अजुनही तूच आहे की ती?
अवांतर: कवितांमधील + या चिन्हांची संख्या, =चा वापर तसेच काही ठिकाणी एक जागा सोडून टिंब यांचा काही विशेष अर्थ असावा का याचा विचार करतोय.
कोण म्हणतं कविता दुर्बोध आहेत.
प्रत्येक ओळ न ओळ बोलकी आहे
असा नको अवेळी
वारा पदराचा.
झाकले इंगळ
राखेखाली .
मन माझे.
भावना जेंव्हा प्रदीप्त होतात तेंव्हा मनाला प्रत्येक बाह्यगोष्ट ही कॅटॅलिस्टच वाटत असते.. ( कॅटॅलिस्ट हा रासायनीक प्रक्रीयेत सहभागी न होता त्या प्रक्रीयेचा वेग/संहतता नियंत्रीत करत असतो)
माझी फितूर पानं
गुलाम तुमची झाली .
हुकुम आमचा झाला
बाजी तुमची झाली.
अवघड खेळ आहे बुवा.
रमी खेळताखेळता भीकारसावकार खेळायला गेले की असेच होते.
आळंबीचं पांढरं रान माजलं आहे
तिथे माझं प्रेम तुझी वाट बघत उभं होतं .
आता, शोधाशोध निरर्थक आहे.
उपेक्षेच्या उंबर्यावर मनाचा चुडा फोडून
मी जगण्याचे गाव सोडले आहे.
हम्म्......एक दीर्घ श्वास घेऊन......
अळंबीसारखी मृतोपजीवी वनस्पती मराठीत भाषेच्या इतिहासात प्रथमच वापरली गेली असावी. कवीच्या अव्यक्त मनात खोल दडून बसलेल्या कोकणच्या मातीतील व्यवसायाच्या नव्या वाटा हा ग्रंथ अधून मधून वर उडी मारत असतो. आणि व्यक्त होत असतो.
कवीने ब्यांके कडून आळंबी उत्पादनासाठी नाबार्ड / खादीग्रामोद्योग मंडळ आणि ब्यांकेकडून जे कर्ज घेतले होते ते सगळे संपून गेले.
अळंबी उगवली पण विकली मात्र गेली नाही. घरी नुसतीच आळंबी खाऊन राहिल्यामुळे अजीर्ण झाले.
गावात फिरताना पोरेटोरे सुद्धा" ए अळंबीवाला" असे चिडवायला लागली.
प्रेयसीला डोक्यात माळायला मोगयाची फुले देताना सुद्धा मोगर्याऐवजी बटण आळंबी दिली गुलाबाऐवजीधिंगरी अळंबी दिली.
व्हायचा तोच परिणाम झाला. हात झिडकारताना इतक्या जोरात झटकले की तिच्या हातली बांगडी फुटली.
गावात रहावेसे फार वाटत होते पण नवे कर्ज कोणीच द्यायला तयार नव्हते, सासरे आणि मेहुणे सुद्धा टाळू लागले शिवाय देणेकर्यानी तगादे लावल्यामुळे गाव सोडावेच लागले.
ते म्हणाले,
हा वेडा आणि ती वेडी
पण..
मी खोल खोल डोहात
तू काठावर कोरडी.
पाऊस जास्त पडला तर ओला दुष्काल पडतो/कमी पडला तर कोरडा दुष्काळ पडतो.
पाऊस पडायचा तसा पडतो. भाजी घेणारा मात्र वेडा ठरतो.
मस्त
मस्त !
कवितेत
मस्तच
छान
काही कळल
दुर्बोध
कोण म्हणतं
क्लास!
आरारारारा ईजुभौ महाराज (सातारकर)
अतिशय