मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

व्यथा

वैभवदातार · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
अचानक आलेल्या चक्रीवादळामुळे खूप पाऊस पडतो आहे. अवकाळी पावसाचा पिकांवर वाईट परिणाम होईन खूप नुकसान होते आहे. बळीराजाच्या मनातील व्यथा मी शब्दबद्ध केली आहे... नको नको रे पावसा घालू अवेळी धिंगाणा नको हिरावून नेऊ माझा मोतियाचा दाणा कष्ट करुनि शनिवारी येते मातीतून पीक थांब थांब रे पावसा माझी हाक तू ऐक छोटी छोटी माझी पिल्ले उभी भुकेली माझ्या दारी पोट भरीन मी त्यांचे दाणे विकून बाजारी वर्ष भर मी राबून सोने शेतात उगले तुझ्या अवेळी येण्याने कोळसे त्याचे झाले तुझ्या अवेळी येण्याला माणूस कारण आहे निसर्ग संपत्तीचा ऱ्हास त्याने केला आहे आता येतील शेतात समाजावण्या मंत्रीगण दाखविती जागा सारे कसा नाही शिल्लक कण कोटी कोटी उड्डाणे होती आता पैशाची दाखविती मंत्री सारे किती काळजी शेताची त्यांचे पैसे आश्वासने हवेत विरून जाती रिकामी माझी झोळी नाही दमडी माझ्या हाती विनवितो मी बळीराजा थांबव वर्षांबाण पुन्हा उठून उभा राही भरून काढण्या नुकसान --शब्दांकित (वैभव दातार ) ५ डिसेंबर २०१७

वाचने 2081 वाचनखूण प्रतिक्रिया 9

कपिलमुनी Tue, 12/05/2017 - 14:10
सध्या द्राक्षाबाग मालकांची अवस्था अशीच आहे . बाकी ही कविता वाचून ||नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी : घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायली || या इंदिरा संतांच्या कवितेची आठवण झाली

In reply to by खेडूत

गबाळ्या Wed, 12/06/2017 - 00:52
अन् ते मीटरचं तेवढं मनावर घ्या राजे..!
केवळ हे वाचल्या वाचल्या मनात आले म्हणून लिहितोय. मूळ कवी आणि कवितेवर कोणत्याही प्रकारची टीका करण्याचा उद्देश नाही. "अन् ते मीटरचं तेवढं मनावर घ्या राजे..!" हेच कोणी कोणी कशा शब्दात सांगितले असते? निळू फुले : "भाई, मीटरवर या!" कवी वा. भा. पाठक : "खबरदार जर चाल सोडुनी ल्ह्याल पुढे 'मुखड्या' वाचीन कधी कधीच थोड्या" आणखी कोणी ?

In reply to by सूड

प्रचेतस Tue, 12/05/2017 - 17:48
त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असावा की शनि म्हणजे दि. २ डिसेंबर रोजी शेतकऱ्यांनी पीक बाहेर काढून ठेवले आणि रविवारी म्हणजे दि. ३ डिसेंबर रोजी ते पीक ओखी चक्रीवादळाच्या कचाट्यात सापडून होत्याचे नव्हते झाले.

In reply to by चांदणे संदीप

नाखु Tue, 12/05/2017 - 22:24
तुझी माझी निव्वळ धूरदृष्टी, यांची (सर्व) दूर.... पिटातल्या प्रेक्षकांना साक्षीदार नाखु