Skip to main content

माझी मिठि अद्याप खुली आहे..........

लेखक पंडित मयुरेश नागेश्वरम देशपांडे यांनी रविवार, 05/01/2014 या दिवशी प्रकाशित केले.
कानी पडला आवाज पैंजणांचा झपकन नजर मागे गेली मनास झाला भास पावलांचा मला तर वाटले तुच आली असे कित्येकदा होत असते तुच सगळीकडे दिसत असते वार्याची एखादी झुळुकही तुझ्या येण्याची चाहुल भासते तु दूर जातेस जेव्हा परतीची मी वाट बघतो ज्या वाटेने गेलीस तु त्याच वाटेवर उभा राहतो तुझे निघुन जाणे नेहमीचेच माझेही वाट पाहणे नेहमीचेच जरी प्रेम आपल्यात टिकुन आहे आपले भांडण होणे नेहमीचेच तु परत येण्याची खात्री आहे तरी अजुन रात्र भित्री आहे लवकर परत येशील का तु? माझी मिठि अद्याप खुली आहे.......... - कवि म.ना.दे.
लेखनविषय:

वाचने 9036
प्रतिक्रिया 41

प्रतिक्रिया

In reply to by वेल्लाभट

व्याकरणाविषयी काही चुका वाटत असतील तर त्या तपशिलान लिहाव्यात....

In reply to by पंडित मयुरेश न…

हलकेच जाहिरातीची मिठी खोल्लीये! क्या आयडिया है सरजी!!

In reply to by वेल्लाभट

व्याकरणाविषयी काही चुका वाटत असतील तर त्या तपशिलान लिहाव्यात....

In reply to by पंडित मयुरेश न…

कानी पडला आवाज पैंजणांचा झपकन नजर मागे गेली मनास झाला भास पावलांचा मला तर वाटले तूच आली असे कित्येकदा होत असते तूच सगळीकडे दिसत असते वार्याची एखादी झुळूकही तुझ्या येण्याची चाहूल भासते तू दूर जातेस जेव्हा परतीची मी वाट बघतो ज्या वाटेने गेलीस तू त्याच वाटेवर उभा राहतो तुझे निघून जाणे नेहमीचेच माझेही वाट पाहणे नेहमीचेच जरी प्रेम आपल्यात टिकुन आहे आपले भांडण होणे नेहमीचेच तू परत येण्याची खात्री आहे तरी अजून रात्र भित्री आहे लवकर परत येशील का तू? माझी मिठी अद्याप खुली आहे..........

In reply to by सूड

मला तर वाटले तूच आली
आली ?? मुंबईच्या मुली म्हणतात तसे का? मी आली, मी गेली.. आमच्या कोल्लापुरात 'आलीस' म्हणतात.. बाकी यमकासाठी कायपन चालतय म्हणा.. ;)

In reply to by कवितानागेश

:)) काका :)) >>> ब्बॉर्र... आणी माऊ, कुणीतरी म्हटलंय... मुंबईला जर कुणी एक भिकार म्हणालं तर आपण सात भिकार असं म्हणून मोकळं व्हावं.. (जाज्वल्य अभिमानी)

In reply to by यसवायजी

>>मुंबईच्या मुली म्हणतात तसे का? मी आली, मी गेली.. आमच्या कोल्लापुरात 'आलीस' म्हणतात.. आमच्याकडं पन त्येच म्हनत्यात, पर त्येचं कसंय ह्ये कवी लोकं त्येंचं त्ये येमक का काय जुळवाया सूट घेत्यात. शेवटी तुमी म्हनलंच हा न्हवं 'बाकी यमकासाठी कायपन चालतय म्हणा..' म्हमयच्या पोरींचं म्हराटी काय ईचारता. त्येस्नी लाज वाटती म्हराटी बोलाया. ;) स्वगतः काडी टाकली, आता पळावं.

In reply to by वडापाव

ते निरंकुशा: कवयः असे आहे, निरंकुशः हे एकवचन झाले. कवी हे निरंकुश असतील पण तसे सांगणार्‍या वाक्याला मात्र व्याकरणाचा अंकुश आहे ;)

In reply to by बॅटमॅन

चुकलो चुकलो चुकलो चुकलो :)
कवी हे निरंकुश असतील पण तसे सांगणार्‍या वाक्याला मात्र व्याकरणाचा अंकुश आहे
आवडलं. पटलं.

आँ !!!

तु परत येण्याची खात्री आहे तरी अजुन रात्र भित्री आहे लवकर परत येशील का तु? माझी मिठि अद्याप खुली आहे........
....अपरात्री घडल्यासारखा वाटतो.

In reply to by संजय क्षीरसागर

अस काही नाही कि रात्रीचीच कविता आहे.....हे शेवटच कडव आहे ज्यात तो ती गेल्यावर रात्रहि कशी भासते ते सांगतोय

In reply to by पंडित मयुरेश न…

मिठी मारल्यावर ती गेली का कविनं उगीच आपली मिठी खुली सोडलीये? (ती आली तर बोलण्यात वेळ जायला नको म्हणून)

मग ती बंद कधी करताय ?

In reply to by इरसाल

यांच्या मिठ्यांची वर्णन वाचता वाचता आमच्या मुठी वळू लागल्या.

छान. अजून लिहा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धन्यवाद तुम्ही कवितेला छान म्हणलात म्हणुन नाही तर निदान एकानी तरी कवितेला साजीशी प्रतिक्रिया दिली.... ऊगाच पानचट प्रतिक्रिया वाचुन थोडा हिरमुसलो होतो..........या संकेतस्थळावर नविन असल्यामुळे या प्रकाराची सवय नाही अजुन........ पण तुमच्या प्रतिक्रियेने धीर दिला......

In reply to by सुहास..

बिरूटेसरांसाठी अजून लिहा. आपल्या सर्वांसाठी म्हणायचं ना राव. :( कानी पडला आवाज पैंजणांचा झपकन नजर मागे गेली मनास झाला भास पावलांचा मला तर वाटले तुच आली यातले पैंजण साले आता दिसतच नाही. कुठे आवाज नै कै नै. बंजारा स्त्रीया छम छम आवाज येणा-या पैजणं घालायच्या आता तेही दिसत नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by दिपक.कुवेत

एखादा जेव्हा चांगली प्रतीक्रिया देतो तेव्हा त्य्चे स्वगत करयची मनसिकत ठेवा... तुमच्यासारख्यांमुळेच लोक अशा चांगल्या संकेत स्थळांवर येणे बंद करतात........

In reply to by पंडित मयुरेश न…

पुढल्या वेळेपासून 'माझ्या लिखाणाला चांगलंच म्हणा' अशी सूचना लिहीत चला तुमच्या लिखाणात. एकाला आवडली म्हणून दुसर्‍यालाही आवडलीच पाह्यजे असा नियम आहे का?

In reply to by सूड

चुका काढण्याविषयी किंवा टीका करण्याविषयी माझी काहीच हरकत नाही........ पण टीका कवितेला समर्पक असाव्यात एवढी साधी अपेक्षा आहे....... माझ्या कवितेला चांगलच म्हणा अशी अपेक्षा नाही पण किमान टीका करताना त्या टीकेचाही अभिमान वाटुद्या....... साहीत्यात लेखका इतकच समिक्षकालाही मान आहे......

In reply to by पंडित मयुरेश न…

कविता बरी असावी. वाचेन नंतर. अवांतरः तुमचं नाव पंडित आहे का? तुम्हाला ज्योतिष विषयक सल्ला कसा विचारु? इथेच की फोन वर? फी किती? वास्तुशास्त्रानुसार संडास कुठल्या दिशेस असावा? भाग्यांक सांगण्यासाठी तुम्हाला काय माहिती द्यावी लागते? Gemology म्हणजे काय? भारतातला भ्रमण ध्वनी क्रमांक आहे का? धन्यवाद!

In reply to by प्यारे१

>>वास्तुशास्त्रानुसार संडास कुठल्या दिशेस असावा? कुठल्या का दिशेस असेना पटकन अ‍ॅक्सेसेबल असावा.

In reply to by प्यारे१

कवितेवर प्रतिक्रिया देताय ना? मग कवितेविषयीच बोला ना.....अवांतर विषयांसठी दुसरे खादे सदर बघा..

सुड आणी प्यारे१... तुमच्यासारख्यांमुळेच लोक अशा चांगल्या संकेत स्थळांवर येणे बंद करतात. समजलं !

In reply to by इरसाल

अहो आम्ही ज्योतिष विषयक सल्ला विचारला होता फक्त. बाकी संडास कुठे असावा हा प्रश्न असतोच की. सूड ने तातडीच्या वेळची गरज सांगितली इतकंच. ह्या मुळं लोक बंद होत असतील तर आमचा 'ना विलाज'!

आला तुमचा डाव माझ्या लक्षात.... मग कवितेविषयीच बोला ना.....अवांतर विषयांसठी दुसरे एखादे सदर बघा.