प्रेमबन
कळीचे उमलणे, बहरणे
तीच्या हाती नव्हते
प्रेमबनातील तीचे आस्तित्वच तीच्या हाती नव्हते.
भ्रमराने यावे, प्रेम बरसुन जावे,
तीला उमलावे, तीने झंकारुन जावे
भ्रमराचे हे येणे , तीला उमलवणे
तीच्या हाती नव्हते,
प्रेमबनातील तीचे आस्तित्वच तीच्या हाती नव्हते.
भ्रमराने मग तीला सोडुन जावे
तीला दु:खात बुडवुन टाकावे
भ्रमराचे हे सोडुन जाणे, तीला कोमेजवणे
तीच्या हाती नव्हते.
प्रेमबनातील तीचे आस्तित्वच तीच्या हाती नव्हते.
पुन्हा नविन भ्रमराचे येणे, पुन्हा प्रेमात डुंबणे
पुन्हा खंगणे आणि पुन्हा कोमेजणे
सारे कसे क्रमाने, नियमाने घडत होते
जरी ते घडणे तीच्या हाती नव्हते
प्रेमबनातील तीचे आस्तित्वच तीच्या हाती नव्हते.
भ्रमराने एका फुलावरुन दुसर्या फुलावर जाणे
हा देखिल प्रेमबनाचाच नियम होता,
येणारा भ्रमर जाणार आहे
हे माहीत असुनही आकंठ त्याच्या प्रेमात स्वतःला झोकुन देणे
हेही तीच्या हाती नव्हते.
प्रेमबनातील तीचे आस्तित्वच तीच्या हाती नव्हते.
कधीतरी ह्या प्रेमबनानी नियम सोडुन वागावे
कधीतरी प्रेमबनात एकातरी भ्रमराने
फक्त तीच्याच जवळ रहावे आणि प्रेमरसात डुंबुन दोघांनी एकत्र प्राण सोडावे
असे कळीला वाटे
पण तसे होणेही तीच्या हाती नव्हते
प्रेमबनाचे हे नियम असे आखणे, बदलणे तीच्या हाती नव्हते.
प्रेमबनातील तीचे आस्तित्वच तीच्या हाती नव्हते.
मग कधीतरी एक पांथस्थ आला,
त्याने त्या फुलाला तोडले आणि देवाला अर्पण केले
प्राण सोडता सोडता फुलाला उमगले
कळीला पुन्हा पुन्हा बहरविणारा, फुलविणारा भ्रमर कुणीही असु देत,
पण त्या प्रेमभावना मात्र प्रत्येकवेळी सारख्याच होत्या
चिरंतन होत्या आणि तिच्याच होत्या
आता त्याचे निर्माल्य झाले होते
पण असे निर्माल्य होणे
हेही तीच्या हाथी थोडेच होते
प्रेमबनातील तीचा अंत देखिल तीच्या हाती नव्हता.
वाचने
2226
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
सुंदर आहे
धन्यवाद
धन्यवाद
धन्यवाद
धन्यवाद
या जीवन बगिचाचा कोणी पाहिला माळी
शशिकांतजी,
अतिशय
सुंदर
सुरेख
वा!
खुपच छान