गाव माझं सारं पेटलं
फुलांचं रान होरपळून गेलं
कुणी घातला हा विषारी विळखा
सोडूनी गेला कुठे दूर सखा
पापण्यांकाठी दु:ख ओलं थरथरलं
सुना झाला हा हिरवा मळा
जाळला कुणी माझा सुर्य कोवळा
डोळ्यांत आभाळ निळं गहिवरलं
केला तुझ्यासाठी प्राणाचा आडोसा
उरात भडकलेला वणवा विझवू कसा
देहात साऱ्या आठवणींचं जहर पांगलं
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1108
प्रतिक्रिया
0
मिसळपाव
प्रतिक्रिया