आपापले जग.
लेखनप्रकार
मिपावरच्या कोठेतरी गर्भप्रतिबंधित गोळ्या आणि गरबाच्या पार्श्वभूमीवर हे लेखन करत आहे.
काल्पनिक वाटले तर तो माझ्या लेखनाचा दोष समजावा.
ज्याचे मन तरल आहे त्याने हे वाचण्याचे शक्यतो टाळावे.
आता विषय प्रवेश.
२५/३० वर्षापूर्वीचा प्रसंग.
स्थळ १५००० वस्तीच्या गावातील मित्रांशी गप्पा.
अनेक विषयानंतर खालील चर्चेचा प्रसंग.
माझा मित्र, अरे आपल्या अमूक अमूक चे लग्न ठरले होते ते माहित आहे ना?
मी : हो, माहित आहे.
तो : अरे त्याचा काडीमोड झाला.
मी : असे कसे? काहीकाळापूर्वीच त्याचे आमंत्रण पाहिले होते. पण मनाची तयारी करत, माझा प्रश्न : का बरे असे झाले?
मित्र : ( थोडे छद्मी हास्य करत) अरे, ती गंमत आहे, मी परत नेटाने : अरे सांग तरी,
मित्र : अरे, त्याच्या लग्नानंतर पहिल्या रात्री त्यांचा आमोद - प्रमोद चालू होता, प्रणय क्रीडा चालू होती. ( मी ह्म्मम). मग?
मित्र : या मूर्खाने तिला विचारले की कोण मूर्खच विचारु शकेल?
मी ( अधीरतेने) काय ते?
मित्र : त्याने आपल्या बायकोला विचारले की असा आनंद कधी मिळाला होता काय?
मी : मित्रा, हा काय चर्चेचा विषय आहे?
मित्र : ऐकतर, त्या मुलीने नकळतच उत्तर दिले, की हो एकदा असा आनंद घेतला आहे.
मी : अरेरे, खरेच मूर्ख आहे हा, पण प्रश्न याने विचारला आणि तिनेही नको ते उत्तर दिले.
मित्र : याने लगेच विवाह विच्छेदाचा निर्णय घेतला.
( माझे मत : मी या घटनेवर बराच विचारमग्न झालो. बर्याच दिवस विचार केल्यानंतर माझे असे मत झाले की खेड्यात एकांत मिळत असतो, त्यामूळे अश्या घटना घडत असाव्यात. दुसरे म्हणजे खेड्याचे वातावरण तसे मोकळेच असते त्यामूळे क्वचित असा प्रमाद घडत असावा. तरीपण समाजाचे अश्या घटनावर बरेच नियंत्रण असते. असो. मला बरेच दिवस एक संसार उद्धस्त झाला याचे वाईट वाटत होते.)
प्रसंग दुसरा, अंदाजे २ वर्षापूर्वी,
बस मध्ये प्रवास करत असताना शेजारी अंदाजे ३० वर्षाची सुंदर मुलगी बसली. विरंगुळा म्हणून गप्पाटप्पा मारतांना समजले की ती नोकरी करत आहे आणि अविवाहित आहे. मी सहजच विचारले, की सुंदर आहे, सुशिक्षित आहे, मग अजून लग्न का बरे नाही केले? आजकाल तर इतर शहरातले आपल्या मुली चांगल्या संगणक तज्ज्ञाना देत असतात, तु तर येथलीच आहे?
तिचे उत्तर ऐकुन मी चाटच पडलो, तीचे उत्तर होते, की खरे सांगुना लग्न करायला अथवा त्यावर विचार करायला मला वेळच मिळाला नाही. माझे आयुष्य इतके गतिमान आहे यावर विचार करायला वेळच मिळाला नाही. साध्या मुलीना महाविद्यालयीन शिक्षण संपले की लग्नाचे विचार मनात घोळू लागतात. या मुलीने जणु आपल्या विचारावर, भावनेवर विजयच मिळविला. आज ठिक आहे, उद्या वय संपले म्हणजे काय होईल?
पहिल्या आणि दुसर्या प्रसंगाचा विचार माझ्या मनात नेहमीच होत असतो. पहिल्या मुलीने नकळतच घात करुन घेतला तर शहरी मुलीने योग्य वेळी निसर्गाची साद न ऐकण्यात आपला घात करुन घेतला.
कधीकधी असे वाटते की दुसरी मुलीने लग्न केले तरी तिच्या मनात भावनेचा ओलावा, तरलता असणार नाही आणि तिला आपल्या जीवनाचा कधी आनंद घेता येणार नाही.
प्रसंग तिसरा म्हणजे आजचा,
मिपावरच्या लेखावर अनेक प्रतिक्रिया. समाजात गुप्तपणे अनेक गोष्टी घडत असतात. पण त्याचा उघड स्विकार मला आक्षेर्पाह वाटतो.
निसर्ग हा असाच अनिवार करत असतो, प्रत्येक वेळेस त्याचे आवाहन ऐकलेच पाहिजे असे नाही. शेवटी चौकट आपणच आपली आखुन घेतली पाहिजे.
कधी कधी नकळतच मनाचा बांध तुटतो, तेंव्हा मनुष्य स्खलनशील आहे आणि लगेच आपल्याला काहीतरी बंधनात बांधुन घ्यायला हवे. शेवटी आपापला सारासार विचार आणि विवेक आपल्याच करायचा असतो, हेच खरे.
वाचने
2856
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
कलंत्री साहेब
आपापले जग
In reply to आपापले जग by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
सर्किटरावांशी पूर्ण सहमत आहे
In reply to सर्किटरावांशी पूर्ण सहमत आहे by बेसनलाडू
सहमत!
नेमका संदेश मला सांगता आला नाही.
दोन्ही मुलींचे...
In reply to दोन्ही मुलींचे... by एकलव्य
चुकीच्या शब्दाचा प्रयोग.
In reply to चुकीच्या शब्दाचा प्रयोग. by कलंत्री
शब्द