मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पाकिस्तान-३

अमरेंद्र बाहुबली · · जनातलं, मनातलं
पाकिस्तान हा ब्रिटिश भारताचा एक छोटासा भाग होता. डिस्कनेक्ट होताच गाडी पुढे सरकू लागेल, अशी स्वतःची यंत्रणा नव्हती. तिथली अर्थव्यवस्था हिंदूच्या हाती होती जे फाळणीनंतर भारतात आले होते. रावळपिंडी नक्कीच मोठी छावणी होती, पण संपूर्ण सैन्य मुस्लिम सैन्य नव्हते. प्रशासकीय अधिकाऱ्यांची संख्या घेतली तर सुमारे बाराशे अधिकाऱ्यांपैकी शंभर अधिकारी मुस्लिम होते, त्यापैकी वीस जणांनी पाकिस्तानात जाण्यास नकार दिला. बाकीच्या अधिकार्यांचे मत बदलण्याआधीच 'ऑपरेशन पाकिस्तान' अंतर्गत ब्रिटिश विमाने दिल्लीला पाठवण्यात आली नी त्यांना ऊचलन्यात आले. ब्रिटीश भारतातील सुमारे पंधरा हजार कारखान्यांमध्ये पाकिस्तानच्या वाट्याला एक हजार कारखाने आले, परंतु त्यातील अनेकांचे मालक हिंदू किंवा शीख होते. नव्या पाकिस्तानच्या हातात रोख रक्कमही नव्हती. भारताकडून वाटणी नंतर येणारा पैसा काश्मीरमध्ये घुसखोरीसाठी वापरला जाऊ नये म्हणून काही काळ रोखून धरण्यात आला होता. पाकिस्तानची जी काही आर्थिक ताकद होती ती पूर्व पाकिस्तानात होती. तेथे ताग उद्योग होते. त्यांची प्रक्रिया करणारे कारखानेही भारतात गेले, परंतु पूर्व पाकिस्तानने पश्चिम पाकिस्तानला आर्थीक बाबतीत बऱ्याच प्रमाणात सांभाळले. या बंगालींनी पाकिस्तानला नक्कीच सांभाळले, पण त्यांचाही जीव आतून गुदमरायला लागला होता, ते पाकिस्तानच्या लोकसंख्येत निम्म्याहून अधिक होते, पण सिंहासन कराचीत होते. त्यांच्यात आणि पश्चिम पाकिस्तानमधला एकमेव बंध होता तो धर्माचा. हा धागा भक्कम होता, पण भाषेच्या बाबतीत तो तूटला. मोहम्मद अली जिना यांचा असा विश्वास होता की संपूर्ण देश एकत्र करण्यासाठी एक भाषा आवश्यक आहे, ती उर्दू असावी. स्वातंत्र्यानंतर ते एकदाच ढाक्याला गेले होते, आणि फक्त ऊर्दू हीच भाषा असेल असे सांगून परत आले. बंगालात बंगाली चालेल, उर्दू नाही, या मुद्द्यावर बंगाली ठाम होते. खरे तर जिना किंवा लियाकत अली खान हे दोघेही पाकिस्तान क्षेत्रातले नव्हते. तिथली भाषा आणि संस्कृती त्यांना तितकीच अनोळखी होती जितकी ती बिहार-उत्तर प्रदेशातून आलेल्या मुस्लिमांना होती. ते पंजाबी, बंगाली किंवा सिंधी कसे बोलू शकनार होते? गुजरातचे असूनही ते गुजराती बोलण्यात गडबड करायचे. त्यांचे शिक्षण इंग्रजीत झाले होते आणि ते उर्दूही इंग्रजी शैलीत बोलत. त्यांचे एक भाषण तीस वर्षे पाकिस्तानात दररोज प्रसारित केले जायचे, ज्यात ते म्हणत,“तुम्ही सर्वजण आपापल्या मंदिरात जाण्यासाठी मोकळे आहात. तुम्ही सर्वजण आपापल्या मशिदीत जाण्यास मोकळे आहात. तुम्ही सर्व कोणत्याही प्रार्थनास्थळी जाण्यास मोकळे आहात.” (1977 मध्ये कोणीतरी हे भाषण गायब केले आणि प्रसारण बंद झाले. आता ते YouTube वर उपलब्ध आहे.) जिना यांच्या मृत्यूनंतर आणि लियाकत अली खान यांच्या हत्येनंतर पाकिस्तानला हाताळण्यास सक्षम कोणीही उरले नाही. बंगाली ख्वाजा निजामुद्दीन यांना पुढील पंतप्रधान बनवण्यात आले. आता आपली मागणी मान्य होईल असे बंगालींना वाटले. पण त्यांनीही बंगालमध्ये जाऊन उर्दू हीच भाषा राहणार असल्याचे सांगितले. पंजाबी, सिंधी, बलोच, काश्मिरी, पख्तुन कसे तरी उर्दूला तयार (?) झाले, पण बंगालसाठी हा मुद्दा पाकिस्तानचे दोन तुकडे करण्याची ठिणगी ठरला. विद्यार्थ्यांना भडकावल्याप्रकरणी शेख मुजीब-उर-रहमान या विद्यार्थ्याला तुरुंगात पाठवण्यात आले. 21 फेब्रुवारी 1952 रोजी ढाक्यातील विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्यात आला आणि त्यात आठ विद्यार्थी हुतात्मा झाल्याने बंगाल पेटला. पंतप्रधान निजामुद्दीन यांना हटवून आणखी एक बंगाली मोहम्मद अली बोगरा यांना पंतप्रधान करण्यात आले. परिस्थिती पाहून त्यांनी लष्करप्रमुख अयुब खान यांना संरक्षणमंत्री केले. अशाप्रकारे तेथील राजकारणात रेड कार्पेट अंथरून पाकिस्तानी लष्कराचे स्वागत करण्यात आले. अमेरिकेलाही तेच हवे होते. (क्रमशः) मूळ लेखक - प्रविण झा. पुस्तक - दास्तान- ए- पाकिस्तान. प्रकाशक- ई संपदा प्रकाशन. https://esamaadprakashan.com/books/dastan-e-pakistan/

वाचने 7047 वाचनखूण प्रतिक्रिया 35

"कारखान्यांमध्ये पाकिस्तानच्या वाट्याला एक हजार कारखाने आले, परंतु त्यातील अनेकांचे मालक हिंदू किंवा शीख होते." सध्या हे मालक किंवा ह्यांचे वंशज कुठे आहेत?

In reply to by मुक्त विहारि

विवेकपटाईत 11/02/2024 - 09:02
ते सर्व पाकिस्तान सोडून भारतात आले. फरीदाबाद (हरयाणा) ही औद्योगिक वसाहत पंजाब मधून आलेल्या उद्योजकांसाठी बसवली होती.

छान लेखमाला ! वाचतो आहे. अवांतर : तुम्ही हिंदी देखील वाचता ? तुमचा हिंदीभाषिकांवरील दांडपट्टा पाहून तुम्ही असे काही वाचत असाल यावर विश्वास बसत नाहिये :)

In reply to by धर्मराजमुटके

सर विरोध हिंदी ला नाही, तर हिंदी लादण्याला आहे. महाराष्ट्रात मराठीच बोलली पाहीजे हा आमचा आग्रह असतो.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

महाराष्ट्रात मराठीच बोलली पाहीजे हा आमचा आग्रह असतो.
>>> हे म्हणजे हिंदुस्थानात हिंदुच रहायला पाहिजे असे आग्रह धरण्यासारखे आहे ! भाषा काय अन धर्म काय , दोन्ही लोकांची माथी भडकवण्याचे धंदे. तुम्ही एकाला चांगलं म्हणता अन दुसर्‍याला वाईट ! असो. जय जगत !

In reply to by प्रसाद गोडबोले

काहीही. तसॅ असतं तर अख्खा युरोप आज इंग्रजी बोलत असतात. लोकांना आपली भाषा जपली नसती.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

जवळपास अख्खा युरोप ख्रिश्चन आहे ! म्हणजे भाषा वैविध्य जपताना त्यांनी एकाच धर्माचा स्विकार केलेला आहे . हिंदुस्थानात असे काहीसे असयाला हवे आहे का तुम्हाला ?

In reply to by प्रसाद गोडबोले

हे म्हणजे हिंदुस्थानात हिंदुच रहायला पाहिजे असे आग्रह धरण्यासारखे आहे ! भाषा काय अन धर्म काय , दोन्ही लोकांची माथी भडकवण्याचे धंदे. तुम्ही एकाला चांगलं म्हणता अन दुसर्‍याला वाईट ! असो. जय जगत ! हे द्न्यान हिंदी भाषाकांना द्या. महाराष्ट्रात येऊनही हिंदी मे बोलो म्हणून मराठी भाषकांवर दादागीरी करतात. स्थानीर भाषआ शिका नाहीतर आपापल्या राज्यात जाऊन पाणीपुरी विका म्हणावं.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

तुम्ही जो तर्क भाषेबाबत लावत आहात तोच तर्क धर्माबाबत लावता येईल की. उदाहरणार्थ : हे द्न्यान अमुक अमुक धर्माच्या लोकांना द्या. हिंदुस्थानात येऊनही त्यांच्याच धर्माच्या आरोळ्या ठोकतात अन हिंदु धर्मीयांवर दादागीरी करतात. स्थानीक धर्म , देव , मंदिरं, उपासना पध्दती स्विकारा नाहीतर आपापल्या वाळवंतात जाऊन काय घिंगाणा घालयचाया आहे तो घाला म्हणावं. आता बोला.

In reply to by प्रसाद गोडबोले

मी उगाच वितंडवाद करत नाहीये . मला इतकेच म्हणायचे आहे के - दोन्ही धर्म आणि भाषा हे दोन्ही अहंकार , अहमन्यता , तात्विक दृष्टीने पाहिले तर समानच आहेत . तुम्ही जर "महाराष्ट्रात फक्त मराठीच चालणार " असा हट्ट धरत असाल अन अन्य कोणी " हिंदुस्थानात फक्त हिंदुच रहणार" असे म्हणत असेल , तर तुम्हाला त्याला विरोध करायचा नैतिक अधिकार रहात नाही. तात्विकदृष्ट्या तुम्ही समानच आहात. इसिच लिये अब्बी हमने विनोबा भावे का मार्ग अपनाया हय. बोलो - सब भुमी गोपाल की . जय महाराष्ट्र जय हिंद सब छोडो , अब बोलो -

जय जगत.

In reply to by प्रसाद गोडबोले

मी उगाच वितंडवाद करत नाहीये . मला इतकेच म्हणायचे आहे के - दोन्ही धर्म आणि भाषा हे दोन्ही अहंकार , अहमन्यता , तात्विक दृष्टीने पाहिले तर समानच आहेत . तुम्ही जर "महाराष्ट्रात फक्त मराठीच चालणार " असा हट्ट धरत असाल अन अन्य कोणी " हिंदुस्थानात फक्त हिंदुच रहणार" असे म्हणत असेल , तर तुम्हाला त्याला विरोध करायचा नैतिक अधिकार रहात नाही. तात्विकदृष्ट्या तुम्ही समानच आहात. इसिच लिये अब्बी हमने विनोबा भावे का मार्ग अपनाया हय. बोलो - सब भुमी गोपाल की . जय महाराष्ट्र जय हिंद सब छोडो , अब बोलो -

जय जगत.

In reply to by प्रसाद गोडबोले

तसं असतं तर बंगालात फक्त बंगाली चालनार हे म्हणून बांग्लादेशा वेगळे निघाले नसते. विविधतेत एकता हे भारताचे ब्रिद आहे. प्रत्येक राज्याची एक राज्यभाषा आहे नी त्या त्या राज्यात तीच चालावी. महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी बोलनार नाही युपीची राज्यभाषा हिंदीतच बोलेन असं कुणी म्हणत असेल तर त्याच्या पाठीत रट्टे द्यावेत ना त्याला साथ देणारा कुणी मराठी असेल तर त्याच्याही पाठीत. नी तसे रट्टे मराठी माणूस नी इतर अहिंदी राज्ये देतच असतात.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मग ह्याच तर्काने - हिंदुस्थान फक्त हिंदुंचाच ! हिंदुस्थानात येऊन हिंदु जीवनपध्धती जगणार नाही वाळवंटातील हिंसक दहशतवादी धर्मच जगेन असं कुणी म्हणत असेल तर त्याच्या पाठीत रट्टे द्यावेत ना त्याला साथ देणारा कुणी हिंदु असेल तर त्याच्याही पाठीत. नी तसे रट्टे हिंदु माणूस नी हिंदुहितवादीसंस्था देतच असतात.

सर टोबी 11/02/2024 - 09:27
ही कंपनी अजूनही भारत आणि पाकिस्तान नागरिकत्व असणाऱ्या उद्योगपतींचा संयुक्त व्यवसाय आहे. रुह अफजा हे त्यांचे सरबत ही बर्याच भारतीय कुटुंबांमध्ये (माझं कुटुंब धरुन) उन्हाळ्यात आवश्यक असणारी गोष्ट आहे. बॉम्बे डाईंगचे नस्ली वाडिया हे मोहम्मद अली जिन्हा यांचे नातू. जिन्हा यांची जिन्हा मॅन्शन आज ही मलबार हिल परिसरात आहे.

In reply to by सर टोबी

जिन्हांची एकूलती एक मूलगी होती. तिने पाकिस्तानात जायला नकार दिला. जिनांची अजूनही शेकडो एकर जमीन पडून आहे जिनांचा वारस पाकीस्तानात नसल्याने.

In reply to by सर टोबी

टर्मीनेटर 11/02/2024 - 11:29
‘ हमदर्द’ आणि ‘रुह अफजा’ वाचल्यावर प्रमुख्याने युनानी औषधांची निर्मीती करणाऱ्या ह्या कंपनीच्या आणखिन एका दर्जेदार उत्पादनाची आणि त्याच्या जाहिरातीची आठवण आली!
ये बेचारा काम के बोझ का मारा… इसे चाहिये हमदर्द का टॅानीक ‘सिंकारा’
😀 मला वाटतं माझी दहावी-बारावी होईपर्यंत सिंकारा आमच्या घरी नियमीत आणले आणि सेवन केले जात होते. आता बाजारात मिळते की नाही बघावे लागेल, रूह अफजा मात्र उन्हाळ्यात अजुनही आणले जाते!

In reply to by सर टोबी

कॉमी 12/02/2024 - 00:08
नेस वाडिया जन संघाचे सर्वात मोठे / सर्वात मोठ्या डोनर पैकी एक होते असे आत्ताच ऐकले एका मुलाखतीत.

सर टोबी 11/02/2024 - 13:43
पाकिस्तान म्हटलं आणि मुस्लिम योगदानाबद्दल आणि पाकिस्तानचं भारताच्या संबंधित महत्त्वाबद्दल बोलायचं नाही असं केलं तर एक मोठा विषय दुर्लक्षित केल्यासारखं होईल. वरुणराज भिडे म्हणून मागच्या पिढीतले, सकाळसाठी वार्तांकन आणि स्तंभलेखन करणारे पत्रकार होते. सहसा पुणेकर मुंबईमध्ये मनापासून रममाण होत नाहीत. पण भिडे याला अपवाद होते. एक सबंध वर्ष त्यांनी मुंबईचं वर्णन करणारी साप्ताहिक लेखमालिका लिहिली. त्यात मुंबईचा अब्दुल रेहमान स्ट्रीट आणि मोहम्मद अली रोड यांच्यावर एक लेख लिहिला होता. मागच्या दोन पिढ्यांपूर्वी घराघरात वापरले जाणारे अहमद मिलचे पोस्टमन ब्रँडचे गोडे तेल, हमदर्दची औषधं (पचनॉल, रुह अफजा, साफी), ईब्राहीमची हरीण छाप छत्री, कॉमेटच्या वह्या वगैरे. पण ते सर्वात जास्त रमले ते मोहम्मद अली रोडवरची, रमझानच्या काळात होणारी खाद्यजत्रा कशी असते ते सांगण्यामध्ये. मिपा संस्थापक तात्यांनी देखील अगदी रसिलेपणाने त्या खाद्यजत्रेवर लेख लिहिला आहे. जुन्या वाचकांपैकी कुणाला त्याची लिंक आठवत असेल तर इथे पेस्टवावी. पाकिस्तानचा भारताबरोबर होणारा व्यापार, कलाकारांची आवक जावक यांची सद्यस्थिती काय आहे याची माहिती नाही. जाज्वल्य देशभक्तीमुळे हे सर्व थंडावले असावे एवढीच आमची माफक समज.

In reply to by सर टोबी

मनो 12/02/2024 - 03:11
> पाकिस्तानचा भारताबरोबर होणारा व्यापार, कलाकारांची आवक जावक यांची सद्यस्थिती काय आहे याची माहिती नाही. YouTube वरती पाकिस्तान-संबंधित अनेक विषय पाहायला मिळतात, त्यातले एक-दोन सांगतो. भारतातील खाणे, फिरणे इत्यादी विषयांवर पाकिस्तानी प्रतिक्रिया देणारे अनेक लोक आहेत. यात पाकिस्तानी रुपया भारताच्या ३ पट असल्याने भारतातील किमती त्यांना खूप कमी वाटतात. एकंदर भारतातील गोष्टींची वारेमाप स्तुती केली की भारतीय सबस्क्राईबर ढिगाने मिळतात, याचा फायदा घेणारे पुष्कळ आहेत. दुसरे म्हणजे भारतात जाऊन आलेल्या लोकांच्या मुलाखती घेणारे. यात वैद्यकीय कारणासाठी, धार्मिक यात्रा, नातेवाईक भेट हे अद्यापही चालू असल्याने त्या कारणासाठी आलेल्या लोकांचे अनुभव ऐकायला मिळतात. यात पाकिस्तानातील अल्पसंख्य हिंदुंपैकी काहींचे चॅनल येतात. शेवटचे रेडिओ स्टाईल पॉडकास्ट करणारे पाकिस्तानी विचारवंत. त्यांचे विचार कितीही बरोबर असले तरी प्रत्यक्ष कृती करणारे सरकार गायब असल्याने चर्चेतून निष्पन्न काहीच होत नसते.

In reply to by मनो

कंजूस 12/02/2024 - 05:50
Us dollar च्या संदर्भात पाकिस्तानी रुपया अंदाजे २८० आणि भारतीय ८५ आहे तर पाकिस्तानी रुपया भारताच्या ३ पट असल्याने भारतातील किमती त्यांना खूप कमी वाटतात. समजले नाही.

In reply to by कंजूस

मनो 12/02/2024 - 07:56
व्हिडिओ बनवताना भारतात तेल ३०० रुपये, आपल्याकडे पाकिस्तानात ९०० रुपये अशी हेडलाईन टाकतात. चलनातील फरक आणि कर इत्यादी पाहिला तर ती एकच किंमत असते, पण लोक क्लिक करून पहातात. उदाहरण https://youtu.be/SZiVOcpZghc?si=5riTHO9uyLmu_eCI

In reply to by मनो

कंजूस 12/02/2024 - 09:23
पाकिस्तानी मनुष्य इथे भारतात शंभर रुपयांचा डोसा खाईल तो त्याला त्याच्या चलनात तिनशेला पडलेला असतो ना. बाकी विडिओ वाले काही वेळा आकर्षक टायटल टाकतात हे मान्य.

In reply to by कंजूस

मनो 12/02/2024 - 11:48
त्यांचे चलनही रुपयाच आहे, त्यामुळं ३०० रुपयाची वस्तू भारतात १०० रुपयांना मिळते अशी फसवी रचना असते.

कंजूस 11/02/2024 - 14:40
नवीन विषय घेतला एका तरुण मिपाकराने याचं कौतुक आहे. आणखी चार पाच आहेतच. जरा वर्दळ वाढली तर एक नवीन पिढी इथे लिहू लागेल. एकदाचं पाहून दुसरा सरसावतो.

नठ्यारा 11/02/2024 - 15:58
अवांतर : अमरेंद्र बाहुबली,
विरोध हिंदी ला नाही, तर हिंदी लादण्याला आहे. महाराष्ट्रात मराठीच बोलली पाहीजे हा आमचा आग्रह असतो.
हजार टक्के सहमत. माझ्या मते हिंदी नामे कोणतीही भाषा नाही. 'हिंदी' हे इंग्रजांच्या सोयीसाठी त्यांनी अनेक उत्तरभारतीय भाषांना एकत्रितपणे दिलेलं समूहनाम आहे. खडीबोली, बुंदेलखंडी, चंदेलखंडी, कनौजी, मैथिली, मागधी वगैरे याच खऱ्या भाषा होत. हिंदी हे केवळ समुच्चयनाम आहे. मी तर म्हणतो घाटी बोली च्या धर्तीवर घाटी हिंदी विकसित करावी. ती महाराष्ट्राची हिंदी म्हणून गणली जावी. -नाठाळ नठ्या

In reply to by अमरेंद्र बाहुबली

+२ पण हिंदुं विरूध्द लढायला हिंदु धर्मीयच छातीचा कोट करून पुढे येतात. वर ऊदाहरण आहे. (महत्वाची टीपः आम्ही हिंदु म्हणतो तेव्हा त्यात सनातन वैदिक, बौध्द, जैन , शीख असे भारतीय उपखंडात उगम असलेले सहिष्णु असलेले सर्वच संप्रदाय येतात !)

कंजूस 12/02/2024 - 09:28
अ.बा. तुम्ही तुमची निरीक्षणे पटापट लिहा. बाकी पाकिस्तान आणि फाळणीवर बरीच इंग्रजी पुस्तके आहेत, आणि येत असतात. कोणत्याही देशांत उद्योजकांनी पुढाकार घेतला तरच आर्थिक स्थिती सुधारते, चलन वर चढते. त्या उद्योजकांना पाठिंबा देणे हे देखील त्यांच्या सरकारचे काम आहे.

चांगली चालु आहे मालिका!! रच्याकने-"नव्या पाकीस्तानच्या हातात रोख रक्कम नव्हती" यावरुन पुर्वी कधीतरी वाचलेले "५५ कोटींचे बळी" हे पुस्तक आठवले. नथुराम गोडसेंच्या भावाने लिहिलेले. पुन्हा वाचायला हवे .

तेव्हढा भाषा आणी धर्माचा एजंडा थोडावेळ बाजुला ठेवुन पाकिस्तान विषयावर लिहील्या सारखे आहे. असेच काहीसे वाचक आणी प्रतिसादकांना म्हणणे आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

धन्यवाद. पण मा फक्त भाषांतर करतोय. चांगलं लिहीतात ते प्रविण झा. त्यांची इतरही पुस्तके वाचनिय आहेत.