Skip to main content

'तंबोरा' एक जीवलग - २

लेखक गौरीबाई गोवेकर नवीन यांनी गुरुवार, 29/08/2019 18:56 या दिवशी प्रकाशित केले.
कालच्या लेखात तंबोर्‍याबद्दल माहिती लिहिली ती तंबोर्‍याची निमिती, जडणघडण आणि भाग या संबंधीची होती. आज जे लिहिणार आहे ते मला आलेल्या तंबोर्‍यासंबंधीच्या अनुभवाविषयी. लहानपणी तंबोरा हातात आला तो परंपरेनं. आई गायची म्हणून. मला खरं म्हणजे शिकायचं होतं. गाणं करायचं नव्हतं पण शिक्षणाचे वातावरण नव्हते. मला शिकवण्यासाठी फारशी उमेदही कुणी दाखवली नाही. कुणी म्हणजे आईनेच. तिचे आपले एकच " तू गाणंच कर व्यवस्थित" तोच आपला पोटापाण्याचा व्यवसाय. स्वराला पक्की होतेच, गळ्यात गोडवाही होता. बुद्धी तेज चालायची. हे सगळं गाण्याच्या पथ्यावर गेलं आणि शिक्षण राहिलं. गंडा बांधला.

युगांतर - आरंभ अंताचा! भाग 39

लेखक मृणालिनी यांनी गुरुवार, 29/08/2019 18:03 या दिवशी प्रकाशित केले.
गडद निळ्या रंगाने सजून कृष्णमय झालेल्या पहाटेने सृष्टीला हलका दवांचा मारा करत जागे केले. पक्षांची किलबिल सुरू झाली तशी साऱ्या नगराला जाग आली. द्वारकेच्या महालातील कृष्णाचा कक्ष कर्णमधुर सुरांनी व्यापलेला होता. पूर्वेचे सुर्यकिरण कक्षभर पसरतील अश्या विशाल खिडकीत निळा-जांभळा मयुर पिसारा फुलवून बासरी ऐकत होता. पहाटेच्या गारव्याने थरथरणारा फुललेला पिसारा ! कृष्ण डोळे मिटून बासरी वाजवण्यात मग्न होता. आज त्याचे सूर काही वेगळेच होते. "अनुज!" कृष्णाने डोळे उघडत बासरी बाजूला केली. "दाऊ?

एक ऐकलेली कार्पोरेट कथा..

लेखक चिनार यांनी गुरुवार, 29/08/2019 17:20 या दिवशी प्रकाशित केले.
आटपाट कंपनी होती. सगळं कसं छान, सुसज्ज,चकचकीत,स्वच्छ वातावरण. अगदी "परिंदा भी पर ना मार सके" अशी सुरक्षा व्यवस्था. हजारो इंजिनीयर्स, शेकडो मॅनेजर्स, जनरल मॅनेजर्स, व्हाईस प्रेसिडंट असे सगळे हुशार लोकं तिथं काम करायचे. अर्थात काम करताना काही ना काही समस्या रोजच यायच्या. पण सगळेच प्रोफेशनल असल्यामुळे, स्वतःच्या अक्कलहुशारीने समस्या सोडवायचे. मग त्याचं कोडकौतुक,बक्षिस,पगारवाढ,बढती असं चक्र नेहमीच सुरु असायचं. पण एके दिवशी अघटीत घडले. नेहमीच्या समस्या बाजूलाच राहिल्या अन एक भलतीच समस्या उद्भवली. कंपनीचे सुरक्षाचक्र भेदून एक माकड कंपनीत शिरले.

शब्द

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 29/08/2019 16:51 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द निरर्थाचे भोई शब्द अर्थभार वाही शब्द धूसर सावली शब्द दाहक बिजली शब्द कोरडा व्यापार शब्द अस्तित्वाचे सार शब्द व्योमापार शिडी शब्द गहनडोही बुडी शब्द अटळ कुंपण शब्दापार मुक्तांगण
काव्यरस

शाली आणि तो

लेखक vaibhav deshmukh यांनी गुरुवार, 29/08/2019 16:28 या दिवशी प्रकाशित केले.
तब्बल तीस वर्षांनी तो त्याच्या गावाला चालला होता. तीस वर्षात सगळ काही बदलल होत. तो बदलला होता. भोवतालचा परिसर बदलला होता. गाव बदलला होता. एवढच काय पायाखालची वाटही बदलली होती. कच्च्या रस्त्याच्या जागी पक्का रस्ता आला होता. काळाच्या प्रवाहात सगळ काही बदलल होत.       मनात विचार करतच तो चालला होता. अंगात सैल कुडता, त्याखाली तशीच सैल आणि ढगळ पँट, वीतभर वाढलेली दाढी. ती त्याने मुद्दाम वाढवली होती. दाढीला शोभतील अशा झुपकेदार मिशा आणि खांद्याला अडकवलेली शबनम पिशवी. एकंदरीत सगळा साधा आणि सरळमार्गी पेहेराव होता त्याचा. पेहरावाला शोभेल असा गरीब आणि भोळा चेहरा.

रुसण्याची मजा

लेखक kool.amol यांनी गुरुवार, 29/08/2019 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
मानवी भावभावना किती सुरेख असतात, नाही? त्यातही कित्येक वर्षांपासून चर्चिला जाणारा आणि पुढील अनेक वर्षात देखील अजिबातच शिळा न होणारा विषय म्हणजे प्रेम! त्यातही हे प्रेम जर प्रियकर प्रेयसी या प्रकारातले असेल तर मग विचारायलाच नको. आपण वयाच्या कुठल्याही टप्प्यावर असलो तरी हा विषय टाळता येणं तसं अवघडच. बरं गंमत म्हणजे ह्या नात्यात काही ठराविक मार्गच नेहमी आपलेसे केले जातात. एकदा प्रेमात पडलात की कोणी काय करायचं आणि त्याहीपेक्षा काय नाही करायचं हे जवळपास ठरलेलंच असतं. म्हणजे बघा ना कितीही नवी पिढी असली तरी काही गोष्टी ह्या क्वचितच बदलतात. ह्या सुंदर नात्यात खूपशा भावना आहेत.

पुस्तक

लेखक दिनेश५७ यांनी गुरुवार, 29/08/2019 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
अलीकडेच माझ्या मनात एक विचार आला. पुस्तक लिहायचा. या पुस्तकाची संकल्पना मी तुम्हाला सांगणार नाही. पण हे नक्कीच वेगळ्या धाटणीचे पुस्तक ठरावे असा माझा प्रयत्न होता. कधीकधी पुस्तकाचे नावच त्याचा गाभा उलगडून दाखविते. म्हणून पुस्तकातील पहिल्या लेखाचे पहिले अक्षर लिहिण्याआधी मी पुस्तकाचे नाव निश्चित केले... ‘युद्ध आमुचे सुरू!’... ज्या डायरीत माझे हे संकल्पित पुस्तक हस्तलिखित स्वरूपात संपन्न होणार आहे, त्या डायरीच्या पहिल्या पानावर मी झोकदार अक्षरात हा मथळा लिहून टाकला आहे. ‘युद्ध आमुचे सुरू!’ ...

श्री गणेश लेखमाला २०१९ - झलक पाचवी!

लेखक साहित्य संपादक यांनी गुरुवार, 29/08/2019 06:41 या दिवशी प्रकाशित केले.
म्हणता म्हणता गणपतीच्या आगमनाच्या प्रतीक्षेचा काळ संपत आलाय आणि भाद्रपद येता येता गणरायालाही सोबतच घेऊन येतो आहे. आजवर घडलेलं सारं भलं-बुरं काही काळासाठी बाजूला ठेवून आता गणपतीच्या स्वागतासाठी तयार राहायचं. येणाऱ्या ह्या पाहुण्याचं आपापल्या परीने मनापासून आगतस्वागत, पूजन करायचं आणि सर्वे भवन्तु सुखिनः असं आशीर्वचन मागायचं. मिपाच्या गणेश लेखमालेवरसुद्धा आता शेवटचा हात फिरवून होत आलाच आहे. लेख, चित्रं, फोटो, ऑडिओ, व्हिडिओ क्लिप्स, सजावट, लिखाणामधले मुद्रणदोष.. एक ना दोन, कित्येक लहान लहान गोष्टी पुनरेकवार पडताळून पाहणं सुरू आहे.