काही कविता.
असा नको अवेळी
वारा पदराचा.
झाकले इंगळ
राखेखाली .
मन माझे.
+++++
माझी फितूर पानं
गुलाम तुमची झाली .
हुकुम आमचा झाला
बाजी तुमची झाली.
अवघड खेळ आहे बुवा.
++++++=
आळंबीचं पांढरं रान माजलं आहे
तिथे माझं प्रेम तुझी वाट बघत उभं होतं .
आता, शोधाशोध निरर्थक आहे.
उपेक्षेच्या उंबर्यावर मनाचा चुडा फोडून
मी जगण्याचे गाव सोडले आहे.
+++
ते म्हणाले,
हा वेडा आणि ती वेडी
पण..
मी खोल खोल डोहात
तू काठावर कोरडी.
++++
नव्या वर्षाची सुरुवात करू या.
| लेखनविषय: |
|---|
याद्या
3516
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त
मस्त !
कवितेत
मस्तच
छान
काही कळल
दुर्बोध
कोण म्हणतं
क्लास!
In reply to कोण म्हणतं by विजुभाऊ
आरारारारा ईजुभौ महाराज (सातारकर)
In reply to कोण म्हणतं by विजुभाऊ
अतिशय
In reply to कोण म्हणतं by विजुभाऊ