ती संध्याकाळ
तु बोललीस ते मी ऐकले नाही
मी बोललो काही ते तू ही ऐकले नाही
जरूर नव्हतीच तेंव्हा त्याची
शब्द मुके झाले होते
हातात हात तुझा घेता
स्पर्ष भाषा उमगले होते
ती संध्याकाळ थोडी आगळीच होती
प्रकाश रंगांची सुगंधी उधळण वेगळीच होती
असतो मी एकटाच जेंव्हा
ते सारे गूज आठवते तेंव्हा
तो सोन प्रकाश धावून येतो
रंगांची ती पखरण
पुन्हा सवे घेऊन येतो
मी मोहोरतो , बावरतो
तू नाहीस म्हणून कावरा बावरा ही होतो.
मग काय अचानक जादू होते;
मला तुझ्या स्पर्षाची जाणीव होते
मी माझीच बोटे चुंबतो
डोळे मिटुनी तुला अनुभवतो
मिसळपाव