प्रेरणा
दिल्लीहून जेट लीमिटेड़ ते उडती
म्हणे आय लव्ह काकांची बारामती
हे काय आज आमी डोळ्याने पाहीले
का भक्तगण असे तोंडावरी पडले ?
जेव्हा आलेले हे आपल्या दारी
म्हणाले संपवू काका पुतण्यांची जुलुमगिरी
थापा मारिल्या जनतेच्या सामोरी
दिसू लागली आता ती फेकुगिरी
दिले काकाला विकासपुरुषाचे सर्टिफिकेट .
सिंचनघोटाळा गेला बँकसीटच्या बासनात
म्हणे आमुचे सहिष्णू राजकारण भारतात.
पण हे आजच कसे घडले?
का असे फासे उलटे पडले.?
तेव्हा तुम्ही कुठे होता?
की तेव्हा भारत राजकारणात सहिष्णू नव्हता?
मुंबईवरती झाला हल्ला, त्यावेळी सडेतोड उत्तर द्या म्हणाला,
आज बीएसएफ वर हल्ला झाला, जिवंत अतिरेकीही पकडला
तरी त्या कासुरीला या म्हणणारी, हि कसली औलाद भारताची ?
तेव्हा तुम्ही कुठे होता?
कि तेव्हा भारत स्वाभिमानी नव्हता?
दिली नथुरामला फाशी.
हजारो जमले त्याच्या गौरवाशी
तेव्हा तुम्ही कुठे होता?
कि तेव्हा कोर्टाचा निर्णय अंतिम नव्हता?
जेव्हा जमली ही भुतावळ उघडपणे मैदानी.
केली विचारवंताची हत्या, अफवेवरून निष्पापांची कुर्बानी.
तेव्हा तुम्ही कुठे होता?
कि तेव्हा भारत विकास करत नव्हता?
भ्रष्टाचार्याला पक्षात घेताना केला नाही विचार किंचित.
हाकलून लावले, केले बेघर निष्ठावान अन वृद्ध.
तेव्हा तुम्ही कुठे होता?
कि तेव्हा भारत चारित्र्यवान नव्हता?
किती सांगू? उदाहरणे आहेत फार.
पण नमोरुग्णसमोर मानतो मी हार,
कालचाच गोंधळ बरा वाटतो मग मला,
शांत बसून पेडा खावून, जीव माझा निमाला.
वाचने
2298
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
__/\__
सहमत!
In reply to __/\__ by श्रीरंग_जोशी
+१: समयोचित अन मार्मिक.
In reply to __/\__ by श्रीरंग_जोशी
छान!!!
थेट
+१
In reply to थेट by नाखु
.