स्वातंत्र्यदिन (?) चिरायु होवो ......!
लेखनविषय:
काव्यरस
पंधरा ऑगस्टच्या रात्री जेवल्यानंतर शतपावलीसाठी म्हणुन मी व आमचे गृहमंत्री बाहेर पडलो. खारघरच्या शिल्पचौकात एका फुटपाथच्या कडेला झोपलेला दहा-बारा वर्षाचा एक मुलगा दिसला. स्वातंत्रदिनानिमीत्त कुठल्याशा पक्षानं लावलेला कापडी फलक त्याने खाली अंथरला होता, त्याचाच अर्धा भाग अंगावर घेवुन ते लेकरु गाढ झोपलं होतं. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ६० वर्षे उलटुन गेल्यानंतरदेखील जर आपल्या देशात ५०% च्यावर लोकांची ही अवस्था असेल, तर खरोखर आपल्याला स्वातंत्र मिळालं आहे असं म्हणता येइल का? हे असलं स्वातंत्र्य काय कामाचं?
आईच्यान सांगतु....,
कालच्याला १५ आगस्ट झाला,
मले माझा बापुस म्हनला व्हता,
१५ आगस्टला म्हनं देशाला सवतंत्र्य मिळ्ळं व्हतं !
आईच्यान सांगतु....,
म्या इच्चारलं, बाबा..., सवतंत्र्य म्हंजी रं काय?
बाप म्हनला, त्येची लै मज्जा असतीया पोरा,
खिशावं झेंडा लावाचा आन जय म्हनाचं, मग जेवाया मिळतया !
आईच्यान सांगतु....,
म्या सदर्याच्या खिशावर....,
चांगला रुप्पायाचा, झेंडा लावला...., टाचनीनं,
जण गण मण व्हईपत्तुर.., गळ्याच्यान सांगतु, थुकबी नाय गिळ्ळी !
आईच्यान सांगतु....,
मास्तरबी म्हनलं व्हतं आमास्नी,
झेंडा फडकला की जेवाया मिळंल,
शिळं येफर नी कुरतडलेला पेडा बगिटला...., आन भुकच मेली !
आईच्यान सांगतु....,
गांधीबाबा म्हनलं व्हतं म्हनं तवाच्याला,
आता म्हनं देशात रामराज (?) येनार हाय,
जनमल्यापासुन बगतुया, हितं रामाचा वनवासच सपत न्हाय!
आईच्यान सांगतु....,
पंदरा आगस्टच्या सवतंत्र्याचं न्हाय म्हायीत मस्नी,
पन चौका चौकात बांदल्यालं ब्यानर मातुर कामी आलं
आता थंडीचं दिस येनार..., माजं पांगरुणाचं काम झालं !
विशाल.
वाचने
2849
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
शब्दच नाहीत
उत्तम
In reply to उत्तम by आशिष सुर्वे
+१
आईच्यान सांगतो
छान आहे
मनःपुर्वक
छान कविता.
दाहक वास्तव ..
सुन्न