Skip to main content

सखा श्रावण

लेखक चंद्रप्रभा यांनी रविवार, 16/09/2007 15:32 या दिवशी प्रकाशित केले.
सखा श्रावण नागपंचमीचा झुला हात टेकवी आभाळा इंद्रधनुच्या फुलाने स्वर्ग पृथ्वीवर आला हिरवा शालू सजविते फुलपाखरांची नक्षी पंख भिजले झाडीती तरुवेलीवर पक्षी खेळ पाठशिवणीचा चाले आकाशी ढगांचा खेळ पृथ्वीवर रंगे तेंव्हा उन-सावलीचा आला आला ऋतुराज असा श्रावण हा आला हिरव्या गालिच्याच्या घाली धरा पायघड्या त्याला गेली मरगळ सारी दाटे हर्ष नि उल्हासं गर्भातल्या दाण्याची ग लागे धरणीला आसं नमःशिवायचा नाद आसमंतात दाटला फेर धरा गं सयांनो सखा श्रावण हा आला -चंद्रप्रभा (येथेच नाही तर, एकुण जालावरच माझ्या मुलाच्या मदतीने पहिलेच लेखन आहे.)

विकास आराखडा

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी रविवार, 16/09/2007 14:42 या दिवशी प्रकाशित केले.
विकास आराखडा की आखाडा
कुठलाही आराखडा म्हटला की त्याला नियोजन लागते. नियोजनासाठी काहीतरी प्रयोजन लागते. पुण्याचा विकास आराखडा १९८७ पासून कागदावर आहे. लोकशाही मूल्यांच्या चौकटीत राहून शहराचा विकास करायाचा हे खूप कठीण काम आहे. खरं तर तो कठीण वसा आहे. बरं विकास तरी कशाला म्हणायचं? विकासाच्या प्रत्येकाच्या संकल्पना वेगळया आहेत. समजा संकल्पनाविषयी एकमत झाले तरी प्राधान्यक्रम वेगळे आहेत. शहरासमोर आज अनेक प्रश्न आहेत.

मराठी आंतरजालीय साहित्यिक!

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 16/09/2007 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, मूळ लेखाआधीच एक अवांतर मुद्दा - (ही वाटल्यास प्रस्तावना समजा परंतु या मुद्द्यावरदेखील अवश्य विचार व्हावा, चर्चा व्हावी अशी इच्छा आहे!) मंडळी, इतर संकेतस्थळांच्या बाबतीत मला असा अनुभव आहे की आंतरजालावर चांगल्यापैकी लेखन करणार्‍या मंडळींबदल काही लिहू लागलो की ते वैयक्तिक लेखन समजलं जातं. का? तर संबंधित लेखक त्या संकेतस्थळाचा सभासद आहे म्हणून! संकेतस्थळाचा सभासद जर चांगली साहित्यनिर्मिती करत असेल तर प्रत्येकवेळेला तो एक सभासद आहे म्हणून त्याच्या सहित्याबद्दल स्वतंत्रपणे लिहिण्या-बोलण्याला बंदी का असावी बरं?

पुजा अर्चा

लेखक कौटील्य यांनी शनिवार, 15/09/2007 16:51 या दिवशी प्रकाशित केले.
भाद्रपद शु ४ शके १९२९ श्री गणेश चतुर्थी दि. १५ सप्टेंबर २००७ हिंदुंमध्ये प्रचलित असलेल्या देवदेवतांच्या पुजनाच्या विविध पध्दती व विचारधारांची एकत्रित माहिती संकलित करुन ती माहिती सर्वांना विनामुल्य विनाबंधन विनासायास उपलब्ध करण्यासाठी संकेतस्थळाचा शुभारंभ आम्ही केला आहे. आपण http://www.pujaarcha.com इथे भेट देवु शकता. अजुन बरेच साहित्य अपलोड करावयाचे आहे, काम चालु आहे.

गणपती बाप्पा मोरया!

लेखक विसोबा खेचर यांनी शनिवार, 15/09/2007 13:07 या दिवशी प्रकाशित केले.
गणपती बाप्पा! १४ विद्या, ६४ कलांचा अभिषिक्त राजा! सर्वांना गणेशोत्स्वच्या अनेकोत्तम शुभेच्छा! हा आम्हा गरीब, कोकणातून पोटापाण्याकरता मुंबईला आलेल्या चाकरमानी मुंबईकरांचा "लालबागचा राजा!" मुंबईकरांचं आराध्य दैवत! लालबागच्या राजाचा विजय असो.. आपला, (लालबागच्या राजाचा भक्त!) तात्या.

ऎसा खत में लिखो

लेखक पंकज यांनी शनिवार, 15/09/2007 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
हि कविता मराठी आहे की नाहि याबद्दल वाद असेल, पण मराठी मातीतली मात्र आहे.
Taxonomy upgrade extras

विनम्र आवाहन..

लेखक मिसळपाव पंचायत समिती यांनी शनिवार, 15/09/2007 08:07 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, येथील सभासदत्व घेतल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार. आम्ही आपणा सर्वांचे मिसळपाव या आपल्या संकेतस्थळावर हार्दिक स्वागत करत आहोत. या संकेतस्थ़ळाच्या मांडणीबद्दल, येथील सोयींबद्दल, त्रुटींबदल आपण इथे अवश्य लिहावे ही विनंती! हे संकेतस्थळ नव्यानेच स्थापन झालेले असून इथे काही तांत्रिक त्रुटी शिल्लक राहिल्या आहेत याची आम्हाला जाणीव आहे. तरी कृपया त्या त्रुटी आपण या काथ्याकुटात दाखवून द्याव्यात व शक्य असल्यास काही उपायही सुचवावेत ही नम्र विनंती.

अभिनंदन!

लेखक जगन्नाथ यांनी शनिवार, 15/09/2007 07:34 या दिवशी प्रकाशित केले.
हे काथ्याकूट सदरात टाकायचं की नाही माहीत नाही ... पण "तात्या" ह्या माणसाचं मनापासून अभिनंदन. अाणि धन्यवाद ... अाणि गणपतीबाप्पा मोरया ... अाणि अाणखीन बरंच काहीतरी ... अापला, "कोण बरे?"

घाटातली पायवाट

लेखक धनंजय यांनी शनिवार, 15/09/2007 01:14 या दिवशी प्रकाशित केले.
*** घाटामध्ये रुळालागी नागमोडी पायवाट चालतसे खेडवळ बाई एक झटाझट - ताई एक कळवळे खिडकीशी बसलेली "आम्हांसंगे ये गे, उगी दमछाक चाललेली" - बाई म्हणे, "ताये, तुझी संग मला थोडी असे. दरीमध्ये शेत माझे घाटमाथ्या घर असे" - "तिथे कोणी वाट पाहे ऊर येई भरुनिया - मुंबईला तुझ्या घरी तू जा बाई बसुनिया" ***

शाहीर ते शाहीर !

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी शनिवार, 15/09/2007 00:28 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी शाहिरी-मराठी कवितेची पहाट मानली गेली.कारण या शाहिरीने अनेक बंधने झुगारुन दिली.मराठी साहित्यात 'शाहिरी वाड;मयाला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे.संत कवी आणि पंत कवी यांनी मराठी साहित्याला जे योगदान दिले,तितकेच योगदान शाहिरांचे आहे हेही विसरु नये.वास्तवातील घटनांना,जीवनातील प्रसंगांना मनोरंजनाच्या माध्यमातून तात्कालीन जीवनाचा आलेख शाहिरांनी आपल्या कवनातून मांडला.देव,धर्माच्या नादात माणूस स्वतःकडे पाहण्यापेक्षा अध्यात्मात गुरफटुन गेला होता. अशा वेळी शाहिरांनी इश्वराकडून माणसाकडे पाहण्याची दृष्टी दिली.