Skip to main content

एक अध्यात्मिक संवाद

लेखक धन्या यांनी रविवार, 30/12/2012 23:16 या दिवशी प्रकाशित केले.
"धन्या, अध्यात्मात खरंच ईतकी ताकद असते का रे?" ध्यानीमनी नसताना हा प्रश्न धाडकन कानावर आदळला आणि मी गोंधळून गेलो. "किस्ना, फोकन्या कोण चावला बे तुला? मी केव्हाचा वाट पाहतोय की हा वल्ली आता काहीतरी या लेण्यांमधील चित्रांबद्दल माहिती सांगेल, नंतर काहीतरी बोलेल. पण हा बावा केव्हापासून त्या क्यामेर्‍याच्या लेन्समध्ये डोळा मारत बसला आहे. देव जाणे कधी काही उघडया डोळयांनी पाहतो की जे पाहायचं ते क्यामेर्‍याच्या लेन्समधूनच असं ठरवलं आहे." "अबे मी आधी मी उघडया डोळ्यांनीच पाहतो आणि मग क्यामेर्‍याने टीपतो ते". वल्लीचं वाक्य कानावरुन निसटतं गेलं. निसटतं एव्हढयासाठी की त्यानंतर मला वल्ली काय म्हणतो आहे हे ऐकण्यापेक्षा किस्नाच्या चेहर्‍यावरील हळूहळू चढत जाणारा रागाचा पारा पाहणं जास्त विंट्रेष्टींग वाटत होतं. आताही तेच झालं होतं. माझ्या "फोकन्या" या संबोधनाने किस्नाला पुरेशी किल्ली दिली होती. आमच्या या सभ्य मित्राला अशा वावग्या शब्दांचं खुप वावडं आहे. आधीच मी गाडीत शिंदे बंधूंचं एक लोकगीत ऐकवून त्याच्या सहनशीलतेचा अंत पाहीला होता. त्या गाण्यात तसं आक्षेप घेण्यासारखं काहीच नव्हतं. एक बाई शेजारच्या गावाला बाजाराला जातात, अचानक पाउस चालू होतो आणि मग परतताना गावच्या वाटेवर असणार्‍या ओढयाला बर्‍यापैकी पाणी येतं तेव्हा कुणीतरी तिला ओढा कसा ओलांडाल हे सांगतं याचं वर्णन त्या गाण्यात होतं. नाही आवडलं या पठठयाला. शेवटी ते गाणं बदलावं लागलं. असो. आताही चेहरा शक्य तेव्हढा कोरा करत मी विचारलं, "तुला कुणी सांगितलं की मला अध्यात्मामधलं काही कळतं?" "अरे तू एव्हढं वाचन करतोस, आपल्या एव्हढया चर्चा होतात तेव्हा तू समजावून सांगतोस ते काय तुला त्यातलं काही कळत असल्याशिवाय?" "किस्ना, अध्यात्मावर वाचन करणं, त्यावर चर्चा करणं आणि अध्यात्माची ओढ असणं, ते तसे अनुभव घेणं या वेगळ्या गोष्टी आहेत. मी भगवद्गीता किंवा ज्ञानेश्वरी पुर्ण वाचलेली नाही. मी बुद्धाचं धम्मपदही पुर्ण वाचलेलं नाही. हे ग्रंथांमधले संदर्भ मी केवळ कुणाशीतरी वाद घालण्यासाठी किंवा एखादया चर्चेत माझं पांडीत्य पाजळण्यासाठी वापरतो. त्यामुळे तू जे काही विचारणार आहेस त्याचं उत्तर देणं मला जमेलच असं नाही." "असू दे ना. तू प्रयत्न तर कर. नाही पटलं तरी हरकत नाही." "ओक्के. गो अहेड" मी अक्कल पाजळायला तयार झालो. "ही समोरची बुद्धाची मूर्ती दिसतेय? तिच्या चेहर्‍यावरचे भाव बघ. किती शांत आहेत. अर्थात ही मूर्ती हे केवळ प्रतिक आहे. पण बुद्धही असाच शांत चेहर्‍याने वावरत असणार म्हणून तर मूर्तीकाराने तसे शांत भाव रेखाटले ना." "अर्थातच." "मग मला एक सांग, बुद्धासारख्या पूर्वाश्रमीच्या एका राजपुत्राला जी मनःशांती राजवाड्यात मिळाली नाही ती त्याला जंगलात एका पिंपळाच्या झाडाखाली मिळाली. खरंच अध्यात्मात एव्हढी ताकद असते का?" "किस्ना, माझ्या अल्पमतीनुसार बोलायचं झालं तर अध्यात्म माणसाला त्याची स्वत:ची खरी ओळख करुन देतं. अध्यात्म माणसाला "मी कोण आहे" या सनातन प्रश्नाचं उत्तर देतं. आणि एकदा का हे उत्तर मिळालं माणसाचं मीपण गळून जातं. तुला ती बोरकरांची कविता माहिती असेलच, जीवन त्यांना कळले हो… मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो..." "अरे पण मग आपल्या आजूबाजूला अशी कितीतरी माणसं असतात जी स्वतःला अध्यात्माच्या क्षेत्रातील अधिकारी व्यक्ती समजतात. पण जरा कुठे काही त्यांच्या मनाविरुद्ध झालं की आकाश पाताळ एक करतात." "ज्ञानदेवाने नऊ हजार ओव्यांची ज्ञानेश्वरी लिहिली, पण पठठ्याने एका अक्षराने कुठे म्हटलं नाही की मी या ग्रंथाचा कर्ता आहे. जे काही केलं ते माझ्या सद्गगुरुंच्या आशिर्वादाने झालं असं तो जागोजागी म्हणतो. 'शके बाराशे बारोत्तरे, टीका केली ज्ञानेश्वरे' ही ओवी प्रक्षिप्त समजली जाते." "मग आजचे अध्यात्मावर लेखन करणारे, स्वतःला अध्यात्माच्या क्षेत्रातील अधिकारी, बुद्धाच्या शुन्यवादावर भाष्य करणारे काही लेखक सतत म ची बाराखडी का म्हणत असतात? विरोधी मताला सामोरं जाताना त्यांचा तोल का जतो?" "मित्रा, त्याचा अर्थ त्यांना अध्यात्म कळलंच नाही हा होतो." "तू जर एव्हढं सगळं कळतं तर तुला अध्यात्म कळतं असाच त्याचा अर्थ होत नाही का?" "दादा, मी जेव्हा स्वारगेटला बस स्टँडला जातो तेव्हा मुंबईला जाणार्‍या बसवरचा बोर्ड वाचून मी स्टँडवर उभा राहूनच तुला सांगू शकतो की ती गाडी मुंबईला जाणार आहे. इन फॅक्ट लिहता वाचता येणारा कुणीही ते करु शकतो. पण मुंबईला जाण्यासाठी मला गाडीत बसावं लागेल. आणि एकदा गाडी बसलो की फार फार तर गाडी सुटता सुटता तुझ्याशी दोन चार वाक्य बोलेन, टाटा बाय बाय करेन. पण एकदा गाडी सुटली की मी माझ्या प्रवासाला निघालो असेल. अध्यात्माचंही असंच आहे. मी आता हे जे काही बोलतोय हे केवळ मला बोर्ड वाचता येतोय म्हणून केलेली बडबड आहे. एकदा माझा अध्यात्माचा प्रवास सुरु झाला की मी तुझ्याशी फुटकळ वाद घालायला इथे थांबणार नाही. मला मुंबईला पोहचायचे वेध लागलेले असतील."
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 15648
प्रतिक्रिया 91

प्रतिक्रिया

In reply to by जेनी...

तुम्हाला जशी प्रतिक्रिया लिहायची तशी लिहा. खरं बोला किंवा खोट्ट. आपल्याला अजिबात फरक पडत नाय. आपून "पोचलेला" मानूस हाय.

आधी खिखिखि, खीखीखी, खुखुखु, खोखोखो. ख्याख्याख्या असं सगळ्या प्रकारचं हसून घेते. त्यानंतर थोडक्यात सांगायचं तर तुझी गाडी योग्य रस्त्यावर आहे. शुभाऽस्ते पन्थान: सन्तु! छान!

In reply to by पैसा

पुढचं "पुनरागमनाय च" राहिलं का? नै म्हंजे पुन्हा पुन्हा इथेच गाडी येऊदे असे तर नै ना सुचवायचे =)) =))

"तू बोललास मी चाललो", आणि किस्ना धन्याच्या खांद्यावरून उडून परत पिंपळाकडे निघाला.... वेताळाची विचकट हास्य करणारी स्मायली/> -(विक्रमादित्य) सोकाजी

बरेचदा विचार करते आणि वाटते की जीवनाची इतिश्री "मोक्षप्राप्ती" मध्येच आहे हे कोणी ठरविले :( ? मी शंकर महाराज यांचा एक खूप पोटंट किस्सा वाचला होता. सांगू नये पण सांगते - एकदा सर्व लोकांमध्ये त्यांनी नाक शिंकरले व तीच घाण खाल्ली. सर्व लोकांना हे पाहून खूप किळस आली. त्यांना कोणीतरी अर्थ विचारला असता ते म्हणाले - अहंकार ही या घाणीहूनही किळसवाणा असतो वगैरे. तो सर्वथा त्याज्य आहे इ. बाप रे बीभत्स रसाचे या गोष्टीहून पोटंट उदाहरण माझ्या ऐकीवात सुदैवाने नाही. असो, पण मी या प्रश्नाने पछाडले गेले की - हेल्दी अहंकार असणे हे आवश्यक नाही काय? अहंकार (मी पणा) सर्वथा त्यागून जगता येईल का? आणि तो त्याज्य आहे हे नक्की कोणी ठरविले? जे कोणी असे म्हणतात त्यांची जीवनावर काय अथॉरीटी आहे? मी त्यांचे का म्हणून ऐकायचे? खरं पाहता कोणतीही फिलॉसॉफी मी का मानायची? एकंदर अध्यात्मामधेही "या जगण्यावर शतदा प्रेम करावे" असा पंथ आहे की नाही? असल्यास तो कोणता? कारण मला तो मानवतो. बहुसंख्यांना मानवणारा पंथच प्रमाण मी का मानायचा? अहंकाराला त्याज्य का मानायचे :( वगैरे वगैरे.....

In reply to by शुचि

बरेचदा विचार करते आणि वाटते की जीवनाची इतिश्री "मोक्षप्राप्ती" मध्येच आहे हे कोणी ठरविले
मोक्ष मिळालेला कुणी जीवनाची इतिश्री "मोक्षप्राप्ती" मध्येच आहे हे पटवून दयायला पुन्हा जन्माला येणार नाही. त्यामुळे हे असं कुणी ठरवलं यापेक्षा ते आपल्याला पटतं का हे जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं.
हेल्दी अहंकार असणे हे आवश्यक नाही काय? अहंकार (मी पणा) सर्वथा त्यागून जगता येईल का? आणि तो त्याज्य आहे हे नक्की कोणी ठरविले? जे कोणी असे म्हणतात त्यांची जीवनावर काय अथॉरीटी आहे? मी त्यांचे का म्हणून ऐकायचे? खरं पाहता कोणतीही फिलॉसॉफी मी का मानायची?
मी पणा सर्वथा त्यागून जगणं केवळ संतपदाला पोहचलेल्या व्यक्तीलाच शक्य आहे. सर्वसामान्य माणूस म्हणून जगायचं ठरवलं तर मला आत्मसन्मानाचं (सेल्फ एस्टीम) भान असायलाच हवं. फक्त माझा हा आत्मसन्मान अहंकाराकडे (ईगो) झुकणार नाही ना याची काळजी घेतली की झाली.
एकंदर अध्यात्मामधेही "या जगण्यावर शतदा प्रेम करावे" असा पंथ आहे की नाही?
याचं उत्तर भगवद्गीतेत आहे. ज्ञानयोग आचरणात आणून सर्वसंगपरीत्याग करुन संन्याशी बनायचं किंवा "या जगण्यावर शतदा प्रेम करावे" म्हणत निष्काम कर्मयोग आचरणात आणायचा हे ज्याचं त्याने आपापल्या प्रायॉरीटीनुसार ठरवायचं. मोक्ष दोन्हीकडे आहे.

In reply to by धन्या

@याचं उत्तर भगवद्गीतेत आहे. ज्ञानयोग आचरणात आणून सर्वसंगपरीत्याग करुन संन्याशी बनायचं किंवा "या जगण्यावर शतदा प्रेम करावे" म्हणत निष्काम कर्मयोग आचरणात आणायचा हे ज्याचं त्याने आपापल्या प्रायॉरीटीनुसार ठरवायचं. मोक्ष दोन्हीकडेआहे.>>> धनाजी यांचा आध्यात्मिक-धनं वर्षाव...! :-)

In reply to by अत्रुप्त आत्मा

आत्म्यांना मोक्ष कधी मिळतो? का ते अत्रुप्त असल्याने सतत जीवनमरणाच्या फेर्‍यांत घुटमळत राहतात? ०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===० तृप्ती ही मोक्षाकडे जाणारी पहिली पायरी आहे. :)

In reply to by प्रचेतस

काकाजी, आत्मा अमर आहे. ज्या आत्म्याला तृप्ती येते तो मोक्षाला जातो आणि जो अत्रुप्त असतो तो मिपावर येऊन स्मायल्या टाकतो!!! :P :D

In reply to by पैसा

ज्या आत्म्याला तृप्ती येते तो मोक्षाला जातो आणि जो अत्रुप्त असतो तो मिपावर येऊन स्मायल्या टाकतो!!!
क्या बात है! और ये रहा सिक्सर!!! :)

In reply to by प्रचेतस

@तृप्ती ही मोक्षाकडे जाणारी पहिली पायरी आहे.>>>=)) आमचा मुक्काम वडगाव,तर अगोबाचा धायरी आहे. :-p ................................................................................................http://www.sherv.net/cm/emo/happy/happy-pillow-fight-games-smiley-emoticon.gif

झटक्यात ठिकाण गाठलात. अध्यात्म्यातला "अ" सुद्धा न कळणारे सर्वात जास्त अध्यात्मावर बोलतात असा माझा अनुभव आहे. व्हाईल ज्यांना 'ध' च नुसत दर्शन झालय ते अंतर्मुख होतात. आता उरलेली गाडी याच बेरजेने पुढे न्या.

मला आपला रायगडावरचा तो प्रसंग आठवला. गडावर ऐन मध्यरात्री राजांच्या समाधीपाशी मोदक, विमे, स्पा आणि प्यारेकाकांची अध्यात्मावर वादळी चर्चा चालू होती. आम्ही मात्र एकटक महाराजांच्या समाधीकडे नजर लावून बसलो होतो. ती चर्चा एकाचवेळी कानावर पडत होती आणि नव्हतीही. हीच जर एकरूपता असेल तर अध्यात्म तरी यापेक्षा वेगळे काय असते?

In reply to by प्रचेतस

>>हीच जर एकरूपता असेल तर अध्यात्म तरी यापेक्षा वेगळे काय असते? आपण किती आध्यात्मिक आहोत हे दाखवणारा संपादकीय प्रतिसादाचा नमुना !! ;)

In reply to by सूड

=)) >>आपण किती आध्यात्मिक आहोत हे दाखवणारा संपादकीय प्रतिसादाचा नमुना !! आपण किती कळलावे आहोत हे दाखवणारा हा नारदीय प्रतिसादाचा नमुना.

In reply to by सूड

मी असं गृहीत धरतो की तू हा प्रतिसाद गंमतीत लिहिला आहेस. :)
गडावर ऐन मध्यरात्री राजांच्या समाधीपाशी मोदक, विमे, स्पा आणि प्यारेकाकांची अध्यात्मावर वादळी चर्चा चालू होती. आम्ही मात्र एकटक महाराजांच्या समाधीकडे नजर लावून बसलो होतो. ती चर्चा एकाचवेळी कानावर पडत होती आणि नव्हतीही. हीच जर एकरूपता असेल तर अध्यात्म तरी यापेक्षा वेगळे काय असते?
होय. निदान मला कळलेला अध्यात्माचा अर्थ तोच आहे. हरीनाम सप्ताह हा प्रकार पूर्वी फक्त खेडयांमध्ये व्हायचा. आता ते फॅड पुण्यासारख्या शहरांमध्येही आलं आहे. ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी, हरीनाम सप्ताह हा वारकरी पंथाचा सात दिवसांचा धार्मिक कार्यक्रम असतो. दिवसा ज्ञानेश्वरीचं पारायण, संध्याकाळी ज्ञानदेवांच्या हरीपाठाचं भजन आणि रात्री किर्तन किंवा प्रवचन अशी एकंदरीत कार्यक्रमाची रुपरेखा असते. काही ठीकाणी हा "सप्ताह" फक्त तीन दिवसांचा असतो. पारायणचा अर्थ सांगण्याची गरज नसावी. एखादा ग्रंथ, एखादं पुस्तक वाचणे. सप्ताहांमध्ये ज्ञानेश्वरीचं जे पारायण होतं ते फक्त भराभर पानं पलटत ओव्या एका विशिष्ट लयीत वाचायच्या असा प्रकार असतो. नऊ हजार ओव्या सात दिवसांत (कधी कधी तर तीन दिंवसांत) वाचून संपवायचं टार्गेट असतं. बास मग काय, पारायणाला बसलेले वाघ मागे लागल्यासारखे सुसाट ओव्या खात सुटतात. ज्या ज्ञानेश्वरीची भाषा एरव्हीही समजायला बर्‍यापैकी अवघड आहे ती ज्ञानेश्वरी अशा पद्धतीने वाचायची? अर्थाचं काय? एकदा त्या भाषेची ओळख झाली की ज्ञानियांच्या राजाने आपल्या प्रतिभेची मुक्त हस्ताने केलेली उधळण आपल्याला वेड लावते. ज्ञानदेव भगवद्गीतेचा भाष्यकार म्हणून जेव्हढा भावतो, तितकाच तो हळूवार मनाचा कवी म्हणूनही भावतो. हे सारं पारायण केल्याने अनुभवता येतं? अध्यात्माच्या क्षेत्रात "अनुभव" हेच एकमेव प्रमाण मानले जाते.
नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी | एकतरी ओवी अनुभवावी ||
अनुभव महत्वाचा महाराजा. मग एखादी घटना, एखादं वाक्य किंवा एखादी ओवीही आयुष्याला कलाटणी देण्यासाठी पूरेशी असते. हे असं पारयणांमधून पुण्य गाठीला बांधू पाहण्याचा प्रकार म्हणजे खुदहीको उल्लू* बनानेका धंदा हैं. असो. अनुभव शब्दाचा धागा पकडून विषय भरकटवल्याबद्दल क्षमस्व. *आयटीवाल्यांकडे या शब्दाला अतिशय चपखळ असा पर्यायी शब्द आहे.

In reply to by धन्या

इथे किंवा कुठेही अध्यात्माची चर्चा करून माना डोलावून अध्यात्म म्हणजे काय हे कळेल का ? साखरेची गोडी खाऊन समजेल तितकी 'साखर गोड असते ' यावर परिसंवाद करून समजेल का ?

In reply to by धन्या

एकदा त्या भाषेची ओळख झाली की ज्ञानियांच्या राजाने आपल्या प्रतिभेची मुक्त हस्ताने केलेली उधळण आपल्याला वेड लावते. ज्ञानदेव भगवद्गीतेचा भाष्यकार म्हणून जेव्हढा भावतो, तितकाच तो हळूवार मनाचा कवी म्हणूनही भावतो.
खरं आहे. अचूक मांडलं आहे.

धन्या, एकदम पटलं हे लिखाण. सम्पूर्णकुम्भो न करोति शब्दं, अर्धो घटो घोषमुपैति नूनं|

म्हणजे आता किसना पिंपळाच्या झाडाखाली जाऊन बसणार ? ('पिंपळाच्या झाडाखाली जाणे' हा कोणत्या गावच्या बोलीभाषेत असभ्य वाक्प्रचार असेल तर कृपया दुर्लक्ष करावे. ;) )

In reply to by सूड

म्हणजे आता किसना पिंपळाच्या झाडाखाली जाऊन बसणार ? ('पिंपळाच्या झाडाखाली जाणे' हा कोणत्या गावच्या बोलीभाषेत असभ्य वाक्प्रचार असेल तर कृपया दुर्लक्ष करावे. smiley )
नैसर्गिक क्रिया करण्यात असभ्यता कसली? वेळप्रसंगी सुटका इतर कोणाला त्रास न होता सुटका झाली म्हणजे झालं! काय?

अध्यात्मावरील लेखातील वाक्य नि वाक्य कळले.. दोन तीन वेळा वाचूनही न कळण्याजोगे काही सापडले नाही.. म्हणजे लेखाचा अर्थ नक्कीच गहन असला पाहिजे. जरा सोपे करून सांगा कि.

In reply to by संपत

लेखाचा काही गहन अर्थ वगैरे नाही. आपल्यापैकी खुप जणांना "कळत असतं". समस्या ही असते की ते "वळत नसतं". मला जे कळलंय तेच लिहिलंय. :)

अजुन काही प्रश्न बाकी राहिले होते ते आता पुढच्या भेटीत विचारावे म्हणतो. ;) बाकी आपण ठरवलेला तो 'धंदा' केव्हा सुरू करायचा? नाही म्हटलं तु आता फुल्ल फाॅर्मात आलायंस.

लेख आवडला, धनाजीराव. कच्च्या मडक्यांच्या गोष्टीची आठवण झाली.

संजय साहेब तुम्हि लवकरात लवकर प्रकट होऊन आपले आध्यात्माचे अम्रुत (डोस) समस्त मिपा करांस पाजावे हि ण्म्र विणंति.

धनाजीबाबा- बोलो भक्त क्या परेशानी होगेला हय तुमको ? भक्त- बाबाजी प्रणाम, बाबाजी में जब भी सिम्पल,सिधा बोलता हून लोगोको डबल मिनिंग लगता हें,बाबाजी उपाय बताये. धनाजीबाबा- मिसळपाव.कॉम खोले हुवे कितना वक्त हुवा हे? भक्त- २ साल बाबाजी धनाजीबाबा- इसीलिये तकलीफ हो रहि हे, आज तुरंत मिसळपाव खोलो धनाजी वाकडे का रसग्रहण पढो, और एक बुवा जी भी हैं वहापे उनसे 'ताक और भांडा' लेके जाओ सुबह,शाम थोडा थोडा लेनेका क्रिपा आनी शुरू होजाएगी :P

मस्त. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

+१

समजले.. कळले.. पटले. वळायची वाट बघतोय. राघव

एक गोष्ट आठवली. रेल्वेत ट्रॅकमधून फिरत थांबलेल्या गाड्यांच्या चाकांवर वा तत्सम भागांवर ठोकून पहाणारा एक कामगार निवृत्त होणार असतो. त्याच्या नोकरीच्या शेवटच्या दिवशी जीएम एक कार्यक्रम ठेवतात. त्या कामगारालाही दोन शब्द बोलायची विनंती करतात. त्यावर तो कामगार उभा राहून विचारतो," साहेब, एवढ्या वर्षांत नोकरी करुन मला एक गोष्ट कधीच समजली नाही, ती म्हणजी चाकांवर कशासाठी ठोकायचं असतं ?" अध्यात्मात बुडालेल्या बर्‍याच मंडळींचे, असेच तर नसते ना ?

यकुची आठवण झाली .

च्यामारी, अध्यात्म येवढं शिंपल असतं व्हय? लोक उगाच काय ते किचकट सांगत बसत्यात.. मस्त लिहीलंय, धनाजीपंत.. आवडले आणि पटले.. बाकी तिमांचा किस्सातर जबराच..

In reply to by कवितानागेश

"इतकी" म्हणजे काय कळले नाही की "ताकद" म्हणजे काय ते कळले नाही? की प्रश्नाचा पुढचा भाग म्हणजे पिंपळाचे झाड वगैरे कळला नाही? नक्की काय कळलं नाही ते आधी नक्की करा मग ते मला कळलं तर कीस पाडायला बरं.

In reply to by पैसा

धन्या मुंबईला का चाललाय ते कळले नाही! ;) शिवाय मुंबईला गेल्यावर परत पुण्यात येता येते का, हेपण कळले नाही. :D

In reply to by कवितानागेश

तू तर ठाण्यात आहेस. तुला काय करायचंय मुंबई आणि पुणे! :D बरं किस्ना आणि धन्या त्या दोघांची पार्टनरशिप आहे. समजा मी उत्तरे दिलीच तरी मला काय मिळणार त्यात! त्यांनाच उत्तरे देऊ देत.

In reply to by पैसा

तू तर ठाण्यात आहेस.
एक दुरूस्ती करू इच्छितो. इथे ठाण्याच्या ऐवजी सानपाडा हवं. ;)

In reply to by किसन शिंदे

धन्या मुंबईला का चाललाय ते कळले नाही! शिवाय मुंबईला गेल्यावर परत पुण्यात येता येते का, हेपण कळले नाही.
मला कुणीतरी सांगितलं की पुण्याला जे काही आहे ते खुपच फालतू आहे, खरी ऐश मुंबईलाच आहे. मला ते पटलंय म्हणून मी मुंबईला चाललोय.आणि एकदा माणूस मुंबईला गेला की तो मुंबईकर होउन जातो. त्यामुळे पुण्याला परत येण्याचा प्रश्नच नाही.

In reply to by पैसा

समजा मी उत्तरे दिलीच तरी मला काय मिळणार त्यात!>> म्हंजे??? अगं पैसाताई, तू पैसे घेत नाहीस उत्तरे द्यायचे? धत् तुझी!! ;) माझ्या वरच्या प्रश्नांची उत्तरे किस्नानी दिली तर मी त्याला आणि धन्याला प्रत्येकी २५-२५ पैसे देइन. :D

In reply to by इनिगोय

कुणाची पावली पडली होती इतक्यात? शोधत होतं खरं कोणीतरी..
चाराणे नाय काय..आठाणे पडलेत, शोधणार्‍याचे. त्याशिवाय का माऊ २५-२५ पैसे देतेय. ;)

In reply to by किसन शिंदे

एका गुरुंचा आश्रम असतो. एका चांदण्या रात्री काय होतं, गुरु अचानक झोपडीबाहेर येऊन काहीतरी शोधायला लागतात. बराच वेळ जातो, गुरुजींचा शोध काही संपत नाही. शेवटी शिष्य बाहेर येऊन गुरुजींना विचारतात, की इतका वेळ तुम्ही काय शोधत आहात? गुरुजी म्हणतात, "अरे बाळांनो, माझे दोन चाराणे हरवलेत. मघाशी झोपडीत कसं कोण जाणे कनवटीला बांधलेली गाठ सुटली आणि कनवटीला बांधलेले ते दोन चाराणे खाली पडून घरंगळत गेले." "मग गुरुजी ते तुमचे दोन चाराणे तर झोपडीतच सापडतील. इथे बाहेर कसे सापडतील." शिष्यांचा भोळा भाबडा प्रश्न. "अरे बाळांनो, पण झोपडीत अंधार आहे ना. म्हणून मी ते हरवलेले चाराणे इथे प्रकाशात शोधत आहे."

In reply to by इनिगोय

इथले भोगायचे भोग भोगून झाल्यानंतर गुरुजींची पाप - पुण्याची बॅलन्सशीट टॅली झाली. त्यांना न्यायला परमधामाहून एयरबस ए३५० आले. त्याच्यात बसून गुरुजी निघून गेले. सध्या त्यांचा मुख्य शिष्य आश्रम चालवतो. त्याने झोपडीच्या बाजूने जाणार्‍या लाईनवर आकडा टाकून झोपडीत सीएफेल लाईटस लावले आहेत.

In reply to by धन्या

ह्या धाग्यातल्या 'धिक्कारात्मक' अध्यात्माचा आवाका आत्ताशी कुठे माझ्या लक्षात अला, ह्या पोस्टीनंतर. पैसातैशी बोलून कन्फर्म करायला हवे! पैसाऽऽतैऽऽ

In reply to by पैसा

माझं "मला कुणीतरी सांगितलं की पुण्याला जे काही आहे ते खुपच फालतू आहे, खरी ऐश मुंबईलाच आहे." हे वाक्य वाचून धाग्यावर मुंबै पुणे वाद सुरु नाही झाला म्हणजे झालं.

In reply to by पैसा

मुळात 'मुंबई'त पोचल्यावर ऐश हीच आहे की पुण्यातल्या लोकांना खिजवता येतं!! :P आता एकदा इतक्या लांssssब गेल्यावर परत हे कसे काय करता येते असा फालतू प्रश्न कुणी विचारला तर मी पैसे घेइन. ;)

In reply to by धन्या

@मुंबै पुणे वाद सुरु नाही झाला म्हणजे झालं.>>>=))शतकी धाग्याची आस!त्याचाच का.. हा...?प्रयत्न...खास..?http://www.freesmileys.org/smileys/smiley-devil06.gif

शतकी धाग्याची आस!त्याचाच का.. हा...?प्रयत्न...खास..?
हेची फळ काय मम धाग्याला. (स्मायलीसम्राट, इथे कपाळावर मारुन घेतल्याची स्मायली आहे असं समजा.) सुश्री, अहो पुणे - मुंबई ही आत्मा - परमात्मा, संसार - मोक्ष अशा अर्थाने वापरलेली रुपकं आहेत. पुण्याहून मुंबईला जाण्याचा प्रवास सुरु होणे म्हणजे आत्म्याला परमात्म्याशी एकरुप होण्याची ओढ लागणे, संसारातून निवृत्तीचे वेध लागून मोक्षाच्या दिशेने प्रवास सुरु होणे असा आहे. डिस्क्लेमरः आता पुणे म्हणजे आत्मा किंवा संसार आणि मुंबै म्हणजे परमात्मा किंवा मोक्ष असंच का? उलट का नाही? तर याचं उत्तर लेख लिहिताना तसं सुचलं. तुम्हाला गैरसोयीचं असेल तर तुम्ही उलट समजा. मोक्ष मिळाल्याशी मतलब. ;)

In reply to by धन्या

@आता पुणे म्हणजे आत्मा किंवा संसार आणि मुंबै म्हणजे परमात्मा किंवा मोक्ष असंच का? उलट का नाही? तर याचं उत्तर लेख लिहिताना तसं सुचलं. तुम्हाला गैरसोयीचं असेल तर तुम्ही उलट समजा. मोक्ष मिळाल्याशी मतलब. >>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing013.gif

धन्या, वेलकम ब्याक....! बाकी बोलण्यासारखं बरंच आहे पण.... ह्या ह्या ह्या!

विचार आवडले. :) अमोल केळकर मला इथे भेटा

संवाद आवडला ! एकदा कधीतरी बैठकीला बसुयात ह्या विषयावर . ज्ञानेश्वरी साठी हे पहा http://www.ednyaneshwari.com/ वाचणे नाही तर किमान ऐकणे तरी होईल तेही सुलभ मराठीत :) असो , "मुंबै"ची गाडी कित्ती तरी वेळ फलाटावर लागली आहे , अन आम्हीही "स्ट्यॅंड"वरच उभे आहेत ....पण "पुणे" इतकं भिकारी शहर असुनही पाय निघत नाही हो इथुन :(

In reply to by प्रसाद गोडबोले

भरोत, भरतिल नेत्र जरी रे, कळ पळभर मात्र, खरे घर ते !

अध्यात्म या शब्दाची फोडच खालीलप्रमाणे आहे. अ + धिः + आत्म - अ हे विरोधार्थी, धिः म्हणजे धिक्कार करणे आणि आत्म म्हणजे स्वतः. स्वतःचा अधिक्कार करणे म्हणजे स्वतःची लाल करणे असाच अध्यात्म चा अर्थ होतो. तेव्हा तुम्हाला इतकी मूलभूत गोष्ट लक्षात न येता तुम्ही केलेलं सगळं निरूपण सगळं फोल आहे. त्यामुळे हे मीपण गळून जाणं वगैरे संपूर्ण बकवास आहे. मीकाराला अध्यात्मात प्रचंड महत्त्व आहे. आपल्या आसपास जे बिलियनेर, मिलियनेर आणि वान्नाबी गुरु झळकताना दिसतात, ते काही आपणच श्रेष्ठ आहोत असं सांगितल्याशिवाय पुढे येतात? बाकी मुंबई-पुणे वगैरे लेखात टाकून ट्यार्पी वाढवण्याचा प्रयत्न मात्र अध्यात्मिक...

In reply to by राजेश घासकडवी

आज दुर्दैवाने तुम्ही म्हटल्यासारखीच परिस्थिती आहे.
बाकी मुंबई-पुणे वगैरे लेखात टाकून ट्यार्पी वाढवण्याचा प्रयत्न मात्र अध्यात्मिक...
नाही हो. ते केवळ ओघाओघात आलेलं उदाहरण आहे. तसा खुलासा मी वर केला आहे. :)

आज अचानक हा धागा परत वाचनात आला ...मस्त वाटलं :)

In reply to by प्रसाद गोडबोले

:)

"दादा, मी जेव्हा स्वारगेटला बस स्टँडला जातो तेव्हा मुंबईला जाणार्‍या बसवरचा बोर्ड वाचून मी स्टँडवर उभा राहूनच तुला सांगू शकतो की ती गाडी मुंबईला जाणार आहे. इन फॅक्ट लिहता वाचता येणारा कुणीही ते करु शकतो. पण मुंबईला जाण्यासाठी मला गाडीत बसावं लागेल. आणि एकदा गाडी बसलो की फार फार तर गाडी सुटता सुटता तुझ्याशी दोन चार वाक्य बोलेन, टाटा बाय बाय करेन. पण एकदा गाडी सुटली की मी माझ्या प्रवासाला निघालो असेल. अध्यात्माचंही असंच आहे. मी आता हे जे काही बोलतोय हे केवळ मला बोर्ड वाचता येतोय म्हणून केलेली बडबड आहे. एकदा माझा अध्यात्माचा प्रवास सुरु झाला की मी तुझ्याशी फुटकळ वाद घालायला इथे थांबणार नाही. मला मुंबईला पोहचायचे वेध लागलेले असतील."
हे सर्वात आवडले आणि पटले :)

In reply to by स्पा

@हे सर्वात आवडले आणि पटले >>> +++१११ खरं/खोटं..योग्य/अयोग्य..उपयुक्त/अनुपयुक्त..कसंही असो! पण जे आहे ते ठाम आणि निश्चित आहे, दांभिक नाही! हे जास्त महत्वाचं.

बरेचदा विचार करते आणि वाटते की जीवनाची इतिश्री "मोक्षप्राप्ती" मध्येच आहे हे कोणी ठरविले
तहान लागल्यावर पाणी पिण्यात मनाची तृप्ती आहे हे कुणी ठरवलं ? ह्या हि प्रश्नाचं उत्तर तसच आहे . सत्य फक्त असतं . ते कोणाला ठरवावं लागत नाही
हेल्दी अहंकार असणे हे आवश्यक नाही काय? अहंकार (मी पणा) सर्वथा त्यागून जगता येईल का?
अहंकार healthy कसा असतो ? हेल्द कोणाची ? स्वताची कि इतरांचीही ? अहंकार त्यागणे म्हणजे पूर्णपणे त्यागणे . healthy काय अन nonhealthy काय
मी त्यांचे का म्हणून ऐकायचे? खरं पाहता कोणतीही फिलॉसॉफी मी का मानायची?
ह्याचं उत्तर तुम्हीच देवू शकता न . त्याचं ऐकायची तुम्हाला कोणी सक्ती केलीये का ? मानायचं का नाही हे तुमचं तुम्ही ठरवू शकता
मी पणा सर्वथा त्यागून जगणं केवळ संतपदाला पोहचलेल्या व्यक्तीलाच शक्य आहे
मी पणा सर्वथा त्यागून जगल्यामुळे व्यक्ती संतपदाला पोचते . आधी संतपद आणि मग मी पणा सर्वथा त्यागून जगणं असं नाही होतं .
एकंदर अध्यात्मामधेही "या जगण्यावर शतदा प्रेम करावे" असा पंथ आहे की नाही?
जगण्यावर प्रेम करू नये मरण्या वर करावं असं अध्यात्मामध्ये कोणी , कधी, कुठे सांगितलंय ?

आपल्या आसपास जे बिलियनेर, मिलियनेर आणि वान्नाबी गुरु झळकताना दिसतात, ते काही आपणच श्रेष्ठ आहोत असं सांगितल्याशिवाय पुढे येतात?
ते तसं सांगतात म्हणून पुढे येत नाहीत तर लोक त्याचं सांगणं ऐकतात म्हणून पुढे येतात . अध्यात्म आणि भोन्दुंचा संबंध लावणाऱ्या विषयी काय बोलायचं ? लोकांना खरं अध्यात्म नको असतं , त्यांना कष्ट न करता फुकटच सुख हवं असतं आणि अध्यात्माविषयी अज्ञानी असलेली च अशी लोकं बिलियनेर, मिलियनेर आणि वान्नाबी भोंदू गुरु निर्माण करतात . खार अध्यात्म समजलेले असल्या थापाड्या so called गुरूंना सावलीला सुधा उभं करत नाहीत