Skip to main content

श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत: कर्म चक्र सिद्धांतानुसार पंच महा पतीव्रतांचे धर्म सूक्ष्म विवरण. डॉक्टर संजय होनकलसे : drsanjayhonkalse@gmail.com

लेखक dr sanjay honkalse यांनी सोमवार, 30/08/2010 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत: कर्म चक्र सिद्धांतानुसार पंच महा पतीव्रतांचे धर्म सूक्ष्म विवरण. डॉक्टर संजय होनकलसे : drsanjayhonkalse@gmail.com http://drsanjayhonkalse.tripod.com श्रीपाद चरित्र अनेक अर्थाने अद्भूत आहे, विलक्षण आहे. एकतर ते तेराव्या शतकात श्रीपादांच्या अनेक चमत्कारपूर्ण जीवन प्रवाहाबरोबरच लिहिले जात होते.

ज्योतिष हे शास्त्रच ! ...आणि आता मान्यताप्राप्त शास्त्र. डॉक्टर .प्रा. संजय होनकळसे .

लेखक dr sanjay honkalse यांनी सोमवार, 30/08/2010 17:41 या दिवशी प्रकाशित केले.
">ज्योतिष हे शास्त्रच ! ... आणि आता मान्यताप्राप्त शास्त्र. डॉक्टर .प्रा. संजय होनकळसे . M.A.;M.Phil.;M.D.;M.Com.LL.B.D.B.M.;D.H.E. drsanjayhonkalse@gmail.com http://drsanjayhonkalse.tripod.com ज्योतिष शास्त्र हे प्राचीन शास्त्र असून त्याची उत्पत्ती ही भारतात व ब्याबिलोन संस्कृतीत झाला आहे.

देवा तु चुकलास

लेखक प्रीत-मोहर यांनी सोमवार, 30/08/2010 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
देवा तू चुकलास.... माणसाला बनवताना मन का दिलेस? सगळं साठवण्याची कुवत का दिलीस? टोचत रे खूप आत्ता.....सहन होत नाही मन दिलेस ते दिलेस.....भावना ही दिल्यास आत्ता लहान सहान गोष्टींतले...हेतू कळतात... न कळते तर बरं झालं असतं.... आता केलीस ती चूक केलीस पुन्हा मात्र चुकू नकोस..... माणसासारखा बनू नकोस.... माणूस काय......
काव्यरस

भगवान श्रीकृष्ण - सत्य की मिथ्य?

लेखक सहज यांनी सोमवार, 30/08/2010 12:54 या दिवशी प्रकाशित केले.
कृष्णा - हिस्टरी ऑर मिथ नामक एक माहीतीपट नुकताच पहाण्यात आला. डॉ. मनिष पंडीत, पुण्याच्या बी जे मेडीकल कॉलेज येथे शिकून १९९०चा दशकात इंग्लंड येथे स्थाईक झाले. तेथे सर्जन म्हणुन काम करत असताना २००३ मधे ते न्युक्लीयर मेडीसीन या क्षेत्राकडे वळले. महाभारत विषयासंबधी एका शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासामुळे त्यांचे कुतूहल जागृत होउन त्यांनी 'कृष्णा - हिस्टरी ऑर मिथ' हा माहीतीपट काढला.

मूव्हींग ग्राफिटी

लेखक भीडस्त यांनी सोमवार, 30/08/2010 12:12 या दिवशी प्रकाशित केले.
वाहनांच्या पाठीवर लिहिलेला मजकूर खूपच मनोरंजक असतो.लांबवरच्या कंटाळवाण्या प्रवासातला शीणवटा क्षणात दूर करण्याचं सामर्थ्य ही कधी भावनाप्रधान तर कधी चटकदार असणारी वाक्यं अंगी बाळगून असतात. पण आताशा हे लिखाण मनोरंजनाबरोबरच उद्बोधनाचंही काम करत आहे. काही दिवसांपूर्वी रस्त्यावर चालणार्‍या ट्रकच्या मागे वाचायला मिळालेली वाक्यं चांगलीच मासलेवाईक आहेत. १) जीवनाच्या वाटेवर सत्कार्य करताना कुत्र्यांपेक्षा माणसंच जास्त आडवी येतात.

पाकिस्तानात आलेला पुर व त्याला मदत करायची झालेली भारताला घाई

लेखक रणजित चितळे यांनी सोमवार, 30/08/2010 11:59 या दिवशी प्रकाशित केले.
पाकिस्तानात पुर आला. आतोनात नुकसान झाले. आपण माणुसकी म्हणुन ५० लाख डॉलर्स मदत देऊ केली आहे. गेले एक महीना भर आपण प्रयत्न करत आहोत की पाकिस्तान ने भेट कबुल करावी म्हणुन. पाकिस्तान कधी म्हणते कि त्याला भारताकडुन भेट नको. खाण्यापिण्याच्या गोष्टींवरच्या वेष्टणावरचे भारताचे चिन्ह काढुन मग ते पुर ग्रस्ताना वाटतानाची चित्र दुरदर्शन वर दाखवली जात होती ती सगळ्यानी पाहीलीच असतीलच. मदत मिळणा-यांना समजु नाही की भारताने मदत दिली आहे त्यापेक्षा भारताचा अपमान कसा होईल ह्यातच पाकिस्तानी नेत्यांना स्वारस्य आहे असे दिसते. आपण फारच आग्रह धरला म्हणुन त्यानी भेट कबुल करायचे ठरवले.