आता फाशीची काय गरज?
पाकिस्तानातून शांतिसंदेश घेऊन आलेले लोकोत्तर पुरुष जनाब अजमल कसाब ह्यांची बिर्याणी नुकतीच बंद झाल्याचे दु:खद वृत्त कळले.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/13343396.cms
आपल्या जनजागृतीच्या प्रयत्नाला अनवधानाने किंचित हिंसक स्वरुप लाभून त्यात किरकोळ लोकांची हानी झाली त्याबद्दल ह्या महात्म्याला मृत्युदंड झाला म्हणून ह्या देशाचे शांतिप्रिय पिते स्वर्गात तळमळले असतील ह्यात शंका नाही.
पण सरकारने आपल्या परीने ह्या क्रूर शिक्षेला पुढे ढकलून आपले शांतिपूर्ण हेतू सिद्ध केले आहेतच.
मिसळपाव
