Skip to main content

शिर्षकविहीन -सिक्वल (स्पर्धेकरीता नाही)

लेखक चिगो यांनी बुधवार, 05/08/2015 या दिवशी प्रकाशित केले.
शिर्षकविहीन ************************************************************************************************* आज चार आठवड्यांनी तो परत येत होता. ह्या काळात 'कधी, काय करायचं' ह्याच्या हजारो रिहर्सल्स झाल्या होत्या त्याच्या मनातल्या मनात.. तीची प्रतारणा आठवून एसीतही डोकं तापलं त्याचं.. तिची रक्ताळलेली धडपडदेखील डोळ्यांसमोर नाचून गेली. कासावीस झाला तो.. ..पण सगळं सेट होतं ! आणखी आठवड्याभरात 'मिसींग कंप्लेंट' द्यायची. मग एक निनावी फोन.. बॉडी सापडेलच.. इन्श्युरन्स क्लेमचं घबाड. लाईफ सेट है, बॉस ! ...बेलच्या आवाजानं तंद्री भंगली त्याची. कोण तडमडलंय, च्यामायला? ..त्याला ढकलतच आत येत इंस्पेक्टर बोलले, "चार दिवस झाले बॉडी सापडून, साल्या.. मग कालपर्यंत चॅटींग कोण करत होतं बे तिच्या नावानं तुझ्याशी? आणि तेपण एकाच आयपी अ‍ॅड्रेसवरुन? पारच #@त्या समजतोस होय रे पोलिसांना, भडव्या?"
लेखनविषय:

वाचने 7086
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

इतक्या लवकर 'सिक्वल' का टाकली मी? तर कारण हे.. माझ्या शतशब्दकथेवर बर्‍याच जणांनी ती 'स्वयंपुर्ण' नसल्याबद्दल शंका व्यक्त केली. नसेलही बापडी. मला वाटतं, 'अबक' करत कथा समजवण्यासारखी परीस्थिती मिपावाचकांची नसावी. आता ही कथा वाचून पहील्या कथेचं 'रिव्हर्स रिडींग' करुन बघा, ही विनंती.. असो. ह्या सिक्वलचा आनंद घ्या. ह्या व्यतिरीक्तही अनेक प्रकारे ही कथा फुलवता येईल. संशयकल्लोळ/ त्याचं प्रेमप्रकरण/ इस्टेटीचं लफडं आणी बरचं इतर काही.. आणि काहीही न करताही प्रथम कथा एन्जॉय करता येईल, असं मला वाटतं. ट्राय टू एन्जॉय..

सिक्वेल टाकायची घाई कशाला रे केली? काही लोकांना स्वयंपुर्ण नाही वाटली तसेच काही जणांना उत्कंठावर्धकही वाटलीच की.

In reply to by मृत्युन्जय

सिक्वेल टाकायची घाई कशाला रे केली? काही लोकांना स्वयंपुर्ण नाही वाटली तसेच काही जणांना उत्कंठावर्धकही वाटलीच की.
पण त्या कथेचा दुसरा सिक्वल नसेलच, असं कशावरुन? पिक्चर अभी बाकी हें, मेरे दोस्त.. ;-)

स्पष्टीकरणासाठी सिक्वेल आता देण्याची आवश्यकता नव्हती, अस माझं वैयक्तिक मत आहे. मूळ कथासुद्धा 'अ‍ॅज अ स्टॅण्ड अलोन' चांगली कथा आहे.

मी तो दुसरा सीक्वेल वाचला. तो जास्त आवडला. हाही छानच आहे.

अगायायाया!!! काय ते सिक्वेल्स! भन्नाट. लवकरच टाकलेस सिक्वेल तेच छान झाले. नाहीतर आमची अवस्था "कटप्पाने बाहुबलीको क्यों मारा?" सारखी झाली होती :D