मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कृष्ण

आनंदमयी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
रूप सावळे आतीव सुंदर भक्तिरसाचा मनात पाझर उठे शहारा अंगांगावर अंतरात वसतो मुरलीधर निळा गंध त्या निळसर देही मोहक इतुका तो निर्मोही वरवर सारे चंचल श्यामल आत गूढ अविचलसे काही चराचरांतून घुमे बासरी सप्तसूर सावळा मुरारी वाहे यमुना अमृत होवुन उठती आतुन अथांग लहरी प्राण नांदतो ह्या तीरावर त्या तीरावर मन झेपावे कृष्ण मूर्त सर्वस्व पुरे हे कृष्णातच समरसून जावे © डॉ.अदिती जोशी

वाचने 3139 वाचनखूण प्रतिक्रिया 20

आयुर्हित Sat, 06/07/2014 - 10:43
वाचतांना एक वेगळीच अनुभुती मिळाली. कवयित्रीचे मन कसे विचार करत आहे, ते ही अगदी स्पष्ट दिसुन येते. "वरवर सारे चंचल श्यामल आत गूढ अविचलसे काही" काहीशी द्विधा मनस्थिती आहे असेही वाटते. यामूळे कवितेत दोन प्रवाह/लेयर्स दिसतात. "प्राण नांदतो ह्या तीरावर त्या तीरावर मन झेपावे" या वाक्यावरून वरवर शांत वाटणारे मन आतून अशांत आहे हेच खरे! मनातले विचार हवे तसे कवितेत उतरवणे ही पण एक कलाच आहे. कवयित्री त्यात १००% उत्तीर्ण झाली आहे. एकंदरीत फारच छान कविता आहे!

त्याच्याकडे पाहण्याचा वेगळा नज़रिया म्हणजे कृष्ण. त्यामुळे भक्तीरसाशी या ओळी विसंगत आहेत :
प्राण नांदतो ह्या तीरावर त्या तीरावर मन झेपावे कृष्ण मूर्त सर्वस्व पुरे हे कृष्णातच समरसून जावे
जर संपूर्ण अस्तित्व कृष्णमय आहे तर त्याला दोन तीर कसे असतील? अस्तित्वाशी एकरुप (कृष्णमय) व्ह्यायचं असेल तर मनातली ही विसंगती दूर व्ह्यायला हवी.

In reply to by संजय क्षीरसागर

आत्मशून्य Sat, 06/07/2014 - 19:36
जर संपूर्ण अस्तित्व कृष्णमय आहे तर त्याला दोन तीर कसे असतील ?
कृष्णमयता ही स्थिती आहे व दोन तीर ही प्रोसेस... होप यु गॉट इट इन अ वे यु युज टु फ्रेज द वर्ड्स.