Skip to main content

अव्यक्त

लेखक रातराणी यांनी मंगळवार, 04/08/2015 या दिवशी प्रकाशित केले.
कितीदा तरी रे आले होते, खूण ओळखीची शोधत होते, नाहीच झाली पण भेट आपली, मी उम्बर्यातच थिजले होते. किती जपून आणले शब्द होते, तुझ्या ओंजळीत ते द्यायचे होते, मौनात वेदना डोळ्यांत विझल्या, शब्द कधीच रे निसटले होते. किती अंतर चालून आले होते, आता कुठे बघ विसावले होते, दिशा साऱ्या का अंधारून आल्या, की गावच तुझे बदलले होते. अस्पष्ट जे मनास स्पर्शुन गेले होते, मूर्त रूप मी त्याला देत होते, कधीच नाही केले व्यक्त तू ज्याला, ते अव्यक्त प्रेम माझे आयुष्य होते.
लेखनविषय:

वाचने 2525
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

In reply to by जडभरत

उंबर्यातच थिजून द्विधा मनस्थितीत हाताने साडीचे टोक अस्वस्थपणे हाताळणारी स्त्री डोळ्यासमोर येते.

दिशा साऱ्या का अंधारून आल्या, की गावच तुझे बदलले होते. या ओळी विशेष भावल्या. सुंदर !

गूढ-रम्य काव्य !