Skip to main content

कृष्ण आणि कर्ण

लेखक स्वानंद वागळे यांनी बुधवार, 28/03/2012 17:44 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी साहित्यातल्या असामान्य कलाकृतींची जर यादी करायची म्हटले तर ती शिवाजी सावंत यांच्या “मृत्युंजय” शिवाय सुरुही होणार नाही आणि संपणार देखील नाही. याच कादंबरीने लोकांना महाभारत ये एका महान ग्रंथाकडे एका वेगळ्या दृष्टीकोनाने पहाण्यास प्रवृत्त केले. कर्ण किती महान होता हे याच पुस्तकामुळे लोकांना कळू शकले. आयुष्यभर अवहेलना सोसणाऱ्या कर्णासाठी, वाचताना नकळतच एक आदराची जागा आपल्या मनात बनते. एवढा दानशूर असूनदेखील भगवंत कृष्ण त्याचाशी एवढे निर्दयीपणे का वागले? नको नको म्हणत असताना देखील त्यांनी अर्जुनाला नि:शस्त्र कर्णावर बाण चालवण्यावस का भाग पाडले असेल? पु. ल. देशपांडेंचा ही लेखनात एका ठिकाणी पु. ल. म्हणतात की “कृष्ण देखील कधीतरी कर्णाबरोबर चीडीचा डाव खेळला असे मला वाटते”. मला स्वतंत्रपणे विचार करताना असे वाटते की ज्या प्रकारचा मृत्यू श्री कृष्णांनी कर्णासाठी ठरवला तो कदाचित बरोबरच होता. अनेक वेळेला त्यांनी अर्जुनाला पाठीशी घातले हा देखील एक कृष्णानितीचाच भाग होता. असे मला वाटते. या सर्व गोष्टीत अर्जुनाला वाचवण्यापेक्षा त्यांचा कर्णाला इतिहासात कायमचे महानपणाचे स्थान देण्याचा त्यांचा हेतू असावा असे मला वाटते. एक विचार सर्वांनी करून पहा की जर अर्जुनाने कर्णाला सरळ युद्धात हरवले असते तर कर्णाला आज कोणी महान म्हटले असते का? किंवा युद्धात रथाचे चाक जमिनीत रूताल्यावर ते जमिनीतून बाहेर काढणे हे त्या वेळी महत्वाचे होते का? कर्ण रथाचा वापर न करता लढू शकत नव्हता का? जेंव्हा अर्जुन बाण चालवत होता तेंव्हा कर्णाने रथाचे चाक मोकळे करायचे सोडून धनुष्य का नाही उचलले? या प्रश्नांचे उत्तर मिळवायचा कोणी कधी प्रयत्न केला आहे का? मला वाटतं की कर्णाला देखील कृष्णांचा हा डाव कळला असावा म्हणूनच त्याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न नाही केला. अर्जुन आणि कर्ण यांमध्ये नि:संशय रित्या कर्ण जास्त महान धनुर्धर होता. परंतु त्याच्या आयुष्यात त्याने अनेक चुका देखील केल्या होत्या. चक्रव्यूहामध्ये अभिमन्यूला कपटाने मारण्यात कर्ण देखील होता. अभिमन्यू चे कवच मागून भेदण्याचे कामही त्याचेच. परशुरामाशी खोटे बोलून दिव्या अस्त्र मिळवणारा कर्ण देखील हाच होता. ध्युतामध्ये पांडवांवर मोहिनी टाकून त्यांना कपटाने हरवनाऱ्या कौरवांच्या बाजूने कर्ण लढला कारण काय तर त्याच्या पडत्या काळात दुर्योधनाने त्याला मदत केली. पण याच कर्णाने कधी दुर्योधनाला समजावण्याचा प्रयत्न केला नाही. द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या वेळी हा कर्ण शांत राहिला कारण काय तर द्रौपदीने त्याला साकडे घातले नाही? हा युक्तिवाद तर कधीही न पाटण्याच्या पलीकडचा वाटतो. तरीही श्री कृष्णांनी त्याला नि:शस्त्र असताना अर्जुनाकडून मृत्यू आणविला. याचमुळे आज कर्णाला सहानुभूती तरी मिळते. लोक आजही सर्वकालीन महान धनुर्धर म्हणूनच उल्लेख करतात. जर श्री कृष्णांनी सरळ युद्धात कर्णाला मृत्यू दिला असता तर आज “मृत्युंजय” चा शेवट आणि एकंदर संपूर्ण विषयाच पूर्ण पणे वेगळा असता असे मला वाटते.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 30919
प्रतिक्रिया 121

प्रतिक्रिया

In reply to by शिल्पा ब

ज्याला आज मूळ महाभारत म्हणतात त्याचे इंग्रजी भाषांतर किसारी मोहन गांगुली यांनी केले आहे. त्याची पीडीफ प्रत जालावर उपलब्ध आहे. हवी असल्यास मला सांगावे विरोपपत्रातुन धाढुन देइन. तळटीपः चांगले ३००० पानी पुस्तक आहे. :)

In reply to by मृत्युन्जय

महाभारताची प्रमाण प्रत भांडारकर प्राच्य विद्या संशोधक मंडळाने केली आहे ना? बहुतेक ठिकाणी संदर्भ म्हणून तीच वापरली जाते.

In reply to by प्रचेतस

नाही बोरी प्रत वेगळी. भांडारकर मधील तज्ञांनी अभ्यास करुन असे निष्कर्ष काढले की महाभारतात बर्‍याच गोष्टी नंतर घुसडण्यात आल्या आहेत. त्यांची काटछाट करुन त्यांनी एक सुधारित संक्षिप्त आवृत्ती प्रसिद्ध केली जी त्यांच्या मते मूळ लेखनाशी प्रामाणिक आहे. त्यांची मतेही बर्‍यापैकी ग्राह्य मानली जातात. महाभारताच्या कथेतील तपशील देशाप्रमाणे बदलत गेले आहेत. इंडोनेशियन महाभारत वाचुन तर चक्रावुन जाशील. त्यात शल्याला अनन्य महत्व आहे. कारण त्यानुसार तो अर्जुन, कर्ण आणि दुर्योधन असा तिन्हींचा सासरा आहे. तसेच त्या कथेनुसार कर्ण आणि अर्जुन युद्धाआधी एकदा भेटले आणि कृष्णाने अर्जुनाला कर्णाबद्दल सत्य सांगितले. त्यावेळेस कर्णाने अर्जुनाला विजयी होण्याचा आशिर्वाद दिला. :) इंडोनेशियन महाभारतात स्थूनकर्ण नावाच्या बाणाचा देखील उल्लेख आहे जो केवळ युधिष्ठीराकडे होता. त्यामु़ळेच तो शल्याला मारु शकला. आपल्याकडे हाच बाण कर्णाच्या भात्यात असल्याचा उल्लेख आहे. :)

In reply to by मृत्युन्जय

हे घे :- आणि आपले डोके आपट ह्याच्यावरती. तुला आता उर्जा पार्कात (जुनी पेशवे पार्क) नेऊन उर्जा कुठे आणि कशी सन्मार्गी लावावी ह्यावरती एक लेक्चर द्यायला हवे. च्यायला जो वाद घालायला निघतानाच "माझेच बरोबर आणि मी म्हणेन तेच खरे" असे ठरवुनच आला आहे, त्याच्यासमोर तू कितीही ज्ञानप्रदर्शन केलेस तरी उपयोग शून्य. बाकी तू आमच्या श्रद्धास्थानांना 'बलात्कारी' म्हणाला असल्याने, आमचे काही कार्यकर्ते काळा रंग, एक गाढव, रिकामे डबडे आणि फटाक्यांची माळ घेउन तुला शोधत आहेत.

In reply to by परिकथेतील राजकुमार

काळा रंग, एक गाढव, रिकामे डबडे आणि फटाक्यांची माळ काळा रंग: माझ्या गाडीची नंबर प्लेट अशीही खराब झाली आहे. उपयोगी पडेल. एक गाढवः समदु:खी , समविचारी मित्र मिळेल रिकामे डबडे: सकाळची सोय झाली फटाक्यांची माळ: दिवाळीचा थोडा खर्च वाचला सज्जन अहिंसक गांधी मोड समाप्त

In reply to by शिल्पा ब

ब ह्यांनी अत्यंत मोलाचा प्रश्न विचारला कि खरे खुरे महाभारत कुठे मिळेल?
मुळात. खरे खुरे महाभारत नक्की कोणते ? हे ज्यावेळी घडले तो काळ काही हजार वर्षापूर्वीचा त्या काळी जे घडले ते व्यासांनी सर्वप्रथम लेखणीतून साकारले. आता मूळ महाभारताची प्रत कोणती? ह्यावर सुद्धा एक लेख पडू शकतो मात्र हजारो वर्षात त्यात अनेक लेखकांनी आपल्या आवडत्या व्यक्तिरेखेनुसार त्यांचा नजरेतून हे महाभारत लिहिले. अलीकडच्या शतकातील उदाहरण द्यायचे तर दाजी पणशीकर ( नाट्य सम्राट पणशीकर ह्यांचे जेष्ठ बंधू व ह्या शतकातील संस्कुत भाषेचे प्रकांड पंडित .त्यांचे सामना मधील सदर खूपच वाचनीय असते ) किंवा इरावती कर्वे व शिवाजी सावंत ह्यांनी आपल्या आवडत्या व्यक्ती रेखाच्या अनुषंगाने महाभारत व त्या
तील अनेक कथानके लिहिली व ते वाचून आज आभासी आणि वास्तविक जीवनात अनेक जण तात्विक वाद घालत असतात. मात्र एक गोष्ट साफ विसरतात कि भारताचा पुराव्याने शाबित होईल असा इतिहास माझ्या मते अशोकाने जे स्तंभ उभारले कि लेणी बनवली तेव्हापासून सुरु होतो. ( जाणकार ह्या बाबत अधिक भाष्य करतील ) ह्या आधीच्या गोष्टी म्हणजे निव्वळ दंतकथा ह्याचा अर्थ महाभारत व रामायण घडलेच नाही असे नाही मात्र आज आपल्याला जे माहित आहे तेच महाभारत ओरीजनल आहे हे आपण पुराव्याने शाबित करू शकत नाही. तो श्रद्धेचा भाग आहे. एक उदाहरण देतो. टिपू सुलतान ह्या विषयो समस्त भारतीयांना म्हणजे कर्नाटक सोडल्यास काय माहित होते ह्यावर प्रवाद निर्माण होऊ शकतात. मात्र संजय खान ह्याने टीवी वर ह्या सुलतानाला ज्या रीतीने सादर केला की माझ्या बालवयात असतांना हा सुलतान म्हणजे इंग्रजांचा कर्दनकाळ ,हिंदू मुस्लीम ऐक्याचा कट्टर पुरस्कर्ता अशी एक भंपक इमेज निर्माण झाली होती. आज पानिपतच्या लढाया किंवा पहिले, दुसरे महायुध्द, भारताची स्वातंत्र्य चळवळ ह्या विषयावर जर वाद विवाद झाले तर त्यामागील दावे हे पुराव्याने शाबित होऊ शकतील कारण ह्या घटना पाहिलेल्या व्यक्तींनी बखर किंवा लेखन करून ते कालखंड जतन केले आहे. आज पानिपत ह्या पुस्तकातील निर्मितीमागील संधर्भ ग्रंथ पहिले तर दोन्ही बाजूने केलेले लिखाण वाचून पानिपतची निर्मिती झाल्याचे कळते. पुरंदरे ह्यांनी शिवचरित्र लिहितांना हेच केले आहे.उदा शाहिस्तेखान आणि तुटकी बोटे हि घटना कोणीही नाकारू शकत नाही कारण शाहिस्तेखानाची रोजनिशी हा सबळ पुरावा किंवा महाराजांचा राज्याभिशेष हि वस्तुस्थिती आहे कारण पुरंदरे ह्यांनी त्याचे बहुतेक वर्णन हे महाराजांच्या राज्याभिषेकाला उपस्थित असणाऱ्या इंग्रज वकिलांचे त्याच्या कंपनीला केलेले रिपोर्टिंग खुद पुरंदरे ह्यांनी लंडन मध्ये जाऊन वाचले आहे. त्यावर आधारित आहे.( आजही हॉलंड मध्ये लाखो अशी कागदपत्रे तत्कालीन भारतीय राजनैतिक घटनांवर आधारित आहेत. त्यावर जर संशोधन झाले तर नव इतिहास समोर येईन असे खुद पुरंदरे म्हणतात. नुकतेच एका विदुषीने इंग्लंड मधील वृत्तपत्रात सुरत लुटीचे वर्णन वाचून त्यावर लेख लिहिला तर अफजाखन खान व कोथळा हि भाकडकथा नसून ती वाघनखं आजही इंग्रजानाकडे संग्रही आहेत. त्यांचे काही वर्षापूर्वी मुंबईत प्रदर्शन मांडले होते. आज पाकिस्तानात जिना ह्यांची काही हस्त लिखिते व भाषणे ह्यांचा आधार घेत असा दावा तेथील प्रसारमाध्यमे करत आहेत कि पाकिस्तानची निर्मिती हि मुस्लामांच्या अस्तित्वासाठी नव्हती. मुळात हिंदुस्थानात मुसलमानावर म्हणजे सामान्य जनतेवर अजिबात अन्यान्य नव्हता. मात्र राजकीय व आर्थिक सूत्रे हि हिंदू लोकांकडे होती. व पंजाब व बंगाल मधील मुस्लीम बहुल प्रांतात तेथील जमीनदार व मोठ्या धेंडांनी स्वताचा प्रांत तेथे स्वतःची मोनोपोली किंवा स्वतःचे अस्तित्व निर्माण होण्यासाठी कवी इकबाल ह्यांना पाठिंबा दिला.व इक्बाल ह्यांनी ह्या चळवळीचे नेतृत्व त्यांच्या समाजातील सुशिक्षित व विजनवासात गेलेल्या जिना ह्यांना दिले. ह्याला इंग्रजांनी फुस दिली कारण साम्यवादाच्या विरुद्ध छोटी धर्मावर आधारित राष्ट्रे हा तोडगा त्यांच्या मनात होता म्हणुनच ज्यू राष्ट्र व मुस्लीम राष्ट् ह्यांना गांधी ह्यांचा विरोध होता. ह्यांचा अर्थ गांधी साम्यवाद मानत होते असे नव्हे. ह्यावर सविस्तर परत कधीतरी तेव्हा मतितार्थ एवढाच उदारणार्थ राज कि उद्धव ह्यावर सरस कोण ह्यावर मत मांडण्यासाठी अत्यंत योग्य व्यक्ती म्हणजे त्यांना बालपणापासून पाहणारे शिवसैनिक. आता वृत्तपत्रातून आलेले लिखाण वाचन जर मी ह्यावर मत व्यक्त केले तर तो मूर्खपणा ठरेल. सरत शेवटी मी वी स खांडेकर ह्यांचे उदाहरण देईन. त्यांनी ययाती ह्या कांदबरीचा शेवट मूळ पुराणातील कथेहून निराळा केला. ह्यावर झालेल्या टीकेला त्यांनी उत्तर दिले कि माझ्या मते ययाती ह्यांच्या व्यक्तिरेखेचे तर्क शुद्ध विवेचन केले तर जो ज्या रीतीने आपल्या जीवनात वागला असेल त्याबद्दल मी अनुमान मांडले आहे. म्हणून हि कादंबरी वास्तविकतेच्या दिशेने झुकते. व तिला जनाश्रय मिळाला. तेव्हा माझ्यामते आज उपलब्ध असलेले महाभारत हे त्या लेखकांचे महाभारतातील व्यक्तिरेखेवर त्याकाळातील सामाजिक नितीमुल्ये ह्यांच्याकडे त्यांचा पाहण्याचा स्वतंत्र असा दृष्टीकोन आहे.किंबुना ह्यात त्या लेखकांची स्वतःची मते व विचार व त्यावर आधारित महाभारतातील पात्रांचे वर्तन अवलंबून आहे. म्हणूनच आपण सर्वांनी आजच्या काळातील नीती अनीती ./ न्याय ,अन्याय ह्यावरील मापदंड निकष मानून त्याकाळातील घटनांवर चर्विचरण करू नये ( ते करण्यासाठी अनिवासी ,निवासी .मुंबई पुणे किंवा गांधी गोडसे असे अनेक हुकमी विषय आहेत.

In reply to by निनाद मुक्काम …

निनाद फारच सुंदर रे... चायला.. आता हा प्रतिसाद वाचूनही कोणाला वादविवाद करावासा वाटला.... तर तो गाढवपणाच ठरेल

In reply to by शिल्पा ब

महाभारताचे इंग्रजी रुपांतर ह्या दुव्यावर मिळेल http://www.holybooks.com/mahabharata-all-volumes-in-12-pdf-files/ उतरवुन घेता येतील अशा पिडिफ वह्या आहेत. हे भाषांतर /रुपांतर प्रताप चंद्र रॉय यांनी केलेले आहे.

In reply to by मृत्युन्जय

|कृष्ण आणि अर्जुन दोघेही बलात्कारी होते हे कसे काय माझ्या माहितीप्रमाणे कृष्ण आणि अर्जुन यांनी प्रियंवदा व सुभद्रा यांना मर्जी विरूद्ध पळवून नेले नाही. लिखाणाच्या ओघात काही च्या काही लिहावे काय???? इतरांनीपण असल्या फालतू विधानांवर डोळेझाक कारावी याचे आश्चर्य वाटले. या विधानावर तीव्र आक्षेप. प्रतिक्रीया देताना संयम बाळगावा व कुणच्या धार्मिक भावना 'आधुनीक विचरांच्या' नावाखाली दुखावल्या जाणार नाही याचा कटाक्ष ठेवावा एव्हडेच सुचवू इच्छितो. अमृत

In reply to by अमृत

फक्त ते प्रियंवदा ऐवजी मित्रविंदा असे वाचावे.

In reply to by अमृत

या विधानावर तीव्र आक्षेप मी स्पष्ट लिहिले आहे की मित्रविंदेला पळवुन नेण्याबद्दल दुमत आहे. मित्रविंदा कृष्णाची आत्येबहिण होती आणि विंद आणि अनुविंद त्याचे मामेभाऊ. हे नंतर कृष्णाच्या हातुनच शहीद झाले. काही स्त्रोतांप्रमाणे रुक्मिणीसारखेच मित्रविंदानेही त्याला पळवुन नेण्याचे साकडे घातले तर काही स्त्रोतांप्रमाणे कृष्णाने तिला स्वयंवरातुन तिच्या आणि तिच्या भावांच्या मर्जीविरुद्ध उचलुन नेले. सुभद्रा हरण तर बळानेच झाले होते. त्याला कृष्णाची संमती होती पण बलरामाची आणि सुभद्रेची नव्हती. तिचे लग्न दुर्योधनाशी ठरते आहे हे देखील अर्जुनाला माहिती होते. अंबा, अंबिका आणी अंबालिका यांना देखील भीष्माने पळवुन नेले होते. महाभारतात लग्नाचे जे ८ प्रकार सांगितले आहेत त्यातील पिशाच्च विवाह सोडुन बाकी सर्व विवाहांना समाजमान्य मानाचे स्थान होते. राक्षस विवाहा (वरील उदाहरणे) क्षत्रियांत मानाची मानली जात मुलीच्या बापाला पैसे देउन भार्या विकत घेण्याची पद्धत मद्र देशात होती जी काही ठिकाणी रुढ होती मात्र उत्तरेकडील हस्तिनापुर, पांचाल आदि देशात त्यांना कमी मानाचे स्थान होते. या गोष्टीवरुनच कर्णाने शल्याचा अपमान केला (शल्याने कर्णाचा तेजोभंग करायचा प्रयत्न केल्यानंतर) बाकी माझे खालील वाक्य नीट वाचा. मी अर्जुन आणि कृष्ण बलात्कारी होते असे म्हटलेले नाही आहे. त्या काळचे मापदंड आजच्या काळाला लावुन आपण महाभारतातील व्यक्तिरेखांचे मुल्यमापन करु लागलो तर कृष्ण आणि अर्जुन दोघेही बलात्कारी होते (कृष्णाने मित्रविंदेशी तर अर्जुनाने सुभद्रेशी पळवुन नेउन लग्न केले. त्यातील मित्रविंदेच्या हरणाबद्दल दुमत आहे. सुभद्रा हरणाबद्दल माझ्यामते नाही. चु. भू. द्या. घ्या. ), अजुन काही चर्चा करायची असल्यास खव मध्ये जरुर करुयात कारण तो या धाग्याचा विषय नाही. धन्यवाद.

In reply to by अमृत

+११११११११ >> त्याला कृष्णाची संमती होती पण बलरामाची आणि सुभद्रेची नव्हती. तुम्ही काय बोलताय साहेब

In reply to by एक मुलगा

When I heard that Subhadra of the race of Madhu had, after forcible seizure been married by Arjuna in the city of Dwaraka या वाक्याचे भाषांतर बहुधा बळजबरीने पळवुन नेले आणि लग्न केले असाच होतो. किसारी मोहन गांगुली भाषांतरित महाभारतातुन उचलले आहे हे. खालील परिच्छेद वाचा, कृष्ण स्वतः म्हणतो आहे की एखाद्या बाईला बळजबरीने पळवुन नेणे आणि तिच्याशी लग्न करणे हे क्षात्रधर्माला अनुसरुन आहे. हे ज्ञान तो अर्जुनाला स्वत:च्या बहिणीच्या बाबतीत देतो आहे: 'O bull amongst men, self-choice hath been ordained for the marriage of Kshatriyas. But that is doubtful (in its consequences), O Partha, as we do not know this girl's temper and disposition. In the case of Kshatriyas that are brave, a forcible abduction for purposes of marriage is applauded, as the learned have said. Therefore O Arjuna, carry away this my beautiful sister by force, for who knows what she may do at a self-choice. हे पण वाचा: The son of Kunti, afflicted with the shafts of the god of desire, suddenly rushed towards that Yadava girl of faultless features and forcibly took her into his car. Having seized that girl of sweet smiles, that tiger among men proceeded in his car of gold towards his own city (Indraprastha). इथे पण कुठे सुभद्रेची संमती दिसत नाही. उलट बळजबरी दिसते. पुढे वाचा, सुभद्राहरण झाले आहे हे कळल्यावर देखील कृष्ण शांत आहे हे बघुन बलरामाने त्याला काय विचारले: Then Rama, that oppressor of foes, spoke unto Vasudeva, saying, 'Why, O Janardana, sittest thou, gazing silently? O Achyuta, it was for thy sake that the son of Pritha had been welcomed and honoured by us. It seemeth, however, that that vile wretch deserved not our homage. What man is there born of a respectable family that would break the plate after having dined from it! Even if one desireth to make such an alliance, yet remembering all the services he hath received, who is there, desirous of happiness, that acts so rashly? That Pandava disregarding us and thee too hath today outraged Subhadra, desiring (to compass) his own death. He hath placed his foot on the crown of my head. How shall I, O Govinda, tamely bear it? Shall I not resent it, even like a snake that is trodden upon? Alone shall I today make the earth destitute of Kauravas! Never shall I put up with this transgression by Arjuna.' Then all the Bhojas, Vrishnis, and Andhakas, present there, approved of everything that Valadeva had said, deeply roaring like unto a kettle-drum or the clouds.'" वरील परिच्छेदातुन स्पष्ट होते की बलरामाला सुद्धा सुभद्राहरणकांडा बद्दल काहीही माहिती नव्हती. तोही प्रचंड चिडला होता.

In reply to by मृत्युन्जय

(फक्त बलरामाना माहित नसल्याचे मला माहित होते ..असो..) जर तुम्ही महाभारताच्या या प्रतिला खरे मानत असाल तर भागवताबद्दल का शन्का आहे. त्यातल्या प्रत्येक भागाचि विषयवस्तु एकच आहे (जर तुम्हाला काही भाग नन्तर टाकलेली वाटत असेल तर...). जरासन्धाला मारणे जमले नाहि ....असे म्हणणे म्हणजे स्वताच्या आवडीणे काही भाग सत्य मानुन घेणे आणी काही भाग असत्य.. नास्तिकता सिध्द करणारे हे वाक्य आहे.

In reply to by एक मुलगा

भागवतात आणी महाभारतात जेव्हा अंतर पडते तेव्हा महाभारत प्रमाण मानावे लागते. कारण भागवत बरेच नंतर लिहिले गेले आहे. भागवत किती एकांगी आहे याची अनेक उदाहरणे देता येतील. त्यापैकी एक द्यायचे झाल्यास शिव - कृष्णाची लढाई. शिव पुराणात अगदी उलटी गोष्टदेखील वाचायला मिळते. असो. मी नास्तिक नाही हे मिपावरचा पक्का नास्तिक पण सांगेल. :) असो बर्‍याच गोष्टी वाचुन त्याची गोळाबेरीज केली आहे त्यामुळे काही भाग खरा वाटतो काही वाटत नाही. हे सगळे म्हणून मग मी स्वत:च्या तर्कावर तासले आणि जो काही प्रॉडक्ट आला तो मांडला. असो. कशाला उगाच भांडायचे. झाली ४००० वर्षे त्याला आता (हा सुविचारीपंणा थोड्याच वेळात गायब होइल आणी परत थोड्याच वेळात मी परत भांडायला (अर्र्र्र, चुकलं चुकलं. चर्चा करायला) सुरुवात करेन बहुधा)

In reply to by मृत्युन्जय

म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार " जरासन्धाला मारणे जमले नाही" हेच का?? (काही प्रोब्लेम नाही, फक्त होय किवा नाही सान्गा.. आपल्या वाचणाचा आदर आहेच :) )

In reply to by एक मुलगा

होय. कृष्णाचे मल्लनैपुण्य लक्षात घेता कदाचित जमलेही असते. पण जरासंधाने त्याला रणछोडदास पदवी घ्यायला लावली हे खरे. आता ती कालयवनाची कृपा असेही तुम्ही म्हणु शकता. पण कृष्णाला जमले नाही हे खरे. जमलेच नसते असे काही म्हणत नाही.

In reply to by मृत्युन्जय

मुळात पाडंवांचच्या वडिल जे पांडु राजा , त्याने वनवासात जाताना राज्य हे दान केल होत त्याच्या भावाला . म्हंजे कौरवानाच ते दान केल होत म्हंजे राज्याचा त्याग केला होता. अस असताना जे राज्य दान म्हणुन दिल ते च राज्य पांडव परत मागत होते. ते मुळातच चुक होत. कर्ण ह्याच्या बद्दल तुम्हि जे विवेचन केल आहेत ते योग्यच आहे. अपमानित झालेला माणुस रागाच्या भरात जे करेल तेच कर्ण ह्याने केले ते म्हंजे पांडवांचा द्वेष. मुळात महाभारत हे वेदव्यास ह्या नी लिहिल आहे आणि ते पांडवांवर जास्त माया करणारे होते. म्हणुन महाभारत हे जेत्यानी लिहिलेल आहे. त्यामुळे ते जेत्यांच्या बा़जुच आहे.

In reply to by मृत्युन्जय

हा प्रतिसाद अत्यंत आवडला त्यामुळे न राहवून दाद देतोय! असेच उत्तम प्रतिसाद दिसले की खर्‍या अर्थाने एखादी चर्चा जीवंत होते. बाकी चालू द्या :)

छान प्रतिक्रिया!

उत्तम प्रतिसाद..... मृत्युन्जय यान्चि प्रतिक्रिया खुप अभ्यासपुर्वक..

मूळ महाभारतात कर्ण ही व्यक्तीरेखा व्यासानी त्रोटक अशी लिहीलेली आहे. त्यानुसारअर्जुन हा निश्शय सर्वश्रेष्ठ धनुर्धर व वीर होता . नन्तर मात्र इतर गोष्टी प्रविष्ट केल्या गेल्या असे वाटते .इमेज लार्ज्र देन लाइफ असे कर्णा विषयी झालेले वाट्ते. तो हेकट, अहकारी होता हे वेळोवेळी त्याने केलेल्या वल्गनाच दर्शवतात .

कोणे एके काळी 'मृत्युंजय' भारावल्या सारखं वाचून काढलं होतं. शोण रथामागून 'दादा, दादा' म्हणत मागं पळतानाच्या सीनला तर हुमसून हुमसून रडलो होतो. :) पण आता वरील लेख आणि प्रतिसाद कुठल्यातरी गोष्टीतल्या दोन पात्रांविषयी हमरी-तुमरीवर येउन चर्चा केल्यासारखे वाटतायेत. वयाचा पर्रिणाम दुसरं काय...

In reply to by दादा कोंडके

दादा कोंडके ला जस वाटल तश्या हुबेहूब माझ्या पण "मृत्युन्जय" वाचल्या नंतर च्या भावना होत्या, भारावून गेलो होतो. कोणे एके काळी 'मृत्युंजय' भारावल्या सारखं वाचून काढलं होतं. शोण रथामागून 'दादा, दादा' म्हणत मागं पळतानाच्या सीनला तर हुमसून हुमसून रडलो होतो. वयाचा पर्रिणाम दुसरं काय... एव्हढाच नाही तर मी एक चांदीच "धनुष्य" करून गळ्यात घातल होत, लोकांना मी कट्टर शिव-सैनिक आहे अस वाटत होत आणि येत जाता कुठल्याही नदीच्या पाया पडत होतो. असो ..चर्चा चालू द्या

मृत्यूंजयाचा प्रतिसाद उत्तम आहेच याविषयी वाद नाही. पण त्याच्याही प्रतिसादानंतर वेगळ्या बाजू मांडणारे तसेच विस्तृत प्रतिसाद अपेक्षित होते, आहेत. योगप्रभू यांचा तेवढाच काय तो त्रोटक प्रतिसाद आला आहे.

बाकी त्यावेळच्या जातीच्या राजकारणाचा फारसा अभ्यास नाही पण अशी धारणा आहे की कर्णाचा जन्म हा मुळातच एखाद्या राज्याचा वारस म्हणून झालेला नसल्याने तत्कालीक समाजव्यवस्थेनुसार तो कोणत्याही राज्याचा वारस ठरत नाही. ** असो, फालतु मुद्यांवर खल करत मिपाचा वेळ घालवण्यापेक्षा आपण मुख्य गोश्टच (रुट कॉझ) समजुन घेऊया, म्हणजे आपल्या दानशुर व शुरवीर कर्णाचा घात नक्कि कोणी केला याचा परामर्श होऊ शकेल. थोडक्यात कर्णाची व्यथा काहीही असो म्हणजे समाज रचना अथवा जातीचं राजकारण असो, त्याच्या बाबतीत सर्वात मुख्य संकटाला सुरुवात ही एका स्त्रिच्या स्वभावाच्या विचीत्र वर्तनातील परीपाकाने झाली ही तर काळ्या दगडावरील रेघ. थोडक्यात स्त्रिया पुरुषांना कशा कायमचं गोत्यात आणतात त्यांच्या छळाला, त्रासाला, र्‍हासाला कारणीभुत असतात याचं क्लासीक उदाहरणच होय. पण मी म्हणतो अहो कीती दिवस पुरुषांनी स्त्रि कडुन असा एखादा कठोर अन्याय सहन करत आयुष्य होरपळुन घ्यायचं ? अहो महाभारत काळापासुन पुरुषांवर अन्याय होतो आहे ज्यात महारथी कर्णसुध्दा आयुष्यभर होरपळुन निघाला आहे याला वाचा कधी फुटणार आहे की नाही ? या आजच्या मीतीला अतीशय ज्वलंत बनलेल्या विषयावर जाणकारांनी नक्किच उजेड टाकवा. व कर्णाने जे कश्ट एक पुरुश म्हणुन सोसले (खरं तर त्याचं अख्ख आयुष्यच स्त्रिमुळे धुळीस मिळालं, प्रचंड अन्यायाला सामोर जावं लागलं )त्या बलीदानाला न्याय द्यायचा प्रयत्न समस्तांनी करावा ही विनंती. **जर त्याच्या आजोबाला (कुंतीचे वडील) वारस असेल तर, अथवा कुंतीला भाउ असेल तर.

In reply to by आत्मशून्य

यासाठी तुम्ही युयुत्सुंना विचारावं...या विषयावर त्यांचा प्रचंड म्हणजे खुपच अभ्यास आहे. (पण आजकाल ते म्हणे देवादिकांवर अभ्यास करताहेत.

अपेक्षित वाद विवाद ! बाकी इतिहास हा कायम जेत्यांकडून लिहिला जात असल्याने, आपापल्या बुद्धी नुसार आपण स्वतःचा अभ्यास वाढवून सत्य काय ते शोधावे.

राक्षस पद्धतीने आवडत्या राजकन्येला पळवून न्यायचे, असले प्रकार मस्तवाल पुरुष नेहमी करत. परंतु महाभारत संपल्यानंतरच्या काळात स्त्रियांनी 'सौ सुनार की एक लोहार की' असा दणका द्यायचे ठरवले. बाणासुराची मुलगी उषा हिने चक्क श्रीकृष्णाचा नातू अनिरुद्ध यालाच पळवून नेले. कुठे तर कामरुप देशाची राजधानी प्राग्ज्योतिष्पूरला (आज लोक त्याला गुवाहाटी म्हणतात). त्यानंतर हे प्रकार कमी झाले. स्त्रियांनी असेच मच्छिंद्रनाथांनाही आपल्या राज्यात डांबून ठेवले होते. (स्त्रियांनी कळपाने राहावे आणि काही पुरुषांना पाळावे, असा सल्ला नुकताच एका धाग्यावर दिलेला दिसला. पण भारतात हे पूर्वीच घडले होते, याचा हा पुरावा) बिचार्‍या गोरखनाथांना शेवटी स्वतः जाऊन मच्छिंद्रनाथांना सोडवावे लागले. अलिकडच्या काळात पृथ्वीराज चौहानाने संयोगितेला पळवले, तेवढे उदाहरण वगळता अशी घटना घडल्याचे स्मरणात नाही. इसको कहते है असली 'महिला सबलीकरण' :)

In reply to by योगप्रभू

ह्यावर लहानपणी पुस्तक वाचले आहे.मुळात कुष्णाचा मुलगा हा पूर्वजन्मीचा मदन त्याच्या प्रेमात झुरणारी त्यांची पत्नी रती मग हा पुत्र मोठा झाल्यावर एका फिल्मी कथेसारखे जन्मोजन्मीच्या प्रेमी युगालांचे मिलन, त्यात एका असुर विलन. आणि ह्यांचा मुलगा अनिरुध्ध ( प्रेमाचा देवता मदन त्याचा पुत्र म्हणजे...) त्याच्यापुढे आजकालचे हिरो म्हणजे पानीकम पुढे बाणासुर व कृष्ण ह्यांचे युद्ध ह्यात बाणासुर ह्यांच्या मदतीला त्यांचे दैवत शंकर उतरल्याने विष्णूचा अवतार कृष्ण आणि शंकर ह्यांच्यात युद्ध झाले. हे पाहून नारदाला आनंदाच्या उकळ्या फुटल्या. तेव्हा माझ्या मनात विचार आला आता त्रिशूल विरुद्ध सुदर्शन चक्र उभे टाकले तर कोण जिंकणार ? मग मोहिनी अस्त्र टाकून कृष्ण शंकरांना निद्रेस धाडतो. व ते जेव्हा जागे होतात. तेव्हा बाणासुर खलास व नायक व नायिका ह्यांचे मिलन शंकर प्रसन्न - पूर्वीच्या काळी त्रिशूल , सुर्दर्शन चक्र , वज्र , ब्रमास्त्र, नारायनास्त्र पाशुपास्त्रे .अशी काही अमोघ अस्त्रे होती. ह्यात सर्वात दाहक म्हणजेच सर्वात श्रेष्ठ शत्रे कोणते ह्यावर काथ्याकुट करूया का? बलात्कारी कोण म्हणजे त्याकाळात बलात्काराची व्याख्या ह्यापेक्षा शास्त्रतेज वर्धित करणारा विषय आपण हाताळूया का ? माझे चिमुकले मनगट बाहु आणि वितभर छाती आताच फुरफुरायला लागली आहे. ( ह्या निमित्ताने वैष्णव आणि शैशव मिपाकर एकमेकांना भिडतील ) मी नारदा सारखा सरत शेवटी मूळ लेखाच्या हून मोठा प्रतिसाद देईन ( साईज मेटर, कंटेंट काय ..) अती अवांतर अजून एक किडा डोक्यात आला कि कुरुशेत्रात अस्त्रे वापरायला बंदी होती असे उडत उडत वाचले आहे. पण जर दिव्यास्त्रे वापरायची मुभा असती तर कोणाचे पारडे जड ठरले असते? म्हणजे ह्या निमित्ताने कोणाच्या भात्यात कोणती शत्रे होती ह्याचे जनरल नॉलेज तसेस कोणत्या शस्त्राला कोणता उपाय किंवा प्रती उत्तर होते ह्या विषयी माहिती मिळेल तसेस कलियुगात ह्या अस्त्रांचे पुनर्जीवन करून मग हिंदू राष्ट्रे एवढीच महत्वाकांक्षा न ठेवता समस्त जग केशरी कसे करता येईन ह्यावर चिंतन करता येईन. माझ्या लहानपणी रामायण मलिक सुरु असतांना आम्ही खराट्या च्या काडीला फुलपुडीचा दोरा बांधून गांडीव तयार करत असू .मग दोन सेना बनवून गच्चीवर आमचे युद्ध चालायचे. मग '' अब , संभाल मेरा अग्न्यास्त्र ,ह्यावर , उसपे मेरा पर्जनास्त्र असे हिंदीतून संवादाच्या फैरी झडत.पुढे महाभारत सुरु झाल्यावर सोसायटी मध्ये पिताश्री , माताश्री अश्या आरोळ्या घुमू लागल्या. आजकाल राजकारणावर लिहिणे त्यातही आंतराष्ट्रीय मला अजिबात मजा येत नाही. सुका वी मिस यु, ( ह्या चिमण्यांनो ..............) हे म्हणजे अती अती अवांतर

बराच उशीर झाला प्रतिसाद द्यायला.. असो. मागे दुसर्‍या एका धाग्यावर या संदर्भात प्रतिसाद दिलेला होता तो मांडावासा वाटतो - मृत्युंजय वाचल्यावर असे होणे साहजिक आहे. मीही ते अनुभवलेले आहे. पण माझ्या मते ती श्री शिवाजी सावंतांच्या लेखणीची कमाल आहे. कादंबरी कलाकृती म्हणून नि:संशय श्रेष्ठ आहे. यावर उतारा म्हणून धनंजय वाचावी. लेखक राजेन्द्र खेर. दोन्ही शेवटी कादंबर्‍याच. दोन्हींमधे उणीवा आहेत. पण त्यांनी अनुक्रमे कर्ण/अर्जुन यांचे उदात्तीकरण करतांना आपापल्या बाजू खूप सशक्तपणे मांडलेल्या आहेत. असो. मला महाभारत म्हणजे नेहमीच अ‍ॅनालिसिसचा विषय वाटत आलाय. अर्थात् महाभारत खरेच घडले होते असे गृहितक मी धरलेले आहे. :) पांडवांचा वनवास काळ एकूण किती असावा बरे? पांडूच्या निधनानंतर कुंती पांडवांना परत घेऊन आली त्यावेळी युधिष्ठीराचं वय बहुदा १०/१२ असावं. वारणावतानंतर द्रौपदी स्वयंवर अन् इंद्रप्रस्थ वस्तीस्थान होईतोवर ते परागंदाच होतेत. किती काळ होता त्याचा अंदाज नाही मला. इंद्रप्रस्थ वस्तीनंतर नियमभंगा साठी दंड म्हणून अर्जुन पुन्हा एकटा वनात निघून गेला ते वेगळे. द्युतानंतरही पुन्हा १२+१ वर्षे वनातच. या सर्व वेळी कौरव काय करत होतेत बरे? राजमहालातच होतेत. सूतपुत्र म्हणून हिणवल्या गेलेला कर्णही. कौरवांवर झालेले अन्याय - - पांडव परत आल्यानंतर युधिष्ठीराची युवराजपदासाठी लागलेली वर्णी. - भीमानं लहानपणापासून केलेली सर्वांची धुलाई. - द्रोणांनी अर्जुनाला दिलेली विशेष वागणूक [अश्वत्थाम्याला सुद्धा] - कर्णाला पदोपदी मिळणारी हिणवणारी वागणूक, द्रौपदी स्वयंवरातला अवमान विशेष. - धृतराष्ट्रांना अंध म्हणून द्रौपदीनं हिणवणं - कर्ण कवचकुंडल हरण - भीष्म, द्रोण, कर्ण, दुर्योधन यांचं अन्याय्यपद्धतीनं झालेलं वंधन. एकलव्यावर झालेला अन्याय हा कौरवांवर झालेला अन्याय असं म्हणता येत नाही. पांडवांवर झालेले अन्याय - - युधिष्ठीराला युवराजपद देण्याची धृतराष्ट्रांची अनिच्छा - भीमावर केलेला विषप्रयोग - वारणावत - पांडवांचा पक्ष घेणारे भीष्म, द्रोण, विदुर सर्वांचे महत्त्व शून्य करणे - कुरुराज्याचे दोन भाग करणे - खांडववनाचा भाग राज्य म्हणून मिळणे - द्युत प्रसंगी शकुनीचे कपटाचलन, वस्त्रहरण, अनुद्युत - कृष्णशिष्टाई विफल करणे.. पाच गावंसुद्धा न देण्याची भूमिका - अभिमन्यूचं अन्याय्य पद्धतीनं झालेलं वंधन - पांडवांचा समूळ नाश करण्याचा दुर्योधनाचा अश्वत्थाम्याकरवी शेवटचा प्रयत्न. विराटपर्वात एकट्या अर्जुनावर सर्व सेनेनिशी केलेले आक्रमण अन्याय या सदरात घालण्याचा मोह होतो पण बृहन्नडेच्या रूपात कुणीही न ओळखणे शक्य आहे. संजय जेव्हा शिष्टाईसाठी पांडवांकडे जातो, तेव्हाही केवळ एकच गोष्ट बोलतो.. धर्म पाळा. का? दुर्योधनानं धर्माचा जेवढा कुशलतेनं वापर करून घेतलेला आहे तो कुणीही केलेला नाही. माझ्यामते दुर्योधनासारखा अत्यंत कुशल राजकारणी कृष्णाशिवाय कुणीही नाही. किंबहुना कृष्ण नसता तर केवळ राजकारणाच्या जोरावर दुर्योधनानं पांडवांना हरवलं असतं. जनसामान्यांचा बुद्धीभेद करून जनमत आपल्या बाजूनं वळवण्याचं प्रभावी अस्त्र जे आजचे राजकारणी वापरतात, ते त्यानं किती अचूकपणे तेव्हा वापरलेलं आहे याचं राहून राहून कौतुक वाटतं. मला वाटतं केवळ कथा म्हणून सुद्धा महाभारताकडं बघीतलं तर ऑल टाईम ग्रेट खलनायक पात्रांमधे दुर्योधनाला मात देणारं क्वचितच कुणी असेल. :) राहिली कर्णाची कवचकुंडलं अन्यायानं काढून घेण्याची गोष्ट. ते चूकच आहे अन् अन्यायच आहे. पण ती असती तर अर्जुनानं पाशुपतास्त्र चालवलं असतं काय अन् महाभारत युद्धात काय झालं असतं हे केवळ कल्पनाभरारीचेच काम आहे. कवचकुंडलं असतांना देखील तो ३ दा पराभूत झालेला आहे की. निष्पक्षपणे ते मान्य करायला त्रास का व्हावा? अर्जुनही पराभूत झालेला आहे. पण शंकरांशी झालेले युद्ध सोडल्यास महाभारत युद्धा नंतर दोनदा. तोवर आणिक प्रसंग असेल तसा तर माझ्या वाचनात आलेला नाही. राघव

In reply to by राघव

>>>कौरवांवर झालेले अन्याय - - पांडव परत आल्यानंतर युधिष्ठीराची युवराजपदासाठी लागलेली वर्णी. राजा पंडु मुळातच राजा म्हणून हस्तिनापूरा वर सिंहासन ग्रहण करुन होता. त्याच्या अनुपस्थितीत धृतराष्ट्राने विश्वस्त म्हणून राज्य कारभार सांभाळलेला होता. पंडु मृत्यू पावल्यावर कुंती आणि पांडव परत आल्यावर त्याला युवराज म्हणून बसव णं हेच उचित होणार होतं. यात कौरवांवर अन्याय कसा झाला? - भीमानं लहानपणापासून केलेली सर्वांची धुलाई. मान्य. त्याबरोबरच कौरवांनी भीमावर केलेला विषप्रयोग हा अन्याय नाही? - द्रोणांनी अर्जुनाला दिलेली विशेष वागणूक [अश्वत्थाम्याला सुद्धा] पांडवांचा यात काय हात्/सहभाग? अर्जुन वॉज अ ब्राईट स्टुडंट. ;) - कर्णाला पदोपदी मिळणारी हिणवणारी वागणूक, द्रौपदी स्वयंवरातला अवमान विशेष. कर्णाला स्वयंवरात निमंत्रित केले गेले होते का हा मूळ प्रश्न आहे. - धृतराष्ट्रांना अंध म्हणून द्रौपदीनं हिणवणं मान्य. - कर्ण कवचकुंडल हरण आपणच म्हटल्याप्रमाणं कर्ण यासहित पराजित झाला होता. तरी देखील मान्य. युद्धात सर्व काही क्षम्य असतं असं म्हणताना सर्वांना हा नियम असला पाहिजे. - भीष्म, द्रोण, कर्ण, दुर्योधन यांचं अन्याय्यपद्धतीनं झालेलं वंधन. युद्धात सर्व काही क्षम्य असतं असं म्हणताना सर्वांना हा नियम असला पाहिजे. डिट्टो. अभिमन्यूचा मृत्यू हे उदाहरण आहेच. लाक्षागृहात सगळ्यांना पाठवून पेटवून देणं हे नीतीत बसत होतं?

In reply to by प्यारे१

कौरवांच्या व त्यांची बाजू मानणार्‍यांच्या दृष्टीनं त्यांच्यावर झालेले अन्याय. तसेच पांडवांच्या बाबतीतही. हे अगोदरच न लिहिणे ही माझी चूक झाली. पूर्णपणे मान्य. :) राघव

च्यायला सचिननं एक शतक काय केलं, लागले सगळे जुने मुडदे उकरायला, तो ९९ वर अडकला होता तेच बरं होतं, निदान एक महत्वाचा आणि मुख्य म्हणजे कल्पनाशक्तीचे तारे न तोडता, पाहिलेल्या मॅचचे रेकॉर्ड घेउन, आकडेवारीचे पुरावे घेउन वाद घालायला चांगला वर्तमानातला विषय होता. असो.

दादा कोंडके ला जस वाटल तश्या हुबेहूब माझ्या पण "मृत्युन्जय" वाचल्या नंतर च्या भावना होत्या, भारावून गेलो होतो. कोणे एके काळी 'मृत्युंजय' भारावल्या सारखं वाचून काढलं होतं. शोण रथामागून 'दादा, दादा' म्हणत मागं पळतानाच्या सीनला तर हुमसून हुमसून रडलो होतो. वयाचा पर्रिणाम दुसरं काय... एव्हढाच नाही तर मी एक चांदीच "धनुष्य" करून गळ्यात घातल होत, लोकांना मी कट्टर शिव-सैनिक आहे अस वाटत होत आणि येत जाता कुठल्याही नदीच्या पाया पडत होतो. असो ..चर्चा चालू द्या

दादा कोंडके ला जस वाटल तश्या हुबेहूब माझ्या पण "मृत्युन्जय" वाचल्या नंतर च्या भावना होत्या, भारावून गेलो होतो. कोणे एके काळी 'मृत्युंजय' भारावल्या सारखं वाचून काढलं होतं. शोण रथामागून 'दादा, दादा' म्हणत मागं पळतानाच्या सीनला तर हुमसून हुमसून रडलो होतो. वयाचा पर्रिणाम दुसरं काय... एव्हढाच नाही तर मी एक चांदीच "धनुष्य" करून गळ्यात घातल होत, लोकांना मी कट्टर शिव-सैनिक आहे अस वाटत होत आणि येत जाता कुठल्याही नदीच्या पाया पडत होतो. असो ..चर्चा चालू द्या

आपणाला विनन्ती आहे की कै. प्रा. अ. दा. आठवले (नन्तरचे स्वामी वरदानन्द भारती) यान्चे आक्षेपान्च्या सन्दर्भात महाभारत हे पुस्तक जरुर अगदी जरुर वाचावे. यामधे त्यानी इरावती कर्वे, पेन्डसे, इ. च्या महाभारत विषयक लिखाणाचा साधार पन्चनामा केला आहे. त्या करिता त्यानी मूळ भारतामधील श्लोकान्चाच बहुशः आधार घेतला आहे. तर्कसन्गत उत्तम युक्तीवाद प्रतिवाद यासाठी हा ग्रन्थ मिळवुन सर्वांनीच जरुर वाचावा.

या सृष्टीत सगळे कसे गूढ आहे. जे आहे ते सर्व आभासी आहे. आपण काल काय केले ते काही जणांना आठवत नाही तर एवढ्या वर्षापूर्वी काय घडले ते कसे बरे छातीठोकपणे सगळे सांगू शकतो. शक्या अश्क्यतेच्या बर्याच गोष्ठी आहेत. तसेच निनाद याने म्हटल्या प्रमाणे महाभारत नंतर ही असे अनेक विषय आहेत ज्या वर उहापोह होवू शकतो . अहो अन्तोजी ची बखर , वि. का. राजवाडे , बाबा साहेब पुरेंदरे यांचे इतिहासातील योगदान माहित आहेच. पण कोणालाही शिव जन्माविषयी का बरे संभ्रम असावा. कारण आज आपण शिवाजी महाराजांची जयंती २ वेळा साजरी करितो. अर्थात या विषय वरही २ ही बाजूने जोरदार चर्चा घडतील. अशा अनेक घटना आहेत ज्या बाबतीत आपणास नोंदी करण्यास भरपूर वाव/ साधने असताना सुद्धा आपण त्याबाबत संभ्रम आहोत. जसे लाल बहादूर शास्त्री यांचा मृत्यू , नेताजी सुभास चंद्र बोसे यांचे पुढे काय झाले . वरील सर्व प्रतिसाद बघता जो धिंगाणा चालला आहे त्याने काय बरे सध्या होणार आहे जे झाले ते झाले आपण याकुच्या म्हणण्या प्रमाणे कुणीच कुणाचं काही ** मतपरिवर्तन करु शकत नाहीत (झालं तरी काय दिवे लागणार आहेत हे पटते. निनाद, मृत्युन्जय - यांचा प्रतिसाद खूप छान

मृत्युन्जय:- तुम्हला व्य. ने. केला आहे.


कर्ण जसा वागला तसा तो का वागला याचे कारण शोधायचे झाल्यास त्याला जन्मभर केवळ त्याच्या सामाजिक स्थितीवरुन जी अवहेलना सहन करावी लागली त्याकडे बघायला लागेल.
लाखो लायक, हुशार लोक जगात आहे ज्यांना केवळ so called खालच्या जातीचे म्हणून दाबून टाकण्यात आले अहे. म्हणून प्रत्येकाने अधर्माची साथ द्यायची म्हणली तर काय होईल ? कर्णाला फक्त श्रेष्ठ धनुर्धर म्हणवून घ्यायचं होतं . त्याच्या वाटेला अवहेलना आली म्हणून इतरांच्या वाटेला ती येवू नये असा कुठलाही प्रयत्न त्याने केला नहि. अर्जुन, कृष ह्यांच्याशी त्याने विनाकारण वैर ओढवून घेतलं . अनेकवेळा कपटा ने वागला . केवळ दानशूर आहे म्हणून तो मोठा होत नहि. दान सुधा सत्पात्री असावं लागतं . बली राजा सुधा दानशूर होता कि . पण त्याच्या अव्यावहारिक दानशूर पणामुळे जगाला वाचवायला भगवंतांना बटूक रूप घ्यावा लागला न. तरीही कोणाला कृष्ण कपटी वगेरे वाटत असेल तर, आई वडील जसे मुलांच्या भल्यासाठी , रक्षणासाठी कधीतरी कठोर वागतात तसाच कृष्ण जगत्पिता असल्यामुळे त्यांना कधी कठोर व्हावं लागलं हे लक्षात घ्यावं .
तुम्ही ज्या खात्रीने बोलता आहात ते बघता तुम्ही कृष्णाला ओळखत असावात बहुधा.
कृष्ण ज्याला हरवु शकलानाही त्या जरासंधाला
हे दोन्हि दोन्ही प्रतिसाद देणाऱ्या मुर्खाला, अज्ञानाने ग्रासलेला बालिश समजून माफ करावे अशी श्री कृष्णाना प्रार्थना