मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

उपकार इंग्रजांचे

आशु जोग · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
इंग्रजांनी या देशाला गुलाम केले. ही गोष्ट खरी असली तरीसुद्धा इंग्रजांनी काही चांगल्या, वरदान म्हणाव्यात अशा गोष्टी भारताला दिल्या. त्यातली एक म्हणजे इंग्रजी भाषा. इंग्रजी भाषेमुळे आपल्याला जगाचे दरवाजे खुले झाले. इंग्रज या देशातून जाऊन आता 70 वर्षे झाली पण त्यांची इंग्रजी भाषा आणि तिची उपयुक्तता मात्र आम्ही विसरलेलो नाही. त्यामुळे आजही अनेक मराठी पालक आपल्या मुलांना आवर्जून इंग्रजी माध्यमाच्या शाळेतच घालतात. ashutoshjog@yahoo.com घरात बोलायला, गप्पा मारायला वगैरे मराठी ठीक आहे पण शिक्षणासाठी माध्यम म्हणून इंग्रजीच ! अनेक पालक मुलांना मराठी साहित्याची घरच्या घरीच ओळख करून देतात पण माध्यमाचा दर्जा मात्र इंग्रजीलाच देतात. इंग्रजांनी बाकी कुठलेही अन्याय केलेले असले तरीसुद्धा इंग्रजी भाषेचे माध्यम भारतीयांना देऊन आपल्यावर अनंत उपकार करुन ठेवलेले आहेत ! निदान या बाबतीतले इंग्रजांचे उपकार तरी आपण विसरता कामा नये. ashutoshjog@yahoo.com

वाचन 36504 प्रतिक्रिया 0