Skip to main content

ग्रामीण करमणूक-मनोरंजन

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी मंगळवार, 01/05/2018 15:30 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे उत्तर महाराष्ट्र ग्रामीण वासियांची करमणूकीची साधनंही इतर गावांप्रमाणे पारंपरिक होती. अनेक लोकपरंपरा सादर करत आणि त्यांचा आस्वाद घेत गाववासी आपली करमणूक करून घेत असत.

नास्तिक म्हणजे काय ?कुणी नास्तिक असू शकते का?

लेखक आदित्य कोरडे यांनी मंगळवार, 01/05/2018 10:04 या दिवशी प्रकाशित केले.
नास्तिक म्हणजे काय ?कुणी नास्तिक असू शकते का? नास्तिक असणं ही काही सोपी गोष्ट नाही. मुळात आपण नास्तिक आहे कि नाही हे ठरवणे सुद्धा फार अवघड आहे. नास्तिक म्हणजे देवाला न मानणारा किंवा देवा धर्माचे अस्तित्व न मानणारा माणूस, हा प्रचलित पण फार संकुचित अर्थ झाला. देव न मानणे ह्याकरता निरीश्वरवादी ही संज्ञा आहे, तसच अज्ञेयवादी ही संज्ञा देवाच्या किंवा ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल शंका किंवा संशय व्यक्त करणाऱ्यासाठी वापरली जाते. नास्तिक ह्या शब्दाची फोड करून पहावे म्हटले तर देवाचे अस्तित्व नाकारणारा असा अर्थ अनेक ‘जन’ जो काढतात, पण तो ओढून ताणून काढलेला अर्थ वाटतो.

वर्तुळ!

लेखक उपयोजक यांनी मंगळवार, 01/05/2018 07:46 या दिवशी प्रकाशित केले.
नित्या! अारं किती दिवसानं दिसायलास! आनि हिकडं कुटं रे? सुन्या तू पन बदललास लेका! जाड झालाईस चांगलाच! व्हय लेका. आरं पन हितं कुटं बोलत बस्लोय आपन,चल च्या घ्यीऊया.निवांत बोलाय यिल! चा मस्त हाय रे हितला! बर नित्या सांगितल न्हाईस हिकडं कुटं आल्तास? आरे सुन्या ह्या पलिकडच्या कारखान्यात कामाला हाय मी! वर्ष झालं. हा हा बरोबर! मीच हिकडं लई दिवसानं आलो न्हाईतर आधीच गाट पडली असती. ते न्हवं आयटीआय नंतर तू कुटं दिसलाच न्हाईस.काय संपर्क न्हाई.आनि आज तीन वर्षांनं गाट पडली आपली.कुटं हुतास इतकी वर्ष? आरं हुतो हितंच.डिप्लोमा केला लेका! पॉलटेक्निकचा! काय सांगतोस? म्हंजे आता इंजिनेर झालास म्हन की!

माझ्या महाराष्ट्राचं गाणं

लेखक अनन्त्_यात्री यांनी सोमवार, 30/04/2018 22:47 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्राच्या अभिमानास्पद वैशिष्ट्यांना एकत्र गुंफण्याचा माझा प्रयत्न : =================== बेलाग कातळ कड्याची कपार त्यातून खुणवी गरुडाचे घर घाटाचे वेटोळे माळती डोंगर माडा पोफळीशी खेळतो सागर पाटाच्या पाण्याची खळाळ लकेर घामाच्या खताने फुलते शिवार शेताच्या बांधाशी चटणी भाकर कष्टाच्या घासाला तृप्तीचा ढेकर खिलारी जोडीला पोळ्याचा शृंगार भारूडा भुलवी लावणी शृंगार ओवीच्या अंतरी शांतीचा सागर अभंग झंकारे झेलून प्रहार भक्तीने भिजतो चंद्रभागातीर दिंडीच्या रिंगणी विठूचा गजर पडघम ढोलाचा,लेझीम लयदार तडतड ताशाची, वाजंत्री सुस्वर मंजुळ सनई, चौघडा गंभीर कीर्तनाचे रंगी टाळांचा झंकार
काव्यरस

किस्सा ए पारसी

लेखक आदित्य कोरडे यांनी सोमवार, 30/04/2018 18:23 या दिवशी प्रकाशित केले.
किस्सा ए पारसी पारशी लोक म्हटले कि आपल्याला ही गोष्ट अगदी आवर्जून सांगितली जाते कि ते ८व्या कि ९व्या शतकात इराण मधल्या मुसलमानी आक्रमणामुळे पलायन करून गुजरात मधल्या संजाण नावाच्या गावी आले आणि त्यानी तिथल्या राजाकडे( जाधव राणा किंवा यादव राणा )आश्रय मागितला मग त्याने दुधाने भरलेला वाडगा पाठवला – तुमच्या करता इथे जागा नाही हे सुचवायला, तर त्या पारशी लोकांच्या प्रमुखाने त्यात मूठभर साखर टाकली – ह्या साखरेप्रमाणे आम्ही तुमच्यात मिसळून जाऊ आणि उलट गोडवाच वाढवू असे सुचवण्याकरता. आता ही गोष्ट कितपत खरी आहे ते माहिती नाही. पण खरी नसावी.

फसता फसता जमलेली गोष्ट-२

लेखक शाली यांनी सोमवार, 30/04/2018 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
प्रवासाचा ऊद्देश फक्त खादाडी असल्याने ताम्हीणी घाटाला टांग मारुन सरळ एक्सप्रेस-वेने पेण-वडखळ करीत अलीबाग गाठायचे ठरले. माझ्याकडे फरसाण-फळे होतीच. स्वातीनेही दशम्या, चटणी, लोणचे आणि फोडणी घातलेला दहीभात घेतला होता. त्यामुळे नाष्ट्यासाठी हॉटेल शोधायचा वैताग नव्हता. हवाही छान होती. कुमारांचे ‘अवधुता, गगन घटा गहरानी रे’ लावले आणि निघालो. चार तासाचा तर प्रवास होता. त्यामुळे रमत गमत निघालो. एक्सप्रेसवेवर यायच्या अगोदर ईंद्रायणी नर्सरी जवळ गाडी बाजूला घेतली. शेतात मस्त चटई टाकली आणि सकाळचा नाष्टा ऊरकला. कुणाच्या हातात काय जादू असते कळत नाही. आता दही-भातात काय करायचे असते?

तप्त झाली धारा सारी , दहाही दिशा त्या पेटल्या

लेखक खिलजि यांनी सोमवार, 30/04/2018 17:58 या दिवशी प्रकाशित केले.
तप्त झाली धरा सारी दहाही दिशा त्या पेटल्या दिनकराशी हात मिळवुनी उग्र होऊनि परतल्या ॥ मरूत व्यस्त, घाले गस्त थैमान चहूकडे माजले पशु, प्राणी, झाडे, पक्षी नद्या नाले भाजले ॥ रुक्ष झाले वृक्ष सारे सावलीपण महाग ती यत्र तत्र वणवा पेटला स्वस्त झाली आग ती ॥ कोपला तो, झोपला तो भक्ती कमी जी जाहली मोह मायेत प्राण सारे म्हणुनी झाली काहिली ॥ {{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}

बालाशिष स्तोत्र

लेखक खिलजि यांनी सोमवार, 30/04/2018 14:39 या दिवशी प्रकाशित केले.
खरंच खूप दुःख वाटतेय आजकालच्या बातम्या ऐकून ऐकून . वृत्तांकनामधून आजकाल लहान मुलांवरील अत्याचाराच्या बातम्या जरा जास्तच येत आहेत . खूप विषन्न व्हायला होते हे सारे ऐकून . मला जे वाटते ते मी आतापर्यंत करत आलोय . माझ्या मुलाचा जन्म झाल्यापासून मी नित्यनेमाने बालाशिषः स्तोत्र म्हणतो . जेणेकरून खरंच दत्तगुरूंचे रक्षकवच असेल तर ते माझ्या मुलांना लाभावे म्हणून . या स्तोत्राची संख्या ५ आहे . म्हणजे किमान आपल्या मुलांच्या रक्षणासाठी ते दिवसातून किमान पाच वेळा तरी म्हणावे . वरील लिखाणावरून अभिप्रायांची राळ उडू शकते . मला पुन्हा नास्तिक नि आस्तिक वादामध्ये पडायचे नाही आहे .

पुरुष जननेन्द्रियाचे यशस्वी प्रत्यारोपण : अभिनंदन !

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 30/04/2018 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या अर्धशतकात शरीरातील अनेक अवयवांचे प्रत्यारोपण यशस्वी करण्यात वैद्यकशास्त्राला यश आलेले आहे. हृदय, मूत्रपिंड, यकृत, नेत्रपटल, त्वचादि अवयवांची प्रत्यारोपणे आता नियमित होत असतात आणि सामान्यजनांना ती परिचित आहेत. हृदय, मूत्रपिंड आणि यकृत यांचे प्रत्यारोपण हे एखाद्या रोग्याच्या जीवनमरणाशी थेट संबंधित असते. या दृष्टीकोनातून आता पुरुषाच्या जननेंद्रियाकडे बघूया. त्या अवयवाचा गंभीर कर्करोग झाल्यास अथवा ते एखाद्या गंभीर अपघातात नष्ट झाल्यास तो त्या पुरुषासाठी फार मोठा धक्का असतो. संबंधित भागाच्या डागडुजीनंतर तो रुग्ण जिवंत राहू शकतो पण त्याच्या पुढील आयुष्यातील ‘पुरुषार्थ’ संपलेला असतो.