Skip to main content

बोली भाषा 'नगरी'

लेखक ओरायन यांनी सोमवार, 13/11/2017 10:30 या दिवशी प्रकाशित केले.
लेखक : चंद्रशेखर अवटी *अहमदनगरची आवडती 'बेक्कार' बोली* नगरी बोली अहिराणी, वऱ्हाडी, तावडी, कोकणी, कोल्हापुरी या बोलींप्रमाणे ठळकपणे उठून दिसणारी निश्चितच नाही; पण तिच्यात स्वतःचे असे वेगळेपण आहे. उत्तर बाजूने खान्देश, पूर्वेला मराठवाडा, पश्चिमेला कोकणकडा, दक्षिणेला सोलापूर-पुणे यामुळे आसपासच्या प्रदेशाचा मोठा प्रभाव लगतच्या कोपरगाव, जामखेड, पारनेर, श्रीगोंदा अशा काही तालुक्यांवर आहे. मराठीतले अव्वल ग्रंथलेखन, महानुभावांचे म्हाइंभटासह अनेक ग्रंथकार आणि लीळांची स्थाने इथलीच. ज्ञानेश्वरी, नाथपंथीयांचे ‘अमर-शिष्य संवाद’पासून लेखन याच परिसरात घडले.

हे टाळता आले असते? -३ एरोपेरू: फ्लाईट- ६०३

लेखक लाल टोपी यांनी सोमवार, 13/11/2017 07:39 या दिवशी प्रकाशित केले.
हे टाळता आले असते? -१ वारिग फ्लाईट २५४ हे टाळता आले असते?- २ एअर कॅनडा फ्लाईट १४३ १ ऑक्टोबर, १९९६ रात्री मियामीहुन, सॅन्टियागो, चिली येथे जाणारे बोईंग - ७५७ लिमा, पेरू आंतराष्ट्रीय विमानतळावर नियमित थांबा घेण्यासाठी उतरले तेव्हा त्यात १८० प्रवासी होते.

गूढ अंधारातील जग

लेखक सुबोध खरे यांनी रविवार, 12/11/2017 22:45 या दिवशी प्रकाशित केले.
गूढ अंधारातील जग आपण कधी खिडकीच नसलेल्या कार्यालयात काम केलं आहे का? महिनोंमहिने सूर्यप्रकाश , चंद्रप्रकाश, उघडे आभाळ पाहिलेले नाही. तीन तीन महिने २४ तास त्याच त्याच माणसांचा चेहरा पहिला आहे का? तीन महिने सलग बिन अंघोळीचे राहिला आहात काय ? आणि वापरलॆले कपडे न धुता टाकून दिले आहेत का? डिस्पोझेबल डायपर नव्हे तीन महिन्यात केस कापता आले नाहीत म्हणून एखाद्या गोसाव्यासारखे वाढू दिले आहेत का?

डेरमाळ-पिसोळ ट्रेक

लेखक नमिता श्रीकांत दामले यांनी रविवार, 12/11/2017 17:05 या दिवशी प्रकाशित केले.
         डेरमाळ-पिसोळ ट्रेक   ङेरमाळ आणि पिसोळ, फार दिवसांपासून हुलकावणी देत असलेले बागलाणातले अनवट किल्ले. गाळणा टेकड्यांमध्ये वसलेल्या या किल्ल्यांची उंची जरी फार नसली तरी विस्तार विस्तृत आहे. त्यामुळे एकेक किल्ला शांतपणे बघायला एक संपूर्ण दिवस तरी हवाच. सतराव्या शतकामध्ये  राठोडवंशीय बागुल राजे पिसोळसह इतर किल्ल्यांवर वास्तव्यास होते. त्यांच्यावरुनच या प्रांताला बागलाण असे नाव पडले. ३२ वा बागुल राजा नामदेव याने गवळी राजाचा पराभव करुन पिसोळ, डेरमाळ व मुल्हेर हे किल्ले घेतले.

Making of photo and status : ६. च्यामारी !!!

लेखक सचिन काळे यांनी रविवार, 12/11/2017 09:09 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना : ज्यांची प्रस्तावना वाचायची राहून गेली असेल, त्यांनी ती वाचण्याकरिता कृपया खाली दिलेल्या लिंकवर हळुवारपणे टिचकी मारावी. http://www.misalpav.com/node/41232 च्यामारी !!! आहे कसलं हे चित्र ? मला तर फक्त एक डोळा तेवढा ओळखीचा वाटतोय.

मैत्रिणीचा नवरा

लेखक आगाऊ म्हादया...... यांनी रविवार, 12/11/2017 00:42 या दिवशी प्रकाशित केले.
परवा मैत्रिणीकडे गेलो होतो, तिचं लग्न ठरल्याचं कळलं होतं. तीने भेटायला सहजचं बोलावलं होतं, पण गाठ पडली तिच्या भावी नवऱ्याशी. बऱ्याच गप्पा झाल्या. इकडच्या तिकडच्या. मला फार प्रश्न पडतात बोलताना, की हं, हे झालं; आता काय बोलायचं? त्याला तसले काही प्रश्न पडत नव्हते. मुळात स्वत:बद्दलच फक्त बोलायचं असेल तर असले प्रश्न पडत नाही साधारणपणे. तिच्या वडिलांना भेटलो नंतर. काका एकदम खुश. माझ्या पाठीवर गुद्दा मारत म्हणाले, “मग? कसा वाटला आमचा जावई?” जे वाटलं ते सांगण्यासारखं नव्हतं आणि त्या ऐवजी वेगळं काही सांगण्याइतकी प्रतिभा नव्हती.

पुणे ते लेह (भाग १ - पूर्वतयारी)

लेखक अभिजीत अवलिया यांनी शनिवार, 11/11/2017 21:15 या दिवशी प्रकाशित केले.
कुठून बरं सुरवात करावी ? हां. साल २०११. पुण्यातील एका टूर ऑपरेटरने लडाख भागातील फोटोंचे प्रदर्शन भरवले होते. लडाख हा भाग तोपर्यंत मला ऐकून माहित होता. इंटरनेट वापरत असलो तरी त्याचे तितके ऍडिक्शन झाले न्हवते. त्यामुळे कधीच गूगल मध्ये 'लडाख फोटोज' असे सर्च पण केले न्हवते. लडाख भाग किती सुंदर आहे हे तेव्हा पहिल्यांदा फोटोंचे प्रदर्शन बघितल्यावर समजले आणि लवकरच इकडे जायचे हे मनाशी पक्के ठरवले. सर्वप्रथम २०१२ साली कंपनीतील आम्ही काही जणांनी मिळून लडाखला जायचे ठरवले. दिल्ली पर्यंत विमानाने जाऊन तिथून बसने मनालीला जायचे आणि मनालीतून बाईक भाड्याने घेऊन लडाख पालथा घालायचा आणि विमानाने परत यायचे.

हिवाळी भटकंती: सुधागड, भोरपगड( Sudhagad, Bhorapgad)

लेखक दुर्गविहारी यांनी शनिवार, 11/11/2017 14:36 या दिवशी प्रकाशित केले.
औरंगजेबाच्या कराल मगरमिठीतून महाराजांची सुटका झाली आणि राजगडावर परतल्यानंतर त्यांनी एकुणच जयसिंगाचे आक्रमण आणि आग्रा भेट याचा सकल विचार करून काही महत्वाचे धोरणात्मक निर्णय घेतले. स्वराज्याची राजधानी राजगडावरून हलवणे हा त्यापैकी एक महत्वाचा निर्णय. राजगड बेलाग तर होताच, पण तो पठारी प्रदेशात वसलेला. मागे शाहिस्तेखानाच्या स्वारीच्या वेळी मोगली फौजानी काही पायथ्याच्या गावात जाळपोळ केलेली. त्यात जसा पुरंदरला वेढा पडला, तसा भविष्यात एखाद्या सरदाराने राजगडाला वेढा घातल्यास, अडचणीचे होईल, हे ओळखून एखाद्या बेलाग आणि शत्रुला सहजासहजी पोहचता येणार नाही अश्या गडावर राजधानी हलवने आवश्यक होते.

काही सांगायचे आहे

लेखक संदीप-लेले यांनी शनिवार, 11/11/2017 11:06 या दिवशी प्रकाशित केले.
काही सांगायचे आहे, सांगावया जमेल का? ज्यांनी ऐकायचे, त्यांना ऐकावया जमेल का? अनुभव टिपताना, मन शब्दबंबाळले शब्द त्यातला शहाणा, वेचावया जमेल का? रेष असो ललाटीची, वा असो तळहाताची नसणार सरळ, हे मानावया जमेल का? चित्रमय जग सारे, काय सोडू? काय भोगू? मयसभा कोणती ते, ओळखाया जमेल का? हाती लागला परीस, सर्वांच्याच हाती सोने धूर पिऊन सोन्याचा, जगावया जमेल का?

म्हैसुर सहल (पूर्वतयारी)

लेखक सुकामेवा यांनी शुक्रवार, 10/11/2017 21:42 या दिवशी प्रकाशित केले.
दरवर्षी प्रमाणे दिवाळीची सुट्टी संपल्यावर नेहमी सारखे कुठेतरी जायचे म्हणून विचार चालू केला. ऑफिस मध्ये १५ दिवसांची सुट्टी आधीच राखून ठेवली असल्यामुळे वेळेचा प्रश्न निकालात निघाला होता. दिवाळीच्या सुट्टीत ऑफिसमधील सहकारी सुट्टीवर असल्यामुळे सहलीचे नियोजन करायला वेळ कमी मिळत होता. तरीपण हो नाही हो नाही करत ठिकाणाची यादी बनवायला घेतली. अगदी रणथंबोर, कन्याकुमारी, ताडोबा, मध्य प्रदेश (इंदोर, रावेरखेडी इ.) पासून ते म्हैसूर पर्यन्त.... ठिकाण कसेबसे नक्की झाले तिथून पुढे पुढची तयारी सगळ्यात महत्वाचे म्हणजे दोन कन्यांना घेऊन जायचे कसे आणि कधी..