मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

इंचा-इंचाने आपण जम्मू-काश्मीरमध्ये माघार घेत आहोत?

सुधीर काळे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
टाइम्स ऒफ इंडियातील ही बातमी वाचून देशाचे काय होणार अशी काळजी कुणाच्याही मनात उभी राहील. आपणही ही बातमी वाचा आणि विचार करा. मुख्य लेख वाचण्यासाठी "Article" हे tab वापरा तर वाचकांचे प्रतिसाद वाचण्यासाठी Comments हा tab वापरावा लागेल. (आतापर्यंत २०१ प्रतिसाद आले आहेत व सारे ही वाचण्यासारखे आहेत.) http://timesofindia.indiatimes.com/opinions/6238649.cms अलीकडे मी वाचलेल्या बातम्यातली ही एक अतीशय गंभीर बातमी आहे. इंचा-इंचाने आपण जम्मू-काश्मीरमध्ये माघार घेत आहोत! आज जोरदार कारवाई न केल्यास एक दिवस आपल्याला जम्मू-काश्मीरवर 'उदक सोडून' बाहेर पडावे लागेल. आपले प्रधानमंत्री, आपले राष्ट्रपती, आपले लष्कर अशी सारी गुमान कां बसली आहेत? त्यांनी जर आज कृती केली नाहीं तर जम्मू-काश्मीरपासून सुरुवात होऊन सारी राज्ये एक-एक करून फुटतील व भारत म्हणजे एक युरोप खंड बनेल! आणि भांडणे चालूच राहिल्यामुळे नवी जागतिक युद्धे इथेच लढल्ली जातील. आणि इथली दोन राष्ट्रे अण्वस्त्रधारी आहेत हाही एक महत्वाचा मुद्दा आहे. जम्मू-काश्मीरमध्ये आपण राष्ट्रपती राजवट आणावी आणि खंबीर मार्गाने गिलानीसारख्या देशद्रोह्याला शिक्षा करून परिस्थिती आटोक्यात आणून मग नव्या निवडणुका घ्याव्यात! असे आजच केले नाहीं तर सारी-सारी पुण्याई व हजारो जवानांचे रक्त वायाच गेले असे समजावे लागेल! या अर्थाची पत्रे मी पंतप्रधानांना इंग्रजीत व प्रतिभाताईंना मराठीत पाठविली आहेत. आपणही पाठवा! राष्ट्रपतींचे कार्यालयः presidentofindia@rb.nic.in पंतप्रधानांचे कार्यालयः pmosb@pmo.nic.in जय हिंद!

वाचने 214943 वाचनखूण प्रतिक्रिया 474

पैसा गुरुवार, 02/14/2013 - 16:56
http://www.rediff.com/news/report/chidambaram-cuts-rs-14k-cr-from-defence-budget-plans-hit/20130211.htm भारताचे संरक्षण बजेट १४००० कोटी रुपये कमी केले. याचा अर्थ सगळीकडे शांतता नांदू लागली काय?

अफझलला फाशी दिल्यानंतर काश्मीर खोर्‍यात लागू केलेली संचारबंदी काल उठविण्यात आली आहे असे बातम्यांमध्ये बघितले.वास्तविक बरेच पत्रकार अफझलला फाशी दिल्यास मकबूल बटप्रमाणे तो 'हुतात्मा' होईल आणि काश्मीरी युवक यातून अजून दुरावला जाईल असे म्हटले होते.मुळात अफझल हा मकबूल बटप्रमाणे 'नेता' नव्हताच.त्याला फाशीची शिक्षा ठोठावून ६ वर्षे उलटून गेली होती तरी काश्मीरात त्याविरूध्द फारसा विरोध झालेला नव्हता.इतकेच काय तर २००८ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये काश्मीरी जनतेने मोठ्या प्रमाणावर भाग घेऊन आपला लोकशाही प्रक्रीयेवरच विश्वास आहे हे दाखवून दिले होते. तरीही अरूंधती रॉय, प्रफुल बिडवाई आणि इतर महामूर्ख विचारजंत/पत्रकार स्वतःचे दुकान चालवायला या अफझलल्याला उगीचच मोठे करायचा विनाकारण प्रयत्न करत होते.यांना माहित आहे की भारतात लोकशाही आहे आणि त्याच लोकशाहीने यांना वाटेल ते बरळायचा अधिकारही दिला आहे.मग आहे काय आणी नाही काय? सोडा तोंडाचा पट्टा, भले अफझल्ल्याचा हात संसदेवरील हल्ल्यात असेल, भले त्याने भारतीय लोकशाहीच्या मुळावर घाला घालायचा प्रयत्न केला असेल यांच्या बापाचे काही जात नव्हते.असल्या महामूर्खांना शक्य झाल्यास कायमचे चंद्रावर का पाठवत नाहीत हेच समजत नाही.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

सुधीर काळे Mon, 02/18/2013 - 20:48
पुण्याचे ववा-साहेब, अगदी खरे आहे आपले म्हणणे. इथे जकार्तात आमच्या संकुलात तीन वाहिन्या पहायला मिळतात (१) झी न्यूज, (२) NDTV India (३) NDTV 24x7. तीन्ही वाहिन्यांवर या फाशीच्या शिक्षेनंतर जी चर्चासत्रे दाखविली गेली त्यात "अफजल गुरू एक देशद्रोही व्यक्ती होती" हा मुद्दा अधोरेखित झालाच नाहीं. सगळे विद्वान लोक-अगदी 'फाशीची शिक्षाच रद्द करावी'पासून त्याच्या तारखेबद्दलच्या माहितीपर्यंतच्या-कमी महत्वाच्या मुद्द्यांनाच महत्व देताना दिसले. अर्थातच त्यात सरकारने एक मोठी चूक केली होती ती म्हणजे फाशीच्या वेळेबद्दलची माहिती अफजलच्या पत्नीला 'स्पीडपोस्ट'ने कळविणे (काय हा विश्वास आपल्याच स्पीडपोस्ट संस्थेवर!) दुसरी चूक झाली ओमार अब्दुल्लांची. त्यांना आदले दिवशी रात्री आठ वाजता ही माहिती समजल्यावर त्यांनी अफजलच्या पत्नीला कळविण्यात आले आहे काय याची चौकशीच केली नाहीं व स्वतःहूनही त्याच्या पत्नीला फोन केला नाही! एवढे करायला हवे होते. ओमार अब्दुल्लांचा एक मुद्दा मात्र मला पटला. पूर्वी जेंव्हां राजीव गांधींच्या मारेकर्‍यांना फाशी द्यायची वेळ आली तेंव्हां तामिळनाडूच्या नेत्यांनी ती शिक्षा न देण्याबद्दल उच्च न्यायालयात (सर्वोच्च नव्हे) अर्ज केला व त्यानुसार त्या शिक्षेची अंमलबजावणी लांबणीवर पडली. त्यावेळी ओमार म्हणाले होते कीं हेच जर आम्ही (काश्मिरींनी) अफजल गुरूबाबत केले असते तर सार्‍या देशाने काश्मिरींवर ठपका ठेवला असता, पण तामिळनाडूच्या सरकारवर अथवा तिथल्या जनतेवर कुणीच तोंडसुख घेतले नाहीं. तीच कथा बेआंत सिंग यांच्या खुन्याबद्दल. तिथेही अकाली दलाने रदबदली केली व फाशीची तारीख पुढे ढकलली. त्याबद्दलही कुणी अकाली दलावर ठपका ठेवला नाहीं! ओमार म्हणाले की अफजल गुरूला झटपट फाशी दिल्याची घटना एक अपवाद (exception) होता कामा नये. इतर लोकांनासुद्धा राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज नामंजूर केल्याबरोबर फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी व्हायला हवी. अफजल गुरूला जशी ताबडतोब फाशी दिली गेली तशी राजीव गांधींच्या मारेकर्‍यांना, वीराप्पनच्या सहकार्‍यांना व बेआंत सिंग यांच्या खुन्यालाही झाली पाहिजे असे त्यांना सुचवायचे होते. ओमार अब्दुल्लांचे हे म्हणणे मला तंतोतंत पटते. आता अफजल गुरूचे पार्थीव त्याच्या कुटुंबियांना देण्याबाबतही 'कब्बड्डी-कब्बड्डी' सुरू झाली आहे. बघू पुढे काय होते ते!

In reply to by सुधीर काळे

आजानुकर्ण Tue, 02/19/2013 - 02:58
453 वा प्रतिसादः
(२) NDTV India (३) NDTV 24x7.
या दोन्ही वाहिन्या वेगवेगळ्या असून एकाच विषयावर वेगवेगळी चर्चासत्रे दाखवतात काय? की रिपीट टेलिकास्ट असते? वीरप्पनच्या सहकाऱ्यांची शिक्षा दोनचार दिवसांनी उशीरा होणार असल्याचे वाचले. सर्वांनीच इसकाळ वर वाचले असेलच त्यामुळे दुवे देत नाही.

श्रीरंग_जोशी गुरुवार, 02/21/2013 - 01:44
नजिकच्या भविष्यात अफगाणिस्तानमधून अमेरिकन सैन्याने माघार घेतल्यावर काश्मीर प्रश्नावर होणारे परिणाम यावर काळेकाकांचे व निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी यांची मते जाणून घेण्यास उत्सुक आहे...

प्रसाद१९७१ गुरुवार, 02/21/2013 - 18:04
ऱोज १ मिटर नी माघार घेतली तरी पाकिस्तान बाँबे पर्यंत पोहचायला ५४०० वर्ष लागतील. रोज १०० मिटर नी माघार घेतली भारतानी तरी आपली काही हरकत नाही.

नाना चेंगट गुरुवार, 02/21/2013 - 22:52
४६२. थोडं राहिलं आता.. ३८ दिवस ३८ प्रतिसाद.. होउन जाईल ५०० आरामात हाकानाका

यशोधन वाळिंबे Sat, 02/23/2013 - 18:44
अंधार होत चाललाय दिवा पाहिजे | या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे ॥ नेते झाले अफ़जलखान,काश्मिरचे झाले स्मशान। शायिस्तेखानची बोटे तोडण्यासयुवा पाहिजे। या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे..॥

In reply to by प्यारे१

धन्या Tue, 02/26/2013 - 01:50
काही कळत नाही म्हणत एक प्रतिसाद तुम्हीही दिलातच की. (असं म्हणून मी ही एक प्रतिसाद दिला. एकदाचे पाचशे पुर्ण होऊद्या. म्हणजे काहीतरी टाईमपास प्रतिसाद देऊन धागा वर आणला जाणार नाही.)

In reply to by धन्या

प्यारे१ Tue, 02/26/2013 - 18:34
अहो एवढ्या महत्त्वाच्या विषयावर तुम्ही असा कसा काय टाईमपास करु शकता धनाजीराव???? आम्ही आपलं प्रांजळपणे कबूल केलं झालं तुम्हाला असं काहीही कसं वाटतं? टाईमपास करायचाच झाला तर तुम्ही तुमच्या सखूला बोलवा परत एकदा.