हल्ली मेघ धुंदीत येऊ लागले कि..
लेखनविषय:
काव्यरस
हल्ली मेघ धुंदीत येऊ लागले की
स्मृतीतला गाव दिसू लागतो
त्या गाव वेशी उभा मीच मजला
पाहून अनोळखी हसू लागतो
दशकान्तुनी उभ्या तिथल्या विक्राळ वटाच्या
सावलीत जरासा बसू पाहतो
स्मरणे ती जुनी अन बदलांच्या खुणा
उद्विग्न नास्तिकासम तपासू पाहतो.
पोपटी तृणांचा जुन्हा तो जिव्हाळा
बदलाच्या भ्रांती फसू लागतो
लोभस ते जग कधीचे संपले खरा
भावनांचा उन्हाळा पुन्हा दिसू लागतो..
(कविता अपूर्णच आहे. अकरावीत असताना केव्हातरी लिहिली होती. बऱ्याच वेळा पूर्ण करण्याच्या प्रयत्न केला पण हा माझा कवितेचा पहिलाच प्रयत्न होता आणि त्यात तो इतका भव्य वाटणारा पण आशयाने जवळपास शुन्य होता कि ते कधीच जमले नाही. आणि हि कविता माझ्या हिशेबाप्रमाणे कडव्या-कडव्यात ट्युनिंग बदलत जाते त्यामुळे कदाचित या अशा कन्फ्युज्ड व बालिश आशयाला साजेशे स्पष्टीकरण करण्यासाठी माझ्या बुद्धीतले काव्यात्मक शब्द अपुरे पडत जातात. आलोय आता मिपावर असे जुने-नवे प्रयोग दाखवत जाइल! सर्व मंडळींना रामराम! मिपावर आज पहिलाच दिवस.. मिपाकरांची मते जाणून घ्यायला आवडेल)
वाचन
4771
प्रतिक्रिया
0