मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वळण

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे · · जे न देखे रवी...
गुलमोहरांच्या आपल्या त्या कावळ्या चिमण्यांच्या ओट्यावर. काल तु म्हणालीस 'वाट बघ' आता आपलं कसं म्हणून पुस्तकांची पानं उचकत आतल्या आत गोठून गेलो एका पानावर, मोगर्‍याच्या वेलीशी, फांदी सोडून घेतेय आपले हात. दारातून दिसतेय मला, आयुष्याचा हिशेब बोटांच्या कांड्यावर मोजणारी म्हातारी, आणि हळद लावून बसलेली भेदरलेली नवरी. शहरापासून मरणा अगोदर कोण पोहोचतो, म्हणुन. भूके कंगालांचे तांडे सरकताहेत हळू हळू गावांकडे. सगळीच तीर्थस्थाने, महापुरुष आठवून कोणीच येत नाही डोळ्यासमोर, हडबडून, गडबडून, घामाने चिंब होऊन. टीटवीचा आवाजही देह चिरुन जातो. आपलं ठरलंय, विना आणाभाकांचं. तुला मी आणि मला तू जपायचं. तुझा जिव्हाळा, अबोला धपापणारा श्वास, अन एक खोल हुंदका. सखे, आत्ता तू जशी असशील तशी ये. मरणाची भिती दाटून गेलीय. आज.. कुठले हे वळण, दूर..दूर राहण्याचे......!

वाचने 6228 वाचनखूण प्रतिक्रिया 13

प्रचेतस Sun, 03/29/2020 - 11:11
सखे, आत्ता तू जशी असशील तशी ये. मरणाची भिती दाटून गेलीय. आज.. कुठले हे वळण, दूर..दूर राहण्याचे......!
अस्वस्थ करणारी कविता. तुम्ही पुन्हा एकदा ललित लेखन सुरू करावे.

चौथा कोनाडा Sat, 05/23/2020 - 17:01
व्वा, जबरदस्त !
शहरापासून मरणा अगोदर कोण पोहोचतो, म्हणुन. भूके कंगालांचे तांडे
अक्षरशः चित्र डोळ्यांपुढं उभं रहिलं आनि एकदम उदासवाणं वाटून गेलं !