-----
लेखनविषय:
काव्यरस
परकी दुःखं दाराशी येतात तेव्हा
हळूच कुरवाळावी
पाहुण्या आलेल्या मांजराला कुरवाळतो तशी.
त्याची पावलं उमटणार नाहीत,नख्या लागणार नाहीत इतपत सलगी करावी...
जिव्हाळ्याच्या आवाजात गुजगोष्टी कराव्या
त्याच्याच आवाजात बोलण्याचे सुख भोगून घ्यावे..
झेपले तर थोडा दूधभात घालावा
म्हणजे ते अजून लाडीगोडी लावेल...
कोण कुठले गरीब बिचारे
देवा ! आई गं ! अरेरे ! वगैरे..
मनी साठलेले सुस्काऱ्यांचे घट रिकामे करत
जड वाटल्याचे भासवत हलके हलके व्हावे !
परोपकाराची साय दाट झाली की मग मात्र त्या मांजराला विसरून जावे!
जणू ते अस्तित्वातच नव्हते..नाही...नसणार !
एवढे करून चिरेबंदी वाड्यात परतताना
पाहुण्या मांजराकडून कृतज्ञतेची अपेक्षा मात्र नक्कीच करू नये
नाहीतर आपलेही तसे एक मांजर होते म्हणे !
वाचने
4886
वाचनखूण
प्रतिक्रिया
25
हम्म...
कच्च्कन काटा रुतावा तशी
कविता दिनाला लिहिलेली सुंदर
हो ना, पुन्हा पुन्हा वाचतेय,
छान कविता.
छान
लाजवाब!
In reply to लाजवाब! by सत्यजित...
सहज-सोपं करुन लिहिणं म्हणजे
____/\____
काही प्रोफेशन,तटस्थता
कविता दिनाला लिहिलेली सुंदर
हे दुसर॓..........
बर्याच गोष्टी डोळ्यासमोरुन
__/\__ सुन्दर..
परोपकाराची साय दाट झाली की मग
छानच !
छान कविता.
कविता फार आवडली.
सर्व वाचक प्रतिसादकांचे आभार
मस्त !!
निशब्द!!!!!
छान कविता...
कविता आवडली.
काय गजब लिहिल्या गेलं आहे हे!
In reply to काय गजब लिहिल्या गेलं आहे हे! by सत्यजित...
'दुःखानुभूतीचे मर्म' उलगडणारा