Skip to main content

युगांतर - आरंभ अंताचा भाग १६

लेखक मृणालिनी यांनी बुधवार, 31/07/2019 12:46 या दिवशी प्रकाशित केले.
हस्तिनापुर महाल. पुर्वदिशेला सुर्यदेवांचे आगमन झाले तसे महालाच्या खिडकीतून किरणांनी कक्षेत प्रवेश केला. अंबिकेला वरच्या कक्षात जाण्याची आज्ञा राजमातांनी दिली आणि तिने कक्षात प्रवेश केला. तो कक्ष एका दिव्य प्रकाशाने व्यापलेला होता. तिव्र प्रकाश असह्य होऊन तिने डोळे गच्च मिटले. सत्यवती आतुरतेने येरझाऱ्या घालत होती. "माते" महर्षी व्यासांचा आवाज ऐकून सत्यवती त्यांच्या जवळ आली. "पुत्र व्यास.... अंबिकेला....." "पुत्र होईल, माते. परंतु...." "परंतु काय?" सत्यवती मनातून घाबरली. "तो अंध असेल." सत्यवती हातपाय गळल्या सारखी व्यासांकडे बघत राहिली. "मी दिव्यशक्तीला आवाहन केले होते, माते.

कावळा..

लेखक प्राची अश्विनी यांनी बुधवार, 31/07/2019 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
बैसला फांदीवरी हा चिंब भिजुनी कावळा मेघांपरी आभाळीच्या, रंग त्याचा सावळा. तीक्ष्ण त्याची नजर आणि बुद्धी तर तिच्याहुनी, ना धजे कोणी म्हणाया पक्षी दिसतो बावळा. व्यर्थ शोधी भक्ष्य अपुले, ना फळेही दृष्टीला निवडले जे झाड त्याने ते निघावे आवळा? कर्ण जरी नसती, शिरी...आर्त काही घुमतसे थांबला जो थेंब नयनी, काक अश्रू सावळा? या अशा ओल्या दिनी काय भरवावे पिलां आजही नाही कुणाचा पिंड पुजला राऊळा? ( मीटरमध्ये खूप चुका आहेत. पण बिचा-या कावळ्यावरची बिचारी कविता.. मानून घ्या. :))

'पागोळी वाचवा अभियान' शंका आणि समाधान

लेखक सुनिल प्रसादे यांनी मंगळवार, 30/07/2019 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
'पागोळी वाचवा अभियान' हळूहळू पसरत चाललंय. सुरवातीला आम्हाला आमच्या दापोली तालुक्यातूनच त्याबद्दल विचारणा होत होती, परंतु सांगायला आनंद वाटतोय की आता आमच्याकडे सावंतवाडी, कणकवली, राजापूर, रत्नागिरी, चीपळूण, म्हसळा, श्रीवर्धन,अलिबाग, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली पासून ते पुणे, नाशिक, इंदापूर, जुन्नर, नंदुरबार, शहादा, धुळे, औरंगाबाद, बुलढाणा, सेलू, परभणी, सांगली, कोल्हापूर पर्यंतच्या लोकांकडून ह्या अभियानाबद्दलची माहिती विचारली जात आहे. आतापर्यंत नऊशेपेक्षाही जास्त लोक ह्या अभियानाशी जोडले गेले असून अभियानाची माहिती घेत आहेत आणि इतरांनाही देत आहेत. दिव्याने दिवा लागत आहे.

कविता: आज्जी माझी…

लेखक bhagwatblog यांनी मंगळवार, 30/07/2019 15:44 या दिवशी प्रकाशित केले.
आभाळभर माया, आठवणींच्या सुरकुत्या प्रखर बुद्धीची प्रभा, अंगी विशिष्ट कला आज्जी माझी... मायेची पाखर, उडून गेली दूरवर परी आठवण नाही पुसली कदापि आज्जी माझी... संवादातून प्रेमाचे ऋणानुबंध जोडले भेटीत स्नेहच जपले, हेच संचित साधले आज्जी माझी... कधी प्रसंगातून शब्दाविनाच सुटले, डोळ्यातून अश्रु अर्धवट ओघळले, प्रयत्नांत कधी धडपडले, घडले परी मी किंचित नाही घाबरले आज्जी माझी... आप्तांना भेटण्यास जीव कासावीस दिसताच पाणावले डोळे आठवणीने आज्जी माझी... आत्ता शरीर थकले, आणि कृश झाले इच्छा संपल्या, उरल्या फक्त स्मृती आज्जी माझी... पानगळ सुरू झाली आणि फक्त खोडच उरले वसंताची चाहुल लागेल, पुन्हा पालवी फुटेल
काव्यरस

राधी आणि मास्तर

लेखक vaibhav deshmukh यांनी मंगळवार, 30/07/2019 14:35 या दिवशी प्रकाशित केले.
बस देवगाव फाट्यावर आली. कंडक्टरने जोरात आवाज दिला, "देवगाव फाटा कोणी आहे का"? कंडक्टरच्या आवाजाने तो डोळे चोळत उठला. हातातील पिशवी सावरत बसमधून खाली उतरला. कंडक्टरने त्याच्याकडे विचित्र नजरेने बघत दरवाजा जोरात बंद केला. बस पुढे निघून गेली. पुढे जाणार्‍या बसकडे बघत त्याने खांद्यावरची पिशवी सरळ केली. कपडे झटकले.     त्याने घड्याळात पाहिले. रात्रीचे आठ वाजून गेले होते. बस वाटेत बिघडली नसती तर आपण वेळेत गावात पोहोचलो असतो, असा विचार करत असताना त्याचे लक्ष समोरच्या पाटीवर गेले. ' देवगाव तीन किमी'. फाट्यापासून गाव आत तीन किमी होता. त्याने इकडे तिकडे नजर फिरवली.

मोदींनी मॅन व्हर्सेस वाइल्ड मध्ये जाण्याचं काय प्रयोजन असावं?

लेखक alokhande यांनी मंगळवार, 30/07/2019 13:46 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्कव्हरी हा एक जागतिक दर्जाचा चॅनल असून तो जगभर बघिताला जातो. आणि त्याच चॅनल वर जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशाचे पंतप्रधान या जगप्रसिद्ध शो मध्ये जाऊन काय सांगू इच्छितात. किंवा जगभरातील देशांना कोणता संदेश देत असावेत. का हा निव्वळ पब्लिसिटी स्टंट म्हणायचा

खुलं मैदान

लेखक जव्हेरगंज यांनी मंगळवार, 30/07/2019 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
एकतर तिथं फारसं काही दिसत नव्हतं. मोकळं मैदान होतं मात्र. गावाच्या बरंच बाहेर. माळरान नुसतं. बारीक बारीक खड्यांची अथांग जमीन. भुरभुर वाहणारा गारठा वारा. आणि बऱ्याच दूरवर चमचमणारे वीजेचे दिवे. "साडेनऊ वाजल्या बे.." रमाकांत म्हणाला. रमाकांत म्हणजे भेकडी बाई. कशालाही काय घाबरायचं. साडेनऊ म्हणजे काय जगबुडी झाली? "बघ, चंद्रप्रकाश कसला भारीये.." मी बाटलीचं झाकण काढत म्हणालो. "गलास नाहीत की राव आपल्याकडं.." दोनचार चणे तोंडात टाकत तो पुटपुटला. "गलास कशाला पाहिजे? बाटलीनंच प्यायची, दोन आणल्यात." "चिअर्स" बाटल्या धडकवत आम्ही आरंभ केला. कधीतरीच प्यावी पण मोकळ्या मैदानात प्यावी अशी जाम ईच्छा होती.

युगांतर - आरंभ अंताचा भाग १५

लेखक मृणालिनी यांनी मंगळवार, 30/07/2019 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
राजमाता..... अशक्य आहे हे!" "तु ही जाणतोस हे किती गरजेचे आहे." भीष्माचार्य काहीच बोलेनात. "तुझ्या प्रतिज्ञेनुसार तू हस्तिनापूर राजगादीच रक्षण करणार आहेस. हो ना?" "होय राजमाता. शब्द आहे माझा." "पण कसे भीष्म? हस्तिनापुरची राजगादी अशी रिक्त ठेवून?"' "राजमाता...." "राजवंश संपला तर राज्य विखरून जाईल. चालून येणाऱ्या शत्रूला कळले, की राजगादीला कोणी वारस नाही, ती रिकामी आहे, तर शत्रूपुढे हे हस्तिनापुर किती काळ टिकेल? सैन्य एका राजाची आज्ञा ऐकते भीष्मा. प्रजा देखील. राजघराण्याची आज्ञा नाही. ऱाजा नसेल तर कसली राजगादी आणि कसली त्या राजगादीला सांभाळण्याची प्रतिज्ञा?

पावसाच्या धारा

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी मंगळवार, 30/07/2019 09:05 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाच्या धारा -------------------------------------------------------------------------------- पावसाच्या धारा भन्नाट वारा टपटप टपटप पागोळ्या दारा पोरं घरामध्ये बसली अडकून वीज कडाडे ढगोबा धडकून लख्ख प्रकाश आकाश तडकून पावसाचा तोरा धिंगाणा सारा पावसाच्या धारा पाणी साठले त्यात खेळू या धबक धबक ते उडवू या पाण्यात होड्या चला सोडू या पाण्यात भोवरा फिरे गरागरा पावसाच्या धारा तुडुंब पाणी वाहते खळाळून चालावे कसे ? किती सांभाळुन ? कागदाच्या होड्या जाती गोंधळून पावसाचा जोरा तडमतडम नारा पावसाच्या धारा किती पडतो कसा पडतो कधी झरतो कधी दडतो कधी हळूच कधी वाढतो पावसाचा होरा कळे ना पोरा पावसाच्या धारा ------
काव्यरस