व्यथा
व्यथा
------------------------------------
जरी वाटतो नवाच आहे
ऋतु कालचा तसाच आहे..
प्रतिबिंबासही रोज वाटते
मीही देखील खराच आहे..
रामासाठी सीता होणे
खरा दोष हा तिचाच आहे..
इथे थांबलो घटकाभर मी
प्रवास अजुनि बराच आहे..
किती भरावे सूख तरिहि
अर्धा प्याला रिताच आहे..
मला नकोसा शेवट झाला
किती कथांची व्यथाच आहे..!
- योगेशु
लेखनविषय:
याद्या
2062
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
छान
सुंदर
सहावं ,
वा!
इथे थांबलो
आवडली
फारच
काय आवडलं