Skip to main content

गांधी विरुद्ध आंबेडकर - नेमके काय घडले ?

लेखक राजघराणं यांनी सोमवार, 14/10/2013 00:48 या दिवशी प्रकाशित केले.

गांधी विरुद्ध आंबेडकर - नेमके काय घडले ? (मला समजलेले गांधीजी भाग २ )

गांधी विरुद्ध आंबेडकर - नेमके काय घडले ? ********************************************************************************* संदर्भ स्पष्टीकरण : धनंजय कीर लिखित आंबेडकर चरित्राची दहावी आवृत्ती संदर्भ म्हणुन वापरली आहे . खैरमोडे लिखित आंबेडकर चरित्रही संदर्भाला घेतले आहे - ( खैरमोडे ३-६७) हा संदर्भ खैरमोडे लिखित चरित्रातील तिसर्या खंडातील ६ ७ वे पान असा वाचावा . बहिष्कृत भारत या पत्रातले बाबासाहेबांचे लेख उद्धृत केले आहेत त्यापुढे वर्तमान पत्राचा दिनांक दिला आहे. द न गोखले यांचे डॉ आंबेडकरांचे अंतरंग हे हि पुस्तक संदर्भ म्हणून वापरले आहे . ********************************************************************************* गांधी विरुद्ध आंबेडकर हा संघर्ष अटळ होता . एक दलितांचा नेता आणि दुसरा सवर्ण हिंदुंचा पुढारी यात गुलुगुलु गुलाबी ऐक्य शक्य नव्हते . त्याला सामाजिक कारणे जवाबदार होती . हा संघर्ष कधी निर्माण झाला ? कसा निर्माण झाला ? कसा वाढत गेला ? आणि कधी संपला ? हे आपण प्रस्तुत लेखात पहायचे आहे . आजच्या दलितांनी गांधिंचा द्वेष करण्याचे कारण नाही आणि सवर्णांनी आंबेडकरांचा किंवा आजच्या दलितांचा राग धरू नये .म्हणुन हि धडपड. वरची वाक्ये हिंदि किंवा इंग्लिश मध्ये लिहिली असती तर ठीक ! पण मर्हाटि माणसाला मुळात गांधी हा सवर्ण हिंदुंचा नेता होता हेच मुळी मान्य नाही ! म्हणुन सुरवात तिथून करावी लागेल . ज्या पक्षाला १३ % एव्हढी जास्तीत जास्त मते मिळाली तो हिंदु महासभा हा हिंदुंचा पक्ष म्हणणे तत्व म्हणुन ठिक आहे . पण लोकशाहीच्या राजकारणात हा एक जोक ठरत असतो . ज्याला लोक मते देतात तो पक्ष त्या समाजाचा असतो . सवर्ण हिंदुंनि फ़ाळणिपुर्वि आणि फ़ाळणिनंतरहि गांधिबाबाच्या कोग्रेसला मते टाकलि होती. तत्कालीन सवर्ण हिंदुंचा पुढारी - लोकनियुक्त पुढारी गांधी होता . गांधीना त्याकाळच्या सवर्ण हिंदुसमाजाचा पुढारी न मानणे हे मध्यमवर्गाच्या वांझ बुद्धीमातेचे गर्विष्ठ अपत्य आहे .असो . हिंदु संघटक गांधीनी हिंदु जाती पातीत फुटू नयेत म्हणुन केलेले प्रयत्न प्रस्तुत लेखात येणारच आहेत आंबेडकर गांधिंकडे सवर्ण हिंदुंचा नेता म्हणुनच पहात होते . तत्कालीन हिंदुंच्या हृदयावर गांधीच राज्य करत होते. हे सत्य एकदा मान्य केले कि पुढे जाता येईल . आंबेडकरांचा प्रश्न वेगळा होता. दलित समाजातल्या एका घटकाने त्याकाळी त्यांना पुढारी मानले होते . त्या काळाचा विचार आंबेडकरांनि राजकारणात प्रवेश करण्या आधीपासून केला पाहिजे. आणि त्या आधी परिस्थिती, अनुभव, वाचन आणि विचार करून माणुस सतत बदलत जात असतो हे ध्यानात ठेवले पाहिजे .

महाडचा धर्म संगर : फक्त गांधिजिंचि तसबीर

चवदार तळ्यासाठी केलेला सत्याग्रह हि बाबासाहेबांच्या संघर्षातलि पहिली मोठी लढाई . २५ डिसेंबर १९२७ रोजी ह्या लढ्याला आरंभ झाला. ७ - ८ हजार माणसे जमली होती . मंडपात येताना शिवाजी महाराज कि जय ! आणि गांधीजी कि जय ! अशा घोषणा देण्यात येत होत्या . यावेळी मंडपात फक्त एकाच नेत्याची तसबीर विराजमान होती - गांधीजी ! (खैरमोडे ३ - १५९ ) a आपल्या तडाखेबंद भाषणात बाबासाहेब म्हणतात - " चवदार तळ्याचे पाणि प्याल्याने आम्ही अमर होऊ अशातला भाग नाही . आजपर्यंत ते प्यायलो नव्हतो तेंव्हा काही मेलो नव्हतो . इथे आम्ही पाणि पिण्यासाठी जमलेलो नाही . आम्हीही माणसे आहोत हे सिद्ध करण्यासाठी जमलो आहोत. हि सभा समतेची आहे ... हिदू समाज समर्थ करायचा असेल तर चातुर्वण्य व असमता यांचे उच्चाटन करून हिंदु समाजाची रचना एकवर्णत्व व समता या दोन पायावर केली पाहिजे. अस्पृश्यता निवारण्याचा मार्ग हा हिंदु समाज समर्थ करण्याच्या मार्गापासून भिन्न नाही. म्हणुन मी म्हणतो - कि आपले कार्य जितके स्वहिताचे आहे , तितकेच राष्ट्र हिताचे आहे . …. हि सभा हिंदु समाजाचे संघटन करण्यासाठी बोलावली आहे. " (बहिष्कृत भारत ३-२ - २ ७ ) या काळात बाबासाहेब गांधी आणि गांधिविचार दोन्हीही मानत असलेले दिसतात. माहाडच्या धर्म संगराला बाबासाहेबांनी सत्याग्रह म्हटले होते . हे हि ध्यानात ठेवले पाहिजे . " सत्याग्रह हि विचारसरणी आम्ही गीतेतून घेतली असून . गीता हा धर्म ग्रंथ म्हणुन आम्हाला मान्य आहे " - बाबासाहेब (बहिष्कृत भारत - २५ - ११ - २ ७ ). याच परिषदेत बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली . १९ २ ७ सालीच बाबासाहेबांनी दादरच्या गणेशोत्सवात भाषण केले होते . आणि विरोधकांच्या बंदोबस्तासाठि खिशात पिस्तुल बाळगले होते! (खैरमोडे २ - १ ४ ९ ) हिंदु राहून समता प्राप्त करणे आणि त्यासाठी लढा देणे हे आंबेडकरांचे धोरण १९ २ ७ साल पर्यंत स्पष्ट दिसते आणि हिंदु पुढारी - गांधी हे आपले विरोधक आहेत असे आंबेडकरांना त्याकाळी वाटत नव्हते हे हि स्पष्ट होते . हिंदु समाज समर्थ आणि संघटित करण्याची मनीषा आंबेडकरांनि या काळात अनेकदा बोलून दाखवली आहे.

काळाराम ते सायमन : ठिणगी पेटली

काळा राम मंदिर प्रवेशासाठी अस्प्रुश्यांचा संघर्ष चालू होता. त्यावेळी आंबेडकरांनि गांधिंना सवाल केला होता - " मंदिर प्रवेशाचा प्रश्न मिटल्या नंतर जेंव्हा अस्पृश्य लोक जातीच्या आणि चातुर्वणाच्या उच्चाटनाचा प्रश्न हाती घेतील . तेंव्हा महात्माजी कोणाच्या बाजूने उभे राहतील ? " हा सवाल फक्त गांधीना नव्हता. पुर्या हिंदु समाजाला होता. गांधीजी उत्तरले - " मी मानत असलेल्या हिंदु धर्मात उच्च नीचता नाही पण डॉ आंबेडकरांना वर्णाश्रमाशि झगडा करायचा असल्याने मी त्यांच्या पक्षाला राहू इच्छित नाही. कारण वर्णाश्रम हा हिंदु धर्माचा अभिन्न भाग आहे, अशी माझी श्रद्धा आहे . " (कीर - २ ३ ९ ) गांधी विरुद्ध आंबेडकर संघर्ष इथून सुरु होतो. b (सनातनी हिंदु धर्माला डांबर फासत आहेत . गांधीजी ते कष्टाने पुसू पाहत आहेत आणि आंबेडकर त्याचा पाया असलेल्या वर्ण व्यवस्थेवर हातोड्याने घाव घालत आहेत. ब्रिटीश लांबून मजा बघत आहेत- तत्कालीन व्यंगचित्र ) सायमन आयोग : हा आयोग भारताला कोणत्या बाबतीत स्वायतत्ता द्यावी याचा विचार करण्यासाठी होता . बहुतेक सर्व राजकीय पक्षांनि त्याला अनेक मर्यादा आहेत म्हणुन विरोध केला . बहिष्कार घातला . आंबेडकरांनि मात्र सायमन आयोगाला सहकार्य केले आणि त्याला एक लांबलचक निवेदन नेउन दिले . का ? हा आंबेडकरांचा स्वातंत्र्याच्या चळवळीशी द्रोह होता का ? काय होते त्या निवेदनात ? या प्रश्नांचि उत्तरे पहाण्या आधी एका घटनेची नोंद केली पाहिजे . सायमन गो ब्याक ! म्हणत आंदोलन करताना लाला लजपत राय यांच्या छातीवर ब्रिटिश पोलिसी दंडुके बसले. त्याबद्दल ७ डिसेंबर १ ९ २ ८ च्या बहिष्कृत भारत च्या अग्रलेखात श्रद्धांजली वाहताना बाबासाहेब म्हणतात - " लाला लजपत राय यांनी राजकारण आणि समाजकारण यात फारकत करून आपल्या पंगुपणाचे प्रदर्शन कधीच केले नाही .त्याकाळी लालाजिंचा आर्य समाज मुस्लिमांच्या आक्रमणापेक्षा जातीभेदादि हिंदु समाजाच्या अंतर्गत दोषांकडे अधिक लक्ष पुरवत असे . अस्पृश्यांच्या चळवळीबद्दल लालाजिंचि सहानुभूती कळकळीची होती " १ ९ २ ७ ते ३ ० या काळात बाबासाहेबांच्या विचारात बदल घडू लागलेला दिसतो . त्यांना अजून हिदू समाजाकडून आशा आहे पण गांधिविरुद्ध मत बनू लागले आहे . ठिणगी पेटली आहे . ********************************************************************************* विभक्त मतदार संघ म्हणजे काय ? भारातात सध्या जी लोकशाही आहे त्यात संयुक्त भौगोलिक मतदार संघ आहेत . काही जागा मागास उमेदवारांना राखीव आहेत . पण प्रत्येक उमेदवारासाठी सर्व जाती धर्माचे लोक मत देतात . त्यामुळे निवडणुकीतल्या उमेदवाराला सर्वसमावेशक भूमिका घ्यावी लागते. विभक्त मतदार संघ म्हणजे काही जातीना वेगळे मतदार संघ . आजच्या पदवीधर मतदार संघात ज्याप्रमाणे पदवीधर उमेद्वरांसाठि केवळ पदवीधर च मतदान करतात त्याप्रमाणे - दलित उमेदवारासाठी केवळ दलितांनी मतदान करणे म्हणजे - विभक्त मतदार संघ. ********************************************************************************* ब्रिटिशांना दिलेल्या सायमन कमिशनच्या निवेदनात बाबासाहेब लिहितात - " १ ) आज अस्पृश्य समाजाच्या समस्या वेगळ्या असल्याने ते हिंदु समाजापासून वेगळे आहेत २) मात्र अस्पृश्यांसाठी मागितलेल्या मागितलेल्या सवलती तात्पुरत्या आहेत . सर्व भारत शेवटी एका व्हावा . " (गोखले १ १ ८ ) या काळात आंबेडकरांनि विभक्त मतदार संघाला कडाडून विरोध केलेला आहे. आणि राखीव जागा मागितलेल्या आहेत . निवेदनात बाबासाहेब म्हणतात - विभक्त मतदार संघ हे लोकशाहीच्या मुळावरच घाव घालतात. विभक्त मतदार संघात निवडुन गेलेले उमेदवार सभागृहात सर्वांसाठीच कायदे करतात . ज्यांनी निवडुन दिले नाही त्यांबद्दल कायदे करण्याचा हक्क विभक्त मतदार संघातल्या उमेदवारांना मिळतो . ज्यांनी निवडुन दिले नाही त्यांवर राज्य करणे हि कुठली लोकशाही ? ( Dr Ambedkar Writings and Speeches. Vol 2 pg 344 - 366, 1982) ह्या निवेदनात बाबासाहेबांचा लोकशाहीवाद आणि राष्ट्रवाद अनेकवार व्यक्त झाला आहे . पण सायमन शी सहकार्य केले म्हणुन त्याकाळी बाबासाहेब देशद्रोही असल्याची चुकीची टिका कोंग्रेसि वर्तमान पत्रांनी केली होती .

गोलमेज परिषद : वणवा पेटला

सायमन आयोगापुढे ३७ दलित संघटना गेल्या होत्या. त्यापैकी ३५ संघटनांनि विभक्त मतदार संघांचि मागणी केली होती . आंबेडकरांनि आपले वैयक्तिक मत बाजूला ठेवत पुढे लोकमताला मान दिला . (खैरमोडे ४ - १ ४ १ . १ ४ २ ) आणि गोलमेज परिषदेत बाबासाहेबांनी दलितांना विभक्त मतदार संघ मागितले . लोकमताच्या रेट्यात बाबासाहेबांनी बदललेला हा निर्णय आहे . इथे एक लक्षात ठेवले पाहिजे कि आंबेडकर हे केवळ विचारवंत नाहीत ते एक राजकारणीही आहेत . जे बाबासाहेबांबद्दल खरे आहे ते गांधीबाबा बद्दल हि खरे आहे. *********************************************************************************

प्रौढ सार्वत्रिक मताधिकार म्हणजे काय ?

ब्रिटिश राजवटीत हि निवडणुका होतच होत्या पण मतदानाचा अधिकार सर्वांना नव्हता. ठराविक जमीन ठराविक शिक्षण असलेलेच लोक मतदान करू शकत . या गाळण्यांमूळे बहुसंख्य दलितांना मतदानाचा हक्क मिळत नव्हता आणि त्यामुळे राखीव जागांवरुन निवडुन जाणारे दलित उमेदवारही सवर्णांचे चमचे असत. प्रौढ मताधिकार म्हणजे १८ / २१ वर्षे वयाच्या सर्व भारतियांना मतदानाचा अधिकार असणे . प्रौढ माताधीकारात सर्व दलितांनाहि मतदानाचा हक्क मिळतो आणि अस्पृश्य हिताबद्दल जागरूक असणारे उमेदवार निवडुन जाणे सोपे होते , असे आंबेडकरांचे मत होते . ********************************************************************************* dv स्वत:चे विभक्त मतदार संघाबद्दलचे प्रतिकूल मत राजकारणी आंबेडकरांनि बदलले . गांधिंमधल्या अट्टल राजकारणी पुरुषा बद्दल तर कोणालाच शंका नाही ! राजकारणात स्वत:च्या लोकांचा अनुनय करावा लागतो . हा लोकशाहीचा साइड इफ़ेक्ट आहे ! गांधीनी सवर्णांच्या भावना बोलून दाखवत दलितांच्या विभक्त मतदार संघाला विरोध केला असे काहिंना वाटते. प्रौढ मतदानाचे नाव सुद्धा नसताना केवळ उच्चशिक्षिताना मतदानाचा अधिकार असताना - आंबेडकरांची नवी मागणी चुकीची होती असे म्हणता येणार नाही. पण जर दलितांना विभक्त मतदार संघ दिले तर उद्या सर्वच जाती स्वत:चे वेगळे मतदार संघ मागतील -प्रत्येक जात स्वत:चे उमेदवार निवडुन देऊ लागली तर - उमेदवारांना सर्वसमावेशक भूमिका घेण्याची काहीच गरज उरत नाही त्यामुळे जातीवादी उमेदवारच निवडुन येतील आणि ते देशाचे तुकडे पाडतील हि गांधिजिंचि भीती हि अनाठाई नव्हती. गांधी विरुद्ध आंबेडकर संघर्ष पेटु लागला आणि त्यातच उभयतांचि भेट ठरली.

वादळी भेट आणि जळते उद्गार

इथे एका विनोदी गोष्टीचा उल्लेख करणे आवश्यक आहे . हि भेट संपेस्तवर आंबेडकर हे अस्पृश्य समाजातले आहेत हेच गांधीना माहित नव्हते. (कीर १८०) गांधीजी आंबेडकरांना पुण्याचे पुरोगामी ब्राह्मण समजत असत ! आंबेडकरांच्या शैक्षणिक डिग्र्यांकडे पाहून गांधिंनि हा ग्रह करून घेतला होता कि आंबेडकर या ब्राह्मण आडनावामुळे गांधिंचा तसा ग्रह झाला होता ते सांगता येत नाही . ( आं - बा -व -डे -क - र हे मुळ नाव बदलून त्यांच्या एका प्रेमळ ब्राह्मण गुरुजीने आंबेडकर असे स्वत:चे नाव दफ्तरी लावले होते. आंबेडकरांनि तेच पुढे कायम ठेवले) पण गांधिंचा समज आंबेडकर हे एक पुरोगामी ब्राह्मण गृहस्थ आहेत असा होता! आणि पुरोगामी ब्राह्मण हा प्राणि राजकारणात फारशी किंमत द्यायच्या लायकीचा नसतो ! कदाचित यामुळेच या भेटीत गांधिंच्या अजब पुर्वग्रहामुळे मोठे नुकसान झाले असे मानायला जागा आहे ! आंबेडकरांच्या जळत्या उद्गारांनी गांधी भानावर आले आणि ते अस्पृश्य समाजातले आहेत काय ? अशी सहकार्यांकडे विचारणा केली . कादाचित हा - पुरोगामी ब्राह्मण कशापाई नसती उठाठेव करतो आहे ? कशासाठी स्वतंत्र मतदारसंघाच्या लष्कराच्या भाकरी भाजतो आहे ? अशा भावनेतून गांधीनी भेटीची सुरवातच थोडी कडक केली. आंबेडकरांचि पार्श्वभूमी माहित नसल्याने - कोणत्या परीस्थित आणि दबावात हा निर्णय घेतला हे गांधिंना कळलेले नसणार . सुरवातीला त्यांनी आंबेडकरांकडे चक्क दुर्लक्ष केले आणि दुसर्याच कोणाशीतरी सुत कताइबद्दल बोलू लागले. थोड्या वेळाने गांधी म्हणाले " आंबेडकर तुमचा जन्म व्हायच्या आधीपासून मी अस्पृश्यांसाठी काम करतो आहे . (तेंव्हा मला शहाणपणा शिकवू नये ! ) कोग्रेसने अस्पृश्यांसाठी विस लाख रुपये खर्च केलेले आहेत. अशाप्रकारच्या बोलण्याने आंबेडकर चांगलेच व्यथित झाले असणार. त्यांनी चिडून गांधिंना खडे बोल सुनावले शेवटी म्हणाले " ज्या देशात आमच्या समाजाला कुत्र्यापेक्षा वाइट वागणुक मिळते त्या देशाला मी मायभूमी म्हणु शकत नाही , गांधीजी मी पुन्हा सांगतो - मला मायभूमी नाही !" या वादळी भेटीमुळे - गांधिंच्या दुर्लक्ष करण्यामुळे आणि आंबेडकरांच्या जळत्या उद्गारांमुळे या दोनही महान नेत्यात तयार झालेला व्यक्तिगत दुरावा बराच काळ टिकला.

पुणे करार : कौन जिता … कौन हारा

आंबेडकरांनि विभक्त मतदार संघांचि मागणी सोडुन द्यावी म्हणुन गांधिजिंनि उपोषण सुरु केले. ज्याच्या मागे जवळजवळ सारा सवर्ण समाज आहे त्याचा मृत्यू झाला तर गावोगावच्या अस्पृश्यांना काय झेलावे लागले असते ? आंबेडकरांसमोर पुणे करारावर सही करण्याशिवाय कोणता पर्याय होता ?

ताणलेले दोर

पण त्या आधी एका भानगडिचा वेध घेणे आवश्यक आहे. ती भानगड म्हणजे राजा - मुंजे करार होय . एम सी राजा हे एक अस्पृश्य पुढारी होते . राजा आणि त्याच्या सारख्या इतर अस्पृश्य पुढार्यांच्या दबावामुळेच आंबेडकरांना आपली मुळातली सायमन कमिशन समोरची भूमिका बदलत विभक्त मतदार संघाना पाठिंबा द्यावा लागला होता . हेच राजा आता गटबाजीचे राजकारण खेळले . आणि स्वत:चे महत्व वाढवण्यासाठी त्यांनी डॉ मुंजे या हिंदु महासभेच्या पुढार्याबरोबर एक करार केला. या करानुसार अस्पृश्यांना विभक्त मतदार संघ नको . वाढीव राखीव जागा हव्या अशी मागणी केली ! आता आंबेडकरांसमोर मोठा पेचप्रसंग होता . महाराष्ट्रातल्या महार समाजाचा पुर्ण पाठिंबा आणि मराठि दलीतात बर्यापैकी वजन या आंबेडकरांच्या जमेच्या बाजू असल्या तरी अखिल भारतीय पातळीवर त्या क्षणापर्यंत तरी आबेडकर हे सर्व दलितांचे एकमुखी नेते नव्हते . अखिल भारतीय पातळीवर दलितांचे नेतृत्व करण्यासाठी त्यांना राजा सारख्या अंतर्गत गटबाजांबरोबर हि राजकाराण भोगावे लागत होते . पंचाइत अशी कि राजा मुंजे करार मान्य केला तर आंबेडकरांनि राजाचे नेतृत्व राष्ट्रीय पातळीवर मान्य केलेले आहे आणि दलितांच्या वतीने करार मदार करण्याचे सर्व अधिकार राजा कडे आहेत असा सरळ अर्थ निघत होता . राजा आणि मुंजेंचि तीच राजकीय चाल होती . आता आबेडकरांना चटकन विभक्त मतदार संघाची मागणी सोडणे अशक्य झाले . राजा सारख्या गटबाज व्यक्ती च्या हाती राष्ट्रीय दलित चळवळीची सूत्रे देण्याचा गलथान पणा आंबेडकर करणे शक्य नव्हते. त्यामुळे आंबेडकरांनिहि विभक्त मतदार संघाचा मुद्दा ताणून धरला आणि गांधिंना प्राणांतिक उपोषण करण्या पर्यंत परिस्थिती ताणावी लागली.

तुटलेले बंध

परिस्थिती विकोपाला जाऊ लागली . गांधिजिंना कोणत्याहि परीस्थित जातीय तत्वावर विभक्त मतदार संघ नको होते . आणि आंबेडकर एका विचित्र राजकीय परिस्थितीमुळे झटकन निर्णय फिरवू शकत नव्हते. गांधिंचि तब्येत खालावू लागली . परिस्थिती स्फोटक बनू लागली. गांधिंचा मृत्यू ओढवला असता तर गावोगाव सवर्ण दलित दंगली पेटल्या असत्या . बाबासाहेबांसारख्या लोकशाहीवादी नेत्याला दंगली होणे कदापि मंजुर नव्हते त्यामुळे त्यांनी पुणे करारावर सही केली . व्यथित होऊन आंबेडकर म्हणाले होते " हे कोंग्रेस वाले माझे राजकीय जीवन संपुष्टात आणतील आणि मग तेच दलितांचे पुढारी होतील " ( खैरमोडे ५ - ३१ ) पुणे करारावर सही - हा आंबेडकरांचा राजकीय पराभव होता काय ? त्यांच्या सहकार्यांना तेंव्हा तसेच वाटले आजही आंबेडकर वाद्यांच्या हृदयातली ती एक भळभळति जखम आहे . त्यामुळे मने तुटली आहेत . पण सत्य काय आहे ?

अंतिम विजय कोणाचा ?

पुणे करारामुळे विभक्त मतदार संघ रद्द झाले आणि संयुक्त मतदार संघ आले असा बर्याच लोकांचा भ्रम असतो . ते खरे नाही . पुणे करारा मुळे संयुक्त आणि विभक्त मतदार संघाचे एक आगळेच फ्युजन जन्माला आले . त्यानुसार - १) दोन स्तरीय निवडणुक पद्धती आली . अस्पृश्यांनी स्वत:चे चार उमेदवार निवडायचे (विभक्तपणे) आणि त्यानंतर सर्व जाती धर्माच्या लोकांनी या चारपैकी एक उमेदवार (संयुक्तपणे ) निवडायचा. या कलमामुळे सवर्णांचे चमचे निवडुन जाण्याचा धोका आंबेडकरांनि टाळला. आणि खरे पाहता आंबेडकरांचा मुलभुत विचार गांधिंनि मान्य केला. २) या करानुसार अस्पृश्यांना १ ८ टक्के राखीव जागा मिळाल्या . (त्या पूर्वीच्या मेकडोनल्ड निवाड्यापेक्षा खूपच जास्त होत्या ) ३) अस्पृश्यांच्या शिक्षणासाठि वेगळी काढुन ठेवायची रक्कम ठरली यातही आंबेडकरांनि ठरवलेला आकडा ग्राह्य धरण्यात आला . c डॉ बाबासाहेब आंबेडकर हेच दलितांचे एकमेव राष्ट्रीय नेते आहेत आणि दलितांच्या वतीने करार मदार करण्याचे सर्व हक्क एकट्या आंबेडकरांना आहेत हि गोष्ट सिद्ध झाली . पुणे करारा नंतर आंबेडकर हे एकमेव राष्ट्रीय दलित नेते असून एम सी राजा सारखे लोक केवळ उपट्सुंभ आहेत हे सिद्ध झाले. पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर सार्वत्रिक प्रौढ मतदानाचा हक्क दलितांसकट सर्वांना मिळाला . शीक्षण , जमीन इत्यादी चाळण्या गेल्या . त्यामुळे घटना परिषदेचे सदस्य असलेल्या आंबेडकरांनि स्वतंत्र भारतात एकदाही विभक्त मतदार संघ मागितले नाही . प्रौढ सार्वत्रिक मतदान आल्याने विभक्त कि संयुक्त हा मुद्दाच उरला नाही . गांधिंना जे साध्य करायचे होते ते हि घडलेच - द्विस्तरीय गुंतागुंतीची निवडणुक प्रक्रिया झाल्याने इतर जाती विभक्त मतदार संघ मागाण्याचा धोका टळला . कारण इतकी गुंता गुंतिचि प्रक्रिया सर्व जातींसाठी लागू करणे अशक्यच होते . त्यातून जातीय फायद्याची गणिते बांधणेहि दुरापास्त होते . थोडक्यात पुणे करार बरोबरीत सुटला किंवा थोड्या प्रमाणात आंबेडकरांच्याच बाजूला झुकला असे म्हणावे लागते. स्वातंत्र्यानंतर तर तो प्रश्न पुर्णपणेच आउट डेट बनलेला आहे . कारण सार्वत्रिक प्रौढ मतदान !

सम्यक पणे विचार बदलणारा - झपाटलेला अभ्यासक : डॉ आंबेडकर

बाबासाहेब आंबेडकर हे एक अभ्यासू आणि विद्वान गृहस्थ होते . राजकारण - समाजकारण - धर्म कारण याबद्दल ते सतत अभ्यास करत आणि नव्या अभ्यासानुसार - मते बदलत असत . उदाहरण घायचे झाले तर भगवत गीता या हिंदु धर्म ग्रंथाबद्दल लिहिता येईल . १) १९ २ ७ सालच्या महाडच्या संगरात त्यांनी मनुस्मृती जाळली पण गीता हा धर्मग्रंथ स्पृश्य आणि अस्पृश्य या दोन्ही लोकांना मान्य आहे असे ते त्याकाळी म्हणत असत . २) पुढे धर्मांतराच्या घोषणे नंतर गिता हा पुर्णपणे मूर्खपणे आणि बाष्कळ पणे लिहिलेला ग्रंथ आहे असे ते म्हणत . ३) धर्मांतरानंतर दिलेल्या एका मुलाखतीत बाबासाहेब म्हणाले - गीतेत ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या बुद्ध धर्मातून उसन्या घेतल्या आहेत . (म्हणजे गीतेत काही चांगल्या गोष्टी आहेत !) एकाच ग्रंथाबद्दल व्यक्त केलेली हि मते आहेत . प्रा शेषराव मोरे यांनी त्यांच्या आंबेडकरांवरिल ग्रंथात राजकारण , समाजकारण , इतिहास मिमांसा या सर्वच बाबतीतल्या बदलत जाणार्या मतांचा आढावा घेतला आहे . d अभ्यासक नवीन माहितीनुसार मते बदलत जातोच . पण आंबेडकरांचे सामाजिक धोरणही त्यांची धर्म मिमांसा आणि इतिहास मिमांसा बदलते. जोपर्यंत हिंदु राहून समता आणता येईल असे त्यांना वाटत होते तोपर्यंत ते गीतेला पुज्य मानत होते. हा हिंदु समाजावरचा विश्वास उडाल्यावर ते गीतेला मुर्ख ग्रंथ म्हणु लागले . पुढे घटना परिषदेत दाखल झाल्यावर ....जेंव्हा त्यांना हिंदु कोड बिल पास करून हिंदु स्त्रियांचे भले करायचे होते तेंव्हा........ ते बिल पास करायला त्यांना सवर्ण हिंदुंचा पाठिंबा हवा होता....... आणि त्यावेळी त्यांनी गीतेत काही चांगल्या गोष्टी आहेत पण ........त्या बुद्धाकडुन उधार घेतलेल्या आहेत असे मत व्यक्त केले . समता आणणे आणि लोकशाही रुजवणे हे बाबासाहेब आंबेडकरांचे ध्येय होते . त्यासाठी त्यांनी धर्म मिमांसा आणि इतिहास मीमांसा लिहिली , त्यात वेळोवेळी बदल केले , कारण त्यांना इतिहास केवळ लिहायचा नव्हता तर घडवायचाहि होता . स्वत:ची मते बदलण्याचे स्वातंत्र्य जर आंबेडकरांना आहे तर गांधिंना का नाही ?

परिस्थितीशी जुळवण्यासाठी विचार बदलत जाणारा देशभक्त राजकारणी : मोहनदास गांधी

परिस्थितीशी जुळवण्यासाठी विचार बदलत जाणारा देशभक्त राजकारणी : मोहनदास गांधी गांधीजी हे आंबेडकरांप्रमाणे विद्वान , अभ्यासक किंवा संशोधक निश्चितच नव्हते . पण त्यांना उभ्या देशाबद्दल कळकळ प्रेम आणि जिव्हाळा होता . दलितांचे भले करणे हा गांधिंसमोरचा एकमेव कार्यक्रम कधीच नव्हता पण उच्च निचतेला आणि मुख्यत: अस्पृश्यतेला त्यांचा विरोध पहिल्या पासून होता . त्याला गांधिंनि कमी महत्व दिल- हा आरोप खोटा म्हणता येणार नाही . पण गांधी म्हणजे अस्पृश्यांच्या जिवावर उठलेला सैतान निश्चितच नव्हे. गांधीही स्वत:ची मते अगणित वेळा बदलत आलेले आहेत . मी हिमालया एव्हढ्या चुका केल्या आहेत असे गांधिंनि अनेकदा म्हटले आहे . f कधीकाळचा चातुर्वणाचा समर्थक गांधी । यापुढे मी फक्त आंतरजातीय विवाहांनाच हजार राहीन अशी अट ठेवतो .। आणि राउंड टेबलाची नीती पुढे घटनाकारांना सन्मान देण्यापर्यंतही बदलते । बाकी गांधिंचि मते बदलत गेली आणि बाबासाहेब कायदामंत्रि (पहिल्या) मंत्रिमंडळात होण्यामागे गांधी होते । पहिल्या घटनेपरिषदेवर बाबासाहेब लीग च्या पाठिंब्यावर गेले होते । ती परिषद पुढे रद्द झाली आणि फ़ाळणिनंतर जी नवी घटनापरिषद आली त्यावर बाबासाहेब जाताना गांधिंनि पाठिंबाच दिला होता . कोग्रेसच्या पाठिंब्या शिवाय घटना मसुदा समितीचे अध्यक्ष होणे शक्य नव्हते … आणि आंबेडकरांसरखा विद्वान कायदा पंडित हातचा घालवायला गांधिजिहि मूर्ख नव्हते . सुरवातीला गांधी सनातनी आणि चातुर्वणाचे समर्थक आहेत असा अर्थ निघू शकेल अशी पुष्कळ वचने गांधिंच्याच साहित्यातून काढुन दाखवता येतील . पुढे मात्र . गांधिंनि त्यांचे विचार बदलले आणि हिंदु धर्माच्या सर्व स्मृतींचे आणि धर्म ग्रंथांचे पुनर्लेखन करावे आणि स्त्रिया आणि शुद्र यांवर अन्याय करणारा भाग त्यातून काढुन टाकावा असे स्पष्ट मत गांधिंनि व्यक्त केले . ( म. गांधी आणि समाजसुधारणा - आकलन . नरहर कुरुंदकर) हिंदु राहून समता प्राप्त करण्याचा हा विचार आहे . हा विचार १ ९ २ ७ सालच्या आंबेडकरांच्या विचारासारखाच आहे. गांधीच्या अर्धनग्न धार्मिक फ़किरिपेक्षा आंबेडकरांचे सुटा बुटात राहणे आणि त्यांचा आधुनिक विचार मला अधिक भावतो पण .... सुस्पष्ट , लोजिकल , तर्कशुद्ध विचार करणारा माणुस उभ्या भारताचा नेता बनणे अशक्यच होते. या देशाची विविधता समस्यांची गुंतागुंत व आकांक्षांचा अनेकपदरिपणा जितका संकिर्ण (Complex ) होता तितकेच गांधिंचे व्यक्तिमत्व हि संकिर्ण होते. भारतासारख्या अनेकपदरी देशात राजकारण करायचे झाले तर मायावतिलाहि शेवटी सर्वजन हिताय अशी घोषणा द्यावी लागते हे विसरून चालणार नाही . गांधीना सर्वोदय हवा होता . पण अंत्योदय हे त्याचे सूत्र होते . सर्वांच्याच डोळ्यातले अश्रू पुसण्याची गांधिंचि महत्वकांक्षा आहे . पण अंत्यजाच्या डोळ्यातले अश्रू पुसणे हि त्याची पहिली पायरी आहे . गांधी हे मुख्यत: राजकीय नेते आहेत पण त्यांनी समाजकारण झटकून टाकलेले नाही . त्यांची धर्माची परिभाषा , हरिजन वगैरे संकल्पना माझ्यासारख्या नास्तिकाला पचणार्या नाहीत पण गांधिंचा उदारमत वाद भारताला थोड्या बहुत प्रमाणात का होईना जोडू शकला हे नाकारता येत नाही . ghk

समारोप

घटनेचा साचा बनवून बाबासाहेबांनी ह्या देशाचा मनु पालटला . गांधिच्या पाठिंब्या शिवाय हे शक्य नव्हते . देशाचे भविष्य कसे चालावे याचा ढाचा आंबेडकर तयार करतात आणि त्यांच्या नियुक्तीला गांधिंचा पाठिंबा असतो . तेंव्हा मुख्य वाद मिटलेला असतो. हा देश सनातनी विचारांनी चालणार नाही … आधुनिक राज्यघटनेनुसार चालेल अशी ग्वाही मिळालेली असते . . बाकी थोडेबहुत मतभेद सगळ्याच माणसात असणार आणि ते नैसर्गीकही आहे . गांधी आंबेडकर मुख्य वाद आणि संघर्ष इथे संपतो . तरीही या दोन महान भारतीय नेत्यांत कधीही मनोमिलन झाले नाही हि भारतीय राजकारणाची शोकांतिका आहे . गांधी सवर्ण हिंदुचे नेते होते पण अस्पृश्यांचे दुश्मन नाही . आंबेडकर दलित समाजाचे नेतृत्व करत असले तरी त्यांचे घटना परिषदेतील काम , हिंदु कोड बिल , कायदा मंत्रि म्हणुन केलेले काम हे सर्व देशासाठी होते . एक अर्थशास्त्री म्हणुन आंबेडकरांचा रिझर्व बेंक ऑफ इंडिया च्या पायाभरणीत मोठा वाटा आहे . हे काम सर्वच देशासाठी आहे . त्या अर्थाने आंबेडकर हे राष्ट्रीय नेते आहेत . स्पृश्य - अस्प्रुश्यांचा संघर्ष जटिल होता . अस्पृश्यांची अस्मिता जागी करणे - अन्याया विरुद्ध लढणे - स्वत:चे न्याय्य हक्क मागणे आवश्यक होते. हे काम आंबेडकरांनी केले . त्याचवेळी अस्पृश्यांना त्यांचे हक्क देऊन टाकण्यासाठी सवर्णांचि मानसिकता तयार करणे आवश्यक होते . गांधिंनि तेच काम टप्प्या टप्प्याने केले . हे कामही अतिशय अवघड होते आणि आवश्यकही होते . त्या दोघात एकमत दुर्दैवाने झाले नाही म्हणुन आजही तो भांडण वारसा चालू ठेवणे वेडेपणाचे आहे .
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 43024
प्रतिक्रिया 174

प्रतिक्रिया

In reply to by विटेकर

त्यातही खालील २ वाक्ये तर जबराच... "आपली लढाई तत्वाबरोबर नसून अमानुषतेबरोबर आहे याचे भानच त्यांना राहीले नाही!" आणि "इट इज अनवाईज टू बी वाईज विथ अनवाईज हे साधे तत्व ते विसरले!"

In reply to by मुक्त विहारि

"इट इज अनवाईज टू बी वाईज विथ अनवाईज हे साधे तत्व ते विसरले!" मला वाटतं हे तत्व या धाग्यावरच्या काही चर्चेतही सिद्ध होत आहे म्हणा !

In reply to by विटेकर

गांधीजींनी मुस्लिमांचा अनुनय केला वगैरे रडगाणे गाइल्याशिवाय काही लोकान्ना अन्न गोड लागत नाही. १. मुस्लिम भारतात १६०० व्या शतकापासून आहेत. ते आले, तेच मुळी राज्य करण्याच्या महत्वाकांक्षेमुळे. मुघल गांधीजी|ंच्या आधीपासूनच या देशाचे राज्यकर्ते होते. मुस्लिम लीगही १९०६ साली स्थापन झाली, तेंव्हा गांधीजी राजकारणातही नव्हते. मधल्या काळात त्यांची संख्याही ४० % झालेली होती. ४० % जनता एकगठ्ठा असेल तर तिला स्वतःचा आवाज, स्वतःची इच्छाशक्ती निर्माण होणारच. २. गांधीजीदेखील स्वतःच्या विचारसरणीने मोठे झाले. गंमत म्हणजे एकाच वेळी हे दोघेही स्वतंत्रपणे मोठे झाले आणि इथल्या तथाकथित 'सनातन धार्मिक' गटांना ते मोठे झाले हे पचवणं आजही जमलेलं नाही. मग ते जिथे तिथे अमूक धर्माचे लोक विश्वासघातकी असतात म्हणे आणि गांधीजींनी त्यान्ना मोठं केलं की त्यान्नी यान्ना मोठं केलं याच्या रडकहाण्या ऐकवत फिरत असतात.

In reply to by उद्दाम

>>मुस्लिम भारतात १६०० व्या शतकापासून आहेत. ते आले, तेच मुळी राज्य करण्याच्या महत्वाकांक्षेमुळे. मुघल गांधीजी|ंच्या आधीपासूनच या देशाचे राज्यकर्ते होते. -- अ‍ॅब्सोल्युटली. भारतात मुस्लीम राज्यकर्ते त्यांच्या मनगटातले बळ आणि आणि निष्णात राजकारणात यांच्या भरोशावर स्थिरावले. >>४० % जनता एकगठ्ठा असेल तर तिला स्वतःचा आवाज, स्वतःची इच्छाशक्ती निर्माण होणारच. -- १००% सहमत.

In reply to by अर्धवटराव

१. गांधीजी ग्रेट थिंकर होते. २. मुघल उद्दाम होते. म्हणूनच दोघेही महान ठरले.

In reply to by उद्दाम

कुर्‍हाडीच्या दांड्यांनी गोतास काळ आणला व कावळा मशिदीच्या मिनारावर बसुन मौलवी बनला.

In reply to by अर्धवटराव

मंडनमिश्रा बौध्ह धर्म सोडून तुमच्याकडे आला तर एका रात्रीत शंकराचार्य झाला. कावळा मौलवी बनला तर तुमच्या पोटात कावळे का ओरडताहेत?

In reply to by उद्दाम

मण्डनमिश्राने आपला अधिकार सिद्ध करुन आचार्य पदाला शोभा आणली तर कावळ्याने फक्त कावकाव करत मौलवीपद खुजे केले.

In reply to by उद्दाम

हरे राम...आपलं ते हे हेर मार्क्स!!!! मण्डनमिश्राने बौद्ध धर्म कधीच स्वीकारला नव्हता. मतपिंका टाकायलासुद्धा एक शिस्त लागते हे विसरलात बहुतेक.

In reply to by उद्दाम

१. मुस्लिम भारतात १६०० व्या शतकापासून आहेत. उद्दाम साहेब हे तुम्ही मुद्दाम लिहिलय का ? आताशी २१ वे शतक चालू झाले आहे.

+१

ग्रेट विचार करण्याकरिता लागणारा मेंदू नेमका कुठे असतो? कवटीत का ..त.?

In reply to by विनायक प्रभू

आधी विचार चांगले विचाराने वर्तन चांगले वर्तनाने व्यक्तिमत्व ते भले असे व्यक्तिमत्व जगी गाजले (मुवि)

In reply to by मुक्त विहारि

+१ सहमत

"जर.. तर.."च्या जाळ्यात न अडकता केलेले, इतिहासाचे समर्पक विश्लेषण.. लेख आवडला..

१. सावरकर फॅसिस्ट होते, २. पुष्यमित्र शुंगाने मनुस्मृती लिहिली, ३. गांधीना त्याकाळच्या सवर्ण हिंदुसमाजाचा पुढारी न मानणे हे मध्यमवर्गाच्या वांझ बुद्धीमातेचे गर्विष्ठ अपत्य आहे. ही ३ वक्तव्ये ऐकली. आता : १. शिवाजी महाराज कर्मट मुसलमान होते, २. राजकारणात येण्यासाठी आंबेडकर नावाच्या ब्राह्मणाने अस्पृश्यता निवारन चळवळीचा वसा स्वीकारल्याचे ढोंग स्वीकारले आणी ३. सावरकरांना पोहता येत नव्हते ही ३ वक्तव्य वाचली की मी डोळे मिटायला मोकळा. बाकी चालु देत.

In reply to by मृत्युन्जय

असत एखाद्याचे 'ग्रेट थिंकींग' त्याला आपण काय करायचे? तर वरती विटेकर काकांनी सान्गीतल्या प्रमाणे 'पीयेला हय' असे म्हणुन सोडुन द्यावे कसे?

In reply to by अनिरुद्ध प

ग्रेटथिन्कर का ग्रेटस्टिन्कर (great stinker) असा मला प्रश्न पडलेला आहे.

किती म्हणून कौतूक करावे इतकी चांगली विचारसरणी आहे लेखकाची. अगोदरच्या काळातील विरोधांना किती मोठी तात्विक बैठक असायची. आणि त्यांचे प्रतिनिधित्व करणारे लोकही किती गोड. वाचनाचा आनंद काय ते हा लेख वाचून कळावे.

भारतीयह्रदयसम्राट स्वातंत्र्यसुर्य महात्मा गांधीजी असतीलही... असोत बापडे. पण हिन्दुह्रदयसम्राट फक्त आणि फक्त एकचः विनायक दामोदर सावरकर!

In reply to by सौरव जोशी

हे असे काही तरी लिहून आपण मुद्दाम कुणाच्यातरी बुध्धीला गहन विचार करायला भाग पाडत आहात. असो. माझ्या कडून तरी +१ स्मॉल पेगर

In reply to by सौरव जोशी

हिन्दुह्रदयसम्राट फक्त आणि फक्त एकचः विनायक दामोदर सावरकर!
अरे बापरे असे भाजप उघडपणे म्हणाला तर महायुतीचे काय होणार

लेख आवडला.
पण मर्हाटि माणसाला मुळात गांधी हा सवर्ण हिंदुंचा नेता होता हेच मुळी मान्य नाही !
हे थोडेसे सरसकटीकरण वाटते. काहींचे विचार तसे असतीलही पण सर्वांचे नक्कीच नाहीत. स्वातंत्र्यपूर्व काळातील काँग्रेस ही हिंदूंची आणि लीग ही मुस्लिमांची संघटना होती, हे नाकारण्यात हंशील नाही.
(सनातनी हिंदु धर्माला डांबर फासत आहेत . गांधीजी ते कष्टाने पुसू पाहत आहेत आणि आंबेडकर त्याचा पाया असलेल्या वर्ण व्यवस्थेवर हातोड्याने घाव घालत आहेत. ब्रिटीश लांबून मजा बघत आहेत- तत्कालीन व्यंगचित्र )
हहपुवा
इथे एक लक्षात ठेवले पाहिजे कि आंबेडकर हे केवळ विचारवंत नाहीत ते एक राजकारणीही आहेत . जे बाबासाहेबांबद्दल खरे आहे ते गांधीबाबा बद्दल हि खरे आहे.
गांधीबाबा अट्टल राजकारणी होता हे मानल्याशिवाय गांधीबाबा समजणारच नाही!
व्यथित होऊन आंबेडकर म्हणाले होते " हे कोंग्रेस वाले माझे राजकीय जीवन संपुष्टात आणतील आणि मग तेच दलितांचे पुढारी होतील " ( खैरमोडे ५ - ३१ )
हे बरेचसे खरे ठरले आहे! (यालाच स्वातंत्र्योत्तर काँग्रेसचे बेरजेचे राजकारण म्हणतात का?)
पुणे करारा मुळे संयुक्त आणि विभक्त मतदार संघाचे एक आगळेच फ्युजन जन्माला आले
ही माहिती नवी आहे. रोचक आहे.
तरीही या दोन महान भारतीय नेत्यांत कधीही मनोमिलन झाले नाही हि भारतीय राजकारणाची शोकांतिका आहे . ....... ....... त्या दोघात एकमत दुर्दैवाने झाले नाही म्हणुन आजही तो भांडण वारसा चालू ठेवणे वेडेपणाचे आहे .
१००% सहमत.

In reply to by सुनील

गांधीबाबा अट्टल राजकारणी होता हे मानल्याशिवाय गांधीबाबा समजणारच नाही!
सदर वाक्याबद्दल थोडे अधिक स्पष्टीकरण. गांधीवाद आणि काँग्रेस संघटना (आणि त्यातील राजकारण) हे दोन संपूर्णतः वेगळ्या गोष्टी होत. कोंग्रेस संघटनेतील नेते जसे की नेहेरू, पटेल वा मौलाना आझाद हे कोणत्याही अर्थाने गांधीवादी नव्हते! (मात्र गांधी ह्या व्यक्तीवर त्यांची निष्ठा होती) आणि सर्वार्थाने ज्यांना गांधीवादी म्हणता येतील अशा व्यक्ती जसे की, साने गुरुजी, विनोबा भावे वा दादा धर्माधिकारी यांना काँग्रेस संघटनेत काडीचेही स्थान नव्हते!!

In reply to by सुनील

या स्पाष्टीकरणामुळे नेहेरू, पटेल वा मौलाना आझाद हे राजकारणी होते असे सिद्ध होउ शकते मात्र गांधी पक्के राजकारणी होते हे सिद्ध होत नाही. शिवाय या स्पष्टीकरणामुळे तुमच्या "राजकारणी " या शब्दाला जरा वेगळाच वास येतो आहे त्या वाईट अर्थाने गांधीजी राजकारणी होते असे तुम्ही म्हणत आहात असे वाटते आहे. बाकी धुरंधर राजकारणी असल्याशिवाय राष्ट्रीय पातळीवर कुठल्याही नेत्याला इतका एकजिनसी पाठिंबा लाभणे शक्य नाही हे मात्र मान्य.

In reply to by मृत्युन्जय

तत्कालीन काँग्रेस संघटनेतील राजकीय निर्णय गांधींना विचारात घेतल्याविना होत नसत. सर्व राजकीय वाटाघाटी वा परिषदांना काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून गांधीच जात असत. विविध राजकीय चळवळींची संकल्पना आणि नेतृत्व हे गांधींचेच असे (उदा दांडीयात्रा वा चले जाव). या सर्व गोष्टी गांधी हे मुरलेले राजकारणी होते, हेच सिद्ध करतात. मी "राजकारणी" हा शब्द वाईट अर्थाने वापरीत नाही. तसे वाटले असल्यास ती माझ्या लेखनीत त्रुटी समजावी!
बाकी धुरंधर राजकारणी असल्याशिवाय राष्ट्रीय पातळीवर कुठल्याही नेत्याला इतका एकजिनसी पाठिंबा लाभणे शक्य नाही हे मात्र मान्य.
मान्यच!

लेख आवडला. तळागाळातल्या भारतीयांचा - दलितांचा - उद्धार व्हावा हे दोघांनाही वाटत होतं. मात्र 'हिंदू म्हणजे नक्की कोण?' या प्रश्नाबाबत त्या दोघांचा तीव्र मतभेद होता. गांधींचा कल दलित-सवर्ण सर्वांना एकत्र हिंदू म्हणू आणि त्यांच्यात समानता आणण्यासाठी जमेल तशा सुधारणा करत जाऊ. आंबेडकरांना अर्थातच हा सलोखा झाला काय अगर न झाला काय, दलितांचा उद्धार करणं हे अधिक महत्त्वाचं होतं. गांधींच्या उपोषणापुढे मान तुकवून आंबेडकरांनी नाइलाजाने पुणे करार केला. त्यामागची राजकारणी चाल बाबासाहेब ओळखून असणार. गांधींनी स्वतःला अधिक व्यापक समाजाचा नेता म्हणून सिद्ध केलं, आंबेडकरांबरोबर करार करून त्यांना दलितांचे नेते म्हणून मान्यता दिली, आणि शिवाय तडजोडीत योग्य त्या मागण्या पूर्ण करून दिल्या.
गांधीबाबा अट्टल राजकारणी होता हे मानल्याशिवाय गांधीबाबा समजणारच नाही!
सहमत. कुरुंदकरांनी म्हणूनच त्यांना 'बॅरिस्टर महात्मा' म्हटलेलं आहे. काही महिन्यांपूर्वीच आंबेडकरांवरचा जब्बार पटेल दिग्दर्शित सिनेमा पाहिला. तो काहीसा लांबलचक आहे, पण त्यांच्या जीवनाचं उत्तम चित्रण केलेलं आहे. त्यात पुणे करारावर बराच भर दिलेला आहे.

गांधी अट्टल राजकारणी होते
एकही पद ज्या व्यक्तीने भूषवले नाही त्याला अट्टल राजकारणी म्हणायचे हे जरा अतीच होतय. समाजकारणातून आलेल्या मानसन्मानामुळे राजकारणी त्यांना भिऊन असायचे. त्यामुळे ते अट्टल समाजकारणी होते.

In reply to by ग्रेटथिन्कर

निवडणूक लढवणारा नि पद भूषवणारा तोच राजकारणी अशी आपली व्याख्या असेल तर आपल्या ग्रेट थिंकींग ला पुन्हा एकदा सलाम! कृष्णापासून चाणक्य ते अलिकडं राज ठाकरेंपर्यंत सगळे समाजकारणी असावेत. काश... ऐसाही होता. :)

राजकडे पद नाही ...आँ!! मग मनसेचे अध्यक्ष कोण आहेत??? . . . . जरा अभ्यास करुन परिक्षेला बसत जा.

In reply to by ग्रेटथिन्कर

"म्हणजे गांधीजी कोंग्रेसचे अध्यक्ष न्हवते असे म्हणायचे आहे का तुम्हाला?" बाकी नेहमी प्रमाणे... आधीच्या मुळ शंकांचे काय? प्रश्र्नाचे उत्तर तुम्हालाच द्यायचे आहे इ.इ.

गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होते जरुर. परंतु त्यावेळी काँग्रेसचे स्वरुप राजकिय पक्ष असण्यापेक्षा independence movement organisation असे होते. ब्रिटिशांना घालवणे व देश स्वतंत्र करणे यासाठी कांग्रेसचे नेतृत्व गांधिंनी स्विकारले, सुभाषचंद्र बोसांनीही काँग्रेसचे अध्यक्षपद ३८ साली स्विकारले होते, आता त्यांना अट्टल राजकारणी म्हणायचे कि क्रांतिकारक????? . . . गणिताच्या पेपरला नागरिकशास्त्राचा अभ्यास करुन जाऊ नये.

In reply to by ग्रेटथिन्कर

"सुभाषचंद्र बोसांनीही काँग्रेसचे अध्यक्षपद ३८ साली स्विकारले होते, आता त्यांना अट्टल राजकारणी म्हणायचे कि क्रांतिकारक?????" इतका साधा प्रश्र्न पण तुम्हाला सोडवता येत नाही?

पण गांधीजी पुर्णपणे समाजकारणी होते ,ते राजकारणी नव्हते हे म्हणणे जरा पचले नाही. याकरिता कोणत्या पाचक गोळ्या वापराव्यात?

In reply to by वेताळ

मुद्दाम विचार (अरे हो... गहन विचार) करून बवलेल्या गोळ्या आहेत त्या. इतक्या सहजा सहजी मिळत नाहीत.आणि मिळाल्या तरी प्रत्येकाला पचतीलच अशी खात्री पण देता येत नाही.

In reply to by ग्रेटथिन्कर

तुम्ही हे असे मध्ये तोंड घालणार ते माहीतच होते. म्हणूनच मी मुद्दामच विचार (गहन केलाच नाही बघा आम्हाला किंचीत पण पुरतो.) करून मी नांव दिले न्हवते.अहो नथूगुग्गूळाचा फायदा तुम्हाला होणार.त्यांना कसा काय होईल्? कमी रक्त दाब असलेल्या रोग्याला , जास्त रक्त दाबाची तक्रार असलेल्या रोग्याची औषधे देवून चालेल का? अर्थात तुम्ही अद्याप "नथुगुग्गुळ चुर्ण" चालू केलेले दिसत नाही. कारण ते "पोट साफ व्हायचे औषध नसून" वेगळ्या उपायावर आहे.अर्थात जो पर्यंत तुम्ही ते घेत नाही तोपर्यंत तुम्हाला उपाय पण समजणार नाहीच म्हणा... आणि हो बाकी नेहमी प्रमाणे.... उत्तर आपणच द्यायचे आहे वगैरे वगैरे..आता आपले निदान इतके तरी पाठ झाले असेलच..... @ वेताळ, आपल्या साठी लागणर्‍या औषधाचा व्य.नि. लवकरच करत आहे.

नथुगुग्गुळगुटी पुरुषांमधील 'दोस्ताना' वाढवायला मदत करु शकेल का?

In reply to by उद्दाम

आपणच या बद्दल जास्त चान्गले सान्गु शकाल कारण आपण वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार आहत.

लेख आवडला. दोन्ही नेते आपापल्या परीने योग्य असे मनापासून नेहमी वाटत होते पण त्याची कारणीमिमांसा कदाचित इतक्या स्पष्ट मांडता आलि नसती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या शिक्षणासाठी आणि दलित समाजासाठी अपरिमित कष्ट उपसले ह्यात काही वादच नाही. काँग्रेस च्या धुर्त सद्ग्रुहस्थांना (?) आणि त्यांच्या शेपट्यांना राजकारणामधे मोनोपॉली निर्माण करायची होती हे तर स्पष्ट दिसतचं आहे. आणि त्याची फळं आपण वेगवेगळ्या आघाड्यांवर भोगतोच आहोत. बाबासाहेबांच्या कष्टांची फळं दलित समाजाच्या नावाखाली कुठंला पक्ष भोगतोय ते आपण पाहातोच आहोत. थोडसं अवांतर : बाबासाहेबांनी कालसिमित आरक्षणाची मागणी केली होती दलितांच्या उन्नतीकरता. आज धुर्त सद्ग्रुहस्थांचा पक्ष वाढीव आरक्षणाच्या कुबड्यांची सवय आरक्षित समाजाला लावतो आहे. त्यांची झगडायची क्षमता मोडत आहे. सावरकरांविषयी जे गरळ ओकतं आहेत त्यांचा जाहीर निषेध. त्यांनी ५० वर्षं अत्यंत प्रतिकुल परिस्थितिमधे कारावास भोगला. तरीही त्यांची देशावरची निष्ठा कमी झाली नाही.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

>>> सावरकरांविषयी जे गरळ ओकतं आहेत त्यांचा जाहीर निषेध. त्यांनी ५० वर्षं अत्यंत प्रतिकुल परिस्थितिमधे कारावास भोगला. तरीही त्यांची देशावरची निष्ठा कमी झाली नाही. मग त्यात काय विशेष? गांधी सुद्धा आगाखान पॅलेसमध्ये स्थानबद्ध होते, तरीही त्यांची देशावरची निष्ठा कमी झाली नाही.

In reply to by श्रीगुरुजी

गांधी बाबांना स्थानबद्ध केलं होतं फक्त. वेळेत अन्नपाणी मिळत होतं. चरखा चालवा, पुस्तकं लिहा वाचायचं स्वातंत्र्य होतं वीर सावरकरांना तेलाचा घाणा फिरवणे (घाणा फिरवताना बैलांचा जीव हैराण होतो), काथ्या कुटणे इत्यादी भयानक कष्टप्रद कामांना जुंपलेले होते. त्यातुन अत्यंत निकृष्ट दर्जाचे अन्न-पाणी मिळायचं त्यांना. शिवाय प्रचंड मानसिक त्रास त्यांना सहन करावा लागला. तुमच्या आमच्या सारखा सामान्य माणुस असता तर कधिच मोडुन पडला असता. माझी जन्मठेप वाचा एकदा. स्वातंत्र्याचे खरे जनक वीर सावरकर, भगतसिंग, राजगुरु, सुखदेव आणि ज्यांची नावं नादान लोकांच्या उदो-उदो च्या नादात इतिहासातुन पुसली गेली आहेत असे अनेक क्रांतीकारकचं आहेत. हे लोकं नसते तर कदाचित चित्र आजपेक्षा अजुन भयानक असतं.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

अगदी खरंय, गांधीने केलंय काय देशाच्या स्वातंत्र्यासाठी???? खरे स्वातंत्र तात्याराव सावरकरांनी दिले देशाला! गांधिजी आगाखान पॅलेसमध्ये आरामात राहायचे, रोज पक्वान्न खायचे ,चांगले काम करणार्या लोकांवर माथेफीरु सोडायचे... ब्रिटीशांची गांधीने माफी मागितली होती ..रीतसर माफिनामा लिहून.. आणि माफीनाम्याचे वचन अगदी पतिव्रतेप्रमाणे १९६६ पर्यंत...माफकरा ४८ पर्यंत पाळले.वर तोंड करुन तो एक स्ट्रॅटेजिचा भाग होता असे निर्लज्ज गांधिभक्त सांगतात, अरे या देशाला काय मुर्ख समजता काय रे.. गांधीवाद्यांनो ! एकही इंग्रज ज्यांनी मारला नाही ते गांधीजी स्वातंत्रवीर मात्र हजारो इंग्रज मारणार्या तात्यारावांना मात्र या गांधीने व काँग्रेसने अपमानीत केले . कलियुग म्हणतात तेच हेच असावे...! एखाद्याला मोठं ठरवण्याच्या नादात आपण धादांत खोटे लिहतो याची या लोकांना (गांधिवादी) कसलीही चाड नाही.

In reply to by ग्रेटथिन्कर

गांधिजी आगाखान पॅलेसमध्ये आरामात राहायचे, रोज पक्वान्न खायचे ,चांगले काम करणार्या लोकांवर माथेफीरु सोडायचे...
रोज पक्वान्न खायचे असं कुठे लिहिलं आहे मी जरा दाखवता का?
खरे स्वातंत्र तात्याराव सावरकरांनी दिले देशाला!
उपरोधातुन का होईना सत्य बाहेर पडलं हे काय कमी झालं का? त्यांचा मोलाचा वाटा होता. मी आजपर्यंत हजार वेळा लोकांना सांगुन झालयं आता परत सांगतो. उपोषण, सत्याग्रह ह्या गोष्टींचा स्वतःला त्रास होतो. जुलुमी राजवटीवर त्याचा काडीचाही परीणाम होत नाही (उदा: अण्णा हजारे आणि लोकपाल प्रकरण!! आज आण्णांचा आवाज का बंद झालाय? झालाय का केला गेलाय?). जे मागुन मिळतं ते स्वातंत्र्य नाही, ती भिक आहे. जो तुम्हाला पुर्ण लुटायच्या उद्देशानी आलाय तो तुमच्या उपोषण सत्याग्रहाला एन्टर्टेन करेल का तुमच्या डीफेन्स स्टान्स ला घाबरेल?

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

उपरोधानं का होईना सत्य बाहेर पडलं उपरोधानं कशाला त्यांनी खरेच देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं तात्यारावांनी एक हाक दिली कि आख्खा देश त्यांच्या पाठी एकवटायचा जगावर बंदुकींच्या जोरावर राज्य करणारे इंग्रज मात्र तात्यारावांना चळाचळा कापायचे कारण तात्यारावांकडे असलेली अत्याधुनिक शस्त्रात्रे तात्यारावांकडे त्याकाळी भूमिगत असे किमान एकलाख खडे सैन्य होते इंग्रज म्हणाले कि सावरकरांनी जर आप्ल्यावर हल्ला केला तर आपले काही खरे नाही जागतिक सत्ता असलेल्या ब्रिटीशांनी सावरकरांना माफीनामा लिहून दिला व जीव मुठीत घेऊन देशाबाहेर पळ काढला इतके तात्याराव लोकप्रिय आणि धाडसी होते. उलट गांधीला चारदोन कार्यकर्ते सोडले तर कोण ओळखायचं हो... तात्याराव रत्नांगिरी राहयचे तिथल्या कोकणी लोकांचा धोतर आणि पंचा हा पोषाख गांधिने ढापला व मोठा झाला. जय तात्याराव, जय तात्याराव ,जय तात्याराव. (ही पोस्ट ज्याला उपरोधिक वाटेल तो तात्यारावांचा समर्थक असूच शकत नाही)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

>>>> उपरोधातुन का होईना सत्य बाहेर पडलं हे काय कमी झालं का? त्यांचा मोलाचा वाटा होता. मी आजपर्यंत हजार वेळा लोकांना सांगुन झालयं आता परत सांगतो. उपोषण, सत्याग्रह ह्या गोष्टींचा स्वतःला त्रास होतो. जुलुमी राजवटीवर त्याचा काडीचाही परीणाम होत नाही (उदा: अण्णा हजारे आणि लोकपाल प्रकरण!! आज आण्णांचा आवाज का बंद झालाय? झालाय का केला गेलाय?). जे मागुन मिळतं ते स्वातंत्र्य नाही, ती भिक आहे. जो तुम्हाला पुर्ण लुटायच्या उद्देशानी आलाय तो तुमच्या उपोषण सत्याग्रहाला एन्टर्टेन करेल का तुमच्या डीफेन्स स्टान्स ला घाबरेल? +११११११११११११११११११११...... हे सत्य दडपण्याचे आजवर असंख्य प्रयत्न झाले. अंदमान कारागृहात सावरकरांनी भिंतीवर कोरलेल्या कवितेच्या ओळींवर चुना फासून एका महामानवाची एक अभिमानास्पद स्मृती सुद्धा नष्ट केली गेली. आता अंदमान कारागृह पाडायची योजना आहे. सावरकरांनी देशासाठी जिथे ११ वर्षे अत्यंत जीवघेणा कारावास सोसला तिथल्या स्मृतीस्तंभावरून त्यांच्या काव्यपंक्ती काढून टाकून ज्या गांधींनी जिथे कधीही पाऊल ठेवले नव्हते अशांच्या ओळी कोरल्या गेल्या. सावरकरांचा काँग्रेसने अत्यंत दुस्वास केला व शक्य तिथे आणि शक्य तितकी त्यांची बदनामी करून त्यांच्या स्मृती नष्ट करण्याचाच प्रयत्न केला. अंहिसेने रक्ताचा एकही थेंब न सांडता गांधींनी स्वातंत्र्य मिळवून दिले असा तद्दन भंपक व खोटा इतिहास शिकविला गेला.

In reply to by श्रीगुरुजी

गांधींनी अंदमानात पाऊल ठेवले नव्हते
बरोबर, सावरकराँनी उणीपुरी २५ वर्षे संसदेत काढली तरीही त्यांचे तैलचित्र तिथे लावत नाहीत.

In reply to by ग्रेटथिन्कर

ऒ ग्रेट साहेब…. जर स्वाक्षरी चा रंग बदल हो डोळ्याला त्रास होतोय…. हिरवा नाही तर निळा ठेवा कसे?

In reply to by श्रीगुरुजी

+९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९ आपली शाळेची पुस्तकं पण पाहा, क्रांतीकारकांवर थोडक्यात माहीती आणि गांधी बाबा आणि खांग्रेस वर उरलेली पानं. खरं तर शाळेपासुन खरा इतिहास शिकवला गेला पाहीजे.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

थोडक्यात माहीती गांधींवर दिली पाहीजे, नथुराम निदान ५० पानांचा तरी हक्कदार आहे!!!! हाच ना खरा इतिहास.??

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

>>> आपली शाळेची पुस्तकं पण पाहा, क्रांतीकारकांवर थोडक्यात माहीती आणि गांधी बाबा आणि खांग्रेस वर उरलेली पानं. अहिंसक आंदोलनामुळे स्वातंत्र्य मिळाले अशा प्रचारकी पुस्तकांनंतर काही वर्षांनी वद्रा हा स्वातंत्र्यसैनिक होता असा इतिहास सुद्धा वाचायला मिळेल.

In reply to by श्रीगुरुजी

म्हणजे काय ? वद्रा आहेतच मुळी स्वातंत्रसैनीक...तिकडे हरियाणात गुडगावात सध्या ते विनोबाजींच्या भुदान चळवळीसारखी चळवळ चालवत आहेत :)

In reply to by प्रसाद गोडबोले

वद्राला गुरु करुन नितीन माठकरीही तीच भूदान चळवळ चालवतोय ,हो की नै गिरीजा. आणि महाजनही तेच करायचा, हंबानीकडून पैसा घ्यायचा आणि गोरगरीबांना वाटायचा... रॉबिनहुडच्याच औलादी ,नै का ?

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

>>> खरं तर शाळेपासुन खरा इतिहास शिकवला गेला पाहीजे. खरा इतिहास शिकविला तर काँग्रेसमधल्या अनेकांची दुकाने कायमची बंद होतील.

In reply to by श्रीगुरुजी

काँग्रेसवाल्यांची दुकाने ... तर भाजपवाले अन्नछत्र चालवतात!....भाजपाच्या अन्नछत्रात वाढपी कोण...तर रेड्डी बंधू, भंगारु लक्ष्मण,संजय जोशी......... आणि सुषमा ,हेमा,नरेंद्र, नितीन, गोपी हे पोट खपाटीला गेलेले बाया बापुडे जेवायला.... धन्य इनोबा ,धन्य भाजप.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

>>> गांधी बाबांना स्थानबद्ध केलं होतं फक्त. वेळेत अन्नपाणी मिळत होतं. चरखा चालवा, पुस्तकं लिहा वाचायचं स्वातंत्र्य होतं वीर सावरकरांना तेलाचा घाणा फिरवणे (घाणा फिरवताना बैलांचा जीव हैराण होतो), काथ्या कुटणे इत्यादी भयानक कष्टप्रद कामांना जुंपलेले होते. त्यातुन अत्यंत निकृष्ट दर्जाचे अन्न-पाणी मिळायचं त्यांना. शिवाय प्रचंड मानसिक त्रास त्यांना सहन करावा लागला. तुमच्या आमच्या सारखा सामान्य माणुस असता तर कधिच मोडुन पडला असता. माझी जन्मठेप वाचा एकदा. काँग्रेसचे तुरूंगात गेलेले बहुतेक जण राजकीय कैदी या दर्जाचे होते. त्यांना सक्तमजुरी मिळत नव्हती. लेखन करायची सोय व स्वातंत्र्य होते. तुरूंगात त्यांचा छळ झाला नव्हता. याउलट परिस्थिती अंदमानात होती.

In reply to by श्रीगुरुजी

||मना त्वाची रे पुर्वसंचित केले तया सारखे भोगणे प्राप्त झाले||-समर्थ रामदास. गांधी -राजकिय कैदी, सर्व सुख सुविधा ,आराम सावरकर- अंदमानात कैदी,घाणा ओढणे ,कष्ट करणे, सक्तमजुरी समर्थउक्तीप्रमाणे कोणाचे पुर्वसंचित चांगले असेल हो!..गांधी कि सावरकर..? कि समर्थच काहीतरी चूकीचं सांगतायत?