जशा निवडणुका जाहीर झाल्यात तशा सगळ्याच युती आघाडीमध्ये गदारोळ सुरु झालाय. सगळ्यांनाच जास्त जागा हव्यात. अजून नवीन आलेल्या घटक पक्षांना द्यायला राज्यातल्या जागा कमी पडू लागल्यात.
आता यावर तोडगा काही लवकर दिसत नाही आहे आणि जर स्वबळावर लढायचे तर सगळ्यांचीच गोची होणार आहे कारण तेवढी ताकद कोणाचीच नाही. आता चर्चेच्या फेर्या आणि त्याला कंटाळलेले सगळेच (छोटे घटक पक्ष, माध्यमे आणि त्यांच्यामुळे जनता) याला उपाय काय असे विचारू लागलेत.
असाच एक सुचलेला हा उपाय:
जर आपण युतीचा विचार केला तर त्यांच्याकडे २८८ जागा आहेत लढवायला आणि ते १८ जागा देणार आहेत छोट्या घटक पक्षांना. मग आता उरलेल्या २७० जागांच्याबद्दल घोळ चाललाय.
भाजपाला पण अर्ध्या जागा (१३५) आणि शिवसेनेला पण अर्ध्या अर्ध्याहून अधिक जागा(उ.दा. १६०) पाहिजेत. आता यासाठीच जर युती तुटणार असेल तर दोघांना पण खूप नुकसान झेलावे लागेल मग त्यापेक्षा दोघांनी पण आपल्या कमीत कमी अनिश्चित जागांचा आकडा पुढे मांडावा.
उ.दा. इथे भाजपाला १३५ हव्या आहेत म्हणजे उरल्या १३५.
पण शिवसेनेला १६० हव्या आहेत म्हणजे भाजपासाठी उरल्या ११०. म्हणजे भाजपला २५ जागा अशा हव्या आहेत की ज्या शिवसेनेलापण हव्या आहेत आणि या कळीच्या वादाच्या जागा आहेत.
मग यासाठी एवढा दंगा आणि एकमेकांची उणीदुणी काढण्यापेक्षा या जागा आणि त्यांची संख्या ठरवून दोघांनीपण त्यांना 'नो मॅन्स लँड' म्हणून जाहीर कराव्यात, म्हणजे युतीतील हे दोन पक्ष या जागा स्वबळावर लढवतील आणि जो जिंकेल त्याची ती जागा म्हणून आपोआपच शिक्का लागेल. जर दोघेही हरले तर प्रश्नच यायला नको.
उरलेल्या निश्चित जागा जाहीर करून या 'नो मॅन्स लँड' जागांवर चर्चा करून ठरवाव्यात कोणत्या ते.
हाच नियम आघाडीपण ठरवू शकते. म्हणजे मग युती आघाडी पण अबाधित आणि लोकांना स्वबळावर केलेली लढाई बघायला मिळाल्याचे पण समाधान.
बाकी जय महाराष्ट्र..!!
(अवांतर : या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ते राज ठाकरेंचे गाडे कशात अडकले हे काही कळायला मार्ग नाही. उमेदवार सापडत नाहीत की काय कळायला मार्ग नाही.)
वाचने
35495
प्रतिक्रिया
69
मिसळपाव
प्रतिक्रिया
सगळ्यांचा 'नाश' झाला तर तो
In reply to असं करून जागावाटपात Nash by आदूबाळ
गूगलून जेवढे 'Nash
In reply to असं करून जागावाटपात Nash by आदूबाळ
दोघांनीही स्वतंत्रपणे लढावे
श्रीगुरुजी, with all due
In reply to दोघांनीही स्वतंत्रपणे लढावे by श्रीगुरुजी
>>> जर एवढी ताकद होती तर मग
In reply to श्रीगुरुजी, with all due by हाडक्या
शिवसेनेने शहाणपणाने वागून
In reply to >>> जर एवढी ताकद होती तर मग by श्रीगुरुजी
>>> वरती भाऊ तोरसेकर यांचा
In reply to शिवसेनेने शहाणपणाने वागून by हाडक्या
असं असेल तर मग भाजपने तोडावी
In reply to >>> वरती भाऊ तोरसेकर यांचा by श्रीगुरुजी
खामोश...
In reply to >>> जर एवढी ताकद होती तर मग by श्रीगुरुजी
-
कोणाच्या मातोश्रीला ?
In reply to - by अमोल केळकर
बाजारात तुरी आणि भट भट्णीला
अजून एक उपाय आहे. राष्ट्रवादी
हा हा हा..
In reply to अजून एक उपाय आहे. राष्ट्रवादी by खटपट्या
'पोपट मेला आहे, शिवसेना-भाजप
.
In reply to 'पोपट मेला आहे, शिवसेना-भाजप by प्रसाद१९७१
युती संपुष्टात आल्यावर सेनेचा
महाराष्ट्राने ह्याला गाडले,
In reply to युती संपुष्टात आल्यावर सेनेचा by श्रीगुरुजी
+१...असेच म्हणतो.
In reply to महाराष्ट्राने ह्याला गाडले, by हाडक्या