अशाच एका सांजवेळी
भेट व्हावी आपुली अवेळी
एकांत असावा तेव्हा तेथे
नसावे कोणी अवतीभवती
परतणार्या पक्षांचीही
दाटी नसावी अवतीभवती
काळोखातही लख्ख दिसावा
चेहरा तुझा चन्द्रकोरीसारखा
पापण्यांची उघड-झाप असावी
जणु चमचमणार्या तारका
गार वार्याची झुळुक येईल
उब घ्यावीशी तुला वाटेल
हातांचा ऊबदार स्पर्श अन्
उश्वासांची साथ भेटेल
मुकी जरी तु उभी असलीस
पैंजण सारे बोलुन जातात
चांदण्यात फिरावयास मग
पाऊले अलगद चालु लागतात
जरी शांतता असली चहुकडे
गाणे मनी गुणगुणत असते
तालावरती पावलांच्या
सतार मनी छेडत असते
निरोपाचा क्षण येतो जेव्हा
वाट सापडु नये असे वाटते
मी हसण्याचा प्रयत्न करतो
पाणी तुझ्या डोळ्यात दाटते
--- कवि म.ना.दे.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1532
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान कविता .
धन्यवाद...
मस्त कविता आवडली