शांतीदूत भारत
शांतीदूत भारत
भारत अमुचा जगात साऱ्या,विश्वशांतीचा देतो नारा ,
शांतीदूत हा, या जगताचा
बहुधर्माचे बहुवंशाचे, भारतवासी एक दिलाचे,
विविधतेत शोधून एकता पालन करिती सहिष्णुतेचे
देव धर्म अन ऐक्याची, शिकवण एका गंगेची
पवित्र गंगा आणि तिरंगा, वंदन करीतो भारत सारा
शांतीदूत हा, या जगताचा
हिमालयातून उगम पावती, अवखळ खळखळ नद्या वाहती,
पावन तिर्थी मंगल क्षेत्री ,गंगेमध्ये विलीन होती,
सवे घेउनी सर्व नद्यांना ,गंगा मिळते थेट सागरा,
भारतदेशा दयासागरा,वैश्विकतेचा तुला किनारा,
.
मिसळपाव
भूत म्हणले की, आजपण आपले कान टवकारले जातात. ह्या भुतावळीचे नाव वाचल्यावर माझे देखील तसेच झाले होते.