Skip to main content

चिकन ६५ का ब्वा??

लेखक सत्याचे प्रयोग यांनी शनिवार, 07/10/2017 21:12 या दिवशी प्रकाशित केले.
बऱ्याच वेळा चिकन ६५ घरी केले गेले आणि सारखा मनात प्रश्न घोळत होता या रेसिपीला चिकन ६५ का ब्वा म्हणत असतील ?? उत्सुकतेने गूगल काकाकडे काही माहिती शोधली तर बरीच रंजक माहिती मिळाली. 1) पुर्वीच्या साऊथ इंडियन लोकांमध्ये 'कोण किती मिरच्या खातो' याच्यावरून चुरस असायची. यातूनच एका हॉटेल व्यावसायिकाने एक डिश बनवली. त्या डिशमध्ये एक किलो चिकनमध्ये ६५ मिरच्या असायच्या. म्हणून चिकन-६५ ! 2) ही डिश अस्तित्वात आली, त्यावेळी तिला आधी काही दिवस लोणच्यासारखं साठवून ठेवलं जायचं आणि मगच सर्व्ह केलं जायचं. साठवून ठेवण्याचा हा कालावधी ६५ दिवसांचा असायचा आणि म्हणून चिकन-६५ !

कायदेशीर सल्ला/मदत मिळेल का?

लेखक अज्ञात यांनी शुक्रवार, 06/10/2017 16:11 या दिवशी प्रकाशित केले.
गाभा: माझ्या मावसभावाच्या बाबतीत खालील घटना घडल्या आहेत , कृपया जाणकार लोकांनी योग्य तो सल्ला द्यावा ! १) याने एका सेबी नोंदणीकृत कंपनीत DMAT अकाउंट उघडला होता.त्या कम्पनीने मोठ्या मोठया गोष्टी सांगून त्याला कमोडिटी ट्रेडिंग करण्यास सांगितले.काही काळानंतर त्याच्याकडून ५० हजार रुपये ऍडव्हान्स ब्रोकरेज म्हणून घेतले.आता त्याला अकाउंट बंद करायचा आहे कारण त्याचे बरेच पैसे त्यांच्या टिप्स मुळे बुडले आहेत.पण आता ती कंपनी पैसे परत देण्यास नकार देत आहे कारण आमच्याकडे अशी काही पद्ध्धत नाही म्हणत आहे.तुम्ही जो प्लॅन घेतला होता तो नॉन रिफंडबल होता असे त्यांचे म्हणणे आहे पण आधी असे काहीच आणि कुठेच सां

काहीतरी नक्कीच आहे....२

लेखक सतिश पाटील यांनी शुक्रवार, 06/10/2017 12:35 या दिवशी प्रकाशित केले.
या विषयावरील आधीच्या लेखाची लिंक खाली काहीतरी नक्कीच आहे... प्रसंग ५- भावाचे लग्न झाले होते म्हणून मी अणि बायको, जवळच असलेल्या आमच्या दुसरया घरी रहायला गेलो होतो. ते घर दुमजली होते. वरच्या अणि खालच्या मजल्यावर भाडेकरू ब्याचलर मुले बरयाच वर्षांपासून राहत होती. आम्ही रहायला आल्यावर खालची मुले दुसरीकडे रहायला गेली. त्यांचा आजुबाजुच्या लोकांना कधीच त्रास न्हवता अणि त्या मुलांना देखिल कुणाचा त्रास कधी न्हवता. तिथे जवळच माझा शाळकरी मित्र मंग्या राहत होता. त्यामुळ त्याला सारा परिसर चांगलाच महित होता.

डंकर्क.... भाग ३

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 06/10/2017 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
पण त्या क्षणी तरी विजयमाला हिटलरच्या आर्देन्सच्या जंगलातून परजत येत असलेल्या चिलखती दलाच्या गळ्यात पडली होती.... पुढे चालू... Simple, Free Image and File Hosting at MediaFire अर्देन्सच्या जंगलात फ्रान्सच्या ९व्या आर्मीमागे या सेना स्वैर संचार करून त्यांना हैराण करत होत्या. फ्रान्सच्या सैन्यात गोंधळाचे व भीतीचे वातावरण पसरले होते. पराभूत मनोवृत्तीने जोर धरला होता.

अनवट किल्ले २०: बहिर्जी नाईकांची स्मॄती जपणारा, भुपालगड, बाणुरगड(Bhupalgad, Banurgad )

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 06/10/2017 10:48 या दिवशी प्रकाशित केले.
शाहिस्तेखानाने चाकणच्या भुईकोटाचा ताबा पंचावन्न दिवसांच्या तिखट प्रतिकारानंतर मिळवला (१४ ऑगस्ट १६६०) आणि या कोटाचे हवालदार काहीसे हताश होउन राजगडाच्या पायर्‍या चढत होता, आता राजे काय शिक्षा सुनावताहेत या चिंतेने ग्रासलेला हा किल्लेदार राजांसमोर उभा राहिला आणि राजांनी त्यांना शिक्षा सुनावली, आदिलशाही सरहद्दीवरच्या भुपालगडाची किल्लेदारी. हे किल्लेदार होते फिरंगोजी नरसाळा.

महाकवी कालिदास

लेखक आदित्य कोरडे यांनी शुक्रवार, 06/10/2017 06:57 या दिवशी प्रकाशित केले.
महाकवी कालिदास कुणाला माहिती नाही? फक्त भारतीयच नव्हे तर सगळ्या जगाला ललाम भूत झालेला हा थोर कवी, नाटककार. पण त्याच्याबद्दल, म्हणजे त्याच्या वैयक्तिक, खाजगी आयुष्याबद्दल फारसे काही कळत नाही. एवढेच काय, त्याचा नक्की कालखंड कुठला हे देखील खात्रीलायकपणे सांगता येणे मुश्कील आहे. एक तर विनयामुळे असेल किंवा अन्य काही कारणे असतील; पण त्याने स्वत:बद्दल फारसे काही लिहून ठेवले नाही किंवा लिहिले असेल तरी ते अजून कुठे सापडले नाही. प्रा. वि. वा. मिराशी , रावबहादूर चिंतामणराव वैद्य, प्रा. र. ना. आपटे इ. पंडितांच्या मते तो शकांचा पराभव करणारा सम्राट विक्रमादित्य ह्याच्या पदरी होता.

सोनदऱ्यातली दिवाळी

लेखक Naval यांनी गुरुवार, 05/10/2017 21:25 या दिवशी प्रकाशित केले.
sonadara दिवाळीचं वातावरण सुरु झालं कि आजही आठवते ती आम्ही साजरी केलेली एक आगळी वेगळी दिवाळी. ही बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझे आजोबा (आईचे वडील) शिक्षण उपसंचालक म्हणून रिटायर झाल्यानंतर एका आश्रमशाळेत जाऊन राहत होते. रिटायरमेंटनंतरच आयुष्य सामाजिक कामात वाहून द्यायचं त्यांनी ठरवलं होतं. डोमरी,कोठिंबा आणि यमगरवाडी या तीन गावातल्या आश्रमशाळांशी ते जोडले गेले. त्यांच्या कामात होईल तो वाटा ते उचलत होते. त्यांच्याकडून आम्ही नेहमी तिथले खूप किस्से ऐकायचो. ते आम्हाला म्हणायचे अरे ते आयुष्य येऊन बघा एकदा तरी.

पोस्टरबाजी - ऐक दिखाऊपणाची गरज

लेखक ओरायन यांनी गुरुवार, 05/10/2017 18:08 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही शहराबाहेर, गावाबाहेर बाईकने, कारने, अथवा अन्य वाहनाने जात असतांना ,बाहेर रस्त्याच्या कडेला हास्यमुद्रेत असलेले ४,५ किंवा जास्त जणांचे टोळकं दिसतच. अर्थात हे टोळकं असत पोस्टरवर..कोणाचा वाढदिवस, किंवा कोणाची कुठेतरी लागलेली वर्णी ह्या साठी हे सर्वजण पोस्टरवर, शुभेच्छा देण्यासाठी किंवा अभिनंदन करण्यासाठी , विराजमान झालेले असतात. हे तुम्हांला तुमच्या शहरात, गावात पण मोक्याच्या ठिकाणी पण हास्यवदन करीत असतात. बर ,नाही बघायचे ठरवले तरी ते अशाप्रकारे लावलेले असतात की त्यांचे मुखदर्शन ओझरते का होईना होतेच.