विचारचक्र
लेखनप्रकार
मागल्या आठवड्याची गोष्ट. आता दिवाळी, खरेदी, आवराआवर, गाठीभेटी अश्या वातावरणात घडू नये अशी एखादी तरी घटना घडतेच. व ती घडली. ओळखीच्या एका व्यक्तिचा अपघात. ही व्यक्ती खूप जवळची अशी नाही पण जे घडले ते काही डोक्यातुन जात नाही. म्हणुन इथे उतरवण्याचा खटाटोप.
ही व्यक्ती तरुण. नुकतेच ३ महीन्यापुर्वी लग्न झालेले. पेशाने डॉक्टर. अपघात झाला, दोन्ही पाय गेले. अपघात झाला तरी कसा? समोरुन रेल्वे येतीय हे दिसतेय तरी रुळ ओलांडून जायची घाई. असे अनेकदा केले असणार आयुष्यात. नेमकी वेळ यायची होती. झालं पाय अडखळून पडला; वेळेत उठू शकला नाही. रेल्वेचे धुड त्याच्या दोन्ही पायाचे तुकडे करुन गेले.
बरं माणूस मोठा जिद्दीचा. अजिबात खचला नाही, अपघाताचा प्रसंग स्व:ता वर्णन करत होता. धडक बसल्यावर म्हणे लगेच काही जाणवले नाही फक्त गरागरा गोल शरीर फिरत होते हे जाणवत होते.
उच्चशिक्षीत तरुण व्यक्ती असा बेजबाबदार निर्णय घेउच कसा शकते. एका "डॉक्टरला" ह्यातील संभाव्य धोक्याची कल्पना नसावी? वर्तमानपत्रात कधी रेल्वेअपघातसंबधी बातम्या वाचल्या नसतील. कधी रेल्वे येण्या अगोदर ५ ते १० मिनिटे बंद असलेले फाटक पाहीले नसेल? समोर रेल्वे दिसत असताना अगोदर बरेचदा नियम मोडून रुळ ओलांडून अंगवळणी पडलेली सवय, आपल्याला असे होउच शकत नाही हा फाजील आत्मविश्वास?
स्व:ताच्या निर्णयामुळे जवळच्या लोकांना अशी सजा देउच कशी शकते ह्या पलीकडे माझे डोके विचार करायलाच तयार नाही आहे.
आता रागाच्या भरात मी असा विचार केला की, च्यायला ही व्यक्ती आहेच बेरकी, पुढे मागे अपंग आरक्षण मिळवण्यासाठी मुद्दाम तर केले नसावे? मंडळी मी असा विचार करणे जास्त चुकीचे की ह्या व्यक्तीचे असा जीव धोक्यात घालून वागणे जास्त चुकीचे.
परत विचार करता हेच जाणवले की जागतीक अर्थबाजारातील बडी धेंडं अगदी असेच तर वागली. नको तेवढी जास्त रिस्क घेउन झाला की अपघात. स्वःता तर कोसळलेच पण त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांची परिस्थीती बिकट करुन गेले. समभाग बाजारातील भाव चढणे अथवा ढासळाणे याची पुर्व कल्पना ह्या बाजारात प्रवेश करणार्या सर्वांना असते पण म्हणुन काही कायदे, नियम पाळणे आवश्यक असते. नक्कीच यातील महत्वाचे नियमांकडे दुर्लक्ष करुन निर्णय घेतले गेले. पण या खेळात सगळेच इतके मुग्ध झाले होते की या अपघाताची झळ जगातील सर्व देशातल्या बाजारात पोहोचली.
निदान तो अपघातात अडकलेला मनुष्य मनाने खंबीर आहे, लवकरच आपल्या खोट्या पायांवर उभे राहू असे सर्वांना सांगत होता. त्याचे घरचे, मित्रमंडळ हे सोबतीला आहेतच. आशा आहे की जागतीक अर्थबाजार देखील त्याच धडाडीने लवकर उभा राहून दाखवेल.
वाचने
2594
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
सहजराव, शेअ
खिन्न
तुलना पटली
धोका/फायदा यांचे झटपट गणित कठिण
In reply to धोका/फायदा यांचे झटपट गणित कठिण by धनंजय
(नेहेमीप्र
In reply to (नेहेमीप्र by सुनील
मूळ लेख
रिस्क
रोचक सांगड
खिन्न..
खिन्न..