आम्ही स्टँडच्या पोरी
लेखनप्रकार
पाच सहा वर्षे झाली असतील. सातार्याहून मुंबै ला यायचे होते.
सातारा मुंबई थेट बस होती . रात्री साडे दहा ची वेळ असेल.
दहा वाजताच बसस्टँडवर जाऊन पोहोचलो. बसच्या स्टँडच्या शेडमधे तुरळकच उतारू होते.
अचानक तेथे एक बाई आली. वय वर्षे तीशीच्या आतच असेल.केस विस्कटलेले ,साडी अंगावर कोट. थंडी फारशी नव्हती तरीही तीने अंगावर ब्लेझर कोट घातला होता
तीच्या कडे काही सामानही दिसत नव्हते.
तीच्याकडे कोणाचे लक्ष्यही नव्हते.
अचानक काहितरी गलबला ऐकू आला म्हणून चमकून पाहिले. तर ती बाइ मोठमोठ्याने कोणावर तरी भांडत ओरडत होती.
काय समजलास काय रे स्वतःला. ह्या इथे दादागिरी नाय खपवून घेणार. मोठा असशील तर घरी. माजुरीपणा दाखवायचा तर तो घरच्या लोकाम्वर दाखव.
मला कशाला दाखवतोस. आम्हाला तू असा फसवू शकणार नाहीस. काय समजलास रे. क्ष्क्ष*&*$#$ *&*& हे सुक्कळीच्या.
ती ज्या दिशेला पाहून भांडत होती त्या बाजूला असलेले प्रवासी तेथून दूर निघून गेले.
आम्ही स्टँडच्या पोरी अशातशा नाय. एकदा दाखवायचे ठरवले तर तुला चांगलाच दाखवू. पार नडवू. परत तोंड दाखवणार नाहीस.
आमी स्टँडच्या पोरी कुनाला ऐकणार्यातल्या नाय.
..........
.......................
..............................
या नंतरही ती बाई बडबडत राहिली. कधितरी हातातला कोट जमिनीवर फेकत राहिली. कधी काठीने शेडच्या खांबावर मारत राहिली. पण उतारुंपैकी सगळेच तीला टाळत होते. कोणीतरी तीला काहि खायला दिले. तीने ते घेतले. पण नंतर म्हणाली. मला खायला देताय होय. मला? मी भिकारी नाय. चांगल्या घरची आहे. मी
.......... तू येच पुन्हा तुला बघतेच आता.कसा येतोस आन कसा जातोस ते.
एकूण अवतारावरून ती बाई एखाद्या चांगल्या घरातली वाटत होती. सुशिक्षीतही असावी. ती डिप्रेशन मधे पण असावी. पण तीच्या घरचे दारचे कोणी नसावे.
पण तीच्या बोलण्यात एकाचवेळेस विस्कळीतपणा राग आणि अभिमान अशा काहिश्या भावना होत्या.
तीच्या आम्ही " स्टँडच्या पोरी " या शब्दावरून काहिशी विचित्र जाणीव झाली. एरव्ही सामान्य माणूस आपण अमूक गावचे आहोत, अमक्या तमक्या संघटनेचेआहोत. असे अभिमानाने सांगायचे तर आम्ही सातारचे लोक, सदाशिवपेठी लोक असे सांगतात.
या बाईने केलेल्या " आम्ही स्टँडच्या पोरी" या उल्लेखाचे जरा वेगळेपण वाटले.
त्या बाईची काही फसवणूक झाली असेल, तीला तिथे कोणी आणले असेल, आपण जर स्टँडमधे आहोत हे तीला समजत असेल तर तेथून घरी जावे हे देखील समजत असेल तरीही ती तिथेच कशी थाम्बली?
हे सगळेच कुतूहल वाटते. कसे असतात ना लोक. या लोकांना भूत भविष्य काहीच नसते. एखाद्या वस्तूसारखे जगायचे , मधेच कधितरी माणूसपण आठवले की जगावर त्रागा करायचा. यातून या लोकांची सूटका कशी आणि कधी होईल कोण जाणे. या बाबत आपण काहीच करू शकत नाही याची हतबलता मात्र जाणवते.
इतक्या वर्षांनंतरही " आम्ही स्टँडच्या पोरी " हे तीचे शब्द मनातून पुसले जात नाहीत.
वाचने
3170
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
फेरीवाली विक्रेती किंवा काही
हे लोक कसे येतात, कुठे रहतात
अस्थिर मन, जगावर राग, तोंडात
सातारा आणि स्टँडच्या पोरी हे
खरे आहे तुम्ही म्हणताय ते.
अशीच आजूनेक कथा ....