मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दुष्काळी शेतकऱ्याचे मनोगत ...

अमितसांगली · · जे न देखे रवी...
भिखेची तिजोरी, पैशाचा तुटवडा जीव घे रे देवा माझा, जीव घे रे माझा....... निसर्गाची साथ नाही, नशिबाचा हात नाही, दुष्काळाची अवकृपा पाठ काही सोडत नाही, थकलेल्या हातांनी या, करू कसा सामना, जीव घे रे देवा माझा, जीव घे रे माझा....... उसालाही दर नाही, कापसालाही भाव नाही, दोन वेळच्या अन्नाची पण, सोय काही होत नाही, हरलेल्या जीवाचा या, प्राण काही जाईना, जीव घे रे देवा माझा, जीव घे रे माझा....... प्याकेजच्या नावाखाली केला विकासाचा भास, मतांचे राजकारणच फक्त, यांच्यासाठी खास जीवघेण्या या राज्यात, कोंडतोय माझा श्वास, नाही राहिली आता मला, कशाचीच आस, दारिद्र्याचे चटके आता, काही केल्या सोसेना, जीव घे रे देवा माझा, जीव घे रे माझा.......

वाचने 90489 वाचनखूण प्रतिक्रिया 9

In reply to by प्रचेतस

अमितसांगली 21/05/2012 - 08:54
तुम्ही या कवितेचे पण विडंबन कराल असे गृहीत धरूनच हि कविता पोस्ट केली होती...किंबहुना मी स्वताच कशा प्रकारे याचे विडंबन होईल याचाही विचार केला होता...माझ्यासाठी अनपेक्षित पण सुखद प्रतिसाद....... खूप खूप धन्यवाद सर ....

In reply to by प्रचेतस

@अरे मी सरसकट विडंबनं करत नाही रे. >>> तरी लोक मग अठवण का काढतात बरं? :-D @विडंबनाची फॅक्टरी आत्माजींकडे असते. >>> घ्या...! धंदा डुबला,तर भागिदार कसे अंग झटकतात. दु...दु... अ. ;-) आप कितना भी मू फेर लो,मगर लोग तो याद रखेंगे ही... :-)

अमृत 21/05/2012 - 09:31
विदर्भात लहानाचा मोठा झाल्याने हे सगळं आजू बाजूला घडताना पाहिलं आहे :-( केवळ ५-१०हजाराच्या कर्जापायी आत्महत्या केल्याची तर कित्येक उदाहरणं आहेत... अशा संवेदनशील विषयाचे मिपावर नक्कीच विडंबन होणार नाही याची खात्री बाळगू शकतोस... अमृत

In reply to by अमृत

अमितसांगली 21/05/2012 - 09:39
वडिलांच्या नोकरीच्या निमित्ताने मी दुष्काळी भाग ८ वर्षे जवळून अनुभवला आहे...पाण्याची, विजेची टंचाई, महागाई आणि पैशाची कमतरता....अतिशय बिकट परिस्थिती....