ताज्या घडामोडी - जुलै २०२२ (भाग २)
In reply to अजूनही झोपेचे सोंग घेतलेले by कानडाऊ योगेशु
In reply to कॉ आणि रावावर घणाघाती हल्ला करणारी बाळासाहेबांची by कंजूस
In reply to आनंद दिघे माणूस ओळखायला चुकले by अमरेंद्र बाहुबली
In reply to शिवसेनेतील बरेच जण शिंदे गटात by श्रीगुरुजी
अवांतर - जर यातून सेना पूर्ण संपली तर सर्वांनाच आनंद वाटेल.नाही हो. हा रोगापेक्षा उपाय जालीम असा प्रकार होईल. भाजप हा राक्षसी महत्वाकांक्षा असलेला पक्ष आहे. राष्ट्रवादी हा सत्तालोलुप धनदांडग्यांचा पक्ष आहे. काँग्रेस तर बजबजपुरी होऊन गेलेला पक्ष आहे.एक शिवसेनाच होती ज्यात श्रमजीवी व बुध्दीजीवींचा मिलाफ झालेला दिसुन येत होता. शिवसेनाच संपली तर होणारा फायदा हा तत्कालिक असेल पण महाराष्ट्राचे पुढचे नुकसान जास्त होईल. शिवसेना संपण्यापेक्षा त्यात नेतृत्वबदल होणे गरजेचे आहे असे मी म्हणेन.
In reply to अवांतर - जर यातून सेना पूर्ण by कानडाऊ योगेशु
In reply to एक आणखी सुचवणी. by शाम भागवत
In reply to अत्यंत चुकीचे समज आहेत. by श्रीगुरुजी
In reply to अत्यंत चुकीचे समज आहेत. by श्रीगुरुजी
In reply to असु ही शकेल. पण अद्यापपावेतो by कानडाऊ योगेशु
In reply to अवांतर - जर यातून सेना पूर्ण by कानडाऊ योगेशु
एक शिवसेनाच होती ज्यात श्रमजीवी व बुध्दीजीवींचा मिलाफ झालेला दिसुन येत होता.
सेनेत बुद्धीजीवि? असा एकजण तरी आहे का? आता मुंबई महाराष्ट्रापासून तोडून गुजरातला जोडणार, असा भंपक खोटारडा प्रचार सुरू झाला आहे. हे अजूनही मराठी माणसांना महामूर्खच समजतात. यांनाच बुद्धीजीवि म्हणायचं का? उद्या मुंबई गुजरातला द्यायची असेल तर फक्त कुलाबा, नरीमन पॉईंट वगैरे भाग देता येणार नाही. भौगोलिक संलग्नता लक्षात घेतली तर डहाणू, पालघरपासून गेटवे ऑफ इंडियापर्यंतचा सर्व पट्टा द्यावा लागेल व असे होणे यावच्चंद्रदिवाकरौ शक्य नाही. पण हे अजूनही मूर्खपणा सोडण्यास तयार नाहीत.
शिवसेनाच संपली तर होणारा फायदा हा तत्कालिक असेल पण महाराष्ट्राचे पुढचे नुकसान जास्त होईल.
सेनेमुळे आजतागायत महाराष्ट्राला फक्त नुकसानच सहन करावे लागले आहे. त्यामुळे हा पक्ष संपणे महाराष्ट्राच्या हिताचे आहे.
In reply to एक शिवसेनाच होती ज्यात by श्रीगुरुजी
In reply to काका भाजपला सुखासुखी by कानडाऊ योगेशु
In reply to काका भाजपला सुखासुखी by कानडाऊ योगेशु
शिवसेनाच एक पक्ष असा आहे कि जो ग्राऊंड लेवल (मराठी शब्द?) राष्ट्रवादीशी टक्कर देऊ शकतो. (भाजप फक्त राजकारण करु शकतो.).
अत्यंत चुकीचा समज आहे. मुळात सेनेला स्वतःची फारशी ताकदच नाही. दुसरं म्हणजे भाजपशी युती असण्याच्या काळात सुद्धा सेनेचं राष्ट्रवादीशी साटंलोटं सुरू होतं व अजूनही आहे.
बर्याच जणांचा शिवसेनेवर राग अभद्र युती केली त्यामुळे आहे. एरवी तसा राग नसावा. त्यामूळे शिवसेनेत नेतृत्वबदल होणे गरजेचे आहे. पक्ष संपायला नको.
राष्ट्रवादी किंवा कॉंग्रेसशी युती करण्याची सेनेची ही पहिली वेळ नाही व शेवटची वेळ सुद्धा नाही. नेतृत्वबदल होऊन शष्प फरक पडणार नाही. सगळे तसेच आहेत. हा पक्ष संपणेच महाराष्ट्राच्या हिताचे आहे. In reply to कोलांट्या उड्या अनेकजण मारतात by श्रीगुरुजी
दुसरं म्हणजे भाजपशी युती असण्याच्या काळात सुद्धा सेनेचं राष्ट्रवादीशी साटंलोटं सुरू होतं व अजूनही आहे.
असं असण्याचीच शक्यता आहे, हे मुमं शिंदेंच्या भाषणात सारखं 'आव्हाड साहेबांना सगळं माहिती आहे' याच्या वारंवार उल्लेखाने जाणवलं. In reply to कोलांट्या उड्या अनेकजण मारतात by श्रीगुरुजी
In reply to अवांतर - जर यातून सेना पूर्ण by कानडाऊ योगेशु
In reply to फक्त एक आरे शेड अडीच वर्ष by विवेकपटाईत
In reply to सहमत, सत्तेत आल्या आल्या by रात्रीचे चांदणे
सत्तेत आल्या आल्या जद्धव ठाकरेंनी, आरे करशेड, जैतापूर, नाणार आणि बुलेट ट्रेन या प्रकल्पांना प्राधान्य देऊन सेनेची इमेज विरोधसेना ते विकाससेना अशी करायला पाहिजी होती.
केवळ उद्धव ठाकरेंना खुश ठेवण्यासाठी फडणवीसांनी जैतापूर व नाणार प्रकल्प रद्द केले होते. अर्थात उद्धव ठाकरेंना खुश ठेवण्यासाठी त्यांनी इतर अनेक चुकीचे निर्णय घेतले होते. विकास वगैरे करण्याऐवजी आपली खुर्ची शाबूत ठेवणे ही एकमेव गोष्ट त्यांनी ५ वर्षे केली. In reply to सत्तेत आल्या आल्या जद्धव by श्रीगुरुजी
In reply to समृद्धी महामार्ग, जलयुक्त by रात्रीचे चांदणे
In reply to छे. काहीतरीच काय. by शाम भागवत
In reply to मोदी-शहांनी फडणवीसांना भरल्या by श्रीगुरुजी
In reply to छे. काहीतरीच काय. by शाम भागवत
ते फडणीस द्वेष करत बसतील आणि फडणवीस खूर्चीवर बसून गंमत बघत बसतील.
ठाकरेंसमोर लाचारीची परमावधी गाठूनही ठाकरेंनी फडणवीसांचा पोपट केला, तेव्हा आम्ही गंमत पाहिली. नंतर अडीच वर्षे पाण्याबाहेर तढफडणाऱ्या मासोळीप्रमाणे फडणवीसांची सत्तेबाहेर जावे लागल्याने होणाऱ्या तडफडीची गंमत आम्ही पाहिली. आतासुद्धा भरल्या ताटावरून उठविल्यानंतर पडलेल्या चेहऱ्याची गंमत आम्ही पाहिली. कदाचित भविष्यात ते खुर्चीत बसतीलही. तेव्हा त्यांच्या समर्थकांची गंमत आम्हाला पहायला मिळेल. In reply to समृद्धी महामार्ग, जलयुक्त by रात्रीचे चांदणे
In reply to समृद्धी महामार्ग, जलयुक्त by श्रीगुरुजी
In reply to माझ्या माहितीप्रमाणे जलयुक्त by रात्रीचे चांदणे
In reply to जलयुक्त शिवार ही योजना by शाम भागवत
In reply to फक्त एक आरे शेड अडीच वर्ष by विवेकपटाईत
In reply to भक्तांच्या निष्ठा अगोदरच वाहिलेल्या आहेत by सर टोबी
In reply to जलयुक्त शिवार हि काही अद्भुत by आग्या१९९०
In reply to पाझर तलाव ही नक्कीच चांगली by सुक्या
In reply to त्यात किती पैसा ओतला, त्याचा by आग्या१९९०
कधी कधी फायदा तोट्याचे गणित सोडवणे कठीण होऊन जाते.
सोयिस्कर रित्या गोल पोस्ट बदललीत. असो ते जरा बाजुला ठेउ. पाझर तलाव किंवा टेकडीवर खड्डे खोदणे यात बराच पैसा खर्च झाला. रोजगार निर्मिती झाली. पण त्याचे फलीत काय? पाणी जिरवणे जितके जास्त महत्वाचे आहे तितकेच ते कुठे व कसे मुरवावे याला ही महत्त्व आहे. टेकड्यांवर खड्डे खोदले, त्यात पाणी जमा झाले पण ते जमीनीत मुरलेच नाही. याला कारण जिथे खड्डे खोदले ती जागा त्या पाषाणाची होती. त्यामुळे पाणी खाली झिरपायला इतका वेळ लागे की सुर्यनारायण ते पुन्हा वाफ करुन टाकी. त्यामुळे इतकी वर्षे ही सारी कामे झाली तरी डोंगर मात्र ओकेबोकेच राहीले. यात रोजगार निर्मिती हा एकच टेंजीबल बेनेफिट बघितला गेला व ज्यासाठी हे सारे केले तो इन्टँजीबल बेनेफिट दुर्लक्षित राहीला.
त्यामुळे जिथे जास्त पाणी मुरवता येईल अशा ठिकाणी लक्ष द्यायला सुरुवात झाली. वरील रोहयो मधे जे बंधारे बांधले होते त्यात गाळ साचल्यामुळे त्यांची साठवण क्षमता कमी झाली होती. कित्येक बंधारे तर जमीनीत गाड्ले गेले होते. जलयुक्त शिवार योजनेत त्यांचा गाळ काढणे, खोली वाढवणे वगेरे कामे करुन त्यांना पुन्हा जीवीत केले गेले. नैसर्गीक पणे नदी मधे असलेला वाळु चा थर हा पाण्याच्या प्रवाहाला अडवुन ठेवतो. साहजिक ते पाणी जमीनीत जास्त मुरते. गेल्या काही दशकात वाळु चा अमर्याद उपसा झाल्याने नदीपात्र अक्षरशः उघडे झाले. त्याची प्रवाहाला अडवण्याची / रेसिस्ट करण्याची क्षमता कमी झाली. पर्यायाने पाणी आले तसे जात राहीले. सध्या दिसत असलेली पुर परीस्थीती या अक्षम्य उपशाचा परीणाम आहे. निसर्गाला कितीही दोष दिला तरी मानव यात भागीदार आहे हे विसरता कामा नये.
ठिबक सारख्या योजना तितक्याच कार्यक्षमतेने अमलात आणायला हव्या होत्या.
ठीबक सिंचन कितीही गोंड्स असले तरी ते प्रचंड वेळखाउ , खर्चीक आहे व त्याची मोबीलीटी खुप कमी आहे. साधारण पणे ठीबक सिंचन १ वर्षे ते ५ वर्षे असा सेटअप केला तरच फायद्याचे असते. म्हणजे फळबागा किंवा वनशेती वगेरे साठी किंवा डोंगर उतारावर जिथे कन्वेन्शनल पद्धतीने सिंचन करता येत नाही अशा ठीकाणी फायद्याचे ठरते. तुम्ही म्हनाल की मी मका किंवा गहु ठीबक सिंचन करुन पिकवतो तर तांत्रीक द्रुष्ट्या ते शक्य असले तरी आजीबात व्यवहारीक नाही. तसे केले तर दर ३ महिण्याला शेतकर्याला शेतात नळ्या घेउन पळत रहावे लागेल. तसेच त्या सेटप मुळे जरुरी कामे जसे की तण काढणे, खत देणे, कापणी करणे यावर बरीच बंधने येतात. विचार करा, शेतात पायपाच्या भेंडोळ्यात उभे राहुन तण काढणे कसे कराल? तुषार सिंचन त्यातल्या त्यात बरी आहे परंतु आपल्या देशातील शेतीचे आकारमान पाहता तो ही आतबट्याचा ठरतो. भारतात वापरात असलेली पारंपारीक सिंचन पध्द्त ही पाण्याची प्रचंड नासाडी करते. त्यामुळे शेततळे खुप कामी येते. शेतकरी पाणी शेततळ्यात साठवुन ठेवतो व जसे लागेल तसे वापरतो. यात पाण्याची नासाडी बरीच कमी होते.
त्यामुळे अशा योजना ह्या सरकारी बाबुंच्या नजरेतुन पाहण्या ऐवजी एका तज्ञाच्या नजरेने किंवा ज्याला त्याचा फायदा झाला आहे अशा लोकांच्या नजरेने बघाव्या. एकांगी मत बहुतेक वेळा बदलते.In reply to कधी कधी फायदा तोट्याचे गणित by सुक्या
In reply to कधी कधी फायदा तोट्याचे गणित by सुक्या
In reply to जलयुक्त शिवार हि काही अद्भुत by आग्या१९९०
In reply to जलयुक्त शिवार हि काही अद्भुत by आग्या१९९०
In reply to कारशेड वही बनायेंगे.... by Nitin Palkar
In reply to https://www.newslaundry.com by आग्या१९९०
In reply to कारशेड वही बनायेंगे.... by Nitin Palkar
In reply to सुबाभूळ खरंच उपयोगी आहे ....? by गामा पैलवान
In reply to सामाजिक वनीकरन मोहिमेत by सुक्या
निलगिरी हे झाड मात्र खुप नुकसानकारक आहे. ह्या झाडात असलेले रसायन हे जिथे त्याचे पाने पडतात त्या जमीनीचा कस घालवतात. दुसरी कुठलीही झाडे त्या जमीनिवर उगवत नाहीत. ह्या रसायनामुळे त्या पानांचे नैसर्गिक विघटनही लवकर होत नाही. त्याउपर ही झाडे जिथे वाढतात त्या भागात भुमीगत पाणीसाठा नष्ट करतात.पश्चिम घाटात तामिळनाडूमध्ये उटी आणि जवळपासच्या परीसरात निलगिरीची झाडे मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळेच त्या जिल्ह्याला निलगिरी जिल्हा म्हणतात. उटी ते कन्नुर टॉय ट्रेनने जाताना आणि उटीजवळच्या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी जाताना निलगीरीचा सुवास आसमंतात दरवळत असतो तो अनुभव कधीतरी घ्यावाच असा आहे. तिथे दुसरी कोणती झाडे असतात की नाही याची कल्पना नाही. पण त्या झाडांमुळे भुमीगत पाणीसाठा नष्ट होतो? तसे असेल तर पश्चिम घाटातील उटी-कन्नूर हे सुंदर ठिकाणे कधीच नष्ट व्हायला हवी होती पण (सुदैवाने) तसे झालेले नाही.
In reply to निलगिरी by क्लिंटन
In reply to निलगिरी by क्लिंटन
In reply to सामाजिक वनीकरन मोहिमेत by सुक्या
त्यामुळे हे फालतु पर्यावरणवादी डोक्यात जातात.याला पूर्ण सहमती. स्वतः कायम एसीत राहणार, झाडे कापून आणि नैसर्गिक झर्यांचे स्त्रोत अडवून कुठेतरी 'निसर्गाच्या कुशीत' विकेंड होम किंवा फार्महाऊस बाळगणार, चुकूनही कधी चालत किंवा सार्वजनिक वाहतुकीने जाणार नाहीत आणि प्रत्येक ठिकाणी बकाबका तेल खाणारी आपली गाडी वापरणार आणि इतके करून इतरांना तुम्ही अमुक करा आणि तमुक करा. आरे वाचवाच्या तथातथित मोहिमेतले रॉयल पाममधील लोक एकजात असलेच आहेत. ज्या लोकांसाठी मेट्रो आहे त्यांची कार्बन फुटप्रिंट या ढोंगी लोकांपेक्षा कितीतरी कमी आहे यात शंका नाही. आणि हेच लोक इतरांना लेक्चरबाजी करत असतात ते बघून नक्कीच तळपायाची आग मस्तकात जाते.
In reply to भक्तांच्या निष्ठा अगोदरच वाहिलेल्या आहेत by सर टोबी
अजूनही झोपेचे सोंग घेतलेले