सध्या आपण काही दिवसांपासुन शेतकरी आंदोलन आणि त्याविषयी माहिती घेतच आहात. मला आंदोलन का सुरु झाले? त्यात कोण पुढाकार घेत आहे, कोण आपल्या फायद्यासाठी कोणाचा वापर करीत आहे यापेक्षा यात शेतकरी वर्गाच्या मागण्या किती व्यवहारीक आणि सरकारने दिलेला प्रतिसाद यावर चर्चा अपेक्षित आहे.
शेतकरी नेतृत्वाने सरकारने मागील महिन्यात केलेले तीनही शेतीसुधारणा कायदे रद्द करावे ही पहिली मागणी केली. त्याला सरकारने नकार दर्शविला आणि त्यात सुधारणा करु. त्यात नवीन दुरुस्ती करणे शक्य आहे असे सांगितले. त्यानंतर आज काही मागण्या घेउन गृहमंत्री यांच्या सोबत बैठक निर्णयापर्यंत आली नाही. नवीन मागण्या माझ्या माहितीनुसार खालील प्रमाणे आहेत.
१. एम एस पी सक्तीची करा. खाजगी खरेदीदारांनी त्याखाली खरेदी करु नये अशी तरतुद करावी.
सरकारने एम एस पी कायम राहील असे लिखीत आश्वासन देण्याचे मान्य केले आहे.
खाजगी व्यक्ती किंवा कंपनी यांना अशी सक्ती कशी करता येऊ शकेल?
हे मला समजत नाही. जरी सरकारने असा कायदा केला तरी प्रत्यक्षात हे कधीही शक्य होणार नाही.
२. एम एस पी खरेदी सरकार बंद करणार नाही.
शासनाने आपण एम एस पी व्दारे होणारी खरेदी बंद करणार नाही असे लिखीत आश्वासन देण्याचे मान्य केले आहे.
सरकारने आपले धान्य एका स्थिर किमतीला घ्यावे असा आग्रह कोणत्या पिकात आणि का केला जातो हे आपण पाहिले तर कडधान्य, गहु, तांदुळ यांनाच केला जातो.
भाजीपाला, नगदी पिके, फळे, मसाले याबद्दल असा काहीही विचार शेतकरी करीत नाहीत. थोडक्यात असा माल जो आपण खुल्या बाजारात आपण विकु शकत नाही
तो एम एस पी त सरकारने विकत घ्यावा असा आग्रह आहे. थोडाक्यात बासमती आम्ही बाहेर विकु, पण हळा भात सरकारने घ्यावा.
३. खाजगी खरेदीदार आणि बाजार संघांवर कर लावावा.
मला हे कळत नाही की कोणावर कर लावावा किंवा लावु नये हा शेतकर्यांचा प्रश्न कसा असु शकतो? त्यामुळे सरकारची लढाई शेतकरी का लढत आहेत?
ए पी एम सी वाचवणे हे कोणत्या शेतकर्याला आवश्यक वाटते? का? कोणताही दुकानदार आपल्यावरील कर ग्राहकाकडुन वसुल करतो. यापुर्वी शेतकर्याकडुन कर
अथवा काही रक्कम वा अतिरिक्त माल नुकसान होतो म्हणुन व्यापार्यांनी घेऊ नये असे सरकारने स्पष्ट केले आहे तरी त्याची अंमलबजावणी होतांना दिसते का?
सरकारने असा कर राज्य सरकारने लावल्यास त्यास आपली हरकत नाही असे स्पष्ट केले आहे.
४. खाजगी खरेदीदार आणि बाजार संघांवर नोंदणी सक्तीची करा.
सरकारने याचा निर्णय राज्य सरकारवर सोडला आहे.
जो व्यापारी खरेदी करतो तो कायम राहुन व्यापार करत असेल तर त्याची नोंदणी आवश्यकच असावी. व्यापारी सुध्दा त्यास नकार देणार नाही. पण हे व्यापारी संघटीत
झाले तर पुन्हा येरे माझ्या मागल्या. पण द्राक्ष, डाळींब याचे खरेदीदार तत्कालीन असतात. त्यांचा आपसी व्यवहार शेतकरी आणि व्यापारी आपापसात ठरवितात त्यात
शेतकरी फसला तर त्यास कोण जबाबदार?
५. शेतकरी आणि करार करणारी कंपनी याच्यातील करार नोंदणी, त्यावरील मतभेदांसाठी योग्य नियामक यांची मागणी.
यास सरकारने मान्यता दिली आहे.
हे खरोखर योग्य आहे. पेप्सिको आणि गुजराथ मधील शेतकरी यांच्या मधील बटाटा पिकाबद्दल वाद सर्वोच्च न्यायालयात गेला. निकाल शेतकर्यांच्या बाजुने लागला.
६. जमीन गहाण ठेवणे, जप्त करणे हे करारात घेता येणार नाही.
सरकार यास तयार आहे.
दोन पक्ष किंवा व्यक्तींमधील करार हा दोन्ही पक्षांना योग्य वाटल्या शिवाय प्रत्यक्षात येवु शकत नाही. शेतकी कंपन्या यावर नवीन तोडगा काढतील. शेतकरी इतका
सोपा नाही.
७. कराराविरोधात न्यायालयात जाण्याची मुभा द्यावी.
सरकार यावर सकारात्मक आहे.
वरील मुद्द्यांमधील ५, ६, ७ हे मुद्दे सर्वात महत्वाचे आहेत असे मला वाटते, हे सरकारने अगोदरच करावे असे माझे मत आहे. पण त्यावरील १ ते ४ हे मुद्दे सगळे फक्त शेतकरी विरोधी आहेत असे नाही. त्यात आजपर्यंत मागील अनुभव पाहुन थोडी अधिक बाजार मोकळीक आहे असे मला वाटते.
शेती आणि शेतकरी यांचा खरा विकास करायचा असेल तर खरेदीदारांना जे हवे ते तसे देण्यास सुरु केले तरच होईल. सरकारी कुबड्या घेउन आजवर कोणताही व्यापार यशस्वी झाल्याचे उदाहरण नगण्य म्हणावे असे आहे. आपण गावात पाहतो की तोच शेतकरी यशस्वी दिसतो जो सरकारी योजनांचा लाभ घेतो, बँकेचे कर्ज काढतो, वेळेवर कर्ज फेड करतो, त्यासोबत दुध, कुक्कुट पालन, मस्त्यशेती, शेणखत यांपैकी एखादा व्यवसाय करतो. आपल्या परिसरात कोणता भाजीपाला विकला जातो तो पिकवतो. साधा मुद्दा आहे. भारताची लोकसंख्या, शिक्षण, आर्थिक स्थिती यामुळे जगण्याची स्पर्धा कठीण होत आहे. हे फक्त शेतीसाठी आहे असे नाही. साध्या नोकर्या करणारे अनेक लोक प्रचंड कष्ट आणि अवहेलना सहन करीत असतात. आपण संघटीत आहोत म्हणुन कोणत्याही मागण्या केल्या आणि अडवणुक करु असा पवित्रा असेल तर कायमस्वरुपी नुकसान होऊ शकते हे समजले पाहिजे. कृपया मी लेखात कोणत्याही पक्ष किंवा संघटना यांचे नाव घेतले नाही. हे लक्षात घेउन फक्त मुद्द्यांवर चर्चा केली तर बरे होईल.
वाचने
174664
प्रतिक्रिया
559
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रजासत्ताक दिन ते शेतकरी रॅली....
अपेक्षित कांगावा
In reply to प्रजासत्ताक दिन ते शेतकरी रॅली.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आभार.
In reply to अपेक्षित कांगावा by श्रीगुरुजी
सहमत आहे
In reply to अपेक्षित कांगावा by श्रीगुरुजी
आभार.
In reply to सहमत आहे by मुक्त विहारि
सहमत आहे
In reply to आभार. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चित भी मेरी.. पट भी मेरी..
In reply to प्रजासत्ताक दिन ते शेतकरी रॅली.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आभार.
In reply to चित भी मेरी.. पट भी मेरी.. by बाप्पू
हे अपेक्षितच होते ... परंतु
In reply to प्रजासत्ताक दिन ते शेतकरी रॅली.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आभार.
In reply to हे अपेक्षितच होते ... परंतु by सुक्या
सहमत आहे
In reply to हे अपेक्षितच होते ... परंतु by सुक्या
बिरुटे सरांकडून अशा
In reply to प्रजासत्ताक दिन ते शेतकरी रॅली.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहमत !
In reply to बिरुटे सरांकडून अशा by सुबोध खरे
एकूणच ....
In reply to सहमत ! by प्रसाद_१९८२
मी देखील हेच म्हणतो. माझा
In reply to सहमत ! by प्रसाद_१९८२
आभार.
In reply to बिरुटे सरांकडून अशा by सुबोध खरे
आमचा या लोकांशी कोणताही संबंध नाही!
In reply to प्रजासत्ताक दिन ते शेतकरी रॅली.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आभार...!
In reply to आमचा या लोकांशी कोणताही संबंध नाही! by चौकस२१२
प्राध्यापक सर, तुमचे आभार
In reply to आभार...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
;)
In reply to प्राध्यापक सर, तुमचे आभार by बाप्पू
हाहाहा.. तुमचा प्रेझेन्स ऑफ
In reply to ;) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
२०२४ मध्ये श्री मोदी येणार हे
सामान्य माणसाकडे पण दुसरा पर्याय नाही....
In reply to २०२४ मध्ये श्री मोदी येणार हे by सुबोध खरे
काही शेतकरी वर्गा बद्दल माहिती देतो ....
> ज्यांना मनापासून, शेतकरी
In reply to काही शेतकरी वर्गा बद्दल माहिती देतो .... by मुक्त विहारि
दुसरा धागा काढला आहे ...
In reply to > ज्यांना मनापासून, शेतकरी by वामन देशमुख
शीख आणि दलाल आंदोलन आता
अजूनही बेळगाव Border ची घुसमट
In reply to शीख आणि दलाल आंदोलन आता by बाप्पू
बाप्पू
एकच प्रतिसाद ...
In reply to बाप्पू by इरसाल
आंदोलन ला हिंसाचार चा डाग लागला
तुम्ही एक मुळ मुद्दाच लक्षांत घेत नाही आहात ....
In reply to आंदोलन ला हिंसाचार चा डाग लागला by Rajesh188
Apmc ही समस्या आहे
1. APMC बंद होणार नाही ... तर...
In reply to Apmc ही समस्या आहे by Rajesh188
आज खूप दिवसांनी, तुमच्या बरोबर मुद्देसूद संवाद करता आला
In reply to Apmc ही समस्या आहे by Rajesh188
मुवि,
In reply to आज खूप दिवसांनी, तुमच्या बरोबर मुद्देसूद संवाद करता आला by मुक्त विहारि
धान्य सरकार नी साठवून ठेवणे
आत्ताही वेगळे काहीच नाही आहे...
In reply to धान्य सरकार नी साठवून ठेवणे by Rajesh188
मुद्देसूद संवाद करता आला
In reply to धान्य सरकार नी साठवून ठेवणे by Rajesh188
कॉन्ट्रॅक्ट शेती हा वादाचा विषय आहे
कोणे एके काळी ...
In reply to कॉन्ट्रॅक्ट शेती हा वादाचा विषय आहे by Rajesh188
राजेशसाहेब
In reply to कॉन्ट्रॅक्ट शेती हा वादाचा विषय आहे by Rajesh188
सर्वंकष वाचन नसले की,
In reply to राजेशसाहेब by भंकस बाबा
कोटी रुपयांचे शेती उत्पन्न ....
म्हणजे त्या ११३ कोटी वाल्या madam सारखं?
In reply to कोटी रुपयांचे शेती उत्पन्न .... by मुक्त विहारि
काही सांगता येत नाही ...
In reply to म्हणजे त्या ११३ कोटी वाल्या madam सारखं? by मास्टरमाईन्ड
फक्त हिप हिप हुर्ये !
In reply to कोटी रुपयांचे शेती उत्पन्न .... by मुक्त विहारि
हिपीप हुर्रे...! हिपीप हुर्रे...!
आन्दोलकांच्या मागण्या चूक
In reply to हिपीप हुर्रे...! हिपीप हुर्रे...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ओके . .
In reply to हिपीप हुर्रे...! हिपीप हुर्रे...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे