Skip to main content

फस्ट साईट लव....

लेखक चेतन677 यांनी मंगळवार, 18/08/2015 18:28 या दिवशी प्रकाशित केले.
राहुल एकदा कोथरुड डेपोवरुन चिंचवडला येत होता...पीएमटी मध्ये तशी जास्त गर्दी नव्हती.थोड्याच वेळात डेक्कन आलं.तिथुन एक तरुणी बस मध्ये बसली.तिने बाकीच्या मुलींप्रमाणे पुर्ण चेहरा स्कार्प मध्ये लपवला होता.बसमधील गर्दी वाढण्याऐवजी कमी होत होती.थोड्याच वेळात तिने स्कार्प काढला.ती अतिशय देखणी मुलगी होती.का कोणास ठाऊक राहुलच्या ह्रदय अजुन जलद गतीने धडधडायला लागलं.त्याच्या कंटाळवाण्या चेहर्‍यावर हास्य फुलले.क्षणभरात ती मुलगी राहुलला हवीहवीशी वाटत होती. मित्रांनो बर्‍याच जणांच्या आयुष्यात अस काहीतरी घडत असतं.या विषयावर काही चित्रपटही बनवले गेलेत.हे नक्की प्रेम असतं की आकर्षण?अशामध्ये

अस्तित्वकण

लेखक अर्थहीन यांनी मंगळवार, 18/08/2015 16:00 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच ब्राम्हवृंद, घासुन-पुसून पुरंदरेंच्या पुरस्काराला सपोर्ट करतायत... बरेच मराठे, चिडून-दाबून पुरंदरे या व्यकती/जातीला विरोध करतायत... उर्वरित महाराष्ट्र 'आम्हाला काही घेणं देणं नाही' या तिरहाईत नजरेने या दोघांच्या (टिपिकल) महाराष्ट्रीय भांडनाकडं ‘साहजिक’ पाहतोय... "अरविंद केजरीवाल ऑनलाइन सेना" दिवसभर "वुई वांट मोदी एज अवर पीम" ला शिव्या देण्यात गर्कय... उभे केलेले कारखाने बंद पाडून तिकडं उस्मानाबादेत मोठमोठे साहेब मोठमोठे मोर्चे काढ़तायत... इकडे शेतकरी नेहमी सारखी पावसाची वाट बघतोय, तिकडे मोदी नेहमीसारखं परदेश दौऱ्यावऱ सेल्फ़ी काढतोय... राहुल नितीश लालू नेमाडे आव्हाड राधे माँ भागवत

पशु-पक्षीभूषण

लेखक तिमा यांनी मंगळवार, 18/08/2015 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
जशी मानवी बहुजनसमाजात जागृती झाली तशी ती, पशु-पक्षी समाजातही होऊ लागली. आधुनिक युगांत तर, शहरांत रहाणार्‍या पशु-पक्ष्यांना मानवी गाणी, साहित्य हेही समजू लागले आणि त्यांत आवड-निवडही निर्माण झाली. त्यांनीही जनसभा घेऊन आपापल्या मागण्या मांडायला सुरवात केली आणि मानवी साहित्यसंमेलनासारखेच ठरावही पास केले. अशाच एका सभेचा हा इतिवृत्तांत. सर्वप्रथम सभाध्यक्षांनी सर्वांचे स्वागत केले आणि आपल्या दोन तासांच्या भाषणाने पशु-पक्ष्यांना झोपेला आणले. नंतर सर्व औपचारिक विधी संपल्यावर , ठरावांसाठी मुद्दे मांडण्याचा प्रस्ताव मांडला गेला. कावळ्यांनी सर्वप्रथम , एका तळयांत होती' या गाण्याविषयी आक्षेप नोंदवला.

किडा वळवळला अन …

लेखक पगला गजोधर यांनी मंगळवार, 18/08/2015 15:33 या दिवशी प्रकाशित केले.
* सत्यघटनेवर आधारित, अत्यंत काल्पनिक कथा. हवेत सकाळच्यावेळीही उकाडा जाणवत होता, गुन्हा-अन्वेशनच्या कचेरीसमोर पोलिस व्हँन उभी होती, नुकतेच बाहेरून आत आलेला इंस्पेक्टर, कचेरीत जमलेल्या सर्वांवरून नजर फिरवत होता, सगळे आपापसात एकमेकांकडे पाहत होते, चालू फ्याशनप्रमाणे त्या पोरसवदा युवकांची, मानेवर रूळणारी व कान झाकणारी अशी, सिनेमातल्या अँन्ग्रीयंगमँन हिरोसारखी हिप्पी केशरचना होती, लांब कॉलर शर्ट अन बेलबॉटम पँट वेश. गावात अफवांचा पूर आला होता. भीतीचे सावट अधिक गडद झालेले. सायंकाळनंतर अंधार पडताच रस्ते निर्मनुष्य होऊ लागलेले.

जीवनाची प्रभावी दशसूत्री !

लेखक निमिष सोनार यांनी मंगळवार, 18/08/2015 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
आपले जीवन हे रोज एकेका दिवसाने आपल्यासमोर येते. थेट मृत्यूपर्यंत!! म्हणूनच आपला प्रत्येक दिवस सारखाच महत्त्वाचा असतो. खाली दिलेल्या दहा गोष्टी रोज करा म्हणजे प्रत्येक दिवस सत्कारणी लागू शकेल. अनेक सकारात्मक विचार, सुविचार आणि पुस्तके वाचून त्यात समान असे काही धागे मी शोधले आणि ते संकलन करून आपल्यापुढे मी मांडतो आहे. त्याने आपल्या सर्वांचा झालाच तर फायदाच होईल, नुकसान काही होणार नाही. त्यामुळे प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? 1) सकाळी देवाला स्मरून दिवसभराची आखणी करून दिवसाची सकारात्मक सुरूवात करावी. आपल्याला जे काही मिळाले आहे त्याबद्दल देवाचे अाभार मानून त्याबद्दल कृतज्ञता बाळगावी.

निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: २- गोरी गंगेच्या काठावरती...

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 18/08/2015 14:45 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवरांना मन:पूर्वक अभिवादन! उत्तराखंडच्या २०१३ च्या महापूरामधील अनुभव शेअर करत आहे. ग्लोबल वॉर्मिंग, क्लाएमेट चेंज, सतत येणारे कोरडे किंवा ओले दुष्काळ, महापूर, भूकंप, वेस्टर्न डिस्टर्बन्स अशा विविध मुद्द्यांना ह्या लेखनातून स्पर्श करत आहे. निसर्गाने मानवाला वेळोवेळी इशारे दिले आहेत व त्यांची तीव्रता वाढत जाते आहे. ह्याचं हे जीवंत अनुभव कथन.

नामाची महिमा न्यारी

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 17/08/2015 21:21 या दिवशी प्रकाशित केले.
नाम संकीर्तन साधन पैं सोपे जळतील पापें जन्मांतरीची. (संत. तुकोबाराय) शेक्सपिअर म्हणतो नावात काय आहे? अरे पण नाव नसते तर शेक्सपिअरला कोणी ओळखले असते. नावाच मुळे शेक्सपिअरला लोक आज ही ओळखतात. नावाची महीमाच न्यारी आहे. व्यक्तीपेक्षा त्याचे नाव मोठे असते. समुद्रावर सेतू बांधताना, राम नाव लिहिलेले पाषाण समुद्रावर तरंगत होते. पण भगवंतानी आपल्या हाताने समुद्रात टाकलेला दगड समुद्रात बुडाला कारण त्या दगडावर राम नाम लिहिलेले नव्हते.

शिंगाड्याच्या पिठाचे लाडू

लेखक अनन्न्या यांनी सोमवार, 17/08/2015 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवारपासून श्रावण सुरू झाला. आता महिनाभर वेगवेगळे उपास केले जातील. उपासाला साबुदाणा खाऊन कंटाळा येतो, आणि आरोग्यासाठीही तो हितकर नाही. शिंगाडा हा कंद उपासासाठी वापरल्या जाणाय्रा पदार्थांपैकी एक असला तरी आपण त्याचा फार कमी वापर करतो. आयुर्वेदिकदृष्ट्या शिंगाडा ऊर्जावर्धक आहे, त्यापासून पीठ तयार करतात. हे पीठ थालिपिठासाठी वापरतात. त्याची खीर, लाडूही करतात. साहित्यः शिंगाड्याचे पीठ दोन वाट्या, पिठी साखर दीड वाटी, साजूक तूप पाऊण वाटी, सुक्या खोबय्राचा कीस अर्धी वाटी, दाण्याचे कूट अर्धी वाटी, वेलची पावडर. कृती: शिंगाड्याचे पीठ कढईत घ्यावे.

"अव दातारम"

लेखक रातराणी यांनी सोमवार, 17/08/2015 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
.. ॐ नमस्ते गणपतये... कानावर नेहमीचे सूर आले आणि नकळत ती त्याच्या अस्तीत्वाच्या तिच्यात असलेल्या खुणा शोधू लागली. रोजचा नियम तिचा. काही झालं तरी अथर्वशीर्ष ऐकल्याशिवाय घराबाहेर पडायचे नाही. अगदीच नाही जमलं तर गाडीत एक सीडी कायम असायची. येणाऱ्या दिवसाला सामोरं जायच बळ यायच मग. एक छोटूसा गणपतीही होता. एरवी नाही व्हायचं तिला पण गणेश उत्सवाचे दहा दिवस रोज एक लालचुटुक जास्वंदाच फूल त्या छोटूशा गणपतीमागे विसावायच. वर्षभर हिच्या गाडीत जीव मुठीत धरून बसलेला तो बाप्पा मग आनंदाने फुलांच्या पाकळ्यात गुरफुटून बसायचा. कारसीटमधे बसलेल्या बाळासारखा.

विवेकानंदांची पत्रे वाचतांना मनात आलेले विचार .

लेखक मारवा यांनी सोमवार, 17/08/2015 12:52 या दिवशी प्रकाशित केले.
मला हिंदु धर्मातील सर्वसंगपरीत्याग संन्यास हि संकल्पना नेहमीच इंटरेस्टींग ( सीरीयसली या अर्थाने इंटरेस्टींग ) वाटत आलेली आहे, एक माणुस एका महान ध्येय्यासाठी वा त्याच्या द्रुष्टीने अधिक श्रेयस्कर अशा अर्थपुर्ण तत्वासाठी वा उच्चत्तम जीवन जगण्यासाठी इतर सर्व मानवी नातेसंबंधांचा त्याग करतो. हे विचारणीय आहे. माणुस खरोखर सर्वसंगपरीत्याग मुळात करु शकतो का ? करण्याने करण्याचा अविर्भाव केल्याने तसे करता येणे शक्य असते का ? मुळात असे त्याला का करावेसे वाटते ? जन्मापासुन ते मृत्युपर्यंत माणुस कुठल्या ना कुठल्या गोष्टीशी व्यक्तीशी संबधात असतोच असतो.