नवीन
उत्तम मांडणी जमलेली आहे.
  • Log in or register to post comments

महाराजांच्या कडे कोणकोणत्या

विजुभाऊ
Sat, 01/11/2025 - 10:04 नवीन
महाराजांच्या कडे कोणकोणत्या प्रकारची गलबते होतीयाचे साद्यंत वर्णन ब मो पुरंदर्यानी केले आहे. तसेच ते कान्होजी आम्ग्रे या पुस्तकातदेखील आढळते. इतकी दूरदृष्टी असणारा राजा अजून काही वर्षे असायला हवा होता. संभाजी महाराज जर फंदफितुरीमुळे पकडले गेले नसते तर त्यानी औरंगजेबाला पुरते नेस्तनाबूत केले असते आणि हिरव्या विषवल्लीचा त्याच वेळेस नायनाट झाला असता.
  • Log in or register to post comments

किती, कोणत्या प्रकारची जहाजे या मोहिमेत होती यावर प्रकाश टाकावा.

शशिकांत ओक
Sun, 01/12/2025 - 17:27 नवीन
नमस्कार विजुभाऊ, आपण म्हणता ते बरोबर आहे. या नौकावहनाच्या वेळी महाराज कोणत्या प्रकारच्या गलबतातून प्रवास करत होते? किती जहाजे त्यांच्या बरोबर जात होती? त्यातून किती मावळे बरोबर असावेत? शिवाय काही घोडदळ जमिनीवरून आधीच कारवार, बसरूरला येऊन थांबले असावे? ही मोहीम नौदलाचे सामर्थ्य दाखवून बसरूर बाजार पेठेत डच, पोर्तुगीजांचा प्रभाव कमी करण्यासाठी प्रयत्न होता असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा