वार्यावर मंद निनादे
ती श्रीकृष्णाची मुरली
त्या अवखळ स्वरलहरींना
अवखळशी कविता स्फुरली...
ल्याइली आज धरणीने
का गर्भरेशमी शाल
किरणांनी आकाशात
उधळला कशास गुलाल
पसरला रोमरोमी का
अवखळसा एक शहारा
का कसा कुणास्तव आज
हा निसर्ग नटला सारा
पसरली सुखाची चर्या
अन् उडून गेली खंत
अवतरे आज धरणीवर
तो ऋतुराज वसंत
अदिती जोशी
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1790
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
अगदी शब्दाशब्दातनं आनंद
क्या बात...! क्या बात...!
सुरेख. खूप आवडली कविता.
कविता आवडली ... छान .
सुप्पर
व्वाह
दर्जा !
मस्त