मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रश्न

शुभान्गी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
म्हणतात ना.... एका गालात मारले तर दुसरा गाल करावा पुढे... मग प्रत्येक जण मारल्याशिवाय जाईल का पुढे ? नेकी कर दरिया मे डाल...... मग एक दिवस स्वत:लाच बुडतान्ना नाही का पहाल? निन्दकाचे घर असावे शेजारी..... जर निन्दकच घुसला घरात,आदरतिथ्य करावे तरी? नेहमी दु:खीतान्चे अश्रू पुसावे........ करावे काय स्वता:च्याच डोळ्यात असतील आसवे? बोट दिले तर हात धरु नये..... पण आधाराचे बोटच नाही दिसले तर काय करावे? चूक भूल द्यावे-घ्यावे.... वाटले मन मिपावर मोकळे करावे. अन्तःकरणातील विचारान्ना करुन दिली वाट... अमूल्य सल्ल्यान्ची पहत आहे वाट.

वाचने 1762 वाचनखूण प्रतिक्रिया 6

विसोबा खेचर Fri, 01/23/2009 - 07:32
चूक भूल द्यावे-घ्यावे.... वाटले मन मिपावर मोकळे करावे. अन्तःकरणातील विचारान्ना करुन दिली वाट... अमूल्य सल्ल्यान्ची पहत आहे वाट. सुंदर कविता. जियो..! तात्या.

अनिल हटेला Fri, 01/23/2009 - 08:08
नेहमी दु:खीतान्चे अश्रू पुसावे........ करावे काय स्वता:च्याच डोळ्यात असतील आसवे? बोट दिले तर हात धरु नये..... पण आधाराचे बोटच नाही दिसले तर काय करावे? आवडले !! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

सँडी Mon, 03/30/2009 - 07:32
खुपच छान! - सँडी नको असलेल्या गोष्टी विसरायला पण त्यांची आठवण ठेवावी लागते.