Skip to main content

अशाच एका सांज वेळी

लेखक पंडित मयुरेश नागेश्वरम देशपांडे यांनी मंगळवार, 24/12/2013 या दिवशी प्रकाशित केले.
अशाच एका सांजवेळी भेट व्हावी आपुली अवेळी एकांत असावा तेव्हा तेथे नसावे कोणी अवतीभवती परतणार्या पक्षांचीही दाटी नसावी अवतीभवती काळोखातही लख्ख दिसावा चेहरा तुझा चन्द्रकोरीसारखा पापण्यांची उघड-झाप असावी जणु चमचमणार्या तारका गार वार्याची झुळुक येईल उब घ्यावीशी तुला वाटेल हातांचा ऊबदार स्पर्श अन् उश्वासांची साथ भेटेल मुकी जरी तु उभी असलीस पैंजण सारे बोलुन जातात चांदण्यात फिरावयास मग पाऊले अलगद चालु लागतात जरी शांतता असली चहुकडे गाणे मनी गुणगुणत असते तालावरती पावलांच्या सतार मनी छेडत असते निरोपाचा क्षण येतो जेव्हा वाट सापडु नये असे वाटते मी हसण्याचा प्रयत्न करतो पाणी तुझ्या डोळ्यात दाटते --- कवि म.ना.दे.
लेखनविषय:

वाचने 1532
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

आपण जन्माला घातलेल्या मुलाला जेव्हा कोणी चांगल म्हणत तेव्हा खुप बर वाटत. कवितेचही अगदी तसच आहे.